माझा नंबर पयला

पु. ल. देशपांडे यांच्या असा मी असामी  मध्ये नायकाची बायको लग्न झाल्यावर उखाणा घेते तो असा,समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता बेंबट्याच नाव घेते माझा नंबर पयला. यातील विनोद सोडून दिला तरी व्हिंदमातेचा नंबर मात्र पयला बऱ्याच क्षेत्रात येऊ लागलाय  नुकतीच जी बातमी वाचली त्यानुसार परदेशात व्यापार आदि क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी लाच देण्यात भारतीय व्यापारी उद्योजक वगरेंचा अव्वल क्रमांक आहे.

भिंतभ्रमण २ - (चीनची भिंत)

पहिल्या दोन भेटीत मी पायी चढायच्या मार्गाने गेलो होतो. विस्तिर्ण पायऱ्या चढायला सुरुवात करताना एक गमतीशीर गोष्ट नजरेस पडली. भिंतीच्या पायथ्याला, जिथे चढ सुरु होतो, तिथे कठड्याला लांबच लांब साखळदंड बांधलेले होते व त्याला रेशमी फिती लावलेली हजारो कुलुपे लटकत होती. या दृश्याने माझे कुतूहल जागे झाले. सहलसखीला याबाबत विचारले असता तिने एक मजेशीर हकिकत सांगितली

अफजल ची फाशी

ह्या महीन्याच्या २० तारखेला अफजला फाशी होईल, पण त्यांची फाशी रद्द व्हावी म्हणून जे जे प्रयत्न हे राजकीय लोक करीत आहे ते पाहून एकदमच सर्व निराशजनक वाटले. काही लोकांचे प्रतिवाद वाचले / दुरदर्शन संचावर पाहीले तेव्हा वाटलं खरोखरच त्यादिवशी ते अतिरेकी जर यशस्वी झाले असते व चार पाच नेते मंडळी ह्याना शहिद (?) केले असते अथवा त्याना ओलिस धरुन आपल्या साथीदारांना मुक्त केले असते अथवा काश्मीर चा हवा तसा निकाल वदऊन घेतला असता तर ह्या लोकांनी काय केले असते ? असेच वाद प्रतिवाद घातले असते की त्याने काही नाही केले त्याला फसवून / धमकावून ह्या कटात सामिल केले गेले अथवा त्यांने तर एक देखिल गोळी चालवली नाही तर त्याला  फाशी नको.

आधी लेखन की आधी वाचक ?

आधी अंडे की आधी कोंबडी? या प्रश्नाचे समर्पक उत्तर कधी मिळेल असे वाटत नाही. पण आधी लेखन की आधी वाचन? या प्रश्नाचे ढोबळ उत्तर अगदी सोपे आहे. मुळात कांही लिहिलेलेच नसेल तर काय वाचणार? आता कवि लोक "डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे" वगैरे म्हणतात. पण ती लिपीच वेगळी असते आणि न देखे रवी ते पहाणा-या कविमंडळींना ती वाचता येते. जास्त विचार केला तर लक्षांत येईल की माणूस लहानपणी भाषा शिकतांना आधी बोलायला शिकतो, मग वाचायला आणि त्यानंतर लिहायला हा नैसर्गिक क्रम आहे.  रोजच्या आयुष्यात आपण शेकडो अक्षरे या ना त्या कारणाने वाचतो पण कागदावर किती लिहितो?  वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांतील हजारो पाने वाचतो. अनेक जणांनी लाखावर पाने वाचली असतील. पण किती पाने लिहितो आणि त्यातील किती इतर लोक वाचतात?
 
पूर्वीपासूनच मला सुध्दा अधून मधून कांही बाही लिहायची हुक्की यायची. उगाच प्रेरणा, ऊर्मी यासारखे मोठे शब्द वापरण्यात अर्थ नाही. पण कोरा कागद आणि लिहिणारे पेन शोधून काढून दोन चार ओळी लिहीपर्यंत मध्येच फोनची किंवा दरवाजावरील घंटी वाजायची किंवा "अहो, ऐकलत कां?" ची साद येऊन लिहिण्यात खंड पडायचा.  त्यानंतर "आपण लिहिलेलं कोण वाचणार आहे?", "कोणी वाचणारच नसेल तर लिहायचं तरी कशाला ?"  अशा विचारामध्ये ती हुक्की विरून जायची. आधी आपल्याला सुचेल तसं लिखाण करायचं?  कां आधी निदान दोन चार तरी वाचक शोधून त्यांना रुचेल असं कांही लिहायचं? या घोळातच 'ढळला रे ढळला दिन सखया' असं झालं.