ट्यूलिप्सच्या गावा...(३)

आता पवनचक्क्या पहायच्या होत्या,आणि चीजचा कारखाना..


युरोपातला प्रवास नेहमीच सुखकर असतो,वाहन कोणतेही असो.एकतर प्रदूषण कमी,घाण,कचरा नाही,रस्ते बिनखड्ड्यांचे! वाहन चालवायलाही सुख आणि आजूबाजूला पहायला सृष्टीचा खजिनाच. चीज म्युझियम,कारखाना आणि जुन्या पवनचक्क्या पाहण्यासाठी फुलांच्या राज्यातून नाइलाजानेच निघालो.

कवी ग्रेस यांच्या ४ कविता. चंद्रमाधवीचे प्रदेश या काव्यसंग्रहातील.

१) मर्म


ज्याचे त्याने घ्यावे


ओंजळीत पाणी


कुणासाठी कोणी


          थांबू नये!


...असे उणे नभ


ज्यात तुझा धर्म


माझे मीही मर्म


       स्पर्शू नये


२) वाटेपाशी


रात्र थांबवुनी असेच उठावे


तुझ्यापाशी यावे क्षणासाठी!

"गिरी" शब्दावरचा शाब्दीक खेळ -

मनोगतवर सध्या गांधीगिरी पासून सुरवात होऊन मग सावरकरगिरी, भोंदूगिरी, फालतूगिरी इत्यादी शब्द जोरात येयला लागले आहेत. या वरून अत्र्यांनी केलेला एक विनोद जो माधव गडकरींच्या तोंडून "मराठी भाषा कशी लवचिक आहे" यावर ऐकलेला आठवला. तो इथे सांगतो:

ससा आणि कासवाची गोष्ट

तुमच्या आणि आमच्या लहानपणी ऐकलेली गोष्ट आज मी नव्या पीढीच्या मुलांसाठी सांगणार आहे बरं!
             ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. एक होता ससा. जसा सगळ्या गोष्टींमध्ये असतोना तसाच. गोरा गोबरा, मऊ, लांब कानांचा, मण्यासारख्या लालचुटुक डोळ्यांचा आणि टुण्ण टुण्ण उड्‍या मारत झटकन पसार होणारा. एकदा एका कासवाशी त्याची मैत्री झाली. पण कासव होतं हळू, जसं नेहमी असतं तसचं. दोघेही एकाच पालकच्या मळ्यात कोवळा पाला खायला जायचे. ससा कासवाला म्हणाला,''किती रे तु हळू'' '' कासव म्हणालं, ''पण तुला माहिती आहे का, सगळ्या गोष्टींमध्ये ना मीच शर्यत जिंकतो.'' <!--break--> सशाला त्याचं हे म्हणणं जरा आवडलं नाही. नाक मुरडत ससा म्हणाला ''मग काय भाऊ लावायची का शर्यत परत एकदा? या समोरच्या डोंगरावरच्या त्या आंब्याच्या झाडापर्यंत''  कासवं म्हणालं '' हो पण जरा मला सराव करायला दोन दिवसांचा वेळ लागेल. तुला चालेल का?'' ससोबा म्हणाला, '' ठीक आहे मग रविवारी सकाळी नऊ वाजता इथेच भेटूया.'' शर्यत ठरल्यानंतर ससा तडक त्याच्या आजोबांकडे गेला. त्यांना म्हणाला,'' हे काय हो आजोबा प्रत्येक गोष्टीत कासवंच शर्यत का जिंकतं. मला ही गोष्ट खोटी पाडायची आहे. आता काय काय करु ते सांगा.'' ससोबाचे आजोबा त्याला म्हणाले,'' बाळा, जर न थांबता धावलं ना तरच जिंकता येईल शर्यत आणि झोप तर अगदी वर्ज्य. मी झोपल्यामुळेच शर्यत हारलो होतो. '' ससा म्हणाला,'' ठीक आहे मी लक्षात ठेवीन आणि शर्यत जिंकूनच दाखवीन.''