तालीम एकांकिकांची...

     कॉलेज सुरु होतं तसे मला हळू हळू तालमीचे वेध लागतात. माझी तालीम म्हणजे व्यायामशाळा नाही; एकांकिकांच्या तालमीबद्दल बोलतोय मी. शाळेत असताना चुकूनही कधी स्टेजवर न गेलेला मी, एकांकिका करण्यात कसा ओढलो गेलो कुणास ठाऊक? गेली दोन वर्ष बॅकस्टेज करणं आणि मिळालाच तर छोटासा रोल करणं अशीच गेली. मला काय माहीत की फक्त अनुभव आणि शब्दांचे शुद्ध उच्चार एवढा मोठ्ठा रोल मिळू शकतो. मी यावर्षी सायकॉलॉजिस्टच्या भुमिकेत होतो. कधीही न प्रत्यक्ष पाहीलेली व्यक्ती स्टेजवर कशी बरं करावी? इमॅजिन आणि इंप्रोव्हाइज करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. 
     

घरच्या घरी एस्प्रेसो कॉफी (यंत्राविना)

वाढणी
१ जण

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • १ कप गरम दूध,
  • १ छोटा चमचा कॉफी (इंस्टंट),
  • दीड चमचा साखर

मार्गदर्शन

१. एका काचेच्या पेल्यात (पेलाच घ्यावा कारण ह्या कॉफीचा फेस खूप होतो) दीड चमचा साखर व कॉफी घ्यावी.

२. या मिश्रणात एक चमचा पाणी टाकून हे मिश्रण ५ ते ७ मिनीटे चांगले घोटावे.

३. घोटल्यानंतर हे मिश्रण फिकट तपकीरी रंगाची पेस्ट (मराठी शब्द??) होईल.

४. पेस्ट झाल्यानंतर या मिश्रणात एक कप गरम दूध (थोड्याशा उंचीवरून) टाकावे.

माझ्या आजोळची गोष्ट - खाऊगिरी

तात्यांचा मदत हवी हा लेख वाचला, त्यावरची संजोप राव, दिगम्भा यांची कोल्हापुराशी संबंधित टिप्पणी वाचली आणि माझ्या कोल्हापूर प्रेमाबद्दल लिहावेसे वाटले. पाहा वाचवतेय का. :)


वार्षिक परीक्षा जवळ आल्या की आम्हाला सुट्टीचे वेध लागायचे (परीक्षेत काय होणार, अभ्यास करायला हवा वगैरे काळजी दूरच)!! कधी परीक्षा संपतायत आणि कधी पळ काढतोय असे व्हायचे. मैत्रिणींचे काय बेत आहेत, याची चौकशी सुरू असायची आणि गेल्या वर्षी काय धमाल केली होती याचीही उजळणी व्हायची. उत्तरपत्रिका लिहून शिक्षकांच्या हाती सोपवल्या की आमचे काम संपलेले असायचे. निकाल कधी आहे, कसा लागेल याच्याशी ७ वी-८वी पर्यंत तरी आम्हाला कर्तव्य नसायचे. जन्मल्यापासून शाळा संपेपर्यंत १५-१६ उन्हाळे कोल्हापुरात काढले असतील. नुसती धमाल!

"आम्ही काय गुलाम आहोत?"

सहज दीक्षाभूमीसमोर फिरत होतो. एका स्टॉलवर जिजाई प्रकाशनाची बरीच पुस्तके दिसली. श्रीमंत कोकाट्यांचं 'खरा शिक्षकदिन-२८ नोव्हेंबर'; पुरुषोत्तम खेडेकरांचं 'आरक्षण वाढवा,देश वाचवा'; चंद्रशेखर शिखरे सरांचं 'प्रतिइतिहास' आणखी खूप काही! आपल्या घरची माणसं भेटल्यासारखं वाटलं. आणि जी माणसं स्टॉल चालवत होती त्याच्याशी दोन गोष्टी कराव्याश्या वाटल्या. अशी पुस्तकं विकणारी माणसं सहसा धंदेवाईक प्रकाशक नसतात.तर आपला विचार समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहचावा एवढ्याचसाठी न नफा न तोटा या तत्त्वावर काम करणारी जागरूक माणसं असतात हा माझा वैयक्तीक अनुभव!

बुद्धयुगाची प्रतिकृती....

 दि.३० सप्टेंबर २००६.....
स्थळ- पवित्र दीक्षाभूमी, नागपूर


दुपारची वेळ. हजारो कषाय वस्त्रधारी उपासक शिस्तीत उभे. पुज्य भदन्त सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली आठ हजार उपासकांनी श्रामणेर दीक्षा ग्रहण केली. रस्त्यांवर जिकडे तिकडे चिवरधारी श्रामणेर दिसतायत,जणू काही मी बुद्धकाळात राहत आहे.आता कुठून तरी स्वतः भगवान बुद्ध येतील आणि धम्मदेसना करतील असं वाटतंय,इतकं जिवंत वातावरण आहे.

खेळ "साप-शिडी" चा

 "व्हिज्युअल फॅक्ट फाइंडर- हिस्ट्रि टाइमलाईन" ह्या पुस्तकाच्या प्रृ. ११४ वर इ. स. ११९९ ते १२०९ ह्या कालखंडातील जगातील महत्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे. त्याच पानावर 'उल्लेखनीय बाब'(फॅस्सिनेटिंग फॅक्ट) ह्या चौकटीत दिलेल्या माहितीचा स्वैर अनुवाद असा-