तात्यांचा मदत हवी हा लेख वाचला, त्यावरची संजोप राव, दिगम्भा यांची कोल्हापुराशी संबंधित टिप्पणी वाचली आणि माझ्या कोल्हापूर प्रेमाबद्दल लिहावेसे वाटले. पाहा वाचवतेय का. :)
वार्षिक परीक्षा जवळ आल्या की आम्हाला सुट्टीचे वेध लागायचे (परीक्षेत काय होणार, अभ्यास करायला हवा वगैरे काळजी दूरच)!! कधी परीक्षा संपतायत आणि कधी पळ काढतोय असे व्हायचे. मैत्रिणींचे काय बेत आहेत, याची चौकशी सुरू असायची आणि गेल्या वर्षी काय धमाल केली होती याचीही उजळणी व्हायची. उत्तरपत्रिका लिहून शिक्षकांच्या हाती सोपवल्या की आमचे काम संपलेले असायचे. निकाल कधी आहे, कसा लागेल याच्याशी ७ वी-८वी पर्यंत तरी आम्हाला कर्तव्य नसायचे. जन्मल्यापासून शाळा संपेपर्यंत १५-१६ उन्हाळे कोल्हापुरात काढले असतील. नुसती धमाल!