लग्नाचा विषय.

काही दिवसापुर्वी प्रवास करण्याची संधी आली असतांना प्रवासात एक चौकोनी कूटुंब भेटले. नवरा अदांजे ५० वर्षाचा असावा, बायको (४५), मुलगा (२२/२३) आणि मुलगी ( १८) चे असावेत.


मला ते कूटुंब अतिशय सुखी आणि समाधानी वाटले. भाउ आणि बहिणी मधे काही तरी चेष्टा-मस्करी चालु होती, आई या सर्वाकडे कौतुकमिश्रित स्नेहशील नजरेने पाहत होती. नवर्‍याच्या चेहर्‍यावर कमालीची स्थितप्रज्ञता होती. विशेष म्हणजे सर्व कूटुंब दिसण्यामधे आणि आर्थिक दृष्ट्या सामान्य वाटत होते ( कदाचित माझा हा शेरा काही लोकांना आवडणार नाही.).

संतांचा उपदेश

महाराष्ट्रातील संतांनी त्यांच्या अभंगांतून धनाला, उपभोगांना (आणि ते मिळवण्याच्या प्रयत्नांना) तुच्छ लेखण्याचा जो उपदेश केला, त्यामुळे महाराष्ट्र निष्क्रीय झाला, मराठी लोकांमधली स्पर्धात्मक वृत्ती संपली, ते आळशी झाले आणि त्यामुळे एकूणच सर्व महाराष्ट्राचे वाटोळे झाले, असा एक बराच लाडका विचारप्रवाह आपल्याकडे आहे. याबाबत बोलताना, तुकाराम महाराजांच्या 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या उक्तीचा प्रामुख्याने आधार देण्यात येतो. काही दिवसांपूर्वी 'मनोगत' वर देखील याच विषयावर चर्चा झाली होती. तेव्हा, या मुद्द्याबरोबरच, संतांनी लोकांना अध्यात्मिक उपदेश करण्याऐवजी वैज्ञानिक प्रगती करण्याचा उपदेश करायला हवा होता, किंबहुना स्वतः संतांनी देखील वैज्ञानिक बनायला हवे होते असाही विचार मांडण्यात आला. प्रस्तुत लिखाणात या दोन मुद्द्यांवर काही विचार मांडायचे आहेत.

व्यापारास आले आणि राज्यकर्ते झाले

व्यापारास आले आणि राज्यकर्ते झाले


वा काय चपखल वर्णन आहे दोन संस्कृतींचे.
एक स्वयंचलित तर दुसरी प्रतिक्रीयतेमुळे काम करणारी.  असे का असावे कि भारताच्या बाहेरून आलेल्या लोकांना भरतीयांवर सहज राज्य करता येते. आणि त्यापुढे जाऊन महाराष्ट्राबाहेरून आलेले इतर भारतीय सुद्धा मराठी लोकांवर लिलया वर्चस्व गाजवू शकतात?

अंगात शर्ट की शर्टात अंग?

पुष्कळदा चुकीच्या आणि योग्य शब्दप्रयोगांतील फरकाचे उदाहरण म्हणून "अंगात शर्ट घालण्याऐवजी शर्टात अंग घालणे" असे म्हणावे असे सांगितले जाते. मी तर अगदी लहानपणापासून हे 'गंमत' ह्या सदरात ऐकत आलो आहे. पण आता विचारांती मला 'अंगात शर्ट घालणे' असे बोलण्यात काहीही गैर, अयोग्य, निरर्थक किंवा चुकीचे वाटत नाही.

जरी आज ती राज्यभाषा नसे.

मराठीला राज्यभाषेचा दर्जा नसल्याने तिची पीछेहाट झाली असे म्हणण्यात येते, मात्र म. टा. मधले हे लेखन वाचल्यावर जरा बरे वाटले. अगदीच हताश होण्याइतके काही आमच्या मायबोलीचे भवितव्य काळवंडलेले नाही असे थोडेसे आशादायक चित्र मनांत तयार झाले. ह्याचा उहापोह मराठीतून करता यावा, ह्या उद्देशाने हे लेखन येथे उतरवून ठेवले आहे.

मिंग्रजी, इंग्राठी इ.

'स्टमकमध्ये फूड नसलं की हेड मध्ये पेन होतं' (विद्यापीठ कचेरीतील कर्मचारी)


'मी वॉलच्या बिहाईंड हाईड केलं' (कॉन्ह्वेंट विद्यार्थी)


ही मी स्वतः ऐकलेली वाक्य आहेत.


मराठी बोलताना किती इंग्रजी अथवा बिगरमराठी शब्द वापरले की ती मराठी रहात नाही, व केवळ मराठीची टिंगल रहाते, हे ठरविणं कठिण असल्यामुळे, खरं पाहिलं तर, सर्व मराठी शब्द वापरणे (आणि साधारणपणे व्याकरणाचे नियम पाळून वाक्यरचना करणे) हे एकच उत्तर उरतं.

मराठी शुद्धलेखन

या site वरील लेख, विचार वाचताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे काही ठिकाणचं अशुद्ध मराठी. (हे माझं लिखाणही त्याला बहुदा अपवाद नाही). शुद्धलेखनाचे नियम ज्यांना माहित आहेत त्यांनी ते येथे लिहावे अशी मी सर्वांना विनंती करत आहे...

जी X राव, पंत, साहेब...

नमस्कार,


महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः टिव्हीमुळे, बर्‍याच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महनीय मराठी लोकांच्या नावांपुढे 'जी' हा आदरार्थी प्रत्यय लावायचे खूळ फार बोकाळले आहे.


१९८०पूर्वीच्या कोणत्याही मराठी लेखनात मराठी माणसाने मराठी माणसाच्या नावापुढे जी लावल्याचे मी तरी वाचलेले नाही. राव, साहेब, पंत असे आदरार्थी प्रत्यय मराठीत आहेत.