हम तो सिर्फ सुंघ के बताते है ।

 हम तो सिर्फ सुंघ के बताते है ।

हा किस्सा माझा मित्र प्रकाश याने खूप वर्षापूर्वी सांगितला होता, तो आठवला की आजही धमाल हसायला येते. त्याचे झाले असे...
प्रकाश त्यावेळी 'फिलिप्स' च्या इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट्स च्या वॉरंटी सर्व्हिस विभागात सुपरवायझर म्हणून काम करत होता होता.  एकदा 'मंदार', हा प्रकाशच्या हाताखाली काम करणारा एक शिकाऊ (ट्रेनी)  इंजिनियर, त्याच्याकडे आला...

"सर, ह्या इंस्ट्रूमेंट मध्ये काय फॉल्ट आहे तेच समजत नाही,  सगळ्या टेस्ट्स केल्या,  आख्खा दिवस गेला त्यात,  सॉरी सर, पण फॉल्ट सापडला नाही.."

बयो !!!!

(हि कथा संपूर्ण काल्पनिक आहे. काळ - १९९८-९९)

बयो!!!!

बऱ्याच तात्पुरत्या नोकऱ्या झाल्या होत्या. कोणत्याच नोकरीत राम वाटत नव्हता. आणि पगारातपण म्हणावी तशी वाढ होत नव्हती. काय करावे काळत नव्हते. स्वतः चा व्यवसाय करायचे डोक्यात होते पण आपल्याला जमेल का?, भांडवल कुठून आणायचे?, तोटा झाला तर काय?, असे असंख्य प्रश्न भंडावत होते.

घरी सर्वांना माझी अस्वस्थता जाणवत होती. आईला माहित होते कि याचे काही ठीक चालले नाहीये. तिने सरळच विचारले,

"काय रे काही प्रोब्लेम आहे का? "

"नाही, काही नाही".

पेयपुराण

"आजकाल तो जरा जास्तच प्यायला लागलाय" आई एका शेजाऱ्या बद्दल सांगत होती आणि माझ्या मनात विचार आला की आपल्या मराठीमध्ये "पिणं "हे क्रियापद फारच बदनाम झालं आहे.

खरंतर जन्माला आल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट आपण करतो ती म्हणजे "पिणं"आणि मग मरेपर्यंत माणूस पीतच राहतो. माझ्या एका मित्राने तर परीक्षेत पिता या शब्दाचा अर्थ पिणारा (करतो तो कर्ता तसेच पितो तो पिता ) असं लिहून चांगलीच आफत ओढवून घेतली होती. असो. आता स्थूलमानाने (म्हणजे नेमके काय ते माहीत नाही पण म्हणायला बरे वाटते ) पेयांचा एक आढावा घ्यायचा म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आठवतात.

तुटलेली युती परत जुळेल का?

युती तोडायचा निर्णय महाराष्ट्रातील नेत्यांनी मोदींना प्रत्यक्ष भेटीत कळवला त्या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीनुसार हा निर्णय घ्यायला इतका वेळ का लागला अशी विचारणा महाराष्ट्रातील नेत्यांना करून मोदींनी त्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या असा काहीसा आशय त्या बातमीचा होता.

युती का तुटली ? भाग २

इथे एक गोष्ट प्रथमच स्पष्ट करतो की, मोदींना प्रादेशिक पक्षाबद्दल राग अथवा द्वेष नाही पण काही झाले तरी प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या घेऊन भव्य दिव्य असे काहीही साकार करता येणार नाही या निष्कर्षाप्रत ते आलेले असून आता तर ते त्यांचे मुख्य धोरण बनले असावे. कदाचित गेल्या दोन दशकापेक्षा जास्त काळ चाललेल्या आघाडी सरकारांचा कार्याचा अनुभव त्याला कारणीभूत असू शकेल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत असून या गृहितकावर पुढील विचार आधारित असल्याने हे सर्व स्पष्ट करणे जरूरीचे वाटले.