डायरी २

मी निलेश. मी मन्याच्याच वर्गात शिकतो. जरा तुमच्याशी काही गोष्टी शेअर कराव्या म्हणून तुमच्या भेटीला मी येणार आहे.

गुरूवार १२ फेब्रुवारी

धुयमाती

थ्या रोजी धुयमाती झाली. या होयीले मी भल्लाच खुश होतो. मायी हे पयलीच होयी होती. मांगच्या साली लगीन ठरलं होतं. होयीच्या आठ दिस पयले "शालमुंदी" झालती. पण शालमुंदीमधं मामा (बायकोचा बाप) खडुस अन रागिट हाये हे सोतच्या डोळ्यानं पायलं व्हतं. अन माया एक साया पैलवान होता. म्हणुनशान मांगच्या साली सासरी जायची हिंमत झाली नव्हती. पन यावर्षी म्या चानस सोडला नायी. सासऱ्यान खुप फडफड केली पण म्या बी त्याले सिदंसिदं सांगितलं. मीनं म्हतलं,

"पैली होयी हाये, आमच्या घरी सुनेचं कवतिक केल्या जाते, तिले साडी चोळी द्याचे परंपरा हाये... " आता ही आमच्या घराची "कष्टम" आहे म्हनल्यावर बुडा काय बोलनार ?

गंभीर विनोदी चर्चा : ३ -टिव्हीचा अनर्थ

टिव्हीचा अनर्थ

विनोद आणि चर्चा घरी परतले.   विनोद सोफ्यावर बसला.   चर्चा किचनमध्ये जावून कॉफी बनवू लागली.

विनोदने टी. व्ही. सुरू केला. प्रथम एक न्यूज चॅनेल लागले- "मीच खरा बातमीदार- परसो तक- टुमारो टाईम्स" नावाचे. हे चॅनेल हींग्लीश्मराटी होते.

ब्रेक झालेला होता. ब्रेकींग न्यूज देवून देवून बातमीवाचकांचा घसा दुखल्यामुळे थोडा ब्रेक त्यांनी घेतला होता. ब्रेक मध्ये जाहीराती लागल्या होत्या. मात्र खाली बातम्या सरकत होत्या.

स्मृतिगंध-३ "वाकेडची शाळा"

आजोबा म्हणजे आईचे वडील, आई आणि वहिनी यांनी मला पाचवीत घालायचे ठरवले पण गावात पुढे शाळाच नव्हती. राजापुरास सातवीपर्यंत आणि पुढची इंग्रजी शाळा होती पण घरापासून २० मैल दूर, मुलाला कोणाकडे ठेवणार? पुढे कसे करायचे ह्यावर आई आणि वहिनीची बोलणी होत असत पण मला त्यात काही फार रस नव्हता. मी आपला गुरेवासरे आणि गडीमाणसे यात रमलेला असे. पुढे एक दिवस गं. भा. बयोआत्ते आमच्याकडे आली असताना म्हणाली, "नारायणास वाकेडला गोदीकडे ठेवा. तिथे मराठी सातवीपर्यंत शाळा आहे. " वाकेड गाव घरापासून ४ मैलांवर, चालत जायला तास दीड तास सहज लागत असे. मी गोदीआत्त्याकडे वाकेडास राहू लागलो.

स्मृतिगंध-२ "व्रतबंध"

आठव्या वर्षी माझी मुंज करायचे ठरले. अंगण चोपून दारात मांडव घातला गेला. मांडव घालायला गावातले कुळवाडी आपणहून येत. जेवणावारी काम करीत असत. त्यांना अंगणात पत्रावळीवर भात, उडदाचे वरण नाहीतर कुळथाचे पिठले, लोणचे मिरची, पापड असे जेवण वाढले जाई.
कुंकुमाची बोटे लावून शुभचिह्ने काढलेल्या पत्रिकेस 'कुंकुमपत्रिका' म्हणत. पत्रिका छापून आणायचा काळ अजून यायचा होता.
एका स्वच्छ कोऱ्या कागदावर कुंकुमतिलकाने सुशोभित करून काळ्या शाईत वळणदार मोडीत पत्रिका लिहिली गेली.