कशेळीचा श्री कनकादित्य

Shri_Kanakaditya.jpg
(श्री कनकादित्य)
कोकण जसे आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते प्रसिद्ध आहे ते तेथील सुबक मंदिरे आणि त्यांच्या गुढरम्य दंतकथांबद्दल. मागील लेखात आपण आडीवऱ्याच्या श्री महाकाली मंदिराला भेट दिली. आडिवऱ्यापासून जवळच असलेले व महाराष्ट्रातील एकमेव असे सूर्यनारायणाचे मंदिर म्हणजेच आपल्या आजच्या भेटीचे ठिकाण कशेळीचे "श्री कनकादित्य मंदिर".
IMG_0258.jpg
कशेळी गावचे भुषण असलेले श्री कनकादित्य मंदिर रत्नागिरिपासून ३२ आणि राजापुरपासून ३५ किमी अंतरावर आहे.
आपल्या भारतात फार कमी सूर्यमंदिर आहेत. सौराष्ट्रात प्रभासपट्टण, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या भागात काही सूर्यमंदिर
आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर तालुक्यातील हे सर्वात मोठे देवालय गावच्या मध्यभागी विस्तिर्ण सपाट प्रदेशात बांधले आहे. या मंदिराला उज्ज्वल अशी ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभली आहे. मंदिरात जी आदित्याची मूर्ती आहे ती
सुमारे आठशे वर्षापूर्वी सोमनाथ नजिकच्या सूर्यमंदिरातून आणली गेली आहे.
IMG_0263.jpg
कशेळी गावात या मूर्तीचे आगमन कसे झाले याबद्दल मंदिराच्या पुजारींनी एक दंतकथा सांगितली ती अशी की,
काठेवाडीतील वेटावळ बंदरातून एक नावाडी आपला माल घेऊन दक्षिणेकडे चालला होता. त्याच्या जहाजामध्ये हि
आदित्याची मूर्ती होती. जहाज कशेळी गावच्या समुद्रकिनारी आले असता अचानक थांबले. खूप प्रयत्न केला पण जहाज
मागेही जाईना आणि पुढेही जाईना. शेवटी नावड्याच्या मनात आले कि जहाजात जी आदित्याची मूर्ती आहे तिला
इथेच स्थायिक होण्याची इच्छा दिसते. मग त्याने ती मूर्ती कशेळीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका नैसर्गिक गुहेत
आणून ठेवली आणि काय आश्चर्य! बंद पडलेले ते जहाज लगेचच चालू झाले. कशेळी गावात पूर्वी कनका नावाची एक
थोर सूर्योपासक गणिका राहत होती. एकदा तिच्या स्वप्नात सूर्यनारायणाने येऊन सांगितले की मी समुद्रकिनारी एका
गुहेत आहे तु मला गावात नेऊन माझी स्थापना कर. कनकेने हि हकिकत गावात सांगितली. गावकऱ्यांनी समुद्रावर
जाऊन शोध घेतला असता आदित्याची हि मूर्ती गुहेत सापडली. पुढे कनकेने गावकऱ्यांच्या मदतीने मंदिर बांधून तीची
स्थापना केली. कनकेच्या नावावरुनच या मंदिराला "कनकादित्य" आणि ज्या गुहेत आदित्याची हि मूर्ती सापडली ती
गुहा "देवाची खोली" म्हणून ओळखली जाते.
IMG_0266.jpg
रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक व पुरातन महत्त्व असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी देशातील विविध भागातून
लोक येतात. चारही बाजुला भक्कम चिरेबंदी असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात इतर देवदेवतांचीही सुबक मंदिरे आहेत.
कोकणातील इतर देवलयाप्रमाणेच श्री कनकादित्यचे मंदिरही कौलारू आहे. मंदिर परिसरातील दीपमाळा, फरसबंदी
पटांगण, शांत वातावरण यामुळे मंदिर पाहताक्षणी मन प्रसन्न होते. मंदिरात कोरीव कलाकुसर केली असून ते
पुराणकालीन आहे. छतावर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून
श्री कनकादित्याची मूर्ती हि अतिशय आकर्षक आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून देवस्थानच्या भक्तनिवासात
राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते.
Shri_Kanakaditya_2.jpg

पद्यानुवादांचा रसास्वाद

मनोगताच्या चवथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

१५ ऑगस्ट २००८. मनोगताचा चवथा वर्धापनदिन. त्यानिमित्त, मनोगतचे मालक, चालक, प्रशासक, लेखक, वाचक आणि सर्वच मनोगतींना हार्दिक शुभेच्छा! मी मनोगतावर येत असल्यापासून, बरेच पद्यानुवादात्मक लेखन केलेले आहे. त्या साऱ्या लेखनाचा आढावा घेत असतांना मला जाणवले की पद्यानुवादांप्रतीचा सगळ्यांचाच दृष्टीकोन फारसा उत्साहवर्धक नाही. तसा तो असावा असे मला वाटते. मग अडचण काय आहे? तर पद्यानुवादात कशाकशाचा आस्वाद घ्यायचा याची सामान्य वाचकास पुरेशी जाण नसते. तो आवडले तर आवडले म्हणतो. पण पद्यानुवाद आणखीही होत राहावेत ह्याबाबत आग्रही नसतो. ज्यांना ते आवडत नाहीत ते मात्र पद्यानुवाद होणे थांबेल कसे ह्याबाबत अत्यंत आग्रही दिसून येतात. असे का व्हावे? पद्यानुवाद लोकांना नको असतात का? याचा शोध मला वेगळ्याच तथ्यांप्रत घेऊन गेला. या वर्धापन दिनानिमित्त त्या शोधाचे फलीत आपणाप्रत पोहोचवावे अशी उमेद धरून हे लिहीत आहे. आपल्याला आवडावे हीच प्रार्थना.

पहिली शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर!

झाला बुवा एकदाचा तो बहुप्रतीक्षित घटस्फोट!
किती ग वाट बघायची त्यासाठी?
किती वेळा देव पाण्यात ठेवायचे? (त्यांना सर्दी-पडसंच नव्हे, आताशा न्युमोनिया पण व्हायला लागला होता... )
त्याच्या `बाहेरख्याली'पणाबद्दल तिनं जाहीर संशय घ्यायला सुरवात केलीच होती. परदेशी माणसांबरोबरचं लफडंही चव्हाट्यावर आणलं होतं. तरी त्याला काही शुद्ध नव्हती. त्याचं वेगळंच गणित सुरू होतं. त्याला घरचं अन्न गोड लागेनासं झालं होतं. बायकोने भरवलेलं आधी जे अमृत लागायचं, ते आता कडू जहर लागायला लागलं होतं. तुला घटस्फोट घ्यायचा तर घे, मी `बाहेरख्याली'पणा सोडणार नाही, असंच त्याला सुचवायचं होतं. पण तिने ते समजून घ्यायला एवढा का वेळ लावला, कुणास ठाऊक? कदाचित, तिचीही दुसरी सोय व्हायची होती. घटस्फोट घेतल्यानंतर घरच्यांना, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना काय सांगायचं, याची तयारी झाली नव्हती. त्यासाठी तिनं पाळलेले सरदार, मनसबदार कामाला लावले होते. कसल्या-कसल्या समित्या नेमल्या होत्या. त्यांचे अहवाल, आणि एकूण पटतील, अशी कारणं देऊन तिनं एकतर्फी घटस्फोट जाहीर करून टाकला.
इकडे `त्या'नं दुसरी तयारी करून ठेवलीच होती. आपल्या `बाहेरख्याली'पणाला अडविणार नाही, अशी दुसरी मुलगी हेरून ठेवली होती. ती देखील काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नव्हती....! तिनं आधी त्याला एकदा नकार दिला होता. एकदा त्यानं तिला झिडकारलं होतं. पण आता दोघांना गरज होती. `माय-बापां`च्या पाया पडायला पुढच्या वर्षी जोडीनंच गेलं, तर खेटरं तरी पडणार नाहीत, असं दोघांनाही वाटलं. मग झाली-गेली भांडण. विसरून दोघंही एकमेकांच्या गळ्यात हार घालून मोकळी झाली.
बरं, इकडे गुढग्याचं बाशिंग पार सुकून गेलेल्या दुसऱ्या वराचं दुःख निराळंच होतं. त्यालाही लग्नाची घाई होती. पण `त्या' दोघांचा घटस्फोट झाला, आणि त्याला दुसरी बायकोच मिळाली नाही, तर याचा चान्स लागणार होता. बिच्चारा! चार वर्षं वाट बघत थांबला होता. दरवेळी काहीतरी कुरबूर झाली, की याला वाटायचं, चला, झालाच घटस्फोट! पण छे! घरचेच कुणी काके-मामे उपटायचे, आणि मिटवायचे भांडण!
या वेळी मात्र तसं काही झालं नाही. घटस्फोटाची धमकी तिनं खरी करून दाखवली, आणि दुसऱ्या नवऱ्यालाही पुन्हा लग्नज्वर चढला.
खरं तर त्याचा नंबर पुढच्याच वर्षी येणारेय. आधीच्या जोडप्याच्या संसाराची थेरं बघून लोकांनी संधी दिली असती, त्यालाही. पण तेवढाही धीर नाहीये आता त्याला.!

पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...

सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते.  साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते.

ऍडमिशन

मीटिंगची वेळ सकाळी साडेनऊची होती. बरोबर साडेनऊ वाजले होते. शिरस्त्याप्रमाणे कॉलेजचे काही विश्वस्त, सगळे स्टाफ मेंबर, सपोर्ट स्टाफ आणि मुख्य म्हणजे ऍडमिशनच्या कामाशी संबंधित सगळा स्टाफ प्रिन्सिपॉल मॅडमच्या केबिनमध्ये आला होत. दयारामने मोठे मीटिंग टेबल सुरेख चकचकीत पुसून घेतले होते. प्रत्येक खुर्चीपुढे टेबलवर त्या त्या फॅकल्टीचे छोटेसे फोल्डर ठेवलेले होते. मॅडमच्या खुर्चीसमोर जराशी जाडसर फाईल, थोडेसे पुढे उजव्या बाजूला पिण्याच्या पाण्याचे लख्ख घासलेले तांब्याभांडे, उजवीकडे एका छोट्याशा फ्लॉवरपॉटमध्ये कॉलेजच्याच बागेतली गुलाबाची चार टपोरी फुले आणि एका काचेच्या बाऊलमध्ये मॅडमच्या खास आवडीची मोगऱ्याची फुले ठेवली होती. कॉलेजच्या पंचवीस वर्षांच्या शिस्तीत वाढलेल्या दयारामला काही सांगावे लागत नसे. शिस्त, पण अभिमान बाळगावा अशी शिस्त - दयारामला वाटत असे. कर्तव्यपूर्तीचे आणि निष्ठेचे अपूर्व समाधान - फारसे शिक्षण न झालेल्या दयारामला कदाचित या शब्दांत नसते सांगता आले, पण रोज सकाळी कॉलेजचा युनिफॉर्म अंगावर चढवताना त्याची मान अभिमानाने ताठ होत असे. कॉलेजच्या प्रवेशद्वाराशीच लावलेल्या गोरे सरांच्या भव्य तैलचित्राकडे बघताना त्याचे मन काठोकाठ भरून येत असे. आधी सर, आणि आता सरांच्याच मुशीत घडवलेल्या मॅडम... आदराने मान लवावी अशी ही माणसे - आपल्यासारख्या साध्या शिपायाला यांची सेवा करायला मिळाली ही आपली पूर्वजन्मीची पुण्याईच - त्याच्या भाबड्या मनाला वाटत असे.
"बसा ना. " मॅडम त्यांच्या नेहमीच्या मृदू स्वरात म्हणाल्या. मोगऱ्याचा अस्पष्ट वास केबिनमध्ये पसरत होता. 'जुलै सुरू झाला तरी मोगऱ्याचा बहार टिकून आहे.. ' मॅडमना वाटून गेलं. डाव्या हाताने त्यांनी चष्मा सारखा केला. " हं, काय शिल्पा, झाली का तयार मेरिट लिस्ट? "
"हो मॅडम. तुमची सही झाली की आज जाईल नोटीस बोर्डवर" शिल्पा म्हणाली.
"आणि आशिष, त्या आऊट ऑफ स्टेट विद्यार्थ्यांची... "
दारावर टकटक झाली. मॅडमच्या कपाळावर एक बारीक आठी आली. स्टाफ मीटिंग सुरू असताना कुणी डिस्टर्ब केलेलं त्यांना आवडत नसे. आणि हे बाहेर असलेल्या दयारामलाही चांगलं माहीत होतं. आणि हे तर ऍडमिशनचे दिवस. एकेक तास महत्त्वाचा होता.
दार किलकिलं झालं. दयारामचा चेहरा किंचित अपराधी झाला होता. "मॅडम... " खालच्या आवाजात तो म्हणाला.
"काय, दयाराम? "
"काही मंडळी भेटायला आली आहेत, मॅडम.. "
"दयाराम, मीटिंग सुरू आहे.मी कामात आहे. बसायला सांग त्यांना" मॅडमचा आवाज किंचितही वर गेला नव्हता. त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणंच हसरा पण निश्चयी होता.
"मी सांगितलं मॅडम. पण ते ऐकायला तयार नाहीत. बाहेर गोंधळ होतोय मॅडम. साहेबांनी पाठवलंय म्हणतात.. " अचानक कुणीतरी धक्का दिल्यासारखा दयाराम धडपडून दोन पावले पुढे आला. मागचं दार उघडून बाहेरची मंडळी आत घुसत होती. "जय भीम म्याडम, म्हनलं आर्जंट हाये, तवा भेटूनच जावं... " वय साधारण पस्तीस, लालसर गोरा सुजकट चेहरा, स्थूल, ओघळलेलं शरीर, झगमगीत लाल रंगाची साडी, कानात तीनचार ईयररिंग्ज, गळ्यात तर दागिन्यांची एक लहानशी शोकेसच, डोळ्यात काजळ आणि या सगळ्या साजशृंगारावर पसरलेला चेहऱ्यावरचा एक विलक्षण माजकट, मग्रूर भाव - अशी ती ठेंगणी बसकट बाई होती. "या, या, म्याडम आपल्याच हायेत... " तिनं तिच्यामागच्यांना म्हटलं तसे मागचे तीघेही आत शिरले. त्यांच्या अंगावरच्या पांढऱ्याशुभ्र खादीच्या आणि स्टार्च केलेल्या कपड्यांसोबत आणि हातातल्या जाड अंगठ्या आणि गळ्यातल्या लॉकेटांबरोबर काहीतरी जबरस्त अशुभ आणि हिडीस केबीनमध्ये आलं होतं. आणि त्याबरोबरच कसल्यातरी उग्र अत्तराचा आणि गुटख्याचा मिश्र वास.
"खासदारसायबांचा फोन आलावता. ते म्हनले म्याडमना मी सांगितलंय म्हनून सांगा. तुमी वळखत आसालंच मला... " बाई म्हणाल्या.
"ह्ये काय बोलनं झालं का ताई? तुमानी वळखत न्हाई असं व्हयील का कवा? काय म्याडम? " पहिला इसम म्हणाला.
"हे बघा, आमची मीटिंग सुरू आहे. " मॅडम शांतपणे म्हणाल्या. "तुम्ही बाहेर थांबा पंधराएक मिनिटं. मग बोलावते मी तुम्हाला. "
"थांबलो आस्तो हो म्याडम." दुसरा इसम म्हणाला "पन ताईंना जायचंय उद्गाटनाला. तवा म्हनलं, की म्हनलं, जाताजाता पाच मिंटात ह्ये कामबी करून टाकावं. आपल्याला काय जास्ती टाइम न्हाई हो लाग्नार. हां ताई, त्ये कागद.. "
ताईंनी तेवढ्यात आपली सोनेरी रंगाची पर्स उघडून त्यातून आपलं कार्ड काढलं होतं. कार्डावर ताईंचं नाव आणि फोटो - कुठल्याश्या समितीचं नाव -आणि सगळ्यात मोठा जाणवणारा असा दलितकैवारी खासदाराचा दाढीदारी फोटो. सोबत कुणाची तरी मार्कलिस्ट आणि एक ऍप्लीकेशन फॉर्म.
"खासदारसायेब म्हनले, म्यानेजमेंट कोट्यातनं तेवडी ऍडमिशन करून टाकायची बरं का म्याडम. " ताई म्हणाल्या.
"ए, गनपत, खुर्ची घे रं ताइन्ला" दुसरा इसम म्हणाला. मॅडमनी दयारामला नजरेनंच खुणावलं तशी दयारामनं खुर्ची आणली. ताईंनी खुर्ची ओढून घेतली आणि त्या जवळजवळ मॅडमना खेटूनच बसल्या. "खासदारसायेब म्हनले.. " बाईंनी मॅडमच्या दंडाला धरून बोलायला सुरुवात केली.
" हे बघा, " आपला दंड सोडवून घेत मॅडम म्हणाल्या, "ऍडमिशनसाठी असे बरेच फोन येत असतात आम्हाला दर वर्षी. आमच्या ऍडमिशन या मेरिटवर होतात.मेरिट लिस्ट तयार झाली आहे, आज लागेल नोटीस बोर्डवर. "
"म्याडम, तुमाला कळंना आमी काय म्हंतो त्ये. ह्यो काय जनरल कँडिडेट न्हाई आपला. एस. शी. कोट्यातला हाये."
"हो, मान्य आहे मला, पण रिझर्व कॅटेगरीच्या ऍडमिशन्सही मेरिटवरच होतात. संस्थेचे तसे स्पष्ट नियम आहेत. त्यात मला काहीच करता येणार नाही. "
"तुमी थांबा जरा अंकुशराव, " ताई म्हणाल्या, "म्याडम, यवडं ह्ये काम करून टाकायचं आपलं. एकच ऍडमिशन हाये आपली. ती पन रिझर्वेशनमदली. अंकुशराव, तुमी बसून घ्या. बसा ना तितल्या सोफ्यावर. म्याडम करनार आपलं काम, मी सांगते ना तुमाला. "
अंकुशराव आणि त्यांच्याबरोबरचे दोघे शेजारच्या सोफ्यावर बसले. अंकुशरावांनी आपला एक पाय दुसऱ्या पायावर टाकला आणि ते पायातला पांढराशुभ्र बूट हलवायला लागले. आपल्या हाताची त्यांनी आपल्या डोक्यामागे चौकट केली.
"तर म्याडम, खासदारसायेब काय म्हनले, की म्यानेजमेंट कोट्यातनं आप्ला एक दलित क्यांडिडेट घेतील म्हनले म्याडम. "
"हो का? " मॅडम म्हणाल्या. "त्यांना माहिती नसेल कदाचित, पण आमच्या संस्थेत असा मॅनेजमेंट कोटा वगैरे नसतो. आणि हे बघा, मीही संस्थेची नोकर आहे. मलाही संस्थेच्या नियमाबाहेर जाऊन काही करता येणार नाही. "
"म्हंजे आपलं काम नाय व्हनार म्हना की म्याडम.. " अंकुशरावांबरोबर आलेला इसम आता परत उभा राहिला होता.
"नाही. मेरिट लिस्टमध्ये तुमच्या कँडिडेटचा समावेश नसेल तर नाही. "
"आन म्याडम, तुमच्या ह्या लिष्टमदली नावं झाली काई क्यान्सल तर? तर भरनारच की न्हाई तुमी भायेरची पोरं?"
"हो, पण त्यालाही एक प्रोसिजर असते. अशा ऍडमिशन्स कॅन्सल होणार हे आम्ही गृहीत धरतोच. त्यामुळे आमच्या चार-पाच मेरिट लिस्ट लागतात. " मॅडम त्या इसमाकडे पाहत म्हणाल्या.
"म्याडम, म्हनजे इतं वकिली शिकाया तुमी भटा-बामनाचीच पोरं भरनार म्हना की. येका राष्ट्रीय पार्टीच्या आध्यक्षाचापन मान न्हाई ठेवायचा तुमाला. एका दलीत पोराला तुम्ही बाजूला काडताय म्याडम... "
"जातीचा इथं काही संबंध नाही ताई. आणि जातीचा आमच्या कॉलेजमध्ये कधीच काही संबंध नसतो. म्हणून तर आमच्या कॉलेजचं सगळ्या देशात नाव आहे... "
"ठीक आहे, म्याडम, आता आमाला काय करायचं ते आमी बगून घिऊ. "
"तुमची मर्जी. तुम्ही जाऊ शकता ताई. "

जागेअभावी होणारी ठळक बातम्यांची विनोदी तोड-फोड!! (१)

आजकाल सगळ्या हिंदी मराठी न्यूज चॅनेल्सवर तळाशी ब्रेकींग न्यूज देतात. पण त्या जर सरकणाऱ्या (स्क्रॉलींग) नसल्यात तर आणि बातमीचे वाक्य खुप मोठे असेल तर त्या बातमीच्या वाक्याची कशी फोड ( की तोड फोड? ) केली जाते व त्यातून कसे विनोदी वाक्ये तयार होतात ते आपण बघूया. त्या फोडीतील पहिले वाक्य वाचल्यावर पूर्ण बातमीचा अंदाज येत नाही. कधी कधी असे वाटायला लागते की जागा उपलब्ध असतांनाही मुद्दाम उत्सुकता ताणण्यासाठी व प्रेक्षक जास्त काळ टिकून राहाण्यासाठी सुद्धा ही फोड केली जात असावी.

मै टल्ली हो गयी...!!

नमस्कार मंडळी,

तुम्ही 'मै टल्ली हो गयी' हे नवे गाणे पाहिले आहे  का?
मद्यप्राशनाचा अभिनय करत मल्लिका ष्टेजवर नाचत आहे!   सोबत रणवीर शौरीही काही झटके मटके मारत आहे. अहो मल्लिका मंडळी मल्लिका!! बॉलीवूडमधील अनेक नटमोगऱ्यांना जिच्या शरीरसंपदेचा हेवा वाटतो ती साक्षात मल्लिका. एवढे असूनही मल्लिकाला आनंद कसला तर टल्ली झाल्याचा.

कशी शांतता शून्य शब्दांत येते....

तो किंवा ती आपल्याला मनापासून आवडते. आपल्या काळजातच घुसते. कुठल्याही अपेक्षेनं नव्हे, पण निव्वळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आपण प्रेमात पडतो. त्यानं/तिनं आपल्याशी मैत्री करावी, असं वाटतं. पण ती एका मर्यादेपलीकडं आपल्याला फार भीक घालत नाही. आपण अनेक प्रयत्न करतो... त्यासाठी प्रसंगी, वेगळ्या वाटेनं जातो. पण व्यर्थ!
ती (व्यक्ती) कुठलीही असू शकते. कुठल्याही पार्श्वभूमीची, कुठल्याही प्रवृत्तीची. आपल्याला आवडते, ती तिची प्रवृत्ती. जगण्याची कला. धडाडी, कर्तबगारी, शैली, बोलण्या-वागण्याची पद्धत, एखाद्या विषयातला अभ्यास, विचार, मतं मांडण्याची पद्धत, यांपैकी काहीही. आपल्याकडे तो गुण नसतो कदाचित, म्हणून आपण तिचा आदर करायला लागतो. तिच्याकडून आणखी काही शिकता यावं, असं वाटतं. त्यासाठी तिच्याशी मैत्री करायला हवी असते. तिनं आपल्यासाठी खास काही करावं, काही द्यावं, अशी अपेक्षा नसते. पण थोडा वेळ तिच्या सहवासात राहता यावं, असं वाटत असतं. तिच्या सोबत राहून जेवढं टिपता येईल, तेवढं आपल्याला टिपायचं असतं. तिच्या खासगी गोष्टी तिनं सांगाव्यात, अशी अपेक्षा नसते, पण आपल्या खासगी गोष्टींत तिचा सल्ला मिळेल, निदान तिच्या सहवासाचा काही प्रभाव पडेल, असं वाटत असतं.
ती कुणी "ग्रेट' असतेच, असं नाही. पण सर्वसामान्यांपेक्षा कुठल्या तरी बाबतीत वेगळी असते. काही एक वेगळा गुण असतो, ज्याचं आपल्याला आकर्षण वाटत असतं आणि आपल्यात तो नसल्याबद्दल रुखरुखही. पण तिला आपल्याबद्दल फारसं वाटत नसतं. औपचारिक ओळख ठेवण्यापलीकडे मैत्री सरकत नाही. मैत्रीच्या तारा काही छेडल्या जात नाहीत. आपण प्रामाणिक प्रयत्न करतो, पण तिला त्याची फारशी कदर नसते. निदान आपल्या मैत्रीच्या प्रयत्नांचा आदर राखण्याएवढंही सौजन्यही कधी कधी वाट्याला येत नाही. हा तिचा दोष असतो, की आपल्याच अवाजवी अपेक्षांमधला फोलपणा?
तुम्हाला हा अनुभव आलाय कधी? मला हज्जारदा आलाय! अनेकदा तोंडघशी पडलोय, अनेकदा त्रास करून घेतलाय. अगदी मनापासूनचा म्हणवणारा मित्र काही कारण नसताना दुरावल्याचा. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडल्याची साक्ष देणाऱ्याकडून नंतर काहीच संपर्क न साधला गेल्याचा. कॉलेज संपल्यावर नातंही संपल्याचा. आणि आपण कितीही ओढीनं आपली सुख-दुःखं सांगितल्यानंतरही, त्यांची परतफेड न झाल्याचा. आपण अतिशय प्रामाणिक राहिल्यानंतरही, त्याच्या आयुष्यातला अगदी महत्त्वाचा टप्पाही दुसऱ्याच्या तोंडून कळण्याचा.
आपल्या चांगल्या/वेगळ्या कामगिरीकडे, कलेकडे नियमितपणे लक्ष ठेवून त्यात सूचना करणारा, कान धरणारा, सल्ले देणारा कुणीच मित्र असत नाही? गरज असल्याशिवाय, आपल्या आयुष्यात काय चाललंय, याची चौकशी करावीशीही त्याला वाटत नाही?
खरंच खरी मैत्री एवढी दुरापास्त आहे? व्यावहारिकतेच्या, धावपळीच्या आयुष्याच्या, अर्थाजनाच्या बंधनांनी तिला जखडून, संपवून टाकलंय? कधीतरी हॉटेलात जाणं, फोनवर बोलणं, एसएमएस करणं, यापलीकडे मैत्री जाऊ शकत नाही? नोकरी, जबाबदाऱ्या यांची बंधनं मैत्रीच्या नात्यापेक्षाही तीव्र असतात?
चांगल्या मैत्रीची गरज काय फक्त एकटेपणीच असते? अगदी जगण्याचं रहाटगाडगं व्यवस्थित चालू असतानाही मित्रांशी उत्तम नातं नाही राखता येत?
-------------

रुपये-पैसे

दुसऱ्या महायुद्धाच्या आधीची गोष्ट.

आपले सगळे पैसे बँकेमध्ये ठेवायची प्रभाकरपंतांना खोड होती. मालतीबाई त्याबद्दल करवादत, पण ते त्यावर "पैसे कधी व किती लागतील ते आधी कळलेच पाहिजे. आणि गरजेप्रमाणेच पैसे काढले पाहिजेत. घरात डबोले बांधून ठेवण्यापेक्षा त्या पैशांवर व्याज मिळवून मुद्दल वाढवले तर ते अंतिमतः आपल्या आणि आपल्या मुलांच्याच हिताचे आहे. शिस्त बाळगली की सगळे जमते" असे सडेतोड उत्तर देत.

लाकडाचा ठोकळा

सुमित लाकडाच्या छोट्या-छोट्या वस्तू बनविण्याच्या कारखान्यात कामाला होता. बरेच दिवस ह्या करखान्यात काम थंड होते, अचानक एकदा त्या कारखान्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली.

कामाचे स्वरूप असे की त्यांना दिल्या गेलेल्या सारख्या दिसणाऱ्या शे-पाचशे लाकडाच्या फळ्यामध्ये तीन वेगवेगळे आकार कोरायचे होते. वर्तुळ, त्रिकोण आणि चौरस. यात मेख अशी होती की वर्तुळाचा व्यास, त्रिकोणाची उंची आणि चौरसाच्या बाजू ह्या एकाच मापाच्या होत्या. फळ्या कोरण्याचे काम तर पटापट होत होते परंतु प्रत्तेक आकाराची आतिल बाजू मोजून पाहाण्यात वेळ जाउ लागला. ह्यावर उपाय म्हणून त्याने लाकडाचा एकच ठोकळा असा बनवला (ज्याला इंग्रजीत आपण गेज म्हणतो) की ज्याच्या साहाय्याने त्याला कोरलेले तिनही आकार पटापट तपासता येउ लागले. ठोकळा असा होता की फळीतल्या प्रत्तेक आकाराच्या आतल्या बाजू घासून आरपार जाउ शकत होता. ज्यामुळे त्याला प्रत्तेक आकार अचुक आहे कि नाही याची खात्री पटू लागली.