केमिकल 'लोच्या'

संपतराव नुकतेच उठून मागल्या दारी मशेरी लावत बसले होते, तोच रंग्या तिरमिरत, धडपडत संपतरावांच्या नावानं बोंबलत तिथं आला.

"काय रे, सकाळीच तडमडलास? काय आभाळ कोसळलं की काय?"

ऋणानुबंध

राधाताई आणि मेघनामावशी फिरून आल्या तेव्हा सकाळचे सात वाजून गेले होते. विश्वासराव शांतपणे पेपर वाचत हॉलमध्ये बसले होते. बाकी घरात कुठे काही हालचाल, गडबड जाणवत नव्हती.
"अहो, सात वाजून गेले. ही दोघं उठली नाहीत अजून." राधाताई उद्गारल्या.
"हम्म....".
"अहो उठवा त्यांना आता".
"झोपू दे गं त्यांना. नव्या नवलाईचं लग्न आहे दोघांचं. रात्र मोठी आणि दिवस छोटा आहे त्यांचा सध्या".
"अहो, पण त्या छोट्याश्या दिवसात स्नेहलला एका इंटरव्ह्यूला जायचं आहे. एवढी मोठी झालीये तरी स्वतःच्या जबाबदार्‍या कळत नाहीत अजून. उठल्यावर म्हणेल, अय्या काकू, गजरच नाही झाला." राधाताई तोंड वेंगाडत बोलल्या तशी विश्वासरावाना फसकन हसायला आलं.
"म्हणजे काय राधाताई, स्नेहल तुला 'अहो आई' नाही म्हणत बाकीच्या सूनांसारखी?" मेघनामावशीने नवलाने विचारलं.
"ती ह्यांना पण काकाच म्हणते". राधाताई तडतडल्या.
"अगं तुझ्या मैत्रीणीची मुलगी मला 'बाबा' म्हणाली तर भलतेच गैरसमज होतील ना...." विश्वासराव हसत हसत म्हणाले.
"तुम्ही भलत्या वेळी भलते विनोद काय करताय. आधी परागच्या मोबाईलवर फोन करून उठवा दोघांना. सकाळचं छान फिरून यावं आणि सुनेने चहाचा वाफाळता कप हातात द्यावा अशी स्वप्नं बघितली होती. विरून गेली चहाच्या वाफेतच. जळलं मेलं आमच्या पिढीचं हे असलंच. आधी सासू होती आणि आता सून मिर्‍या वाटतेय डोक्यावर". राधाताई फणफणत चहा करायला गेल्या.

"अमर्यादित आनंद ! (भाग ३)"

मला अजूनही आठवतं, साधना शाळेचं पटांगण, मूल्यशिक्षणाचा तास.... आणि बी. जी. आबा म्हणजे आमच्या मुख्याध्यापकांच भाषण....

"मी लहान असताना माझ्या हातेडच्या शाळेत, ५ वीत ४ झाडं लावली होती, त्यातली २ तोडली गेली, पण २ झाडं आज ही दिमाखानं उभी आहेत....मला जगाला काहीतरी दिल्याचा आजही अभिमान वाटतो". आबा बोलत होते. माझ्या कानांत कुणीतरी लोहरस ओतत आहे असं वाटायला लागलं, आपल्याला का नाही सुचलं झाडं लावायला? आबांना कसं काय सुचलं हे? की त्यांना कुणी सांगितलं असेल तसं करायला? आज मी इथे पटांगणात लावू शकतो का झाडं? पण मी तर आता १० वीत आहे, मग मी शाळा सोडल्यावर कोण काळजी घेईल त्या झाडांची? आपण ५ वीत असताना काय करत होतो? आबा मी ५ वीत असताना तुम्ही इथेच होतात मग का नाही सांगितलं आम्हा सगळ्या मुलांना तुम्ही असं त्या वेळी? आजच का? कारण तसं सांगायला एक व्यासपीठ लागतं आणि ते उपलब्ध झालं आहे , सरकारने सुरू केलेल्या मूल्य शिक्षणाच्या तासामुळे.

एक तरी लाईफलाईन हवी होती

आमच्या कॉलेजचा परिसर. आज परीक्षेचा शेवटचा दिवस असतो. जूनच्या कडक उन्हात तो सुंदर दिरवा परिसर भाजून निघत असतो. जगजीतसिंगची गझल सतत बॅक्ग्राउंडला वाजत असते. "कोई चिट्ठी ना सन्देस, वह जाने कौनसा देस जहाँ तुम चले गये" सिम्मी, फ्रेडी आणि मी, कँटीनमध्ये बसून बोलत असतो. आम्ही तिघेही मनांतून रिते झालो असतो. आमची मैत्री अशा वळणावर उभी असते, की जिद्दीने चालत राहिली तर आयुष्यभरासाठी मिळविली आणि थांबली तर संपून गेली. सिम्मी जाणार असते आगरतला-आसामला, मी, नागपूर-महाराष्ट्रात आणि फ्रेडी.... त्याच्या त्या सोनेरी धूळ उडणार्‍या. खमंग वासाचे साफे घातलेल्या जैसलमेरला.

        म्हणजे असं तो म्हणत असतो. तो खरंच कुठे जाणार हे सिम्मीला आणि मलाही माहिती असतं. आमचा जीव आतल्या आत गुदमरत असतो. त्याच्यासमोर बसवतही नसतं आणि त्याला सोडून उठवतही नसतं. मी जगजीतसिंग्च्या त्या बॅकग्राउंडला वाजणार्‍या रेकॉर्डसारखी परतपरत फ्रेडीला घरी येण्याबद्दल बजावत असते आणि तो उठतो. संध्याकाळची गाडी असते त्याची. म्हणतो,"चलो, हम तीनों कॉलेज का एक राउंड मार आते हैं, फिर पता नही...." माझ्या पोटात खड्डा पडतो. मी सिम्मीकडे बघते. तिच्या लालसर मोठ्ठ्या डोळ्यांमध्ये बघते. पापण्या ओलावल्या असतात. ओठ दाबून ती मानेनेच नाही म्हणते. "तेरे बस की बात नही है, हिम्मत चाहिये". मी यांत्रिकपणे उठते.  कॉलेज,लायब्रेरी, पार्किंग, कट्टा परत कँटिन आणि फ्रेडी शेकहँड करायला हात हातात घेतो. "मै आऊंगा तेरे घर. फिर मिलेंगे" माझ्या हाताची पकड पक्की होते. मनातला सावरून धरलेला बांध फुटतो. "हम फिर कभी नही मिलंगे फ्रेडी, कभी नही. कारण तू मरणार आहेस या जूनमध्ये. तू नेहमीसाठी जाणार आहेस. कधीच भेटणार नाहीस. आपली दोस्ती संपून जाणार आहेस. कधीच भेटणार नाहीस. आपली दोस्ती संपून जाणार आहे धाडकन. मी सुरू ठेवली असती रे माझ्याकडून. मीच तुला पत्र पाठवलं असतं, फोन केला असता. पण मलातरी काय माहिती तू कुठे जाणार आहेस ते. फ्रेडी, कुणालाच नाही माहिती." पण माझे शब्द आतच कोंडून जातात. नुसतीच जीवाची घालमेल होते. मी कसेबसे डोळे उघडते. अवघडलेले हात खाली घेते. कोंडलेले गरम अश्रू माझ्या कानशिलावरून खाली घसरतात. फ्रेडी, सिम्मी कॉलेज काहीही नाही. मी? आहे. थँक गॉड. मी नेहमी  माझ्याजवळ असते. थँक्स टु मी. मी माझ्या खोलीत असते आणि हे सगळं स्वप्नं असतं. मी किंचित सैलावते.

अनुनादी कविता: सुधीर मोघेंचे रसग्रहण

गेल्या शनिवारच्या लोकसत्ता चतुरंगमधे सुधीर मोघेंचा एक सुंदर लेख आलेला आहे. अनुनाद नावाचा.

ह्या लेखाच्या शेवटाला त्यांनी पंडीत नरेंद्र शर्मांच्या एका गीताचा उल्लेख केलेला आहे.

मधु माँग न मेरे मधुर मीत |
मधु के दिन मेरे गये बीत ||

'पेव फुटणे' याची (आश्चर्यकारक) व्युत्पत्ती !!!

नुकतीच बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. उद्यानाच्या परिसरात फिरताना ठिकठिकाणी मोठ्या फलकांवर उद्यानातल्या निरनिराळ्या वनस्पतींबद्दल माहिती लिहिलेली होती. त्यांपैकी एका फलकाकडे गाडीतून जाता-जाता ओझरतं लक्ष गेलं. त्या फलकावर 'पेव' या वनस्पतीबद्दल माहिती होती आणि पहिलं वाक्यच असं होतं :

इंग्रजी शाळांत जाऊन मराठीचा जागर करा - रामदास फुटाणे ह्यांचे विचार

आजच्या ई सकाळात ही बातमी वाचायला मिळाली. सर्वांना समजावी आणि तिच्यावर ऊहापोह करता यावा ह्या उद्देशाने ती येथे उद्धृत करून ठेवत आहे.

ईसकाळातली मूळ बातमी : इंग्रजी शाळांत जाऊन मराठीचा जागर करा - रामदास फुटाणे

लोहगड

लोकलच्या 'हूक'ला लटकत लटकत बाहेर नजर टाकत होतो. प्रत्येक स्टेशन आले की हजारो पाय माझ्या पायाचा मुका घेत होते. गर्दीने तर माझी दामटीच वळली होती. पण तिथे लक्ष द्यायला मला फारसा वेळ नव्हता. माझं लक्ष होत ते 'मळवली' स्टेशन कडे.... लोहगडाला जाण्यासाठी इथेच उतरावे लागते.

सरसेनापतींचा सत्त्याहत्तरवा समर्पणदिन

azad

दिनांक २७ फेब्रुवारी २००८ - हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्तक सेनेचे सरसेनापती हुतात्मा 'चंद्रशेखर आझाद' म्हणजेच चंद्रशेखर सीताराम तिवारी यांचा सत्त्याहत्तरावा समर्पणदिन.

प्रखर राष्ट्रवाद म्हणजे काय ते स्वा. सावरकरांनी दाखवून दिले, धगधगते हौतात्म्य म्हणजे काय ते हुतात्मा भगतसिंगाने दाखवून दिले, समर्पित जीवन म्हणजे काय ते नेताजी सुभाषांनी दाखवून दिले तर एका सेनापतीचा मृत्यू कसा असावा हे हुतात्मा आझादांनी दाखवून दिले.