बिगरमराठींसाठी मराठी कोचिंग क्लासेस

आजच्य महाराष्ट्र टाईम्समध्ये ही बातमी वाचली आणि सर्वांना समजावी आणि तिच्यावर विचारांची देवाणघेवाण करता यावी म्हणून तिच्याविषयी माहिती येथे द्यावीशी वाटली.

म.टा.तली मूळ बातमी :  बिगरमराठींसाठी मराठी कोचिंग क्लासेस

उद्‌घाटन, नको रे बाबा!

बाबूराव पाटील म्हणजे अवली माणूस. गोंधळे बुद्रुक गावाचे सरपंच; पण रुबाब पंतप्रधान असल्याचा. अडल्यानडल्याची कामं करतील, पण प्रत्येक ठिकाणी मिरवायला मिळालं तर! लग्न असो, मुंज असो, साठी-पंच्याहत्तरी असो की श्राद्ध; बाबूरावांना काही वर्ज्य नाही. श्रद्धांजली सभेतही असं भाषण ठोकणार, की निवडणुकीच्या प्रचाराची सभा आहे की काय, असंच वाटावं.
या अतिउत्साहापायी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यातही बाबूराव पटाईत. कधी तोंडघशी पडतील, याचा नेम नाही. बरं त्याचं यांना सोयर ना सुतक. आजूबाजूची मंडळीच खजील व्हायची. बाबूराव मात्र जय की थय!

मोकाशींची 'पालखी'

        (दि.बा.मोकाशींचं 'पालखी' हे पुस्तक नुकतंच वाचलं. त्याचं रसग्रहण) 
       
        वर्षांमागून वर्षे जातात. तंत्रज्ञानात प्रगती होते. माणसाभोवतीचं भवताल कमालीचं बदलतं. पण माणूसपण बदलत नाही. हाडं जिथल्या तिथे राहतात. रक्ताचा रंग लालच राहतो. वृत्ती तशाच राहतात. षड्रिपूंचा धुमाकूळ देहात अविरत सुरूच राहतो...
         या सगळ्याचा प्रत्यय ठायी ठायी 'पालखी'मध्ये येत राहतो.
         पुस्तक म्हणजे लेखक स्वतः पालखीमध्ये सामील झाल्यावर त्याला आलेल्या अनुभवांची टिपणं आहेत. सासवड ते पंढरपूर असा रात्रंदिन प्रत्यक्ष केलेला तो प्रवास आहे. प्रश्नपत्रिकेच्या मदतीनं समाजाचा आरसा पाहावा, असा लेखकाचा उद्देश होता प्रत्यक्षात तो आरसा कागदाऐवजी त्याच्या मनातच तयार झालेला आहे.
        एकेका मुक्कामाच्या आगे मागे नाना नमुने लेखकाला भेटतात. सुरूवातीला एक वारकरी बाईच फसवते, तेव्हा लेखकासह आपणही चमकतो. वारीची चुणूक मिळते. मुलं सांभाऴीत नाहीत म्हणून वारीला एक म्हातारा पालखीला आलेला आहे. पंचविशीतला केवळ आनंदासाठी क्षण जगणारा तरूण पालखीत आहे. पोर हरवलेली बाई आहे. हिशेब ठेवणारा संन्यासी आहे. स्वतःच्या समाजाचा रोष पत्करून पालखीत येणारी मुस्लिम स्त्री आहे. चार पैसे सुटतात म्हणून आणि वारीची सेवा घडते म्हणून येणारे न्हावी आहेत. अखेरच्या टप्प्यात समाजातील अभिजन वर्गातील प्राचार्य सोनोपंत दांडेकरांची उपस्थितीही पालखीत आहे. 
     या सर्वांशी लेखकाचे झालेले संवाद-विसंवाद नमुनेदार आहेत आणि म्हणून मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.
     पालखीचं व्यवस्थापन, मुक्कामांवर निर्माण झालेले तंबू , जेवणाखाणाची व्यवस्था अशा असंख्य गोष्टींशी नकळत परिचय होऊन जातो.
     वर्णनाची अत्यंत साधी शैली लेखकाकडे आहे. मित्रापाशी मन मोकळं करावं, तसं लेखक लिहितो. 
     भजनाचे नाद दूर जात जात फक्त पावसाची थडथड राहिली, तेव्हा धावत्या लारीतून पडलेल्या पोत्यासाऱखा मी दचकलो.
     मांडवीचा ओढा भल्या मोठ्य़ा कातळाला बगल देऊन वाहत आहे. 
     उजव्या हातास टेकडी आहे. मुरूम काढल्याचे लहानमोठे खड्डे तिच्यावर दिसत आहेत.
     ...अशी असंख्य वाक्यं सहज येऊन भेटतात.
     माणसं, निसर्ग आणि एकूण जीवनमानाचं आगळं वर्णन लेखक करतो. 'जमीन मागे पडत आहे' ऐवजी लेखक म्हणतो 'पृथ्वी मागे पडत आहे'. वारीचे वर्णन मोकाशींनी कमालीचे चित्रमय केले आहे...
     वारक-यांच्या उंच धरलेल्या पताका आकाश भगवं करीत दिलखुलासपणे नाचत-खिदळत होत्या.  
    पाच-पाचच्या रांगेत वारकरी चालत होते. सर्वांच्या उघड्या पोट-या नजरेत भरत होत्या.
    साध्या शैलीमुळे वारीची निव्वळ बातमीदारी होत नाही तर समालोचन होतं. जणू आपणही वारीत आहोत पण काय घडत आहे ते केवळ मोकाशींनाच दिसत आहे.  एकेक मुक्काम करत करत जेव्हा आपण पंढरपूरला येतो तेव्हा वारीमय होऊन गेलेलो असतो. पालखीने लेखकासह आपल्यालाही काय दिलं असा विचार आपण करतो, करतच राहतो.
    पुस्तक 1964 सालचं आहे पण कोणी ते 2007 सालचं म्हणून सांगितलं तरी त्याला खोटं बोलणं म्हणू नये. कारण पालखी आजही तशीच आहे. आय.टी. युगातही.

मास्तर आणि मडकं

ही विनोदी गोष्ट मी कुठेतरी वाचलेली आहे. जशी आठवली तशी लिहित आहे. चु. भू. दे. घे.

काही वर्षांपुर्वीचा काळ. अनामवाडीतील जि. प. ची शाळा. कुठलाही शिक्षक दोन महिन्यांच्या पुढे न टिकण्याची शाळेची परंपरा. अशातच जानेवरीच्या आगेमागे नुकतेच रुजू झालेले, मारकुटे मास्तर - टिपिकल पुणेरी पेहेरावातले आणि संस्कारतले, ग्रामीण भागातील मुलांना अभ्यासाबरोबरच शिस्तीचंही महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांची खास नेमणूक करण्यात अलेली होती. त्यामुळे एका हातात खदू आणि दुसऱ्या हातात छडी असं चित्र दिसायचं. पुढे पोरांच्या अनुभवावरून मास्तरांच्या हातात खडूऐवजी नुसत्या छडीचंच चित्र दिसू लगलं. ते कडक शिस्तीच्या नावाखाली निमित्तच शोधायचे. पोरंही जाम वैतगली होती.

प्राचीन भारतीय खगोलशास्त्र ६

रामायणाप्रमाणेच महाभारतामध्ये व्यासानी खगोलविषयक अनेक वर्णने केली आहेत.ती खरी आहेत.महाभारतयुद्ध १० सप्टेंबर इ.पू.३००८ ,ग्रेग्ररीयन( ५ आक्टोबर ज्युलियन)कार्तिक अमावस्येस सुरू झाले.त्या दिवशी सकाळी सूर्य ऊगवतानाच २१३.३३ अंशावर(विशाखा/अनुराधा) सूर्य/चंद्र असता सूर्यग्रहण झाले. राहू २११ वर होता.त्यापूर्वीच्या कार्तिक पौर्णिमेस चंद्रग्रहण होते.युद्ध १४ आक्टोबर रोजी श्रवण नक्षत्री मार्गशीर्ष  शु. ४ रोजी संपले.(मध्ये अधिक महिना होता.)येथे डेल्टा टी १ दिवस असल्याने संगणकात ४ आक्टोबर ३००९ बी. सी.ई. ज्युलियन बघावे लागेल.मी कॅल्क्युलेटरवर सर्व गणिते केली आहेत.ती पुस्तकात दिली आहेत.या दिवसाशिवाय वनवासाच्या प्रारंभापासून भीष्मनिधनापर्यंत (१८ डिसेंबर ,माघ शु.८,रोहिणी नक्षत्र) सर्व तारखा,गणिते,श्लोक दिले आहेत.

(पुणेरी) 'सभागृहा'मधील आचारसंहिता

परवा पुण्यातल्या एका लग्नाला गेलो होतो. "लग्न मंगल कार्यालयात होणार आहे." असेच सगळे लोक बोलतांना म्हणत होते. पण त्या जागेचे नांव 'मंगल कार्यालय' असे न ठेवता 'सभागृह' असे ठेवले आहे असे तेथे गेल्यावर कळले. म्हणजे त्यात चाललेले प्रत्येक कार्य खरोखरच 'मंगल' आहे की नाही हे कोणी विचारायला नको की तिथे एकादे 'अमंगल' कृत्य करण्याचा विचार कोणाच्या  मनात आला तर त्याची पंचाईत व्हायला नको. आंत गेल्यावर मात्र 'वधूपक्ष', 'वरपक्ष' वगैरे पाट्या तिथल्या खोल्यांवर लावलेल्या होत्या. गरज नसेल तेंव्हा ते त्या काढून ठेवत असतील. सभागृहात प्रवेश करतांनाच दरवाजापाशी ठळक अक्षरात एक आचारसंहिता लिहिलेली होती. त्यातील नियम खालीलप्रमाणे होते.
१. संध्याकाळी ५ वाजता कोणत्याही परिस्थितीत सभागृह १०० टक्के रिकामे करून दिलेच पाहिजे. ही गोष्ट सभागृहाचे 'बुकिंग' करतांनाच लक्षात घ्यावी.
(याचा अर्थ संध्याकाळी ५ वाजता कोणी तेथे आढळल्यास त्याला बाहेर काढले जाईल आणि तेथे असलेले सामान जप्त केले जाईल कां? ज्याने सभागृहाचे आरक्षण केले असेल त्याला त्या वेळेस या नियमाची जाणीव करून देणे इष्ट आहे आणि तशी ती दिलेली असणारच पण बाकीच्या पाहुणे लोकांनी बहुधा आपण होऊन शक्य तो लवकर तेथून आपला गाशा गुंडाळावा यासाठी ही जाहीर सूचना दिली असावी किंवा त्यांच्यापैकी कोणाला हे सभागृह भविष्यकाळात भाड्याने घ्यायचे असल्यास त्याने या नियमाची नोंद आधीच घ्यावी म्हणून असेल.)
२. दुपारी ३ वाजतानंतर सीमांतपूजन, वाङ्निश्चय यासारखा कोणताही कार्यक्रम करू नये.
(संपूर्ण समारंभाचे वेळापत्रक तयार करून त्यावर संचालकांची आगाऊ संमती घेणे अधिक श्रेयस्कर!)
३. रात्री १०.३० नंतर गाणी, नाच, भेंड्या वगैरे कसलाही गोंगाट करू नये.
(सर्व पाहुणे मंडळींनी अळीमिळी गुप्पचिळी धरावी किंवा डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपून जावे!) आम्ही ज्या लग्नाला गेलो होतो तिथे सकाळी उठूनच सभागृहात गेलो होतो त्यामुळे हा नियम आम्हाला लागू पडत नव्हता. त्यामुळे तो कितपत आणि कसा पाळला जातो ते समजले नाही.
४. सभागृहाच्या आवारात ताशे वाजंत्री किंवा बँड वाजवणे, तसेच फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे.
(लग्नाच्या अक्षता टाकल्यानंतर टाळ्या वाजवून हात झटकायला तरी परवानगी आहे की ज्याने त्याने आपापल्या हातरुमालाला हात पुसावेत?)

ही बाब जरा गौण आहे

"नाही! आता हे चालणार नाही!! या राज्यात मराठी माणसाची कुचेष्टा!! माझ्या मर्द मराठ्यांनो आता तुटून पडा!"
अस म्हणत 'राजां'नी गर्जना केली आणि  हजारोंच्या संख्येने मराठा गनीमाच्या मुलुखात- शहरे 'मुंबईत' घुसला!!
(संदर्भ - 'सकाळ' बखर. शके २००८-३-फेब) सरदार अबू आझ्मीच्या गोटावर त्याने जबरा मारा चालवला!

काही नवीन पुणेरी पाट्या

नमस्कार

मी मनोगत वर नवीनच आहे. तेव्हा काही लिहिताना चुकले तर माफ करा.

"साक्षात" ची दहा वर्षे

"साक्षात "या त्रैमासिकास नुकतीच दहा वर्षे पुर्ण झाली‌.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या ,समाजातील सर्व स्तरांतील नव्या जुन्या कवी ,कथाकार,समीक्षकांचे साहित्य कुठलाही पूर्वग्रह अथवा विशिष्ट विचारसरणीच्या आहारी न जाता प्रकाशित करणाऱ्या या अनियतकालिकाचे अभिनंदन करण्यासाठी,औरंगाबादेत गेल्या आठवड्यात  एक लहानसा सोहळा आयोजित करण्यात आला होता.. या प्रसंगी चंद्रकांत पाटील ,ना.धो.महानोर या दोन ज्येष्ठ कवींसह अनेक नवे जुने साहित्यिक उपस्थित होते.( अधिक माहिती ..http://editorsakshat.multiply.com/).या मसिकाचे संपादक रमेश राऊत यांचे हार्दिक अभिनंदन !! साक्षातचे  गेल्या दहा वर्षांतील अंक खालील पत्त्यावर उपलब्ध आहेत --

कथा/पटकथा (ईमडॉकॉ पार्ट फोर)

कथा/पटकथा (ईमडॉकॉ पार्ट फोर)

                       ईझी मराठी डॉट कॉमच्या नव्या मालिकेच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमाच्या जल्लोषाला तसेच तिथे सोडून मी आणि सौ घरी निघालो होतो खरे पण कां ते निदान मला तरी समजत नव्हतं. इतक्यात आमच्या पाठीमागून कसलासा गलबला कानावर आला. मी मागे वळून पाहिले तर मंदकांत परत जायला निघाले होते आणि त्यांना निरोप द्यायला सुता आणि आणखी एक दोघे बाहेर आलेले दिसले. माझ्याकडे लक्ष जाताच पुढे होत मंदकांत म्हणाले,