मुंबईतलं 'राज'कारण

मुंबईत राज समर्थकांनी घातलेल्या धिंगाण्यामुळे अमराठी प्रसारमाध्यमांमार्फत विचित्र संदेश गेला आहे. महाराष्ट्रात रहाता तर मराठी संस्कृती आपलीशी करा, आमची भाषा शिकून घ्या हे म्हणणे कुणाला अमान्य असण्याचे कारण नाही. पण दुर्देवाने राजच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारामुळे माध्यमांमधून फक्त हिंसाचारालाच हायलाईट केले जात आहे. शिवाय अमिताभसंदर्भातील विधाने, त्याच्या घरावरील कथित हल्ला हे मुद्दे पुढे येताहेत आणि मुंबईत किंवा महाराष्ट्रात इतर भाषकांनी येऊच नये काय असा प्रश्न विचारणार्‍या आणि राजचे आंदोलन हा प्रसिद्धीचा स्टंट असून त्या ला अटक करावी अशी मागणी करणार्‍या प्रतिक्रिया प्रत्येक वेबसाईटवर वाचायला मिळत आहेत.

साईनिंग अमाऊन्ट (ईमडॉकॉ पार्ट टू)

                         दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ठीक आठ वाजता बिट्टू यादवने दिलेल्या कार्डावरच्या पत्त्यावर मी जाऊन पोहोचलो. जेमिनी टॉवर्स नावाच्या  एका बहुमजली इमारतीच्या एका सदनिकेच्या बाहेरच्या पितळी नामफलकावर याक अँड यति रेसॉर्टस् पासून अनेक कॉबलर्स् टॅनरीज पर्यंत अनेक कंपन्यांची नावे कोरलेली होती. सगळ्यात शेवटी टीव्ही अँड बीवाय् फिल्म्स कंबाईनचे जाड अक्षरात नाव लिहिलेला कागद डकवलेला होता. काळसर काचेचा दरवजा ढकलून मी आंत प्रवेश केला तेंव्हा एखाद्या अंधार्‍या गुहेत शिरताच अंगावर शिरशिरी यावे तसे झाला. पण मा लक्षात आले, अतिशय मंद प्रकाश असलेल्या वातानुकूलित स्वागतकक्षात मी प्रवेश करता झालो होतो. माझी चाहूल लागताच एका कोपर्‍यातून ‘ येऽस्’ असा फूत्कार कानावर आला. त्या दिशेने तर एक तांबूस लाल खड्यांची माळ घातलेला गळा, दोन उघडे दंड, उघडेच खांदे आणि त्यावर जवळ जवळ अगदी पुरुषी केशभूषामंडित एक स्त्रीचे मुंडके नजरेस पडले. नकळत मी एक आवंढा गिळला आणि त्या मुंडक्याच्या दिशेने सरकलो. जवळ गेलो तेंव्हा ती तेथील स्वागतिका आहे हे लक्षात आलं. तिच्या अर्ध्या उघड्या खांद्याखाली एक झग्यासारखे वस्त्र आहे हेही माझ्या लक्षांत आले. पण त्याचाही रंग ती ज्या मेजापलिकडे बसली होती त्याच्या काळ्या तांबूस रंगाशी मिळता जुळता होता. त्या मुळे कांही क्षणापूर्वी माझा गोंधळ झाला होता.

ठाण्यातील 'क्रांतीचा झंझावात'

दिनांक एक, दोन व तीन फेब्रुवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणाऱ्या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकाची नावे सुद्धा माहीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र यावर नुसते चरफडण्यापेक्षा या महान हुतात्म्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून द्यावा, व विद्यार्थ्यांचा यात सक्रिय सहभाग लाभावा, त्यांना क्रांतिकारकांविषयी आदर निर्माण व्हावा, त्यांची माहिती करून घ्यावीशी वाटावी यासाठी ’अर्थ’ ने एक अत्यंत कल्पक असा प्रकल्प राबविला. kz

एका लग्नाची गोष्ट...

"डोकं फिरलंया...बयेचं डोकं फिरलंया..."

लग्नसमारंभाला अगदी साजेसं आणि नवरा-नवरीच्या मनःस्थितीचं सुयोग्य वर्णन करणारं गाणं बॅंडवर वाजवलं जात होतं. (लग्नाचीही काय गंमत असते बघा...आधी वधूपक्षाकडली मंडळी नवऱ्या मुलासाठी बॅंड वाजवतात आणि मग त्याचा बॅंड वाजवतात !) पाहुणे झकास नाचत होते. गणपतीतल्या नाचापेक्षा या नाचाचा दर्जा किंचित वरचा आहे, अशी शंका घ्यायला वाव होता. फुगड्या रंगल्या होत्या. काही जण लग्नातल्या कामांचा शीण घालवण्यासाठी अंग हलवत होते तर काही जण आधीच 'श्रमपरिहार' करून आले होते आणि आता अंगात भिनलेलं रसायनच त्यांना नाचवत होतं. करवल्या घरात असले-नसलेले सगळे दागिने अंगावर चढवून, मेकअपची तमाम साधनं वापरून तरुण पोरांचं लक्ष वेधून घेण्याच्या आटोकाट प्रयत्नात होत्या. ज्येष्ठ मंडळींच्या सध्या कशी हवा पडलेय, रस्त्यांवर चालताना कसा त्रास होतो वगैरे गप्पा रंगल्या होत्या. बायका मंडळी एकमेकींच्या साड्या, दागिने, नवी खरेदी, अमक्‍याच्या लग्नात असं झालं, तमकीच्या सासरच्यांनी तमूक हुंडा मागितला वगैरे विधायक गप्पांमध्ये रंगल्या होत्या.

घाईत घाई

मुडदा बशिवला तुझा...डोळेबिळे फुटलेत की काय? मेल्या पायाचं पार भजं केलंस की...तुझ्या...***!''
एक कचकचीत शिवी त्या कोंदटलेल्या, तुंबलेल्या बसमध्ये घुमली. आणि गजराबाईंच्या पायावर पाय देणाऱ्या सदाचा चेहरा (न) पाहण्यासारखा झाला.
"कुठल्या मुहूर्तावर बसमध्ये चढलो कुणास ठाऊक,' असं त्याला वाटलं.

ईझी मराठी डॉट कॉम

                      हेमंत ऋतूतील सुरम्य रविवारची सकाळ. जुन्या भाषेत बोलायचं तर कोवळी उन्हं अशी ओटीवर - तूर्तास बाल्कनीत- पोहोचलेली.  सौभाग्यवती, कुलदीपक आणि कुलदीपिका अद्याप साखरझोपेतच. ‘या निशा सर्व भू्तानां तस्यां जगर्ति संयमी’ असा मी संयमी. भल्या पहांटे सहा वाजता जागा झालेला. पोटात कोकलणार्‍या कावळ्यांना कसे शांत करावे या चिंतेत. एरवी मी एव्हाना एखाद्या क्षुधांशांति गृहात मिसळपाव हाणत बसलो असतो. पण ‘बाहेर जाऊन कुठे कांही हादडू नका’ अशी तंबी काल रात्रीच मिळाली होती. कारण आज घरी महिला मंडळाची किटी पार्टी ठरली हो्ती आणि त्यासाठीच्या मदतीसाठी मी रिझर्व्हड् होतो.
                      पार्टीचा मेनू अगदी यावेळेपर्यंत गुपित ठेवला गेलेला होता. पण मला त्याचीच खरी धास्ती होती. कारण गेल्या वेळेस अशाच किटी पार्टीचा मेनू आयत्या वेळेस ‘ आमरसातील कडबोळी ’ असा जाहीर झाला आणि त्यासाठी लागणारा आमरस बाजारात शोधता शोधता मला ऐन डीसेंबरात घाम फुटला होता. अशा नाविन्यपूर्ण पाककृतीचे प्रयोग करण्याची आमच्या सौभाग्यवतींना भलतीच हौस. त्यासाठी दूरदर्शनवरील पाकक्रियेचा एकही कार्यक्रम त्या सोडीत नसत. त्या पाककृतीही भलत्याच नाविन्यपूर्ण असतात. बहुदा नेहेमीच्याच दोन किंवा तीन पाककृतींचे भागश: केलेले कडबोळे असते.
                       चुकून एकदा दुपारी घरी आलो तर ‘ढंग मेजवानीचा ’ अशा नावाचा एक कार्यक्रम बघण्यात सौ तल्लीन झालेल्या. मला त्यांच्याशी महत्वाचे बोलायचे होते. पण त्या छोट्या पडद्यावर चालू असलेली ‘ बोहेमियन पिज्झा वुईथ गार्लिक सॉस ’ ही पाककृती संपेपर्यंत त्या माझ्याशी बोलणेच काय पण माझ्या अस्तित्वाची दखल घेतली जाणेही दुरापास्त होते. त्या मुळे ती पाककृती मला पहा्वीच लागली. मैद्याच्या वात्तऽड अशा भाकरीवर आलं-लसणीचा ठेचा सारवलेला, त्यावर बर्‍याचशा कच्च्या भाज्या किसून घातलेल्या आणि शेवटी त्याच्यावर चीझचा कीस. हे सारं छोट्या भट्टीत गरम करून खायचं. बोटीच्या भोंग्यासारखा टोप घातलेला एक खानसामा ती पाककृती करून दाखवत होता आणि एक गोर्‍या गोबर्‍या गालाची नाकेली मुलगी एकदा ओढणी आणि एकदा कपाळावर लोंबू पहाणारे केस सावरीत, त्यातून वेळ काढीत त्याची पाककृती प्रेक्षकांना समजावून सांगत होती. या पदार्थाला बोहेमियन पिज्झ्झा कां म्हणायचं हे मला कळेना. सौ ती पाकक्रूती ( हा तिच्याच वहीतला शब्द आहे) लिहून घेण्यात मग्न असल्याने माझ्या या प्रश्नाला उत्तर मिळणे शक्य नव्ह्ते. आमच्या घरी दुपारचे जेवण बाराच्या आत आणि तीनच्या नंतरच मिळू शकते. कारण दरम्यानच्या वेळात निरनिराळ्या वाहिन्यावरती प्रसारित होणार्‍या अशा पाककृतीचे कार्यक्रम असतात. त्यांच्या वेळांचे नियोजनही खुबीने केलेले असते. म्हणजे दुपारी बारा ते साडेबारा ‘ग’ वाहिनीवर असा कार्यक्रम असेल तर तसाचा प्रकार साडेबारा ते एक या वेळेत ‘ढ’ वहिनीवर  असतो. त्यामुळे रोज किमान चार ते पाच पाककृती क्रमाने पहाता येतात. एके  ठिकाणी मात्र थोडी पंचाईत होते. कारण कुठल्यातरी दोन वाहिन्यांची असा पाककृतींचा कार्यक्रम दाखाण्याची वेळ दुपारी अडीच ते तीन अशी एकच आहे. त्यावेळेस सौंच्या डाव्या हातात ‘पाकक्रुती’ची वही, तोंडात(दातात) पेन्सिल आणि उजव्या हातात दूरदर्शन संचाचा दूरनियंत्रक अशी अवस्था असते. पाककृती लिहून घेते वेळी पेन्सिल दूरनियंत्रकाला खो देते आणि वाहिनी बदलते वेळी ती पुन्हा दातात येते. एकाच वेळी दोन निरनिराळ्या पाककृती लिहून घेणार्‍याला सव्यसाची वगैरे म्हणता येते किंवा नाही हा मला माहिती नाही. पण त्या वहीतल्या कांही पाककृतींची गणना ‘अपौरुषेय’ अशा सदरात  करावी लागेल. ‘ट्रिच्ची पायसम्‌’ अशा शीर्षकाखालील एका पाककृतीत, ‘ शिजत आलेल्या शेवयामधे दूध, साखर, कांजू-बदामाचे काप घालावे त्यात... म्यारीनेट केलेले पापलेटाचे तुकडे अलगद सोडावेत, हलक्या हाताने ढवळावे ... चारोळ्या घालून फ्रीजमधे थंड करावे’ असा उल्लेख असलेला मी (चोरून) पाहिला आहे.
                      ‘आभाळ पांघरून जग शांत झोपलेले, घेऊन एकतारी गातो कबीर दोहे’ ही ओळ गुणगुणत (मला तेवढीच येते) शांत झोपलेले जग जागे होई पर्यंत, माझ्या कडे एकतारी नसल्याने आलेली वर्तमानपत्रे चाळायला घेतली. रविवार असल्याने वर्तमान पत्राची साप्ताहिक पुरवणी आधी पहावी असा विचार केला. नाही तरी मुख्य पुरवणीत हल्ली ‘वाचलेच पाहिजे’ असें फारसें कांही नसतेच. इतक्यात ती पुरवणी कोणीतरी खस्सकन‌ हातातून् ओढून घेतली. ती कोणी ओढून घेतली हे पहाण्यासाठी मान वर केली तर पुरवणी ओढून घेणारी व्यक्ती नीटशी दिसली नाही. ओळखीची मात्र वाटली. " असे काय बघताय बावळटासारखे?" कानावर आदळलेल्या या प्रश्नासरशी ‘कुठे बरं बघितलंय् हिला’ ही संभ्रमावस्था भंग पावली. डोळ्यावरच्या, वाचण्यासाठी म्हणून खास बनवून घेतलेल्या, चष्म्यातून जरासे पलिकडचेही अंधुकच दिसते. चष्मा बाजूला सारून बघेपर्यंत ती व्यक्ति पुरवणीमागे अंतर्धान पावलेली.
"अय्या, कित्‍ती छान!" आता मात्र आवाजाची ओळख पटली.
" काय कित्‍ती छान?.."
" अहो असं काय करता? आज आपल्याकडे पार्टी आहे ना?"
" बरं, मग? त्यात कित्‍ती छान काय?"
" त्यात काही नाही. हे बघीतलंत का? काय छान रेसीपी आलीय मधुरामधे"
" ही मधुरा कोण?"
" हे पहा जोक नका मारू हं सकाळी सकाळी. मधुरा म्हंजे बायकांची पुरवणी. छान छान रेसीपी असतात त्यात. नाही कां मागे मी ब्रिन्‍जल फ्रिटाटा  केला होता. तो मधुरातलाच होता." 
 बापरे! अंडी घालून केलेला वांग्याचा तो गचका आठवून आत्ताही मला गरगरायला लागलं.
" बरं आता काय आलंय?"
" हे पहा, स्पॅघेटी इन सांबार. आज आपण तेच करूया. शिवाय मी टोफू हलवा करणार आहेच."
" अगं पण......"
" तुम्ही आता वेळ घालवू नका बाई. जा बाजारात पळा आणि सांबारासाठी भाज्या, पनीर, सगळं सगळं आंणून द्या गडे. मी पटकन् यादी करून देते"

द ग्रेट अन"लॉयल' सर्कस...

""बाबा, सर्कसला जाऊया?''
"नको रे...कंटाळा आलाय. शिवाय गावाबाहेर आहे ती. खूप लवकर निघावं लागेल.''"
"शी बाबा! तुम्हाला नेहमीच कंटाळा. अहो, बरेच प्राणी असतात त्यात. मला बघायचेत.''"
"नको म्हटलं ना! आणि हल्ली मेनकाताईंच्या कृपेनं त्यात कुठलेच प्राणी नसतात. फक्त कुत्री-मांजरी, पोपट-मैना असतात.''"
"वाघ, सिंह, हत्ती नसतात?''"
"अजिबात नाही!''"
"मग...सर्कसमध्ये बघायचं काय?''
"अरे...सांगितलं ना, बघण्यासारखं काहीच नसतं हल्ली''"
"पण ते झुल्यावरच्या कसरती, मृत्युगोल, गाड्यांच्या कसरती तरी असतातच की!''"
"तू अगदी हट्टी आहेस बघ. अगदी आईवर गेलायंस. आपलं बोलणं खरं केल्याशिवाय राहणार नाहीस. अरे, गाड्यांच्या कसरती बघण्यासाठी सर्कशीच्या तंबूपर्यंत कशाला जायला हवं? मी तुला दाखवतो. आपल्या पुण्यातल्या रस्त्यांवर रोज अखंड कसरती चालू असतात.''"
"बाबा बाबा, आपण जायचं, रस्त्यावरची सर्कस बघायला?''"
"चल...''
-----
दृश्‍य दुसरे ः स्थळ ः टिळक चौक. (अलका टॉकीजच्या जवळचा. "टिळक' कोणाला माहित नाहीत, ना!)"

एक विद्रोही

संतोष पद्माकर पवार. "भ्रमिष्टाचा जाहीरनामा' लिहिणारा. त्याच्या निर्मितीला काय म्हणावे? कविता की सुसंस्कृत समाजासाठी तळमळणाऱ्या वेड्याचा हुंकार की, स्वान्त सुखाय समाजाच्या दृष्टीनं एक काफिरनामा. काहीही असो. त्याचा हा दीर्घ कविता संग्रह म्हणजे बनचुक्‍या, आत्मकेंद्री आणि सामाजिक अपप्रवृत्तींचा केलेला पंचनामा जरूर आहे. म्हणूनच काव्यविश्‍वातील मानाचा- 25 हजार रुपयांचा- "अभिधानंतर पुरस्कार' संतोषच्या या काव्यकृतीला मिळाला. त्यानंतर त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

मॅक्झिम गॉर्की: आई २

एखादे आत्मचरीत्र किंवा ख-या जीवनाची पार्श्वभूमी असलेली कादंबरी आपण जेंव्हा वाचत असतो, तेंव्हा काही क्षण स्वतःहाचे जीवन विसरून त्या कथानायकांच्या जीवनाशी समरस होतो... व वाटू लागतं जीवनात एवढी मोठी दुःखं, संकटं आहेत तरी हे लोक त्यांच्याकडे किती सहज दृष्टीने पाहतात. आणि मी माझ्या किती क्षुल्लक गोष्टी मनात घेऊन बसलो आहे. जेंव्हा माणसासमोर उदात्त ध्येय असतं, तेंव्हाच त्याला जीवनाचा खरा मार्ग सापडतो.

यशस्वी पुरुषामागे स्त्री (चांगली की वाईट)

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, अशी शब्दावली प्रचलित आहे; पण सकारात्मक अर्थाने! याचा अनुभवही अनेकांना आला असेल. पण एखाद्याची बायको किंवा प्रेयसी खाष्ट असेल तर, तो पुरुष यशस्वी होणारच नाही का? यावर प्रत्येकाची मते भिन्न असू शकतात. नव्हे असतीलच, यात शंका नाही. पत्नी खाष्ट आणि तऱ्हेवाईक असेल तर पती यशस्वी होणारच नाही, असे कुणाचे म्हणणे असेल तर अब्राहम लिंकनच्या आयुष्यात डोकवा म्हणजे डोक्‍यातील भ्रम दूर होतील. कुणी म्हणेल हा अपवाद आहे... (ज्याचा-त्याचा प्रश्‍न!)