अफगाणिस्तान या एके काळी मुक्त असलेल्या आणि समृद्ध देशाची आज लक्तरं उरली आहेत. १९८८ साली रशियाच्या मदतीने बंडखोरांनी त्याच्यावर पहिला घाला घातला आणि त्यानंतर हा प्रांत अखंड धुमसतो आहे. 'तालिबान' च्या मूलतत्त्ववादी विचारसरणीने तर त्याला काहीशे वर्ष मागे नेऊन ठेवलं आहे.
सकाळी विमानतळावरुन निघालो तेव्हा भुवनेश्वर जागं झालं होतं. पूर्वेकडे जाऊ तसं लवकर उजाडतं त्यानुसार ओरिसामध्ये सकाळी सहा वाजताच चांगलं फटफटीत उजाडतं. पण मावळतं देखील तितकंच लवकर आणि सवय होईपर्यंत बर्याचदा पाच वाजेपर्यंतच अंधार पडायला सुरुवात होऊन आमचं नियोजन चुकत असे. असो. सकाळ सकाळ भुवनेश्वरचं जे दर्शन झालं ते मी तरी कधी विसरणार नाही. कुणालाही आवडेल असंच! म्हणजे कामाला जाणाऱ्यांची घाई, घरांसमोर चाललेली झाडलोट, रस्त्याकडेच्या टपऱ्यांवर उकळणारा चहा! आणि सर्वत्र जाणवण्याइतपत असलेली स्वच्छता! भुवनेश्वर चा विमानतळ शहराच्या जवळच आहे त्यामुळे गाडीतून शहरात पोहोचायला बिलकूल वेळ लागत नाही. डीआरडीओच्या विश्रामगृहात राहण्याची आमची सोय होती. क्षेपणास्त्र चाचणीवेळी भुवनेश्वर वरुन बालासोर(बालेश्वर)आणि तेथून पुढे चंदीपूरला जाणाऱ्यां अधिकाऱ्यांसाठी हे विश्रामगृह डीआरडीओने ट्रान्झिट फॅसेलिटी म्हणून बांधले आहे. तिथे पोहोचून सामान खोल्यांवर टाकलं आणि नंतर दुपारी भुवनेश्वर बघायला निघावं असं ठरलं. एकतर सकाळचं साडेपाचचं विमान पकडण्यासाठी कालच्या संपूर्ण झोपेचं खोबरं झालं होतं. त्यामुळे झोपेची थकबाकी मिटवणे हा पहिला कार्यक्रम होता. आख्ख्या ओरिसात जवळजवळ ६०० मंदिरं आहेत. भुवनेश्वर हे सर्वार्थाने मंदिरांचं शहर आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने कुठेही, कशीही, हरएक देवांची, भडक ऑईलपेंटने रंगवलेली ही मंदिरं नाहीत तर दगडांमध्ये नजाकतीने कोरलेली, कित्येक शतकांपूर्वी बांधलेली, काहीतरी वेगळं पाहिल्याचं समाधान देणारी मंदिरं आहेत. बहुतेक मंदिरं ही भोळ्या शंकराची आहेत. मुक्तेश्वर, परशुरामेश्वर अशी! पण भुवनेश्वर (भुवन+ईश्वर ?) मधलं सगळ्यात मोठं आणि पर्यटकांच्या अजेंड्यावरचं पहिलं मंदिर आहे ते लिंगराज मंदिर
स्वर्गारोहण डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर मला पहिल्याप्रथम योगसूत्रे पाहायला मिळाली होती. अर्थात मराठी विकीवरही ती उपलब्ध आहेत. पण स्वर्गारोहण डॉट कॉम स्वतःला गुजराती भाषेतील अध्यात्मविषयक सुपरसाईट म्हणवते. मला गुजराती येत नाही. पण ते संकेतस्थळ विपुल आध्यात्मिक साहित्यांनी भरलेले दिसून येते. गुजराती जाणणारे कदाचित यथोचित मूल्यमापन करू शकतील.
शौच आणि संतोष वगळता, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान ह्या तीन नियमांना मिळून क्रियायोग म्हटले जाते. ह्या क्रियायोगाचे स्वरूप कोणते, त्याचे आचरण कसे करावे आणि ते का, ह्या सर्व प्रश्नांचा विचार ह्याच पादाच्या पहिल्या आणि दुसर्या सूत्रांत केलेलाच आहे.
ह्या भागात अष्टांग योगातील अंगे, यमनियमादी प्रत्यक्ष आचरणात आणावयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा पातंजल योगसूत्रांत केलेला उहापोह आपण बघणार आहोत. कोल्हटकरांनी स्कंदपुराणातील एक श्लोक सत्याचरणाच्या महतीखातर दिलेला आहे. तो असा:
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.