कळ्यांचे दिवस फुलांच्या राती....

       थंडीचा कडाका आता आता पर्यंत होता. रात्री झोपताना चार पांघरुणं घेऊनही हात पाय पोटाशी घेऊन झोपताना मजा वाटायची. सकाळी उठल्यावर अंगावरचं उबदार पांघरुण बाजूला सारून उठावं असं वाटायचंच नाही. 'अजून पाच मिनिटांनी उठू या ' चे तीन चार गजर झाले की मात्र उठावंच लागायचं. पण तोवर उशीर झालेला असायचा. एकूणच गेले तीन-चार महिने सगळी काम उशीरानेच सुरू होती. दिवस लहान असल्यामुळे संध्याकाळ पण लवकर व्हायची. सूर्य पश्चिमेला झुकतो आहे असं म्हणेपर्यंत, बटण बंद केल्यावर विजेचा दिवा बंद होतो तसा झटक्यात अंधार पडायचा. नेहमीच्या वेळेला घरी जात असलो तरी त्या चटकन पडलेल्या अंधारामुळे घर एकदम लांब लांब वाटायचं. दिवसभर स्वेटर चढवून वावरायचं, भर दुपारीही उन्हातून जाणारी वाट शोधून त्यावरून चालायचं. हवा गार, पाणी तर फारच गार आणि सूर्याचं ऊनही गार पडल्यासारखं वाटायचं. मला या सगळ्याची कुठेतरी खूप गंमत वाटायची. ही अशी गार हवा, छोटे दिवस, हवंहवंसं वाटणारं ऊन हे वर्षातल्या फार थोड्या काळात अनुभवायला मिळतं म्हणून आपल्याकडे त्याचं अगदी अप्रूप असतं. रोज दुपारी जेवणानंतर ऊन खात एक फेरफटका मारताना 'युरोपात अशी हवा नेहमी असते त्यामुळे तिथले लोक जास्त उत्साही असतात' ही चर्चा हटकून होतेच. एकूणच थंडीचे दिवस म्हणजे खाण्यापिण्याची रेलचेल, पावसाच्या चिकचिकाटापासून आणि रडक्या उदास दिवसांपासून मुक्ती असं काहीसं समीकरण असतं.

प्राचीन भारतीय खगोलशास्त्र ५

गीताप्रेसचे सन्स्कृत वाल्मिकी रामायण (मूलमात्रम ; पाने ७३४) फक्त १०० रुपयात मिळते.

सन्स्कृतची आवड असल्यास जरूर वाचावे. त्यात अनेक ठिकाणी खगोलशास्त्रीय वर्णने आहेत.त्यावरून रामराज्याभिषेक,वनवासगमन ,खरदूषण वध व सूर्यग्रहण , सीताहरण,वालीवध,त्यानंतरच्या पावसाळ्याचे वर्णन,शरदाचे वर्णन, हनुमानाचे पौष महिन्यात लंकेत जाणे व पौष पौर्णिमेस परतणे,रामाच्या सैन्याने सेतू बांधून चैत्र पौर्णिमेस लंकेत प्रवेश,त्यावेळचे चंद्रग्रहण,अमावस्येस रावणवध व त्यादिवसाचे सूर्यग्रहण या सर्व गोष्टी वर्णन केल्या आहेत. ही खगोलशास्त्रीय वर्णने बरोबर असून गणितात बसतात.त्या स्रर्व प्रसंगाच्या तारखा मी शोधून काढल्या आहेत.(जास्त माहिती माझ्या पुस्तकात मिळेल,(फोनः ०२५१ २२०९४७६ )रामजन्माच्या वेळच्या ग्रहांचे वर्णन १.१८.८,१.१८.९,१.१८.१० श्लोकात आहे.त्यानुसार कर्क लग्नी,पुनर्वसू नक्षत्री सकाळी चंद्र व गुरू होते.पाच ग्रह उच्चस्थानी होते,रामजन्म दुपारी झाला तेव्हा चैत्र शु.९ व पुष्य नक्षत्र होते.रवी मेषमधे,मंगळ मकरमधे,गुरू कर्कात,शुक्र मीनेत व शनी तूळजवळ होता.

जपानी बॉस!

"त्यांना म्हणावं बाकी काहीही चालेल, पण यात साके मात्र ठेऊ नका" माझ्या नवीन बॉसने मला सांगायला सांगितलं.मी तसं सांगितल्यावर योशिदा उमजून हसले...नेहेमीप्रमाणे एक सोनेरी दात आत लुकलुकला.
शेवटच्या दिवशी 'फेअरवेल' समारंभात योशिदा या जपानी सदगृहस्थाला आम्ही म्हणजे आमच्या देशी डिपार्टमेंटने आपल्या सत्यनारायणाच्या किंवा तत्सम पूजेत ठेवला जाणारा एक नक्षीदार चांदीचा कलश भेट म्हणून दिला होता. त्याचा 'सदुपयोग' व्हावा एव्हढ्याच  कळकळीच्या इच्छेने माझ्या नवीन बॉसने त्याचा उपयोग योशिदांनी 'कसा' करु नये यावर तेव्ह्ढ्यात एक टिप्पणी मला त्यांच्यापर्यंत पोचवायला सांगितली होती. मी तो हुकुम पाळलाही.

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ६)

विष्णुपंतांचे शब्द प्रांताच्या पाठीत बुक्क्या बसल्याप्रमाणे बसून तो नरमून म्हणाला, "मग आम्ही काय करावे म्हणता?"

"तुम्ही सरकार आहात." पंत ठासून म्हणाले, "हा दुष्काळ निवारा. साथीचा बंदोबस्त करा आणि लोकांना दुष्काळाच्या दाढेतून बाहेर काढा."

प्राचीन भारतीय खगोलशास्त्र

१२०० वर्षांचे कलियुग संपण्यापूर्वीच कलियुगाप्रमाणेच सर्व युगांची वर्षे ३६० ने गुणून वाढविण्यात आली.त्यामुळे लोकास रामायण लाखो वर्षांपूर्वी झाले असे वाटू लागले.

परंतू हे लक्षात घेतले पाहिजे की वर्षे वाढविण्यापूर्वीच रामायण व महाभारत घडले आहे.

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ५)

हातापायांची आग झाल्याप्रमाणे पंत चुळबुळ करत सभोवार पाहू लागले आणि प्रांत गोंधळून म्हणाला, "पंत तुम्हाला म्हणायचंय काय?"

"मग ऐका तर" पंत निर्भीडपणे खणखणीत आवाजात बोलू लागले, "साहेब, माझा गाव दुष्काळाच्या छायेत असून लोक कुरडूचा पाला खात आहेत आणि साथीच्या रोगाने घरे बसत आहेत हे सर्व मी तुम्हाला कळविले होते की नाही?"

वादळभूमी १.०

 मग मी परत एकदा विमानातून खाली बघितलं. तसाच सपाट विस्तीर्ण पसरलेला वैराण प्रदेश! पण निदान तो ओळखता तरी येत होता. मुंबईहून भल्या पहाटे विमान निघालं तेव्हा तर किती वेळ पाणी आहे की ढग आहेत की जमीन आहे, हे काहीच कळत नव्हतं. कानांना बसलेले दडे काढायचं तर मी बंद केलं होतं. तसं कानांना दडे वगैरे बसतात हे ऐकलं होतं पण एवढे आयुष्यभराचे दडे बसतील हे काय माहीत? मला नक्कीच कंटाळा आला होता. पण करणार काय? एकतर नेहमी अशी कुठे प्रवासाला सुरुवात करताना एक वेगळीच विलक्षण अवस्था झालेली असते. झोप वगैरे काही येत नाही. एखाद्या लहान मुलाला नवीन खेळणं मिळाल्यावर होते त्या अवस्थेत आपण सगळं बघत असतो. त्यामुळे या पहिल्या विमानप्रवासात सगळे सोपस्कार उरकून बसल्यावर काय करावं हे मला बिलकूल माहित नव्हतं.

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ४)

मुराचे पुष्कळ लोक धान्याची पोती घेऊन दूर गेले होते आणि निवडक लोकांनिशी मुरा त्या वेढ्यात अडकून पडला होता. गावकर्‍यांनी पांद रोखल्याचे लक्षात येताच बळी धावत येऊन म्हणाला, "मुरा, गावकर्‍यांनी पांद आडवली, आता?" क्षणभर विचार करून मुरा म्हणाला,"दावण कापून सारी गुरं पांदीत घाला आणि मागनं गोफणीने जोडून वाट काढीत चला."

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ३)

उरलेले लोक आपआपल्या घरी परतले. मुराने आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला.

त्याच्या मागून ते दीडशे गडी निघाले. निवडुंगात हत्यारे चमकली.

गावाबाहेर पडून मार्गाला लागल्यावर बळीने हळूच विचारले,

"मुरा कुठं जायचं?"