अवेळीच केव्हा दाटला अंधार...

कवी ना. धो. महानोर हे खरेतर निसर्गकवी पण त्यांच्या कविता केवळ प्रणयरम्य व शृंगाररस युक्त असतात म्हणून वाचणारे व ऐकणारे अनेकजण असतील. हा खरे तर त्यांच्यातील कवित्वाचा अपमान आहे. त्यांच्या कवितेतील शृंगाररसाला नाके मुरडणे जितके चूक तितकेच त्यांच्या कवितेतील केवळ शृंगाररसाचा आस्वाद घेणे अयोग्य होय.

बिहारींचे स्थलांतर का होते?

मुंबईत उत्तर भारतीयांना विशेषतः युपी व बिहारींविरोधातील नाराजीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड व्यक्त केले. पण ज्या बिहारी व युपीविरोधात ही नाराजी व्यक्त केली जाते आहे, त्यातील बिहारी लोकांना मुंबई किंवा महाराष्ट्रात येण्याची गरज का पडते हे जाणून घेण्याची गरज आहे.

मतदान

अखेर ज्याची उत्साहाने वाट पाहात होते तो मतदानाचा दिवस उजाडला. ठरवलेच होते कि भल्या पहाटे रांग लावायाची. पहिले वहिले मत आपणच द्यायचे.

कर्तव्याच्या भावनेने मन अगदी भरून आले. मतदान केंद्रावर गेले. बघते तर निवडणूक कर्मचारी आणि ४-५ कुत्री स्वागताला.... लोकांच्या उदासीनतेला शिव्या घालत अगदी मनापासून मोठ्या उत्साहाने नाव, प्रभागक्रमांक, मतदार क्रमांक असलेली चिठ्ठी पुढे केली. मतदार सूचीतील नाव पाहून हायसे वाटले आणि नाव
पुकारले गेल्यावर तर अगदी कृतकृत्य झाले. इतक्या मेहनतीचे चीज झाले.

"शुद्ध' काही जीवघेणे...

---------
व्याकरण, भाषा, यांचा आग्रह अस्मादिकांना पूर्वीपासूनचा.
मी काही तर्कतीर्थ नाही, की भाषासुधारक वि. दा. सावरकर.
पण माणसानं निदान शुद्ध, व्यवस्थित, दुसऱ्याला समजेल, अशा सोप्या पण स्वच्छ भाषेत बोलावं, एवढा बरीक आग्रह.
किंबहुना, हट्टच.
(त्यामुळं गृहस्वामिनीशीबरोबरही अनेकदा समरप्रसंग ओढवतात. असो.)

रामजन्म

रामायण कधी झाले याविषयी खूप चर्चा चालू आहे.

रामजन्म ६ जानेवारी इ.पू.५६४८,ग्रेगरीयन, चैत्र शुक्ल ९ रोजी झाला.

त्यादिवशी खालीलप्रमाणे ग्रह होतेः

सूर्य :  ३ (मेष रास) ,चंद्र : ९४ (पुनर्वसु), राहू : २२६ ,बुध : ३४०.५ ,शुक्र : ३५० (मीन रास),मन्गळ : ३०६ ( मकरजवळ) , गुरू : ९४ (पुनर्वसु), शनी : १६० (तूळजवळ)

महूरत (ईमडॉकॉ पार्ट थ्री)

                       दहा लाखाच्या चेकने घरात एक चैतन्य नव्याने जन्माला आलं. हर्षोल्लासाची अनेक कारंजी घरात उसळू लागली. आमचे कुलदीपक  आणि कुलदीपिका या आमच्या वंशविस्ताराला, आपले पप्पा कित्ती कित्ती ग्रेट आहेत हे आत्ता कळलं आणि तो साक्षात्‌कार मित्र मैत्रिणींना कळविण्यासाठी दोघांच्याही कानाला मोबाईल फोन चिकटून बसला. एरवी मी माझ्या लेखनाचा ‘ले’ जरी उच्चारला तरी " पप्पा प्लीज, पकवू नका" अशी त्यांची प्रतिक्रिया असायची. सौ चेकवरची रक्कम पाहताच क्षणभर सुन्न झाली आणि पुढछ्याच क्षणी तिच्या डोळ्यात पाणी तरारलं. तिच्या चेहर्‍यावर इतका संपृक्त आनंद मी या पूर्वी पाहिला नव्हता. सौ ने चेक देवापुढे दिवा लावला आणि चेकही देवापुढे ठेवला. तेवढ्यात फोनची घंटा घणाणली आणि सौ तीरासारखी तिकडे धावली.  फोन घेण्यासाठी मी कांही हालचाल करण्याची कांही आवश्यकता नव्हती. अग्रक्रमाने तो हक्क तिचाच होता. फोनवर "हो, हो! थँक्यू, थँक्यू! पार्टी नं? देउ की. त्यात काय एवढंसं!" असली वाक्य कानावर येऊ लागली तेंव्हा तो फोन तिच्या महिला मंडळातील कुणा बुभुक्षितेचा असणार यात शंका नव्हती.  संभाषण आटोपून फोन खाली ठेवताच पुन्हा त्याचा गजर वाजणे आणि मघाचेच संभाषण याची पुनरावृती सुरू झाली. म्हणजे ‘दुष्मनोंको कानोकान खबर हो गई’ आणि ‘सर मुँडवाया और ओले पडे’ याची कल्पना आली. तेवढ्यात घराच्या दरवाजाशी एखादी गाडी येऊन थांबल्याचा आवाज आला. मी अभ्यागतावागमनसूचकघंटिका वाजण्या आधीच दरवाजा उघडला आणि पुन्हा एकदा माझी जीभ टाळ्याला चिकटली. टीव्ही, त्यापुढे बीवाय आणि सर्वात पुढे सुता अशी रांग दाराबाहेरच्या पायर्‍यांवर उभी.

पाऊली यांचा वगळ सिद्धांत

पाऊली यांचा वगळ सिद्धांत
(अर्थात पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल)

त्या काळी एन्रिको फर्मी, वुल्फगँग पाऊली ह्या ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञाच्या, अलीकडील एका संशोधनाबाबत विचार करत होते. पाऊली एकेकाळी मॅक्स बॉर्न ह्यांचे सहकारी होते. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या आण्विक विजकांच्या हालचालींचा अभ्यास करत असतांना, पाऊलींनी असे निरीक्षण केलेले होते की, एका कक्षेत केवळ एकच विजक असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कुठलेही दोन विजक एकाच कक्षेचा अवलंब करत नाहीत.

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ५

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ५

वेदव्यासांनी गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी "इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितियो अध्याय:" अशाप्रकारचा शेवट केला आहे. गीतेतील अध्यायांची नावेही अनुक्रमे अर्जुनविषादयोग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यासयोग, संन्यासयोग, ध्यानयोग, ज्ञानविज्ञानयोग, अक्षरब्रह्मयोग, राजविद्याराजगुह्ययोग, विभूतियोग, विश्वरूपदर्शनयोग, सगुणभक्तीयोग, क्षेत्रक्षेत्रज्ञयोग, गुणत्रयविभागयोग, पुरूषोत्तमयोग, दैवासुरसंपाद्विभागयोग, श्रद्धात्रयविभागयोग आणि मोक्षसंन्यासयोग अशी आहेत. गीतेचा शेवटला श्लोकही

पिवळी पिवळी रेघ काढली खेळाच्या अंगणी ... पण कशी?

परवा फुटबॉलचा सामना पाहताना मला बरेच दिवस असलेली शंका पुन्हा उफाळून आली. खेळ चालू असताना टीव्हीवर 'आयत्या वेळी' क्रीडांगणावर एक पिवळी रेघ आखतात. हवी तेव्हा ती दाखवतात. नको तेव्हा ती पुसतात. ती रेघ क्रीडांगणाच्या जमिनीवर असते आणि खेळाडू 'तिच्यावरून' इकडे तिकडे जातात. हे कसे बरे करीत असावेत? दृश्य कुठल्याही चित्रकाचे कुठल्याही कोनातून कितीही अंतरावरून घेतलेले असो, ही रेघ बिनचुक आखतात. आंतरजालावर भ्रमंती करीत असताना ह्या शंकेचे उत्तर मला मिळाले, ते असेः

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४

भारत सरकारच्या ह्या संकेतस्थळावर "काशीकी विभूतीयाँ" म्हणून पंधरा थोर व्यक्तित्वांची हिंदीत ओळख करून दिलेली आहे. पतंजलींची इथली ओळख विश्वसनीय वाटते. ती मुळातच अवश्य वाचावी. ती थोर व्यक्तीत्वे खालीलप्रमाणे आहेत.
 
१. महर्षि अगस्त्य
२. श्री धन्वंतरि
३. महात्मा गौतम बुद्ध
४. संत कबीर
५. अघोराचार्य बाबा कानीराम
६. वीरांगना लक्ष्मीबाई
७. श्री पाणिनी
८. श्री पार्श्वनाथ
९. श्री पतञ्जलि
१०. संत रैदास
११. स्वामी श्रीरामानन्दाचार्य
१२. श्री शंकराचार्य
१३. गोस्वामी तुलसीदास
१४. महर्षि वेदव्यास
१५. श्री वल्लभाचार्य