माझा पहिला परदेश प्रवास : १० (तिसऱ्या रानडुकराची आरोळी.)

तिसऱ्या रानडुकराची आरोळी.


रोज सकाळी नाश्त्याच्या हॉलमध्ये शिरताना दारात आपला 'रूम नं.' सांगावा लागायचा. कोलंबो, पट्टाया आणि बॅंकॉक नंतरचं हे चौथं हॉटेल होतं. दर दोन दिवसांनी त्या-त्या ठिकाणचे नवीन क्रमांक लक्षात ठेवायचे म्हणजे भलतंच कठीण काम होतं. त्यादिवशी पण मी नाश्त्याला एकटीच खाली आले आणि नंबर विचारला गेल्यावर एकदम गडबडले. तिथला रूम नंबर सोडून आधीचे सगळे आठवले पण जो हवा होता तो आठवेचना !! बरं, 'कार्ड की' असल्यामुळे त्याच्यावरही लिहिलेला नव्हता ... पण अनपेक्षितपणे आदित्य माझ्या मदतीला आला. तो माझ्याआधीच आवरून खाली आला होता आणि त्या हॉलमधे दारासमोरच्याच टेबलवर बसला होता. नेमकं त्याचवेळी त्याचं माझ्याकडे लक्षं गेलं, काय गोंधळ झालाय ते तिथूनच त्याच्या लक्षात आलं आणि बसल्या जागेवरूनच तो ओरडला - 'आईऽऽऽ, ९७८' .... मी एकदम चमकून आत पाहिलं. तोपर्यंत मला पत्ताच नव्हता की तो तिथे आहे आणि आपल्याकडेच पाहतोय. '९७८' हे शब्द मेंदूपर्यंत पोचायला जरा वेळ लागला आणि मग माझी ट्यूब पेटली. हे सगळं अक्षरशः काही सेकंदांतच घडलं पण नंतर आम्हाला दोघांनाही आठवून हसू येत होतं.

नाश्ता उरकून खाली लॉबीत आलो. लिफ़्ट्सच्या समोरच एक अतिशय सुंदर लँडस्केप बनवलेलं होतं. आपले नर्मदेतले गोटे असतात तसे लहानमोठ्या आकाराचे गुळगुळीत दगड आणि त्यातून झुळझूळ वाहणारं कारंजं .... नेहेमीच्या लँडस्केप्सपेक्षा उंची एकदम कमी - जेमतेम ७-८ इंच. पण त्यामुळेच आल्यापासून ते लक्ष वेधून घेत होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यादिवशी तिथल्या त्या पाण्याचं परिक्षण चालू होतं!!! 'कारंज्यातलं पाणी दूषित तर नाही ना' याची तिथल्या लोकांना चिंता पडली होती!! तसंही ते योग्यच होतं म्हणा. कारण तिथे प्रत्येक नळांतून प्यायचं पाणीच वाहत असतं. त्यामुळे तिथे फिरताना जवळ पाण्याच्या बाटल्या बाळगण्याची कटकट नव्हती. तहान लागली की बागेतला एखादा नळ सोडा आणि पाणी प्या इतकं सोपं होतं. म्हणजेच त्या तिथल्या कारंज्यातही प्यायचं पाणीच वाहत असणार ... मला वाटतं ते लोक आपल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये नुसते डोकावले ना, तरी बेशुध्द पडतील बहुतेक!!!

सगळे निघायच्या तयारीत होतो पण आमची गाईड आलेली नव्हती अजून. मग हॉटेलच्या आवारात जरा इकडे-तिकडे करायला सुरूवात केली. प्रवासी येत होते, जात होते, बॅगांचे ढीग चढत होते, उतरत होते; कर्मचाऱ्यांची लगबग चालू होती. कोण सिंगापूरला प्रथमच आलंय, कोण अनेकदा येऊन गेलंय याच्याशी त्यांना काहीही देणं-घेणं नव्हतं. मी पायऱ्या उतरून खाली आले. आवारात रस्त्याच्या कडेला झाडं लावलेली होती आणि त्यांच्या कडेने ३-४ फ़ूट उंचीचे संरक्षक कठडे लावलेले होते. खरं म्हणजे, थोडा वेळ 'टेकायला' ती जागा एकदम मस्त होती - आसपास इतकी छान झाडंबिडं ... मला मोह आवरला नाही. जरा तिथे बसतीये न बसतीये तोच कुठूनतरी हॉटेलचा एक माणूस आला आणि मला त्याने तिथून उठायला लावलं. कारण काय - तर तसं तिथे बसल्याने झाडांची नासधूस होते. ऐकताक्षणी मला थोडा रागच आला, कारण आपल्यामुळे झाडांना काही त्रास होत नाहीये याची खात्री करूनच मी बसले होते. त्यात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी असं हटकलं जाण्याची आपल्या देशात आपल्यावर क्वचितच वेळ येते. उठले मग तिथून - करणार काय? पण माझ्यासारखेच इतर काहीजण जे बसले होते त्यांना मात्र खरंच त्या झाडांची पर्वा नव्हती असं लक्षात आलं. तसं होतं तर मग त्या माणसाने सगळ्यांनाच तिथून उठवलं त्यात त्याची काहीच चूक नव्हती!!! अजयच्या मते ते पाण्याचं परिक्षण काय, हे असं लोकांना बसल्या जागचं उठवणं काय, हे सगळे तारांकित हॉटेलचे नखरे होते. पण मला नाही तसं वाटलं कारण शिस्त, स्वच्छता आणि नियमांचं पालन या गोष्टी तिथल्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याचाच भाग होत्या. आपल्या देशात जर असं प्रत्येक ठिकाणी नियमावर बोट ठेवायचं म्हटलं तर रोजची कामं सोडून दिवसभर तेच करत बसावं लागेल आणि तरीही शेवटी 'जनजागृती' वगैरे साध्य होणार नाही ती नाहीच!!! पण परदेश प्रवास हा अश्या विरोधाभासांमुळेच तर लक्षात राहतो ...

१० वाजत आले होते. धावत-पळत आमची गाईड आली. आमची रोजची बस बिघडली होती. दुसऱ्या बसची व्यवस्था करण्याच्या नादात तिला उशीर झाला होता. सिंगापूरमध्ये वेळेचं बंधन पाळणं किती महत्वाचं आहे, तसं केलं नाही तर कसा भरमसाठ दंड भरावा लागतो इ. गोष्टींची तिनं आम्हाला आल्या-आल्या, पहिल्या दिवशीच भीती घातली होती. आता तिलाच उशीर झाला म्हटल्यावर मंडळींची तिला दंड ठोठावण्याची फार इच्छा होती. नुसत्या कल्पनेनंच सगळे खूष झाले. ५-१० मिनिटांत सगळे निघालो. बसमध्ये ड्रायव्हरच्या सीटसमोर आपल्याकडे असतो त्याच्या चौपट मोठा आरसा लावलेला होता. त्यातून त्याला संपूर्ण बस व्यवस्थित दिसत असणार. आमचा मलेशियन ड्रायव्हर - मि. मलिक - बस चालवता-चालवता सुध्दा सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून असायचा. बस निघाल्यावर वर ठेवलेल्या बॅगमधून काहीतरी काढण्यासाठी मी उभी राहिले तर त्याने माझ्याकडे त्या आरश्यातून असलं रोखून पाहिलं ना की मी बॅग उघडून त्यात हात घालून हवी ती वस्तू काढण्या‍ऐवजी पटकन ती बॅगच खाली घेऊन बसले. चालत्या गाडीत उभं राहणं हा पण तिथे गुन्हा मानला जातो ... म्हटलं उगीच झंझट नको कसलं!! कारण आमची गाईड सुध्दा बहुतेक वेळा बसूनच आमच्याशी बोलायची.

त्या दिवशी आमचा दौरा होता 'ज्युरॉंग बर्ड पार्क' ला ... 'बर्ड पार्क' हे नावच मुळात मला फार आवडलं ... 'पक्षी अभयारण्य' पेक्षा 'पक्ष्यांची बाग' हे ऐकायलाही छान वाटतं. जगभरातले जवळजवळ ३००० प्रकारचे पक्षी तिथे पहायला मिळतात. सुरुवातीला निशाचर पक्ष्यांचं एक वेगळं दालन होतं. त्या दालनात जोरजोरात बोलायला किंवा कॅमेऱ्याचे फ़्लॅश मारायला मनाई होती. बहिरी ससाणे, अनेक प्रकारची घुबडं तिथे पाहिली.
बाहेर मात्र काही अपवाद सोडले तर सगळे पक्षी मुक्तपणे विहरत होते. पण त्यांची वावरण्याची ठिकाणं आणि माणसांना हिंडायला दिलेली पायवाट यांच्यात बऱ्यापैकी अंतर होतं. आपण केवळ निरिक्षणाशिवाय अन्य कुठल्याही प्रकारे त्या पक्षांच्या संपर्कात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना हात लावायचा प्रयत्न करणं, त्यांना काहीतरी खायला घालणं असल्या प्रकारांना आपोआपच आळा बसतो. अश्या ठिकाणी ते प्राणी किंवा पक्षी हेच सर्वात महत्वाचे घटक असतात याचं तिथे सतत भान ठेवलेलं दिसलं. सकाळी फिरायला बाहेर पडलो आणि रस्त्यात किंवा झाडावर अचानक एखादा सुंदर पक्षी दिसला तर आपली कशी प्रतिक्रिया असेल तसंच होत होतं तिथे. मुळात त्या बागेचा आराखडाच असा होता की 'सहज दिसावा' असेच सगळे पक्षी समोर यायचे. 'पक्षी बघायला आलो आहोत' हे माहिती असूनही दर वेळेला तोंडातून आश्चर्योद्गारच बाहेर पडायचे.

छोटे चिमण्यांसारखे पक्षी, जे जमिनीवर कमी चालतात, असे मात्र काहीसे बंदिस्त होते. पण ते ही कसे ... तर मोठ्ठंच्यामोठ्ठं आवार आणि त्याला १५-२० फ़ूट उंचीवरून बारीक मच्छरदाणीसारखी जाळी लावलेली. म्हणजे ऊन, पाऊस, वारा याला कुठलाही अडसर नाही, पण ते पक्षीही इतरत्र कुठे उडून जाऊ शकणार नाहीत. कळस म्हणजे अश्या ह्या पक्ष्यांचं निरिक्षण करण्यासाठी त्या मच्छरदाणीच्या वरून फिरवून आणणारी एक छोटीशी लहान मुलांच्या बागेत असते तसली रेल्वेगाडी होती. त्या रेल्वेगाडीतून एक फेरी मारून आलो.

बॅंकॉकप्रमाणेच इथेही दोन 'शो' पाहिले - 'Birds for Pray Show' आणि 'Birds-N-Buddies Show'. पहिल्या शो मध्ये सगळे शिकारी पक्षी अगदी जवळून पहायला मिळाले. लांब अंतरावरून सावज टिपण्यासाठी त्यांनी घेतलेली झेप, त्यांची तीक्ष्ण नजर इ. ची प्रात्यक्षिकं फारच छान होती. दुसरा शो लहान मुलांना आवडेल असा होता. तिथेही अनेक नवखे पक्षी पहायला मजा आली.
नेहेमीप्रमाणेच, त्या बागेत घालवलेला तास-दीड तास आम्हाला कमी वाटला....

तिथून निघायची वेळ झाली होती. आदित्यला तेवढ्यात एक आईसक्रीमचं दुकान दिसलंच. पण सकाळपासूनच ढगाळ हवेमुळे इतकं उकडत होतं की त्यानं आईसक्रीमची मागणी करण्याची मी वाटच पाहत होते. आम्ही तिघांनी मारे अगदी 'डबल लार्ज स्कूप' वगैरे खाल्ले पण नंतर बिलाचा आकडा पाहून माझ्या आणि अजयच्या पोटात त्या 'डबल लार्ज स्कूप' पेक्षा मोठा गोळा आला!!! तेवढ्या किंमतीत इथे महिनाभर आम्हाला तिघांना भरपूर आईसक्रीम खाता आलं असतं!!! पण आता त्याचा विचार करून काय फायदा होता? गुपचूप पैसे दिले आणि आदित्यनं अजून कशाची मागणी करण्याच्या आत तिथून काढता पाय घेतला.

आता बसनं न जाता आम्ही मेट्रो ट्रेनने हॉटेलवर परतणार होतो. सिंगापूरची MRT Train ही लंडनच्या मेट्रो ट्रेनच्या तोडीस तोड समजली जाते. MRT म्हणजे Mass Rapid Transit. नावाप्रमाणेच ती माणसांची वेगानं वाहतूक करणारी व्यवस्था होती. साहजिकच काही विशिष्ट नियम पाळणं गरजेचं होतं. चुंबकीय तिकिटांनी उघडणारे स्वयंचलित दरवाजे, गाडीची आपोआप उघड-बंद होणारी दारं, त्यांचा कालावधी - या सगळ्यांबद्दल सौ. शिंदेनी खबरदारीचे उपाय सांगायला सुरूवात केल्यावर समस्त आजी-आजोबा मंडळी जरा चपापलीच होती. चुंबकीय तिकिटानं ओळख पटवून दार उघडल्यावर पट्कन त्या दारातून पुढे जावं लागतं नाहीतर मग एकदा दार बंद झालं की पुन्हा दुसरं तिकिट घ्यावं लागतं हे कळल्यावर तर बहुतेकांचं अवसानच गळालं. 'आम्ही आपले बसनं जातो ... आम्हाला नको ती ट्रेन राईड' असाही प्रस्ताव आला. मग आम्ही तरण्याताठ्यांनी त्यांना जरा धीर दिला आणि एकदा अनुभव घेतला पाहिजे असं म्हणून येण्याचा आग्रह केला.

अमेरिकायण! (भाग ७: राजधानीतून१ [प्रथमदर्शन आणि सकुरा])

नववर्ष आलं आणि पहिल्याच दिवशी हिमवर्षाव चालू झाला. मी पाहिलेला तो पहिला 'हिमसेक'. रात्री पाहिलेला नजारा एका रात्रीत रंगहिन होऊन केवळ सफ़ेद हाच एक रंग संतिम सत्य आहे याची आठवण करून देणारा नजारा.. सफेद रंगाचं सौदर्य दाखवणारा असा हा हिमसेक! एखाद्या मुलानं साबणाचा फ़ेस मनसोक्त उधळून द्यावा तसा काहीसा प्रकार. त्या पहिल्या हिम-दृश्याचं वर्णन माझ्यासारख्याला शब्दात बांधणं खरचं कठिण! 'हिरवे हिरवे गार गालीचे..' तील हिरवा शब्द 'शुभ्र' असा बदलून पाहिला आणि काही ओळी स्फुरत गेल्या

शुभ्र सभोवती 'गार' गालिचे..
अतिशीतल तरीही मखमालीचे..
त्या शुभ्रतनू मखमाली वरती..
हिमगौरी ती खेळत होती..

असो, तर त्या हिमवर्षेने सारी सृष्टी थिजवून टाकली, पण तरीही लोकांचा उत्साह थिजवणं त्या हिमवर्षावालाही शक्य झालं नाहि. बाहेर लहान-थोर साऱ्यांचा दंगा चालू होता. आम्हीपण यथेच्छ "गोळाफ़ेक" करून घेतली. हिममानव करण्याचे काही माफक प्रयत्न करून पाहिले.. पण या सगळ्यापेक्षा वरचढ होता तो स्लायडिंगचा (घसरण्याचा?) अनुभव. छोट्याशा टेकडिवरून पोटाखाली सरकते-फ़ळकुट (स्लेज) घेऊन झोकून द्यायचे.. पुढे खाली ज्या भन्नाट वेगात आपण जातो त्याची तुलना करणे अशक्य!! मोठ्या मोठ्या रोलर कोस्टर (मराठी?)मध्येही ही नैसर्गिक मजा कधीच आली नाही. तसंच आईस स्केटिंग/स्किईंग इ. उपद्व्याप केले पण (कदाचित यात फ़ार कसब लागत नसल्याने असेल पण) या स्लायडिंगची मजा सगळ्यात जास्त!

वाघ आणि माणुस

एकदा एक माणुस जंगलातुन एकटाच जात असतो...

तेवढ्यात समोरुन वाघ येतो !

माणुस घाबरुन डोळे बंद करून "भीमरूपी महारुद्र ..." म्हणायला लागतो !

आणि वाघ कधी हल्ला करतो याची वाट बघतो...

काही सेकंदांनंतर डोळे किलकिले करून पहातो तर काय,, !

संथ वाहते कृष्णामाई

जेमतेम तीन मिनिटे आणि दहा-अकरा सेकंदांचे हे गाणे. चटक लागल्याप्रमाणे वारंवार ऐकले. शब्दांत संगीताचे वर्णन करणे म्हणजे दोन्ही माध्यमांवर अन्याय आहे हे मान्य आहे. पण उबळ आवरत नाही.

सुरुवातीलाच देवळातल्या (तेसुद्धा विरळ वस्तीच्या गावातील छोट्या देवळातल्या; त्या तीन सेकंदांच्या आवाजाने टक्क चित्र समोर उभे रहाते) घंटेने गाणे उघडते.

गोडी अपूर्णतेची,अहाहा! काय वर्णावी?

गोडी अपूर्णतेची,अहाहा! काय वर्णावी?
अष्टमीचा चंद्र ,अर्धी उमललेली कळी,यांचे वर्णन कवी-साहित्यिकांनी अनेकविध प्रकारे करुन ठेवलेले आहे.पण वैयक्तिक जीवनातही अपूर्णतेचाच जणू
प्रत्येकाला ध्यासच लागून राहिलेला दिसतो.करताना अनेक गोष्टी अर्धवट करायच्या आणि तरीही श्रेय मात्र पूर्ण घ्यायचे,असा मानवाचा स्वभावच् झालेला आहे.पण त्याला तू अर्धवट आहेस,असे म्हटलेले मात्र चालत नाही.
     वैयक्तिक जीवनात तो आळशी,निरुत्साही असतो.योग्य -अयोग्य,आवश्यक-अनावश्यक हे कळत असूनही तो अनेकदा योग्य,आवश्यक गोष्टी न करता,अनावश्यक,अयोग्य गोष्टी करतो.उदा:-सकाळी लवकर उठणे,व्यायाम करणे,स्वत्:च्या शरिराला पचेल-अपचण होणार नाही,असेच पदार्थ खावेत
वेळच्या वेळी त्यात्या गोष्टी कराव्यात इ.त्याला कळत असूनही नेमके याविपरित आचरण माणसे करतात.
   आपण ज्या गल्ली,गाव,शहरात रहातो तेथील स्वच्छता,आरोग्य यामध्ये आपला वैयक्तिक,कुटूंबातील व्यक्तींचा सकारात्मक सहभाग आवश्यक असतो हे माहीत असूनही त्यामध्ये सहभाग न घेणे;उलट अस्वच्छता-अनारोग्य वाढीस लगेल असे आचरण आपणाकडून होत असते.नियमांचे पालन केल्याने
सर्वाना फ़ायदा मिळतो,हे ठाउक असूनही नियम मोडण्यातच धन्यता मानणारे जास्त लोक असतात.
   पूर्ण ज्ञान जणू कोणी घ्यायचे नाही,अशी आपली शिक्षण विषयक धारणा कि धोरण असावे ! विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण मिळवावेत ,अशी पद्धती नाहीच.३५ गुणाला उत्तीर्ण असे ज्या कोणी ठरवून दिले असेल,त्यामहाभागाला मात्र स्वत्:ला ३५%श्रेय घेणे आवडले नसेल.फ़ळे लटकता आहेत,त्याफ़ांदीपर्यंत तरी झाडावर चढणे आवश्यक असते.तेथे भू-पातळी व फ़ळापर्यंतच्या ऊंचीपैकी एक-तृतीयांश उंचीपर्यंत चढणाऱ्यला त्याफ़ळाचा किंवा तेथील एकून फ़ळापैकी एक-तृतीयांश मिळू शकेल का ? हे प्रत्यक्षातील सत्य सर्वाना ठावुक आहे,पण ...!
   पालक मुलाना शाळेत घालतात,तेव्हा पासून त्यामुलाकडून फ़क्त एकच अपेक्षा असते,ती म्हणजे त्याने मन लावून फ़क्त अभ्यास करावा .बहूसंख्य मुले फ़क्त शाळा करतात.पण शाळा बुडविणे,दंगामस्ती करणॆ,आणखी अनेक प्रकारे ही मुले आपले शालेय जीवन व्यतीत करतात.पण पूर्ण पणे अभ्यासाकडे फ़ार थोड्य़ा मुलांचे लक्ष असते.
     जीवनातील त्या त्या अवस्थे मध्ये करावयाचे कर्तव्य पार पाडण्यात बहूदा सर्वजण अपुरे पडतात.मुलगा/मुलगी ,पती/पत्नी ,माता/पिता ,
सेवक/धनी ,नेता/राज्यकर्ता यांचे आचरण परिपूर्ण नसतेच.सारे यंत्रवत जगत असतात.पूर्णत्वाचा ध्यास कोणाला आहे, असे दिसत नाही.
मागील काही शतकापासून सर्वात चांगली,कमीत कमी दोष असलेली,सर्वाना समान अधिकार देणारी,सर्वांच्या वैयक्तिक विचार स्वातंत्र्याला वाव देणारी,सर्वांचा समान विधायक विकास साधणारी शासन पद्धती म्हणून लोकशाही ही जगातील अनेक देशात स्विकारलेली आहे.पण यामध्येही अनेक उणीवा ठेवल्या आहेत.लोकशाहीमध्ये मताचा अधिकार तर सर्वाना दिला,पण खरोखरच सर्वानी मतदान करावे हे अपेक्षित नाहीच.निवड बहूमताने म्हणजे किती हे नक्की नाहीच.संपूर्ण गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला तरी फ़रक पडत नाही.एकून मतदारसंख्येच्यापैकी किती मतदारानी मतदन केले तर ती निवडनूक वैध मानावी,किमान किती मते मिळवल्यानंतर त्या प्रतिनिधीची निवड झली ,असे मानावे याबद्दल स्पष्टता नाहीच.अलिकडील काळात भारत देशात युती किंवा आघाडी म्हणून जो प्रकार आहे ,तो म्हणजे उपवर मुलीला योग्य तरूण उपलब्ध होत नाही म्हणून अल्प वयाच्या तीन/चार मुलांसोबत तिचे लग्न लावून देणे ,होय.
      भारत देशात इंग्रजीतील सेक्यूलर शब्दास प्रतिशब्द असलेली धर्मनिरपेक्षता स्विकारण्यात आली आहे.धर्मनिरपेक्षता म्हणजे असंख्य जाती,पोट्जाती,धर्म यांचे किळसवाणे ,महाभयंकर जंतूचे आस्तित्व मान्य करणे.जन्माच्यानोंदीपासून जात/धर्माची नोंद करावी लागते.हे जंतू प्रतिदिनी
भारतातील समाज-जीवनात अनारोग्य निर्माण करत आहेत.तरीही या धर्मनिरपेक्ष्तेच्या कर्क रोगाला ह्या देशातील स्वार्थी आणि नपुंसक राजकारणी
व्यक्ती कवटाळून बसलेच आहेत.इथल्या सामान्य माणसांच्या हातात बघत रहाणे एवढेच् आहे.
आता मी ही हा लेख असाच अर्धवट सोडतॊ आणि ..... म्हणूनच शिर्षक - गोडी अपूर्णतेची !
 

माणसे: अरभाट आणि चिल्लर - १४

माणसे: अरभाट आणि चिल्लर - १३ पासून पुढे.

"असे होते कधी कधी." मास्तर म्हणाले. पण आज एकंदरीने ते व्यग्र दिसत होते, कारण त्यांनी खोटेच रागावून कुणालाच भोपळ्या म्हटले नाही.
"आज येताना मला एक प्रेत दिसले. ते एका मुलाचे होते; पण त्याची आई मारूतीच्या देवळापुढे उभी राहून त्या मुलाला पूर्ण आयुष्य देऊन सुखी ठेव, असे हात जोडून म्हणत मध्येच हसत होती. मला एकदम राजहंस कवितेची आठवण झाली." ते सांगत होते. वास्तविक आम्ही त्यांचे वेगळे स्वरूप पाहून गप्प बसायला हवे होते. पण आम्ही आज फसफसून झिंगल्याप्रमाणे झालो होतो की काय कुणास ठाऊक ! मी म्हटले, "त्या कवितेत सुद्दा असल्या ओळी आहेतच -

माणसे: अरभाट आणि चिल्लर - १३

माणसे: अरभाट आणि चिल्लर - १२  पासून पुढे.

मास्तरांचा आवेश उतरला. त्यांनी टेबलावरचे पुस्तक उचलले, पण चुकून गोगलगाय उचलल्याप्रमाणे त्यानी ते चटकन खाली टाकले. ते पुन्हा म्हणाले, “गडकर्‍यांच्या घरी मेणबत्त्या, लाटन दिसणार नाहीत. तिथे रंगीत चंद्रज्योती, भुईनळे कारंजत असतात. त्यावर तुमची पिरपिर काय, तर उदबत्तीचे टोक देखील पुरे झाले असते?”

गालांतल्या गालांत - २

एका कंपनींत उच्चस्तरीय मीटिंगसाठी अधिकारी जमलेले असतात. मीटिंगला वेळ असतो. ड्रिंक्स होत असतात. मीटिंगच्या वेळेवर चेअरमन येतात. सर्वजण स्थानापन्न होऊ लागतात. चेअरमन साहेबांसाठी संत्र्याचा रस येतो. तो पिऊन झाल्यावर चेअरमन आपल्या नेहमींच्या शैलींत उपस्थितांना उद्देशून म्हणतात, " आता चांगलं काही करण्यासारखं नसेल तर आपण मीटिंगला सुरवात करू या." (ऑर्थर हॅले च्या 'व्हील्स' या कादंबरीतून).

साखळी

द्रुतगती महामार्गावरून मुंबई-बंगळुरु वोल्व्हो पिसासारखी तरंगत येत होती. द्रुतगती महामार्ग संपला. देहूरोडचे वळण घेतले आणि चालक राजू तेंडोलकरने वेग कमी केला. एकदा आतल्या तपमानाच्या आकड्याकडे नजर टाकली. तो आकडा एखाददुसऱ्या अंशाने वाढला तरी ही लांब पल्ल्याची गिऱ्हाइके किरकिर करू लागत. मग व्हीसीडी व्यवस्थित चालू आहे ना याचा अजमास घेतला. तारस्वरातला किचकिचाट ऐकू आला. गाणे चालू होते बहुतेक. सिनेमा जुना होता म्हणून हरकत नव्हती. गेल्या आठवड्यात एका नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाची व्हीसीडी 'चोरून' दाखवल्याबद्दल वाशी-नाक्यावरच्या भरारी पथकाला दोन हजार रुपये सारावे लागले होते.

निळ्या काचेचे पेन - भाग २

मी घरी पोचून आंघोळ उरकली. आई वरच्या देवघरात कालिंदीकाकूंबरोबर काम करत होती. मग मी तांब्याभर पाण्यात साबणाची वडी घालून चांगले खळबळवले आणि ते साबणपाणी अंगावरून घेतले. मग उरलेल्या बादलीतले पाणी भसाभस डोक्यावर ओतले आणि आंघोळ संपवली. आई न्हाणीच्या आसपास असली की उगाचच सगळ्या अंगाला साबण लावा, तो जाईस्तोवर त्यावर पाणी ओता असले प्रकार करायला लागत. गणपती आणायला मला बरोबर न्यायला पुरुषोत्तम काकांनी अजिबात हरकत घेतली नाही. मला बाहेर पाठवायला (नेहमीप्रमाणे) आईचा नकाराचा सूर उमटणार तोच "चला निखिलपंत" अशी हाक मारून त्यांनी आईचे तोंडच बंद केले. त्यांना इंग्रजी येत होत की नाही माहीत नाही, पण ते माझ्याहून खूपच उंच होते. त्यामुळे मुकाट त्यांचे बोट धरले. माझे सबंध नाव इंग्रजीत सांगण्याचा हातखंडा प्रयोग केल्यावर ते खूषच झाले आणि परत त्यांनी मला खांद्यावर घेतले. विमानात बसून जावे तसा मी तळ्याकाठच्या त्या देवआळीतून (हे 'आळी' प्रकरण इथे आल्यावरच कळले होते) रामधरण्यांच्या घरी निघालो. वाटेत कितीतरी माणसे "बाप्पा मोरया" करीत पाट घेऊन निघाली होती. झाडून सगळ्या पुरुषांच्या डोक्यावर टोप्या होत्या पुरुषोत्तमकाकांच्या डोक्यावरही माझ्या मांड्यांना गुदगुल्या करणारी जरीची टोपी होती) आणि बायकांच्या नाकात नथी. एकूण किती माणसांनी टोप्या घातल्या हे मोजावे म्हणून मी आकडे म्हणायला सुरुवात केली. सदतीस-अडतीस नंतर काहीतरी गफलत झाली. मी मधले एकदोन आकडे गाळले बहुतेक. मी गप्प का म्हणून पुरुषोत्तमकाकांनी विचारले तर मी खरे ते सांगून टाकले. "हात्तिच्या. त्यापेक्षा किती लोकांनी टोप्या घातल्या नाहीत हे मोज ना!" त्यांनी फटक्यासरशी सगळे चित्र सोपे करून टाकले.