निळ्या काचेचे पेन - भाग १

सकाळी जाग आली ती एका गोड उग्र वासाने. रात्री तर असले काही नव्हते. या प्रकरणाचा छडा लावायलाच हवा म्हणून मी स्वैपाकघरात शिरलो. वास तिकडूनच कुठूनतरी येत होता. पण दार ओलांडणार तेवढ्यात आईने बघितले. ती घराच्या कुठल्याही कोपऱ्यात असली तरी मी काय करतो ते तिला कसे कळे देव जाणे. आता तर ती पार वरच्या मजल्यावर मोठ्या देवघरात होती.

पूजा अर्चा

भाद्रपद शु ४ शके १९२९ श्री गणेश चतुर्थी दि. १५ सप्टेंबर २००७

हिंदुंमध्ये प्रचलित असलेल्या देवदेवतांच्या पुजनाच्या विविध पध्दती व विचारधारांची एकत्रित माहिती संकलित करुन ती माहिती सर्वांना विनामुल्य विनाबंधन विनासायास उपलब्ध करण्यासाठी संकेतस्थळाचा शुभारंभ आम्ही केला आहे.

आलीस का गौराई?

मी चौथीत होते तेव्हा पहिल्यांदा आईने मला एक दिवस दुपारीच घरी परत बोलावले. आपल्याला काय? सुट्टी मिळाल्याशी मतलब. :-) तर त्यादिवशी गौरी घरी आणायच्या होत्या. आईने मला आज उपवासच कर असं सांगितलं होतं, त्यामुळे जोरदार भूक लागली होती. पूजेची तयारी चालूच होती. आईने मग वेगवेगळ्या पाच प्रकारची फुले की पाने काहीतरी आणली होती, एका तांब्याला सजवून त्यात ती व्यवस्थित लावूनही ठेवली. मग सामानाच्या खोलीतून चार पत्र्याचे डबे काढले आणि त्यातल्या एकातून त्या दोघी बाहेर आल्या. अगदी अलगद आईने दोन मुखवटे एका ताटात ठेवले आणि त्यासोबत तो तांब्या पण.माझ्या हातात ते ताट देऊन आई म्हणाली,'हां आता आत ये, आधी उजवं पाऊल टाक. मग देवघर, स्वयंपाकघर, मग ओसरी असं करत मी जाईन तशी पाऊलं टाकत पुढे ये. ते ताट तसं बरंच जड होतं आणि त्यात ते नाजूक मुखवटे, त्यामुळे कसं बसं सांभाळत मी पहिलं पाऊल टाकलं. त्यावेळी पहिल्यांदा त्या गौरी माझ्यासोबत घरात आल्या. आईने मला सांगितलं होतं की पुढे काय करायचं आहे.
मी पहिलं पाऊल टाकल्यावर आईने प्रश्न विचारला,"आलीस का गौराई?"
मी,"आले गं वाई".
आई,"कशाच्या पावलाने?"
मी,"सुखसमृद्धीच्या पावलाने".
आई,"आलीस का गौराई?"

न चिकटणारा चघळगोंद

सिंगापुराबद्दल अलीकडेच माहिती मी मनोगतावर वाचली. ती वाचून सिंगापुरात चघळगोंदावर बंदी आहे असे कोणीतरी सांगितल्याचे आठवले. (मात्र तिथेही निकोटीन युक्त चघळगोंदावरची बंदी अलीकडेच उठवल्याचे येथे वाचले.)

मुखवटे

दिवस गजबजू लागला. गडबडीने अनिकेत बाहेर पडला.

दाराचा आवाज ऐकून शेजारच्या सदनिकेतल्या आज्जी गडबडीने दार उघडून बाहेर आल्या. "जपून जा रे बाळा", त्यांच्या आवाजातून आणि चेहऱ्यावरून प्रेम ओथंबून वाहत होते. अचानक अनिकेतला पिसे लागल्यासारखे झाले. हा प्रेमभरला चेहरा... छे! हा तर मुखवटा. त्या मुखवट्यामागील अगतिक चेहरा त्याला स्वच्छ दिसू लागला. मुलगा बंगळुरात. सून बंगाली. तिने मुलाला पारच बाईलवेडा करून टाकला. 'हे' गेले आणि सुटले ह्यातून. आता माझे काही बरे-वाईट झालेच तर मग हा अनिकेतच देईल बहुधा भडाग्नी. विधीवत मंत्राग्नी कुठला आलाय माझ्या नशिबी? कोंडलेला हुंदकासुद्धा त्याला स्पष्ट ऐकू आला. घाईघाईत पायऱ्या उतरून तो खाली पोचला.

गणपती उत्सवानिमित्त मखर / सजावट स्पर्धा २००७

ह्या वर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त आम्ही मखर / सजावट स्पर्धा आयोजीत केली आहे.

ह्या स्पर्धेद्वारे आम्ही सगळ्यात चांगल्या सजावटीला MP3 Player बक्षीस देणार आहोत.

अधिक माहिती साठी मराठी माया वेबसाईट पहा.

मराठी माया परीवार

मराठी पाऊल पडती पुढे..

नमस्कार,

दिनांक १५ सप्टेंबर, २००७ रोजी गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मिसळपाव डॉट कॉम हे एक नवं, मराठमोळं संकेतस्थळ आंतरजालावर दाखल होत आहे, हे जाहीर करण्यास आनंद होतो आहे. मनोगत, मायबोली, उपक्रम, मराठी गझल, माझे शब्द, यांसारख्या दिग्गज वटवृक्षांच्या सावलीतच मिसळपाव डॉट कॉम हे 'इवलेसे रोप लावियले द्वारी..' अशीच मिसळपावकारांची भावना आहे!

आंतरजालावर मराठी भाषेच्या प्रचाराच्या व प्रसाराच्या दृष्टीने हे आणखी एक नवे पाऊल ठरावे असे वाटते!

एका आत्म्याचे मनोगत - २

पुन्हा जन्मलो. पण जन्मतःच मी कुणाला तरी नकोसा झाला होतो. तान्हा असतानाच कोणीतरी माझ्यावर चाकूचे वार करुन मला कचरापेटीत टाकून दिलं! जन्मताच पेपरांत फोटोबिटो छापून आले म्हणे. नंतर एका गरीब, निपुत्रिक जोडप्यानं मला प्रेमाने वाढवलं.

येथून जाताना कीर्ती मागे उरावी .कैसी ?

येथून जाताना कीर्ती मागे उरावी,असे प्रत्येकला वाटते.त्यासाठी काय करावे,याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन कोठे आहे,असे दिसत नाही.मात्र इतिहासांत डोकावले तर

अनेक माणसांची नावे वाचायला मिळतात.त्यानी त्यांच्या आयुष्यात काय काय केले ,याचे तपशील वाचल्यावर लक्षात येते की चांगले किंवा वाइट यापैकी कोणत्याही प्रकारचे आचरण केले तरी इतिहासात नाव राहून जाते.मग आपण काय करावे ?वाइट कामाबद्दल ज्यांचे नाव घेतले जाते,त्यानी सुद्धा जे केलेले आहे,ते करताना त्याना चांगलेच वाटलेले होते.म्हणजे कृत्य हे सापेक्ष असते.एकच कृत्य ,एकाच्या दृष्टीतून चांगले तर दुसर्याचे दृष्टीने वाइट असते.उदा:-इस्ट इंडिया कंपनीने भारतातजे केले ते भारतीयांच्यादृटीने वाइट ठरते पण ब्रिटिशांच्या नजरेतून पराक्रमाचे ठरते.यामुळे सर्व सामान्य माणसाना प्रश्न पडतो की जगावे तर कसे जगावे ?

माणसे: अरभाट आणि चिल्लर - १२

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ११  पासून पुढे.

आम्हाला कसलीच माहिती नव्हती.  पण आम्ही काही बोलायच्या आतच नानू बापटाने होय म्हणून टाकले.  मास्तरांचा इसाळ कमी झाला नव्हता, पण तेवढ्यात तातू सामंताने विचारले, “सर तुम्ही कधी गडकरी यांना भेटला होता का प्रत्यक्ष?” "भेटला होता का? भेटला होता का?” हातवारे करत मास्तर पुढे सरकत म्हणाले, तेव्हा नानू बापट तर गाठ मारल्याप्रमाणे आक्रसला. मास्तर म्हणाले, “मी इतक्या वेळा पुण्याला गेलो ते काय तेथले टांगे आणि अनेक मारुती मोजायला की काय? मी त्यांना दोनदा पाहिले. एकदा मी एकटाच गेलो होतो. त्या वेळी मी त्यांना पाहिले. पण त्या वेळी पायांतील शक्तीच गेली, आणि मी बावळटपणे पाहत राहून तसाच परतलो. दुसर्‍या खेपेला मात्र मी एका लेखकाची विनवणी करून त्याला बरोबर घेऊन गेलो. ते दोघे खूप बोलले, पण मला मात्र एक शब्द बोलायला झाले नाही. येताना मी त्यांच्या घरासमोरील पिंपळाची चार पाने घेऊन आलो. ती मी अगदी जपून ठेवली होती. त्यांतील दोन पाने मित्रांना दिली. एक माझ्यासाठी हवे.” मग ते मला म्हणाले, “पुढे कधी तरी तू गडकरी यांचा अभ्यास केलास, तर तुला ते उरलेले पान देईन.” नंतर अनेक वर्षांनी मी गडकर्‍यांच्या कविता, त्यांची नाटके वाचली. पण त्याआधीच मास्तरांकडून ते पिंपळपान मला मिळायचे नाही, हे ठरून गेले होते.