अशी पाखरे येती

ऑफिसला जाताना समोर एखादी स्कूलबस लागली की आम्ही वैतागतो. अरे एक तर ती दिलेल्या स्पीडलिमिट्च्या एक मैल वर जात नाही, शिवाय रेल्वे क्रॉसिंगला थांबते, सिग्नल पिवळा होण्याच्या खूप आधीच थांबते आणि हो जर त्यात मुले चढणार किंवा उतरणार असतील तर 'Stop' लिहिलेला आपला मोठा दांडा आडवा टाकून मागच्या सर्व गाड्या थांबविते.

फुलविले आदिवासींचे जीवन !

गेली तेहतीस वर्षे महाराष्ट्राच्या सीमेवरील भामरागडच्या परिसरातील दुर्गम जंगलात वसलेल्या आदिवासी लोकांची आरोग्य, शिक्षण, शेती अशा विविध माध्यमातून डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ.मंदा आमटे समर्पितपणे सेवा करत आहेत. आपल्या प्रयत्नांनी तेथील जीवनमान बदलत आहेत. पैकी त्यांच्या प्रयत्नांतून शेतीसंदर्भात जे काही बदल झाले आहेत त्याबद्दलची ही माहिती. डॉ. प्रकाश आमटेंशी संवाद साधून येथे दिली आहे.

सोन्याची साखळी-२

जवळपास बाग असावी असे त्या मुलीला वाटले. ती आईला म्हणाली, ' आई, तू येथे बैस. कोठे तरी जवळच बाग असावी. फुलांचा वास येत आहे. रातराणीचा, निशिगंधाचा, प्राजक्ताच्या कळ्यांचा वास येत आहे.' असे म्हणून ती मुलगी पाणी शोधावयास निघाली.

ती प्रधानाच्या मुलाची गावाबाहेरची बाग होती. केवढी थोरली अफाट बाग होती. एकदा आत मनुष्य शिरला की बाहेर निघणे कठीण. रात्रीच्या वेळी कोणी अनोळखी नवखा मनुष्य बागेत शिरला तर तो बाहेर पडणे शक्य होत नसे. उजाडले म्हणजे तो बाहेर पडे. ती मुलगी त्या बागेत शिरली. पाणी शोधीत चालली. शेवटी एका करंज्यांजवळ आली. रात्रीची वेळ होती. कर्दळीची पाने तिने तोडली, परंतु त्या झोपलेल्या पानांना तोडण्याआधी तिने नमस्कार केला व क्षमा मागितली. त्या पानांचा द्रोण करून तो पाण्याने भरून घेतला व ती निघाली. परंतु तिला रस्ता सापडेना. तिला बागेतून बाहेर पडता येईना. घुटमळत राहिली, हिंडत राहिली. 'माझी आई तहानलेली असेल, पाणी पाणी म्हणून प्राण सोडील' असे म्हणून ती रडे व भिरीभिरी हिंडे, परंतु रस्ता सापडेना.
आता बरीच रात्र झाली होती. प्रधानाच मुलगा गावाला गेला होता. आज राजपुत्र एकटाच होता. तो रात्री जिवंत झाला व बागेत हिंडू लागला. हिंडता हिंडता त्या मुलीची व त्याची गाठ पडली. ती दोघे एकमेकांकडे पाहतं राहिली.  'माझी आई' एवढा एकच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडला. त्या राजपुत्राने सारी चौकशी केली. तो म्हणाला, 'चल, मी तुला रस्ता दाखवतो.' किती तरी दिवसांत राजपुत्र बागेच्या बाहेर पडला नव्हता. दोघेजण बागेच्या बाहेर आली व आईला शोधीत फिरू लागली. सापडली एकदाची आई.

सोन्याची साखळी-१

एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या; परंतु दोघींनाही मूलबाळ नव्हते. आपल्या राज्याला पुढे वारस कोण, असा विचार मनात येऊन राजा दु:खी होई. कशाला हे राज्य, कशासाठी ही धनदौलत, ही कोणाच्या स्वाधीन करू, असे विचार सारखे त्याच्या मनी घोळत. राजेच दु:ख पाहून राण्याही दु:खी होत.
एके दिवशी कोणी तरी एके बोवा आला होता. एक राणी तेथे होती. राणी रडत होती. बोवाजी म्हणाला, 'राणी, राणी तुझ्या डोळ्यांत का पाणी ? राजाची राणी असून दु:खी का ? दासदासी पदरी असून दु:खी का ? रथ, घोडे, हत्ती असून दु:खी का ? तुम्हाला काय कमी ? तुम्हाला कसला तोटा ? तुम्हासारख्या श्रीमंतांनी रडावे मग गरीबांनी काय करावे ? देवाने तुम्हाला भाग्य दिले, राज्य दिले. रडू नका, रुसू नका, सुखाने नांदा'.
डोळ्यांत पाणी आणून राणी म्हणाली, 'शेतात पीक नाही तर शेताला शोभा नाही; तळ्यात कमळ नाही तर तळ्याला शोभा नाही; आकाशात चंद्र नाही तर आकाशाला शोभा नाही; झाडाला फळ नाही तर झाडाला शोभा नाही; शिंपल्यात मोती नाही तर शिंपल्याला शोभा नाही. महाराज, जिला पुत्र नाही, त्या स्त्रीच्या जगण्यात काय अर्थ ? मला 'आई' अशी हाक कोण मारील ? पुत्रवती जी आहे तीच खरी सुखी, तीच भाग्याची, तीच दैवाची. देवाने सारे दिले परंतु हे दिले नाही; देवाने सोने दिले परंतु सोनुकला दिला नाही. मी रडू नको तर काय करू ? राजाचे दु:ख पाहून मला प्राण नको असे वाटते. तुम्ही तरी कृपा करा, मला मुलगा द्या.'
बोवाजीस दया आली. तो म्हणाला, 'माझ्या कृपेने तुम्हाला पुत्र होईल; परंतु दुसरी राणी त्या मुलाचा द्वेष करील. त्याला मारू पाहील. म्हणून मी एक युक्ती करतो. तुमच्या मुलाचे प्राण तुमच्या या राजधानीत जे मोठे तळे आहे, त्या तळ्यात जो एक सोन्यासारखा मासा आहे त्याच्या पोटात ठेवतो. त्या माशाच्या पोटात मी एके सोन्याची साखळी ठेवीन. ती जोपर्यंत तेथे आहे तोपर्यंत तुमच्या मुलाचे प्राण सुरक्षित राहतील.'

विश्वबंधुत्त्व व धर्म

विश्वामध्ये कोठलाही धर्म मग तो भूतकाळातील असो, वर्तमानातील असो अगर भविष्यातील कोठल्याही दुसऱ्या धर्मापेक्षा श्रेष्ठ अगर कनिष्ठ असूच शकत नाही. प्रत्येक धर्म हा सापेक्ष आहे. धर्म स्थळ, काळ व समाज या ३ अक्षाशी निगडित असतो. हे ३ अक्ष वापरून कोठल्याही धर्माचे स्थान निश्चित करता येईल. या आधारे कोठल्याही धर्माचे मूल्यमापन केले तर त्या धर्मामध्ये एकही चूक सापडणार नाही. कोठल्याही अक्षात बदल केले तर चुकाच चुका सापडतील. पृथ्वीवर आद्य धर्म अरण्यधर्म असावा. या धर्मात प्रत्येक प्राणि स्वतंत्रपणे आपले भक्ष व स्वतःचे संरक्ष्ण स्वतःच करत असे. त्यामुळे ताकतवान प्राणि कमी शक्तीवान प्राण्याना सहज भक्ष बनवू शकत. (प्राणि भूक लागल्याशिवाय शिकार करत नाहीत त्यामुळे दुबळे प्राणिही टिकुन राहिले.) बोटांच्या व मुठीच्या ताकती बद्दल सर्वानाच माहिती आहे. या मुळेच दुबळे प्राणि कळप करुन राहु लागले असावेत. अरण्यधर्मातील हा पहिला बदल असावा. मनुष्यसुद्धा कित्येक प्राण्यांच्या तुलनेत दुबळाच आहे. म्हणुनच मनुष्याने कळप करुन राहण्यास लवकर सुरवात केली असेल. माणसाच्या कळपाला समाज असे संबोधले जाते.

ऐवज - दत्ता सराफांचे आत्मकथन

पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा निर्माण केलेल्या दत्ता सराफांचे हे आत्मकथन. तसा आत्मकथन हा प्रकारच अवघड. स्वतःबद्दल तर लिहायचे, पण ते स्व-केंद्रित होऊ द्यायचे नाही. हा तोल सांभाळणे भल्या-भल्यांना संकटात टाकते.

पण सराफांनी हा तोल उत्तम रित्या सांभाळला आहे. नाशिक हे जन्मस्थान आणि अधुनमधुन कर्मस्थान असलेल्या सराफांनी सुरुवात नाशिकच्या कोंडाजीच्या चिवड्याइतक्याच प्रसिद्ध "गांवकरी" वृत्तपत्रात केली. दादासाहेब पोतनीस हे गांवकरीचे मालक आणि त्या पिढीतल्या बऱ्याच इतर उदाहरणांप्रमाणे व्यक्ती कमी आणि संस्था जास्त असे व्यक्तिमत्त्व. त्यांनी विचारलेला एक साधा प्रश्न "'गांवकरी'त का येत नाही?" हा सराफांची पत्रकारिता सुरू व्हायला पुरेसा ठरला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्ते मागे एकच कारण आहे किंवा असेल असं मला वाटत नाही. फक्त उरावर कर्ज आहे या एकाच कारणासाठी  आत्महत्या करण्याइतकी कुठलीच जनता लोचीपोची नक्कीच नसते.

 कर्ज आहे, ते फेडण्याची इच्छा आणि हिंमतही आहे पण उत्पन्न अगदीच शून्य, हिच लाजिरवाणी, पण जीवघेणी यातना "आत्महत्ये" पर्यंत नेण्यास कारणीभूत असते. कर्जापेक्षा कमी उत्पन्न हेच मूळ कारण आहे.

शरण्य सबमिशन

आता हा माउस कुठे ठेवायचा असे म्हणून थोड्या कागदांचे दुसरीकडे पुनर्वसन करण्याचा मी प्रयत्न केला पण एक कागद सरकताच दुसऱ्याने त्या जागेवर अतिक्रमण केले. त्या भानगडीत माझे लक्ष गुंतल्याचे पाहून एका पेन्सिलीने टेबलावरून उडी मारून आत्महत्येचाही प्रयत्न केला. पुस्तके वगैरे दांडगट मंडळी माझ्या झटापटीला दाद देत नव्हतीच. पण मधेच कळफलकाच्या कडा सर करून नसत्या कळा दाबून विरोध व्यक्त करत होती. त्यांचा एका हाताने कळफलकावरून कडेलोट केला तर त्या धक्क्याने कोपर्‍यातले पुस्तकांचे डोलारे डोला रे डोला रे करायला लागले. परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आणि एफ् एम ने सुरात सूर मिसळला "इन्किलाब झिन्दाबाद".

भाषावार प्रांतरचना

भाषावार प्रांतरचना ही एक फसलेली गोष्ट आहे. आपण मारे कितीही नगारे वाजवले तरी मराठी माणसे  म्हणजे नेमके कोण? ( अथवा तेलगु/तामिळ/कन्नड) म्हणजे तरी नेमके काय? जी बोंब मराठीची तीच इतर भाषांची!

महाराष्ट्राची राजधानी - मुंबईच्या विकासात अमराठी पारश्यांचे योगदान केवढे आहे.ज्या टाटा बजाज मुळे पुणे बहरले.. ते मराठी की अमराठी?

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ९

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ८  येथून पुढे. 

प्रिन्सिपॉलच्या खोलीत असलेल्या शिक्षकांपैकी एक रेगे होता. रेगे मास्तर म्हणजे कोणत्याही बातमीचा तोंडी छापखानाच होता. त्यांनी ती हकीकत सार्‍या शाळेत पसरवली. मी तर उड्या मारतच घरी परतलो. कारण ती  हकीकत मला घरी सांगायची होती.