आखाती मुशाफिरी (२३)

मी बॅटीला भांडाराकडे पिटाळले आणि मुख्यालयाला फोन करून कामाची आणि लागणार्‍या साहित्त्याची कल्पना दिली.
-------------------------------------------------------------------------------------------------
बॅटी गेल्यानंतर मी जुन्या डक्ट्‌स काढण्याच्या कामाचा आढावा घेतला. काम पूर्णपणे आटोक्यात होते. उरलेल्या डक्ट्स काढण्याचे काम आज साय़ंकाळपर्यंत पूर्ण होतील आणि नवीन डक्ट्‌सचा संच लावण्याचे काम उद्या सकाळी सुरू करता येईल असा मी विचार करीत होतो. या कामाच्या पूर्वनियोजने प्रमाणे कंपनीच्या कारखान्यात नवीन डक्ट्स तयार झालेल्या आहेत असा निरोपही आलेला होता. माझ्या कामाच्या अंदाजाबाबत सुर्वेचे काय म्हणणे आहे ते जाणून घेण्यासाठी मी त्याला बोलावले,

आवाहन !

मी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी लेखन, मी कवी, मी मराठीचा उद्धार कर्ता पण मी भारतीय कुठे आहे ?
मराठी महाजालाच्या जगाच्यात आजकाल मराठी अव्यक्त नाही आहे, शेकडो ब्लाग, काही संकेतस्थळे व माहीतीच्या जगात मराठीची उपस्थिती ही सर्वानाच माहीत आहे मराठीवर्ड-मनोगत-मायबोली-माझे-शब्द-उपक्रम ईत्यादी, पण मला सर्वत्र मराठी लोकचं भेटले पण मला भारतीय मराठी कुठेच भेटला नाही काय कारण असावे ?
भारतीय मराठी हा नवीन शब्द आहे ना ? मला ही नवीन आहे काय करावे !
पण मला नाही भेटला हा मानुस (मनुष्य) का ? हाच प्रश्न मला त्रास देत आहे.

तीन मडकी - २

'आता किती वेळ ते मडके हालवीत घुमणार ? ठेवा खाली. दमले, घामाघूम झालेत.' सावित्रीबाई रागातही हसून म्हणाली.
परंतु भिकंभट हसला नाही. त्या वाण्याने आपल्याला फसवले असे त्याला वाटले. ते मडके त्याने हातात घेऊन तो तसाच घराबाहेर पडला. सावित्रीबाई रडणाऱ्या मुलांना समजावीत बसली.

                                                 
अंधारातून भिकंभट जात होता. उजाडते न उजाडते तोच तो वाणीदादाच्या घरासमोर दत्त म्हणून उभा राहिला. 'वाणीदादा, माझे मडके तुम्ही लांबवलेत. हे नव्हे माझे मडके. तुम्ही अदलाबदल केलीत. होय ना ? द्या माझे मडके.' असे तो ब्राह्मण म्हणाला.
वाणीदादा संतापून भिकंभटाच्या अंगावर धावून गेला. तो रागाने म्हणाला, 'मला काय करायचे तुझे मडके ? मला का भीक लागली आहे ? मी का चोर आहे ? नीघ येथून. नाहीतर थोबाड रंगवीन. नीघ.'
ती बाचाबाची ऐकून शेजारची मंडळीही तेथे आली. त्या सर्वांनी भिकंभटाची हुर्यो केली. त्याला हाकलून लावले. बिचारा भिकंभट पुन्हा रडत निघाला. रानात जाऊन त्या पूर्वीच्याच झाडाखाली रडत बसला.
तिकडून शंकर पार्वती जात होती. त्याचे रडणे त्यांच्या कानी पडले. पार्वती शंकरास म्हणाली, 'देवा कोणी तरी दु:खीकष्टी प्राणी रडत आहे. चला. आपण पाहू.' शंकर म्हणाले, 'पुरे झाले तुझे. या जगाला रडण्याशिवाय धंदा नाही. या रडारडीला मी तरी कंटाळलो आता आणि आपल्याजवळ तरी असे काय उरले आहे ?' पार्वती म्हणाली, 'अजून दोन मडकी शिल्लक आहेत. तोपर्यंत काय द्यायचे ही चिंता नको. चला जाऊ त्या दु:खी प्राण्याकडे.'
ती त्या झाडापाशी आली. तो तोच पूर्वीचा ब्राह्मण. शंकरांनी विचारले, 'का रडतोस, काय झाले ?' भिकंभट म्हणाला, 'काय सांगू महाराज ? त्या एका वाणीदादाकडे मी मडके ठेवून अंघोळीला गेलो. अंघोळ केल्यावर मडके घेऊन घरी गेलो. 'पड पड' म्हणून मडके हालविले; परंतु एक दाणा पडेल तर शपथ. त्या वाण्याने मडके बदलले असावे अशी शंका येऊन मी त्याच्याकडे गेलो. त्याला विचारले; परंतु तो माझ्या अंगावर धावून आला. शेजारीपाजारी त्याच्याच बाजूचे. खऱ्याची दुनिया नाही. मी गरीब, एकटा पडलो. आलो पुन्हा या झाडाखाली व बसलो रडत.'
भगवान शंकर म्हणाले, 'हे दुसरे मडके घे.'
भिकंभटाने विचारले, 'यातून काय बाहेर पडते ?'
शंकर म्हणाले, 'यातून पड पड म्हटले की राक्षस बाहेर पडतात. 'शिव शिव' म्हटले की ते नाहीसे होतात. घे हे मडके व त्या वाण्याची खोड मोड.' ब्राह्मणाच्या सारे ध्यानात आले. नमस्कार करून व ते मडके घेऊन ब्राह्मण निघाला.

तीन मडकी - १

एक होता गाव. त्या गावात एक मनुष्य राहत होता. त्याचे नाव होते भिकंभट. तो फारच गरीब होता; परंतु त्याचे कुटुंब फार मोठे होते. बायको होती. चार कच्चीबच्ची होती. घरात खाण्यापिण्याची सदैव पंचाईत पडायची. कधी कधी नवराबायकोचे कडाक्याचे भांडणही होई. त्या वेळेस मुले रडू लागत. शेजारीपाजारी मात्र हसत व गंमत बघत.
एके दिवशी तर गोष्टी फारच निकरावर आल्या. भिकंभट ओसरीत बसले होते. घरात खाण्यासाठी पोरे आईला सतावीत होती. सावित्रीबाई शेवटी एकदम ओसरीत येऊन गर्जना करू लागल्या, 'काय द्यायचे पोरांना खायला ? घरात एक दाणा असेल तर शपथ. बसा येथे ओटीवर मांडा ठोकून. संसार चालवता येत नाही तर लग्न कशाला केलेत ? नेहमी गावात चकाट्या पिटा. पानसुपाऱ्या खायच्या, पिचकाऱ्या मारायच्या. दुसरा उद्योग नाही तुम्हाला. काही जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज. लोकांजवळ तरी कितीदा तोंड वेंगाडायचे ? ही पोरे घेऊन विहिरीत जीव द्यावा झाले. शंभरदा सांगितले की काही थोडे फार तरी मिळवून आणा. कोठे बाहेर जा, उद्योगधंदा पाहा; परंतु घरकोंबडे येथेच माशा मारीत बसता. मला तर नको हा संसार असे वाटत आहे.'
सावित्रीबाईंचा पट्टा सारखा सुरू होता. बिचारे भिकंभटजी. त्यांना कोण देणार नोकरी चाकरी ? कोणतेही काम त्यांना येत नसे; परंतु त्या दिवशी त्यांना फार वाईट वाटले. बायको रोजच बोलत असे; परंतु आज त्यांचा स्वाभिमान जागा झाला होता. त्यांची माणुसकी जागी झाली. एकदम उठले व म्हणाले, 'आज पडतो घराबाहेर. काही मिळवीन तेव्हाच घरी परत येईन. पोराबाळांचे पोट भरण्यास समर्थ होईन तेव्हाच परत तोंड दाखवीन. ही तोपर्यंत शेवटचीच भेट.' परंतु सावित्रीबाईंस त्या बोलण्याने तेवढेसे समाधान झाले नाही, त्या चिडविण्याच्या आवाजात म्हणाल्या, 'आहे माहीत तुमची प्रतिज्ञा. आजपर्यंत सतरादा जायला निघालेत; परंतु अंगणाच्या बाहेर पाऊल पडले नाही. जाल खरोखरच तेव्हा सारे खरे.' भिकंभट खरोखरच घरातून बाहेर पडले. लांबलांब चालले. पाय नेतील तिकडे जात होते. कोणाकडे जाणार, कोठे जाणार ? ना कोठे ओळख, ना कोणापाशी वशिला.' दमेपर्यंत चालत राहावयाचे असे त्यांनी ठरवले होते. शेवटी ते अगदी थकून गेले. पोटात काही नव्हते. एक पाऊलही पुढे टाकवेना. शेवटी एका झाडाखाली ते रडत बसले.

झोप कमी कशी करावी ?

कोणी मला झोप कमी करणे या वर काही मार्गदर्शन करु शकेल का? मी माझी झोप ६ तास मर्यादित करायचा प्रयत्न करतो आहे.  तर हे करण्यासाठी काही उपाय सांगु शकाल का?

जंजिरा - इतिहास

कर्नाळा इतिहास व हा लेख लिहिल्या नंतर महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांचा इतिहास सुद्धा प्रस्तुत करावा असा विचार आहे.  उपक्रम मोठा आहे पण सुरुवात तर केलेली आहे. इथे नमूद केलेला जंजिऱ्याचा इतिहास संपूर्ण नसला तरी कमीत कमी छत्रपतींचा काळ व त्या दरम्यान झालेल्या लढाया यांचा तपशील मी देत आहे.

काहि नवे परदेशस्थ मराठी शब्द...

काही नवे परदेशस्थ मराठी शब्द...
अमेरिकेतील प्रवास, या श्री. रवी यांच्या लेखना वरील प्रणाली यांचा प्रतिसाद वाचून सहज एक कल्पना सुचली, की आपल्या पैकी काही जण परदेशस्थ (परदेशी-स्थायिक झालेले/असलेले  ) मराठी मनोगती आहेत, त्यातील बरेच जण प्रतिभावंत पण आहेत, आणि अश्या या मनोगतींचा एखादा अनोखा वयैक्तिक असा शब्दकोश हि असेल. कारण परदेशात, किंवा परराज्यात सुद्धा मुख्यत्वे जिथे मराठी ही सामान्य बोलीभाषा नाही तिथे, आपल्या-आपल्या मराठी चमू मध्ये आपण एखादा स्थानिक भाषेतला शब्द विडंबात्मक पद्धतीने वापरतो, आणि तो तिथे इतका चपखल बसून जातो की, मूळ मराठी भाषेतील शब्दा प्रमाणे आपण तो वापरात आणतो अर्थात विनोदानेच...

कर्नाळा आणि सांकशी

मुंबई गोवा महामार्गावरच्या पनवेल आणि पेणच्या मध्ये थम्स अप च्या अंगठ्याच्या आकाराचा एक सुळका आकाशात डोकावत असतो. पुण्याहून मुंबईला येतांनाही पनवेलच्या अलीकडे डाव्या हाताला दिसतो. हाच तो कर्नाळ्याच्या किल्ल्यावरचा जैत रे जैत ने प्रसिद्धी मिळालेला सुळका. याच्या पायथ्याशी एकेकाळी दिमाखदार आणि नांदते असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे.

चार चाकी गाड्यांना असणारे आरसे

चार चाकी गाड्यांना असणाऱ्या (rear view) आरश्यांवर "या आरशात दिसणाऱ्या गोष्टी/वस्तू प्रत्यक्षात दिसतात त्यापेक्षा जवळ आहेत"हा मजकूर का लिहितात?

जर आरशांचा उपयोग मागील वाहन पाहण्यासाठी असतो तर त्या वाहनाचे आपल्या वाहनापासून असणारे खरे अंतर समजावयास हवे.

आखाती मुशाफिरी (२२)

  " सांगतो माऊली. सगळं सांगतो. आधी आंत तर चला " असं म्हणत मी दार उघडलं आणि वश्याला घरांत घेऊन गेलो.

-----------------------------------------------------------------------------------------------

"हां बोल आता."
घरांत गेल्या गेल्या वश्या म्हणाला. मी वश्याला थोडक्यात सध्याच्या माझ्या कामाची माहिती दिली आणि बॅटी दिवसाच्या शेवटी काय बोलला तें सांगितलं. अर्थात्‌, मात्र मी त्यामुळेच नाराज आहे हे त्याला निराळं सांगावं लागलं नाही.