आखाती मुशाफिरी (७)

तिथून सुटका झाली याचंच हायसं वाटून घेत मी गाडी सुरूं केली. खरंच मी उद्या त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो कां?--------------------------------------------------------  

शुक्रवार उजाडला.

जाग आली तेंव्हा सकाळचे आठ वाजत आले होते.पण खिडकी बाहेर, माध्यान्ही असांवे तसें लख्ख ऊन पडलेले. सुटीच दिवस म्हणायचा पण दैनिक कामांप्रमाणे साप्ताहिक कामे करावी लागत ती वाट पाहात होती. आस्थापनेकडून निवासा साठीं दोघांत मिळून एक अशी सदनिका दिली गेली होती. प्रत्येकी एक स्वतंत्र स्वयंपूर्ण शयनखोली,  अभ्यागत कक्ष आणि भटारखाना मात्र सामाईक. माझा सहनिवासी एक केरळी होता. माझे त्याच्याशी कधी पटलें नाही. जरा सणकीच होती वल्ली. सुटीच्या दिवशी भल्या सकाळी स्वारी त्याच्या इतर ज्ञातीबांधवांकडे निघून जायची, ती रात्री उशीराच परतायची. त्यामुळे घरी मी एकटाच.  साप्ताहिक कामें म्हणजे निर्वातक-झाडूने घर साफ करणे, आठवडाभ्रर मळवलेले कपडे धुलईयंत्रातून खंगाळून काढणे मग न्याहरी आणि त्यानंतर निवांत अंघोळ. पण आज झडझडून कामाला लागावे असें वाटत नव्हते.

दुधीची दुधातली भाजी

वाढणी
४ जणांकरिता

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

यंदा कर्तव्य आहे !! - भाग १

नमस्कार मंडळी !!

मी मनोगताची नियमीत वाचक व सदस्य आहे,परंतु स्वतः लिहीण्याची ही पहिलीच वेळ ! तेव्हा चुकांबद्दल क्षमस्व !कोणत्याही संस्थेबद्दल किंवा कार्यपद्दतीबद्दल टिप्पणी करण्याचा माझा अजिबात हेतु नाही पण मी जो अनुभव घेतला तो आपल्यासमोर मांडावासा वाटला इतकंच.

बोलका ढलपा (उत्तरार्ध)

(पूर्वार्धातील गोष्ट- रानात औषधे गोळा करायला गेलेल्या वैद्यबुवांनी एका लाकडाच्या ढलप्यावर संदेश लिहून एका वनवासी मुलाबरोबर घरी पाठवला. संदेशवाहनाचा हा प्रकार पाहून त्या मुलाचे कुतुहल चाळवले. पण त्याला लाकडाचा तो ढलपा पुन्हा पहायला मिळाला नाही. इथून पुढे.....)

आखाती मुशाफिरी (६)

साईटवर पोहोचलो आणि पाहातो तो काय !
-------------------------------------
         तसा काम संपायला अजून अर्धा तास बाकी होता. कामगार कामाच्या जागेवर होते. सकाळच्या मानाने काम बरेच पुढे सरकलेलेही दिसत होते. पण जेथपर्यंत काम सरकलेले होते त्या टोकापाशी कामगारांचा घोळका एकत्र जमा झालेला होता. काय असावे म्हणून मी माझी गाडी तशीच पुढे त्या ठिकाणा पाशी नेली आणि खाली उतरलो. खोदलेलेल्या चराच्या टोकाला खोदणी यंत्र स्तब्ध उभे. त्याच्या अलिकडे चराच्या दोन्ही तीरावर पठाणांचा घोळका विभागून उभा आणि त्यांची आपसांत काही तरी चर्चा चाललेली. मी पुढे झालो त्यासरशी कांही पठाण मला वाट करून देत बाजूला सरकले. खोदलेल्या चराच्या तळाकडें निर्देश करत त्यानी जें कांही दाखविले ते भयचकित करणारे होते. तिथे एक तुटलेला आणि विस्कळित अवस्थेतला मानवी हाडांचा सांपळा विखरून पडलेला होता. हाडांवरचे मांस जवळ जवळ झडून गेलेले. खोदकामाच्या यंत्राच्या फाळाला लागून ते अवशेष जरासे वर आलेले.ज्यांची संभावना एरवी राक्षस म्हणून व्हायची ते सारे पठाण म्लान  मुद्रेने उभे.

एक पिवळा दिवा-

नुकतीच घडलेली घटना-
नेहमीच्या घाई गडबडीत दुचाकीवरून कामे साधत भटकंती सुरू होती....
दादरला सेना भवनचा वाहतूक नियंत्रक दिवा ओलांडून पोर्तुगीज चर्च कडे आगेकुच करीत होतो.... जुन्या कंपनीत नोकरी करताना हा रोजचा रस्ता असायचा... ह्या आठवणी मनात आणत पुढे सरकत होतो इतक्यात सुश्रुषा हॉस्पिटलच्या चौका जवळचा दिवा हिरव्याचा पिवळा होताना बघीतला....
पटकन पुढे निघून जावू ह्या मनात आलेल्या चोरट्या भावनेने विचारांना जिंकले व मी तो दिवा पिवळ्याचा लाल होण्या आधीच चौक पार केला....
तसे बघायला गेल्यास हे असे मी कधी कधी केलेही असेन - व ही काही पहिलीच वेळ नव्हती....
झाडाखाली फटफटीवर ठाण मांडून बसलेल्या साहेबांनी आपल्या सहकाऱ्यामार्फत थांबण्याचा इशारा केला..... मनोमन साहेबांच्या सात पिढ्यांचा उद्धार करीत मी दुचाकी बाजूला घेतली...
नशीब डोक्यावर शिरस्त्राण (लोखंडी टक्कल) होतेच.
सविनय पणाचा आव आणत दुचाकी बरोबर एका कोपऱ्यात साईड स्टॅंडला लावली व चालत साहेबांकडे येत असतानाच परवाना काढण्यासाठी मागच्या खिशातले पाकीट काढले...
रस्त्यात ५०० रुपयाची नोट सापडल्यासारखे हसू चेहऱ्यावर आणत साहेबांना खास आवाजात व एक हात उंचावून मराठमोळा नमस्कार केला.
साहेब चांगलेच खत्रुट वाटत होते - नमस्काराचे प्रत्युत्तर तर सोडाच साधे लक्षही देण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. जेव्हा खात्याचे सौजन्य सप्ताह कसा पाळावा ह्यावरचे प्रशिक्षण दिले जात होते तेव्हा बहूदा ते त्या वर्गाला गैरहजर राहिले असावेत अशी शंका डोक्यात आली.

बरहा मधल्या युक्त्या

परवा अनामिक ह्यांचा लेख वाचताना जाणवले की बऱ्याच मंडळींना मराठी लेखनाची आवड आहे व त्यांचे प्रयत्न योग्य दिशेने जात आहेत. काही मंडळी बरहा चा वापर करतात जेणे करून आपण केलेले लेखन धारीणीत वाचवून ठेवता येते व लेख मोठे असल्यास (एका बैठकीत ते पूर्ण होऊ शकत नाहीत) किंवा चुकीने दुसरीच कळ दाबली गेल्यास लेखन नष्ट होत नाही.

मायदेशी जाताना....

मी उद्या माझ्या मायदेशी जात आहे.. भारतात.. चांगला १ महिना सुट्टीसाठी...

खूप खुश आहे.. "फ्लाईंग टू यू.एस." प्रमाणेच... "मायदेशी जाताना..." हे ही लिहायचा मनसुबा आहे..

मनोगतींच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवे आहेत.. द्याल ना नक्की?

- प्राजु.

चेहऱ्यामागचे सौंदर्य.

वाचायला येउ लागले तेव्हापासून मी सतत वाचतेच आहे. लहानपणी बालगोष्टी, किशोर, चांदोबा......जे हाती लागेल ते संपवूनच खाली ठेवायचे. वाचनाचे वेड खूप लोकांना असतेच.अगदी पुडीच्या कागदावर लिहिलेलेही वाचले जाते. कधीकधी त्यावर कुणाचे मन थांबलेले सापडते. वाचनवेडे मान्य करतील की हे वाढत जाणारे वेड आहे. वेगवेगळ्या वयात वाचनाचे प्रकार बदलतात, अर्थही बदलतात. माझाही वाचनप्रवास वेग घेत होता. बालगोष्टी मागे पडल्या होत्या. किशोरवयात पदार्पण केले होते. अनेक नवीन भाव आकार घेत होते. योगिनी जोगळेकर, भालचंद्र नेमाडे, सुहास शिरवळकर, वपु.....हे आवडू लागले. काहिसे हुरहूर लावणारे, स्वप्नात नेणारे लिखाण भावत होते. अशातच उदयचे ( लेखकाचे लोकांना माहित असलेले नांव लिहिलेले नाही, उदय हे त्याचे काही खास लोकांनाच माहित असलेले नाव आहे. ) लिखाण वाचायला मिळाले. बारा-तेरा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. ओघवत्या, भारावून टाकणाऱ्या कादंबऱ्या. मी एकामागोमाग एक वाचितच सुटले होते. पाहता पाहता उदयच्या लिखाणाने माझ्या मनाचा कब्जा घेतला.  त्याच्या धुमसत्या, अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या, प्रेमासाठी आसुसलेल्या पात्रांच्या व्यक्तित्वाने, भन्नाट लेखनशैलीमुळे माझ्या मनाने त्याचे रुप  रेखाटले होते. अमिताभचा जंजिर येउन गेलेला होता. दिवार,जमीर सारखे सिनेमे गाजत होते. त्याच्या सगळ्या लिखाणातून तोही असाच डॅशिंग, रफटफ पण मनात मात्र हळवा असणार ह्यात काही शंकाच नव्हती. तशातच त्याच्या एका कादंबरीच्या प्रस्तावनेत मला त्याचा पत्ता मिळाला. त्यात त्याच्या जन्मतारखेचा उल्लेख होता. त्यावेळी त्याची तिशी उलटून गेली होती. घर,संसार व लेखनप्रपंच ह्यात दंग असलेला एक प्रभावी लेखक. लेखक कसा दिसतो हे पाहण्याचा मला मोह झाला...  वाढदिवस नजरेच्या टप्प्यात आला होता.  जराही वेळ न दवडता मी त्याला पत्र लिहिले.  वाचून झालेल्या कादंबऱ्या  आवडल्या आणि तुम्हाला भेटायची इच्छा आहे असेही लिहिले. त्याआधी घरातील आपली माणसे वगळता मी कोणालाही पत्र लिहिले नव्हते. त्यामुळे असे अनोळखी माणसाला पत्र लिहिताना मोठे साहसच केले होते. माझ्या ह्या खुळेपणाला घरातले सगळे हसत होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला उत्तर येईल असे एकदाही वाटले नव्हते. पोस्टमन येइ त्यावेळी मी शाळेत असे. घरी आल्या आल्या मी  आईला विचारी, पत्र आलेय का? आई गालातल्या गालात हसून नाही म्हणे. असा महिना उलटला. मुळातच आशा नव्हती त्यात इतके दिवस उलटल्यावर ......एके दिवशी घरी आले तर आई हातात निळ्या रंगाचे आतंर्देशीय पत्र घेऊन उभी. माझा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता. पत्रात त्याने सामान्यपणे सगळे लेखक जे लिहितील तेच लिहिले होते. प्रकाशकाना भेटण्यासाठी मुंबईत येणे होतेच तेव्हा नक्की भेटू. आमचा पत्रव्यवहार वाढू लागला. दहावीचा अभ्यास जोर धरु लागला होता. अवांतर वाचनासाठी वेळ कमी पडत होता. दरम्यान त्याची आणिक एक कादंबरी प्रकाशित झाली. पत्रात त्याने मुंबईस येत असल्याचे कळविले. मी वेळ झाल्यास आमच्या घरी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले.त्याने ते स्विकारले.

आखाती मुशाफिरी (५)

भाग (५)
ते मला उद्या कळणार होते.
------------------------------------------------------------------------
कुणाचाही सल्ला, कुणाचीही परवानगी न घेता मी एक नवा प्रयोग करूं पहात होतो. यशस्वी झालो तर प्रशंसा होईलच याची शाश्वती नव्हती. नव्हे तशी शक्यताही क्षीणच होती. मात्र अपयशी ठरलो तर मात्र धडगत नव्ह्ती. कदाचित परत मायदेशी धाडला जाण्याचीच शक्यता अधिक. कारण प्रस्थापित कार्यप्रणाली बदलण्याचे धाडस ज्यांनी पूर्वी केले त्यांची गत काय झाली होती हे मला माहित होते. पण वांडपणा करण्याची खोड जन्मजात होती त्याला मी तरी काय करणार.