माझी अस्मिता- माझी मराठी !

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

माझा पिवळेपणाकडे प्रवास -६

यापूर्वी वाचा: माझा पिवळेपणाकडे प्रवास -५
पण सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ झाली तरी सुटायची चिन्हं दिसली नाहीत. बहीणीला विचारल्यावर कळले की रक्त तपासणीवरुन अजून एक दिवस थांबायचा निर्णय झाला आहे. आता मला परतीचे वेध लागले होते!

यंदा कर्तव्य आहे !! - भाग २

आत सर्वप्रथम आम्ही व्यवस्थापकांच्या खोलीत गेलो.म्हणजे पहिल्यांदा तिथे येण्याची नोंद करायची व नंतर आपण तिथून हवी असलेली रजिस्टर्स घ्यायची. बाकी सर्व नोंदणीचे सोपस्कार आईने आधीच केल्याने आम्हाला लगेचच उमेदवार मुलांची माहिती असलेले रजिस्टर्स पहायला मिळाले.

आखाती मुशाफिरी (८)

पठाणी सहभोजनासाठी आता वसंताही मजबरोबर थांबणार होता.
------------------------------------------------------------------

       पठाणांच्या वस्तीवर पोहोचलो तेंव्हा अंधारून यायला सुरुवात झाली होती. एका
मोठ्या भूखंडावर चहूबाजूंनी सुमारे बारा फूट उंचीची वीटकामाची तटबंदी, मधोमध
एक भलामोठा दिंडी दरवाजा आणि आंत अत्यंत ओबडधोबड अशा बराकी. अशी
एकूण त्या वसाहतीची रचना. भारतांतील कोणत्याही शहरांतील कारावासाची  आठवण व्हावी अशी. माणसांच्या जेमतेम मूलभूत गरजा पुऱ्या व्हाव्यात इतपतच केली गेलेली सोय. काल इथे आलो होतो तेंव्हा दिंडीदरवाजा खुला होता. आज मात्र बंद होता. अर्थात गाडी आज बाहेरच ठेवावी लागली. दिंडीतून वाकून मी आंत दाखल झालो तसा वश्या बाहेर घुटमळतच राहिला. त्याच्या चेहर-यावर
संदेह अगदी स्पष्ट दिसत होता. आत घोळक्या घोळक्याने वावरणारे पठाण तो निरखीत होता. मी त्याने आंत यावे म्हणून खुणावले तर तो मलाच बाहेर ये म्हणाला. जावेच लागले.
     " कांही खरं नैये बे भोट्या. तुले काय सांगाव आता. पार्टी काय्ची खातं बे,  भ++ ! तुलेच   फाडून खातीन ते. पैन लाव."
       वश्या पोटतिडकीने बोलला यात शंकाच नव्हती. कारण ’भ’काराने सुरु होणारी संबोधने आपसुकपणे त्याच्या तोंडून बाहेर पडणे आणि ’पैन लाव’हे त्याचे शब्द त्याच्या निरागस मनस्विततेचे लक्षण होते. एखाद्या विधानाला हे ’पैन लाव’ (म्हणजे पैज लाव) हे शब्द जोडले की अगदी ठामपणा येणारच अशी त्याची समजूत होती. 
 " कांही तरी काय बोलतो आहेस. अरे असं कांही होणार नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो तसं काहींही करणार नाहीत आणि कांही झालंच तर तूं आहेसच की." मी त्याला दिलासा दिला. तेंव्हा स्वारी आंत दाखल झाली.
 " मरहब्बा या हबीबी "  म्हणत कादरखानाने पुढे होत  आमचे हात हातांत घेत स्वागत केले. त्यांच्या रिवाजाप्रमाणे त्याने मला आलिंगनही दिले. एरवी मळकट दिसणारे पठाण स्वच्छ आणि स्वच्छ कपड्यात दिसत होते. सगळ्याच पठाणांना ही दावतची कल्पना पसंत पडलेली नसावी.
तशी वसती बरीच मोठी होती पण आमच्या साईटवर दिसणारे सगळेच तिथे दिसत नव्हते. तरी साईटवर दिअसणारे दहा अकरा चेहरे होतेच. त्यांत नुरुलखान, मोईन खान होता. बाकी खानांचीही ओळख करून देण्यात आली. सर्वांनी हस्तांदोलनाने स्वागत केले.

'आव्हान'

दिनांक २७ फेब्रुवारी, महान क्रांतिकारक हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांचा हौतात्म्यदिन आणि महान क्रांतिकवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन.

वयाच्या १४व्या वर्षी 'वंदे मातरम' च्या जयघोषाखातर १५ आसूडांची शिक्षा प्रत्येक फटक्यागणीक 'वंदे मातरम' चा उदघोष करीत सहजपणे भोगणारे आझाद पुढे आयुष्यभर इंग्रज सरकारला आव्हान देत जगले आणि आव्हान देत धारातिर्थी पडले. स्वातंत्र्याचे वेड लागलेल्या आझादांनी आपण व आपले सहकारी यांची शक्ति किती, आपल्याकडे साधने किती, आपल्याला मान्यता किती याचा विचार कधी केलाच नाही. ते जगले ते एका आदर्श सेनापतीसारखे आणि मेले तेही एका सेना धुरंधरासारखे. आल्फ्रेड पार्क मध्ये शेकडो पोलिसांशी तब्बल २२ मिनिटे एकट्याने झुंज देत आझाद धारातिर्थी पडले. मृत्युनंतरही त्यांचा दरारा कायम होता, त्यांच्या मृतदेहाजवळ जायची हिंमत त्या फौजफाट्यात नव्हती. बराच वेळ शांततेत गेल्यावर देखिल हा योद्धा खराच गतप्राण झाला आहे की आपल्याला बेसावध ठेवून अचानक गारद कराण्यासाठी मेल्याचे नाटक करीत हे पोलिसांना समजायला वाव नव्हता. अखेर काही शिपायांना जरा जवळून गोळ्या झाडायला सांगीतल्या व  संपूर्ण खात्री झाल्यावर मगच पोलिस अधिकारी त्यांच्या देहाजवळ गेले. जांभळाच्या झाडाच्या बुंध्याला टेकून पाय पसरून बसलेल्या अवस्थेत आझादांचा मृतदेह विसावलेला होता. एका हातात स्वत:च्ये आयुष्य अखेरच्या काडतुसाने संपवत त्यांना इच्छामरण देणारे त्यांचे इमानी माउजर होते व दुसऱ्या हातात आपल्या मातृभूमितील मूठभर माती होती. एका वज्रनिश्चयि व ध्येयबद्ध सैनिकाचा मृत्यु कसा असावा याचा आदर्श हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांनी घालून दिला. त्यांच्या मृतदेहावर इंग्रजांनी झाडलेल्या गोळ्या ही जणु त्यांना दिलेली मनवंदनाच होती.

त्याच दिवशी क्रांतिकवी कुसुमाग्रज बरोबर १९ वे वर्ष संपवून वयच्या विशीत पदार्पण करीत होते; दिनांक २७ फेब्रुवारी १९३१. कदाचित 'अग्निसंप्रदायी कवी' ची बीजे या घटनांतुनच अंकुरली असावीत. ऐन विशीत हुतात्मा आझाद, हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा जतिनदास, हुतात्मा महावीरसिंग या व अशा अनेक तेजस्वी हुतात्म्यांचे बेभान हौतात्म्य पाहणाऱ्या कुसुमाग्रजांच्या लेखणीतून अजरामर क्रांतिकाव्ये साकारली. पैकी १९३८ च्या जुलै महिन्यात लिहिलेली 'आव्हान' ही कवीता निश्चितच हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्या हौतात्म्याने स्फुरलेली असावी (आझादांचा जन्म जुलै महिन्यातलाच). हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्या ७६ व्या हौतात्म्यदिनी त्यांच्या गौरवार्थ क्रांतिकवी कुसुमाग्रजांनी लिहिलेले हे शब्द

'आव्हान'

बलवन्ता, आव्हान
बलीचे बलवन्ता, आव्हान
असेच चालूदे चहुंकडुनी अखंड शरसंधान!

रक्ताने न्हाली
तनू ही रक्ताने न्हाली
आणि चाळणी जरी छातिची पिंजुनिया झाली!

काळजात उठती
कळा जरि काळजात उठती
बळी गिळाया घार-गिधाडे घोटाळत वरती!

लवहि न आशंका
परंतू लवहि न आशंका
समर पुकारित राहिल नित हा रणशाली डंका!

मराठी चित्रपटांच्या पाककृति

कौटुंबिक सामाजिक चित्रपट (शहरी) प्रकार १

साहित्य: बऱ्यापैकी दिसणारी आंबूस चेहेऱ्याची नायिका एक नग (तोंड आंबवण्याची कृती पुढे दिली आहे), माठ नायक एक नग, खाष्ट सासू एक नग, भांडाळ नणंद एक नग,रिकामटेकडा दिर एक नग,  सासरा (सज्जन व निरुपद्रवी)एक नग, कुचकट बोलणाऱ्या शेजारणी (संख्या निर्मात्याच्या ऐपतीनुसार), प्रेमळ व कष्टाळू नोकरमंडळी एक जोडी (फक्त चित्रपटातच मिळतात), नायिकेचे वडील एक नग (सरळ मार्गी व गरीबीतले)
मसाला: नवऱ्याचे प्रकरण ( समजून चालायचे - पात्राची गरज नाही), नणंदेला भरपूर वेळ, सासू-नणंद यांची कारस्थाने, दीराचा चालूपणा, नोकर असतानाही सर्व कामे सूनबा‌इला, सूनेला अपत्य योग नसणे, सूनेच्या वडीलांचा अपमान; त्यांच्यावर चोरीचा आळ वगरे वगरे.
सजावटीसाठी: मंगळागौर, भोंडला, दिवाळसण वा एखाद्या प्रसिद्ध देवस्थानाचे दर्शन या पैकी कोणतेही एक.
नायिकेचे तोंड आंबवण्याची कृती: एखादी बरी (फक्त बरीच, त्यापलिकडे नाही) अभिनेत्री घ्यावी, तिला भूमिका नीट समजावून सांगावी - म्हणजे तिला फारसा नटा-मुरडायला वा बरे कपडे (फुकटचे) घालायला वाव नसणे, चटपटीत संवाद तोंडी नसणे हे सविस्तर समजावावे, वर असेही स्पष्ट करावे ही या कामासाठी कुणीही बिनीची अभिनेत्री (खास करून हिंदीत जाण्याचे स्वप्न बाळगणारी) तयार नसल्याने तीला ही भूमिका देण्यात येत आहे. यामुळे फक्कड विरजण लागायला सुरुवात होते. या सर्वाच्या जोडीला हा (भिकार) चित्रपट कितपत चालेल याची शंका आणि चुकुन चाललाच तर निर्माता पैसे बुडवण्याची दाट शक्यता यामुळे मस्त पैकी तोंड आंबते.

मराठी राजभाषा दिनाच्या हर्दिक शुभेच्छा !

नमस्कार,

                  २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ साहित्यिक वि.वा शिरवाडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा दिन  साजरा होतो. सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हर्दिक शुभेच्छा

नामाख्यान

"कालच्या पार्टीला हरीनं नेसलेली साडी किती सुंदर होती नाही का?"
"दुर्गानं दाढी काढून टाकायला नको होती. चांगली शोभून दिसत होती!"
अशा अर्थाची वाक्यं ओरिसा मध्ये तुमच्या कानावर पडतील. तुमच्या मनात काही तरी वेडेवाकडे  विचार येण्याच्या आत मला याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. तर ते असं की ज्या व्यक्तीचा हरी असा उल्लेख केला आहे ती मुलगी आहे आणि ज्या व्यक्तीचा दुर्गा असा उल्लेख केला आहे तो मुलगा आहे! 

लाल पराठे

वाढणी
४ जणांकरिता

पाककृतीला लागणारा वेळ
45

जिन्नस

  • १ बीट, १ मुळा, ४ वाट्या कणिक , १/४ प्रत्येकी डाळीच पीठ व तांदळाची
  • पीठी, १ चमचा प्रत्येकी तीळ व ओवा, थोडीशी हळद, १/२ वाटी दही,
  • चवीनुसार मीठ व तिखट, २ चमचे तेल मोहनासाठी व पराठयाला वरून लावण्यासाठी आपल्या आवडीनुसार

मार्गदर्शन
मुळा व बीट किसून घ्यावे.  एका पातेल्यात दोन्ही  किस एकत्र २-३ मिनिटं वाफवून घ्यावे.एका परातीत वरील सर्व जिन्नस एकत्र करून घट्ट कणिक भिजवून घ्यावी. १० मिनिटे कणिक मुरल्यावर नेहमी प्रमाणे पराठे करावे.

भात आणि बिर्याणी

भात या खाद्यप्रकाराचे का कुणास ठाऊक, ऐदीपणाशी एक नाते जोडले आहे. 'गरमगरम तूपभात खाऊन...' च्या समोर 'झोपणे' हेच क्रियापद आपसूकपणे येते! 'चांगला रबरबीत कालवलेला दहीभात खाऊन तो रणरणत्या उन्हात सायकल हाणीत कामावर गेला' हे वाक्य काही केल्या मनाला पटत नाही.भातासारख्या अद्वितीय खाद्यप्रकारावर हा जरासा अन्यायच आहे असे म्हणवे लागेल. भाताचा आजारपणाशीही असाच एक अनाकलनीय  संबंध जोडला गेला आहे. 'जराशी कणकण वाटत होती, म्हणून वरणभात खाऊन गुरगुटून झोपलो...' असे सांगणाऱ्याला 'मित्रा, अरे कणकण यायची वाट कशाला बघतोस?  बरं वाटत असतानाही कधीकधी वरणभात खाऊन गुरगुटून झोपत जा...' असं सांगावसं वाटतं! 'मला भात आवडत नाही' असे सांगणाऱ्यांकडे मी केवळ दयार्द्र करुणाकटाक्ष टाकतो!

  भात! नुसता उकडलेला तांदूळ, पण स्थळकाळ पाहून कसे फुलावे , ते माणसाने त्याच्याकडून शिकावे! सभ्य, समारंभी जेवणात तो पांढराशुभ्र कुडता घालून, वरणाचा पिवळाधमक फेटा नेसून कपाळाला उभे गंध लावून येतो. नारळीपौर्णिमेला तो ताज्या नारळाच्या किसाच्या जोडीने बहिणीच्या आग्रहाच्या ताटातून येतो.नारळीभात खाणे गावंढळपणाचे वाटते म्हणून लोक हल्ली साखरभात खातात. साखरभाताचे पेशवाई महत्त्व सोडले तर तो त्याच्या आकर्षक रंगामुळे आणि त्यातल्या लवंग- काजूंमुळेच अधिक ध्यानात रहातो. पण नारळीभाताला कसे 'कॅरॅक्टर' आहे! बाकी एक खरे, एखाद्या कसलेल्या गवयाचे गायन जसे साथीला तितकेच तयार तबलजी असताना अधिक खुलते तशी या नारळीभाताची  खरी लज्जत त्यावर सढळ हाताने सोडलेल्या साजूक तुपाच्या चमचमच्यांबरोबर खुलत जाते! 'कोलेस्टेरॉल' हा शब्ददेखील विसरायची तयारी असेल तरच या वाटेने जावे. दाक्षिणात्य सांबारभाताचे गोळे रिचवणाऱ्या मद्रदेशीयाचे चित्र काही फारसे लक्षात ठेवावे असे नसते, पण काजूची फोडणी घेऊन  सकाळीसकाळीच  भेटायला येणाऱ्या पोंगलने जिभेचे जीवन धन्य होते.सुब्बालक्ष्मीचे वेंकटेशस्तोत्र लागले की हाच भात बिचारा डाळींच्या आणि कढीलिंबाच्या गराड्यात ’बिशीबेळी भाता’ होऊन सतरंज्या उचलायला लागतो. त्यापेक्षा काळा मसाला घालून केलेला कोल्हापूर सांगलीकडचा 'काळा भात' कधीही सरस. त्यातच तोंडली, छोटी छोटी वांगी किंवा दोडक्याचे छोटे काप घालून केलेले प्रकारही अप्रतिम.

'दही भात' हा लहानपणी जसा खाल्ला तसा परत कधीच खायला मिळाला नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस असायचे, आते-मामे भावंडं रहायला आलेली असायची. 'कारट्यानो, उन्हात वर वर हिंडू नका. कुठं नाही बाहेर जायचं आता...' असा दम देऊन पोरांना दडपून झोपवलं जायचं . चार वाजता वडीलांनी माडीच्या पत्र्यावर टाकलेल्या चुळीचा  आवाज यायचा. सताड जागीच असलेली मुलं उठून बसायची. दुपारचा चहा ही फक्त मोठ्या माणसांची चैन असायची. मुलांसाठी सकाळचा उरलेला भात कालवला जायचा. खापरीसारखी साय धरलेलं म्हशीचं दूध, कवडीदार दही आणि अगदी होय की नाही इतके मीठ असं सगळं घालून आई किंवा आत्या भात कालवायच्या. ताटल्या भरल्या जायच्या. भरड भरड कुटलेल्या शेंगदाण्याच्या चटणीची - आम्ही त्याला 'शेंगदाण्याचं तिखट' म्हणत असू- त्या पांढऱ्याशुभ्र भातावर पेरणी व्हायची. बघता बघता ताटल्या रिकाम्या व्हायच्या. ताटलीत शेवटचे बोट फिरवून ते जिभेने चाटले, की हात धुवून चला क्रिकेट खेळायला! दही भात हा असा कुळाचार पाळून करावयाचा प्रकार आहे. स्टेनलेस स्टीलच्या चमच्याने काचेच्या 'बाऊल' मध्ये दहीभात कालवणारे काय, आमटीतल्या शेवग्याच्या शेंगा सुरी आणि काटेचमच्याने देखील  खातील! लहानपणी खाल्लेला हा दही भात आजही माझ्या स्वप्नात येतो.

भाताची 'पुणेरी मसालेभात' नावाची एक झक्क फसवाफसवी आहे. 'कोबी भात'. 'पनीर भात. 'मोती पुलाव' हे एखाद्या संमेलनाच्या मेनूत शोभून दिसणारे प्रकार, पण त्यांना काही खानदान नाही. भातात अस्सल राजघराणे बिर्याणीचे. चारमिनारची किंवा हजरतगंजची वाट असावी, हवेत बेगम अख्तरच्या गजलेचे स्वर असावेत, कुठेतरी हुक्क्याचा सुगंध दरवळत असावा, शायरीच्या किताबाची काही पाने फडफडावीत, एखादा जाम किणकिणावा आणि मेंदीने रंगलेल्या दाढीवाल्या उस्तादांनी आपल्या बुजुर्ग हातानी बिरयानी पेश करावी! शाकाहार, आरोग्य, हिंदू संस्कृती आणि मुगल साम्राज्य अशा शेंड्या धारण करणारे उग्र आठ्याळ पंचेधारी आचार्य पंचक्रोशीतही नसावेत. ‘गोश्त’ म्हणायला जुबान चाचरावी अशा त्या चावलबरोबर हमसफर झालेल्या अन्नब्रम्हाने घासाघासाला जन्नतची याद द्यावी. तुपात तळलेल्या कांद्याने केलेली कुरकूरही कानाला तंबोऱ्याच्या सुराइतकी गोड लागावी. एखाद्या राजपुत्रासारख्या भेटीस आलेल्या खानदानी आख्ख्या काजूने अदब वाढवावी. मधूनच झणझणणाऱ्या मसाल्याने तोंड, नाक, कान व डोळे यांचे अद्वैत सिद्ध करावे. ‘कबाब गर्म हैं जनाब, शौक फरमायेंगे?’ अशी विचारणा व्हावी . कुठे शौकीनांनी दिलेल्या ‘वक्कटे तीस्कोंडी’ च्या फरमायशीने वातावरणातली जान वाढवावी. ‘आता पुरे’ असा शरीराने आणि मनाने खुषीचा इषारा द्यावा. नरम जिभेच्या लोकांनी मीठी लस्सी मागवावी आणि मर्दांनी जर्द्याचे खुशबोदार पान! 
‘मानवी जीवन धन्य झाले….’ म्हणून जगाला दुवा देत बाहेर पडावे!