भगवद्गीता अर्थ

नमस्कार.


भगवद्गीतेतील श्लोक आणि त्यांचा अर्थ वाचताना निरनिराळ्या प्रकाशकांच्या पुस्तकांत निरनिराळे अर्थ वाचावयास मिळाले.


भगवद्गीतेच्या १० व्या अध्यायातील ३७ वा श्लोक, " वृष्णीनां वासुदेवः अस्मि--" ( मी संधी सोडवला आहे ) असा आहे. त्याचा अर्थ, सार्थ श्रीमद्भगवद्गीता, जयहिंद प्रकाशनमध्ये, "यादवांमध्ये वासुदेव मी " असा आहे. तसेच, प्रणवगीताई या पुस्तकात या श्लोकाचा अर्थ "वृष्णीवंशीयातील यादवांमध्ये वासुदेव मी आहे " असा आहे.

कांदा उत्तप्पा

वाढणी
२ जण

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • तांदुळ २ वाट्या (लाँग ग्रेन राईस)
  • उडीद डाळ अर्धी वाटी
  • अर्धा मोठा कांदा
  • चिरलेली कोथिंबीर १ वाटी
  • तिखट हिरव्या मिरच्या ३-४
  • चवीपुरते मीठ, व तेल

मार्गदर्शन

 

मिसी रोटी.

वाढणी
२-३ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • कणिक १ कप
  • बेसन - १ कप
  • रवा १/२ वाटी.
  • मीठ, कोथिंबीर, तेल
  • आलं, लसूण, मिरची वाटून.
  • तूर डाळ १/२ वाटी भिजवून भरड वाटून. (हवी असल्यास)

मार्गदर्शन

वरील सर्व पदार्थ एकत्र करून , त्यात लागेल तेवढे पाणी घालून घट्ट भिजवून घ्यावे. साधारण अर्धा तास हे मळलेले पीठ झाकून ठेवावे.

शब्द साधना - ५.


  1. सध्याचे जग ग्लॅमर वर काम करते.
  2. सध्या मला विकनेस जाणवत आहे.
  3. आजच्या पिढीचे रोल मॉडेल विचारू नका?
  4. तुझा फिल कसा आहे? किंवा सध्या फिल गुड अशी भावना नोकरदार लोकात दिसते.

नमस्ते सद्दाम हुसेन

२००२-२००३ या वर्षांत तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक इराकच्या दौऱ्यावर असतांना इराकचे राष्ट्रप्रमुख सद्दाम हुसेन यांनी रामनाईकांच्या 'नमस्ते'ला प्रतिसाद म्हणून हिंदू पद्धतीने हात जोडून अभिवादन केले. त्यावेळच्या प्रमुख वृत्तपत्रांत ही बातमी सद्दाम हुसेन यांना हात जोडलेल्या अवस्थेंत दाखवणाऱ्या फोटोसहित प्रसिद्ध झाली होती. यांतून सद्दाम हुसेन यांनी भेटायला आलेल्या व्यक्तीच्या संस्कृतीबद्दल आपल्याला आदर आहे हे व्यक्त केले. तसे करण्यांत त्यांना कमीपणा वाटला नाही की आपण धर्माज्ञेचे उल्लंघन करीत आहोत असेही वाटले नाही. इतर बिगर- हिंदू राष्ट्रप्रमुखाने सद्दाम हुसेनप्रमाणे केले असते की नाही सांगता येत नाही. मात्र, पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख तसे कधीही करणार नाहीत हे नक्की. 

ह्रदयाने विचार करणारा माणूस. . ३ (अंतिम)

काही वर्षापासून गुरुजी दत्तजयंतीला जालन्याजवळ अंबड नावाच्या एका गावी नेमाने जात असत. तिथे अण्णासाहेब जळगांवकर म्हणून एका गृहस्थांच्याकडे तीन दिवसांचा संगीत महोत्सव असे. दत्तजयंतीच्या आदल्या तीन दिवस रात्री या जळगांवकरांच्यावतीने याचे आयोजन केले जाते, गेल्या सुमारे 75-80 वर्षापासून. यांच्या संपर्कात गुरुजी केव्हातरी आले व नेमस्तपणे तेथे हजेरी लावू लागले. मी त्यांच्याबरोबर एकदा तिथे गेलोही होतो. त्यानंतर दोन एक वर्षानंतर त्याला जोडूनच आदल्या रात्री उदगीर जवळ एका गावी एक कार्यक्रम ठरला. तेव्हा आम्ही दोघांनी जायचे ठरविले. प्रथम उदगीर नंतर दुसऱ्या रात्री अंबड व तिसऱ्या संध्याकाळी औरंगाबाद आकाशवाणीतर्फे कार्यक्रम असे ठरले. त्यानुसार आम्ही पुण्याहून एका रात्री कुच केले. बसने. ती मराठवाड्यात नेणारी खासगी बस, तेव्हा रात्रभर जागून आम्ही पहाटे केव्हातरी एका हायवेवरच्याच छोट्या गावी उतरलो. खेड्यातलेच हॉटेल - ते इतके घाणेरडे होते की आम्ही आता झोप वगैरे जाऊ दे म्हणून समोर एका धाब्यावर चहा वगैरे घेत बसलो. काही वेळाने आम्हाला पं. शौनक अभिषेकी व पं. अतुल उपाध्ये पण सामील झाले. मग दिवसभर गप्पाटप्पांतच वेळ घालविला. संध्याकाळी हॉटेलवाल्याशी भांडून  या तिघांसाठीतरी किमान एकेक गरम बादली पाण्याची मी सोय केली. त्यानंतर एका मोडक्या टेम्पोतून बसून खाचखळग्यातून आम्ही त्या गावी पोहोचलो. हा कार्यक्रम एका धार्मिक सोहळ्याला चिकटविलेला होता. रात्री उशीरा, सुमारे दोन अडीच हजार जनसमुदायासमोर - ज्यातले आमच्यासकट केवळ पंचवीस-तीस लोक (बहुधा इलाज नसल्याने) जागे असावेत, तिथे या तिघांचे गाणे बजावणे झाले. मी आता मात्र वैतागलोच होतो कारण हा कार्यक्रम त्यांनी व बहुधा सर्वांनीच केवळ एका ओळखीच्या माणसाचा आदर ठेवण्यासाठीच स्वीकारला होता असे वाटते. तर शेवटी पुन्हा त्या टेम्पोतून सकाळी आम्ही उदगीरला परतलो. मग शासनाच्या सात वाजताच्या एस.टी. त ती सुटण्याची प्रतीक्षा करत बसलो. तेव्हा दोन दिवस अजिबात झोप झालेली नव्हतीच, तर आता आपण दुपारी दोन वाजता अंबडला पोहोचल्यावर तिथल्या डाकबंगल्यात नेहमीप्रमाणे आपली व्यवस्था केली असेल तिथे जाऊन अंघोळी करून मस्त ताणून देऊ या, गुरुजी बहुदा माझी समजून घालितं असावेत. शेवटी ही साताची एस.टी. अकराला सुटली व पार दक्षिण मराठवाडा ते उत्तर मराठवाडा धूळ चाखत आमचा प्रवास एकदाचा संध्याकाळी साडेसात वाजता संपला. आम्ही डाकबंगल्याच्या स्टॉपवरच उतरलो. आत जाताच कार्यक्रमाच्या संयोजकांनी तुमचे कुठलेही आरक्षण केलेले नाही व एकही खोली शिल्लक नाही. बहुधा, गावाकडच्या अमुक हॉटेलमध्ये केले असावे  असे आम्हाला समजले. तिथून परत सायकलरिक्शाने सामान घेऊन गावाकडे. तिथल्या हॉटेलमध्ये आमची खोली ठेवली होती. त्या खोलीत पाय ठेवताच कुबट वास व प्रचंड धूळ यांनी आमचे स्वागत झाले. किमान ताजी हवा तरी यावी म्हणून सामान तिथल्या कॉटवर ठेवून (त्यातल्या त्यांत स्वच्छ जागा तीच होती), मी खिडकी उघडली आणि पलीकडे असलेल्या शाळेच्या मुतारीची प्रचंड घाण खिडकीवाटे आत शिरली. इथेही परत थोडी भांडाभांडी करून गुरुजींसाठी एक बादलीभर पाणी मिळवले. व इतर काही शक्य नसल्याने हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला येऊन आम्ही दोघे बसलो. तेवढ्यांत संयोजकांचे तरुण व उत्साही स्वयंसेवक लगबगीने आले. खॉसाहेब आलात का? छान! या वेळेस या हॉटेलवाल्याने दोन दिवस हॉटेलच्या वतीने खोली देतो, असे सांगितल्याने डाकबंगल्याऐवजी इथे व्यवस्था केली. तेवढेच साठ रु. वाचले, आपल्याला माहीतच आहे की हे आयोजन अत्यंत थोड्या बजेटमध्ये चालते. तर तुम्ही आराम करा - आम्ही जरा औरंगाबादला जाऊन येतो. ते अमुक गवई विमानाने येणार आहेत त्यांना घेण्यासाठी आम्ही जात आहोत. हे ऐकताच माझा आतापर्यंतचा संयम सुटला व मी गुरुजींना बोलायला लागलो की पाहा तुम्हीच स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे - तुमच्यासाठी यांना साधी डाकबंगल्याची व्यवस्था करता येत नाही पण कुणासाठी तरी हे गाडी घेऊन शंभर की.मी. जाणार आहेत आणि परत त्यांना मात्र विमानाचे तिकीट वगैरे.. मी उपहासगर्भपणे तिरकसपणा चालू केला. यावर आनंद, अरे हे त्या अण्णांना फारसे माहीत नसणार - ते कोणकोणत्या गोष्टीत लक्ष घालणार म्हणून त्यांनी माझी समजूत घालण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
शेवटी रात्री तीन वाजता आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. सुमारे पाच-सहाशे माणसांनी गुरुजी पोहोचताच टाळ्यांच्या कडकडांटात स्वागत केले. व त्यानंतर अजून थोडे करता करता, गुरुजींची तासाची हजेरी सुमारे अडीच तास रंगली.  उत्स्फूर्त दाद व अत्यंत रसिक श्रोतावर्ग, गुरुजींचे वाजविणे जे खुलले.. मी अवाक्‌च झालो. जो माणूस गेल्या दोन रात्री झोपला नव्हता, दिवसाही नुसता प्रवास - त्यांतच संयोजकाकडून झालेली प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मानहानी याचा कुठलाही मागमूगसही नव्हता. कार्यक्रमानंतर तृप्तीने व मिश्कीलपणाने माझ्याकडे त्यांनी पाहिले. त्या नजरेतून त्यांना बरेच काही सांगायचे होते. काही वेळाने अण्णांचा निरोप घ्यायला आम्ही गेलो की औरंगाबादला कार्यक्रम आहे लवकर जायला पाहिजे वगैरे. तर शिरस्त्याप्रमाणे पिठलभात खाऊन निघण्याचा आग्रह झाला. तेवढ्यांत तिथे डागरसाहेबही होते ते म्हणाले की आपण बरोबरच जाऊ या, म्हणून मग आम्ही थांबलो.

ह्रदयाने विचार करणारा माणूस. . .२

आज मी ब्रह्म पाहिले ... हे काही वेगळे असेल का? या ही दिवसांत, अशा पद्धतीने जगणारी माणसे आहेत? .. पाटी कोरी होण्यास सुरुवात झाल्याने,  आयुष्यातल्या खऱ्या शिक्षणाला मघाशीच सुरुवात झाली होती.


'दैव देते पण कर्म नेते' हा वाक्प्रचार बहुधा कोकणस्थांमुळेच मराठी भाषेला बहाल झाला असावा. म्हणजे बघा ना! कोंकणात वस्ती, जिथे मागच्या वाडीत धोतरे वाळत घातली तरी भरतीनंतर काही मासे त्यांत अडकतील - व दारात नारळ, पण आम्ही मासे खाणार नाही.. अर्धपोटी राहिलो तरी बेहत्तर, हा बाणा माझ्या माहितीनुसार जगांत समुद्रकिनारी पिढ्यानपिढ्या वस्ती केलेल्या ह्या एकमेव जातीनेच बाळगला असावा. तर वाण नाही पण गुण असल्याने, माझेही नोकरी-व्यवसाय-संसार, म्हणजे जिवंत राहण्याचा - जगण्याच्या नव्हे - रहाटगाडग्यात गुंतून काही वर्षे -वाचन, संगीत शिक्षण वगैरे जगण्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. पण सुमारे एका तपानंतर आपण फक्त जगांत राहत आहोत, जगणे कुठल्याकुठे गेले आहे, हे उमजू लागले. आपण अजाण ही जाण येण्यासाठीही तप लागतेच. तेव्हा ताबडतोब जाऊन पुन्हा गुरुचे पाय धरले. तो खरा गुरुच, ""मध्ये खंड पडल्याने विस्मरण झाले होते, पण हरकत नाही पुन्हा सुरुवात करा, कुठल्याही गोष्टीला वेळ यावीच लागते'' इतके बोलून आमच्या सहवासाच्या पुढील पानाला सुरुवात झाली.

खरंच.......मराठी पाऊल पडती पुढे???????

मुंबई,मराठी माणूस आणि मराठी भाषा हे तीन विषय किती संवेदनशिल आहेत,हे सगळ्यात चांगल कोणाला माहित आहेत? याच उत्तर आहे,"सामान्य मुंबईकर".


पण....


पहाटे उठल्यावर आपण 'जागरण'मध्ये कबिराचे दोहे, मीरेची भजने आणि पंकज उधासची भक्तिगीते ऐकतो, नंतर ब्रेकफास्ट घेताना टाइम्स वाचतो. रिक्षावाल्याला 'अंधेरी वेस्ट को चलो'ची आज्ञा फर्मावतो, नंतर तिकिटाच्या खिडकीत डोके खुपसून 'चर्चगेट रिटर्न' मागतो. ट्रेनमध्ये शेजारच्या प्रवाशाशी 'आज स्टॉक कितना उपर जायेगा?' याची चर्चा करतो. ऑफिसात बॉस आणि सहकाऱ्यांबरोबर फर्मास इंग्रजीत व्यवहार करतो. लंच अवरमध्ये फिल्म फेअर किंवा मिरर वाचतो. बेस्टच्या कंडक्टरशीही न चुकता हिंदीतच बोलतो. संध्याकाळी मुलाचा होमवर्क तपासतो आणि नंतर साँस आणि बहूच्या सिरियल्स बघत झोपी जातो. खरच आपण असे का वागतो बरे,कधी विचार केलाय याचा??

नववर्षाचा निर्धार

अन्यायाची चीड येणे हा एक चांगला गुण आहे. दुष्कृत्यांविषयी मनात येणारा संताप अभिव्यक्तीमधून व्यक्त होणे साहजिक आहे. अनेक निरागस बालकांची निर्घृण हत्या करणाऱ्या नोइडामधील नरपिशाचाबद्दल वाटणारी घृणा, असे नरपशु आपल्याच देशात कां निपजावेत असा त्रागा यापासून ते हातात कीबोर्ड मिळाला आहे म्हणून तो मनसोक्त बडवून लेखनप्रदूषण करणाऱ्या चिल्लर लेखकूंविरुद्ध तक्रार आणि  मराठी मायबोली पायदळी तुडवली जात असल्याचा कांगावा इथपर्यंत अनेक प्रकारची गाऱ्हाणी वाचनात येतात.

भाजणी

वाढणी
गैरलागू

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • ४ वाट्या बाजरी,२ वाट्या ज्वारी,१ वाटी उडदाची डाळ,१ वाटी हरबरा डाळ
  • १/२ वाटी गहू,१/२ वाटी तांदूळ,१/२ वाटी धने,२ चमचे जिरे

मार्गदर्शन

वरील सर्व धान्ये वेगवेगळी भाजून घ्या,धने व जिरे ही भाजून घ्या.एकत्र करून भरड दळून आणा.

धान्यांच्या प्रमाणात कमीजास्त करण्यास हरकत नाही.