शेंगदाण्याची खमंग चटणी

वाढणी
घरातल्या सगळ्यांसाठी..

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • शेंगदाणे १ कप
  • सुक्या लाल मिरच्या - ५-६
  • कढीपत्त्याची पाने - कपभर
  • मीठ, साखर चवीप्रमाणे.
  • तेल.

मार्गदर्शन

एका जाड बुडाच्या कढईत तेल घालावे. तेल तापले की त्यावर शेंगदाणे, कढीपत्त्याची पाने, आणि लाल मिरच्या हे सगळे वेगवेगळे परतून घ्यावे. दाणे आणि मिरच्या करपवू नयेत. त्यानंतर हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घालून थोडे भरड वाटून घ्यावे. वाटताना त्यात चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालावी. खूप साखर घालू नये.

एक ट्रॅफ़िक जाम विकत घेतला......!!!- १

हि कथा मी ११-१२ वर्षाची असताना, टी.व्ही वरील एक मालिकेमध्ये पाहिली होती. खूप आवडली होती मला ती. आता ती पूर्ण आठवत नाही, फक्त कथेचा मुद्दा आठवतो आहे. तेव्हा गाभा तोच ठेवून, थोडीफार माझी कल्पनाशक्ती वापरून हि कथा मनोगतींसमोर ठेवत आहे. आवडल्यास लेखकाला(???) श्रेय द्यावे. काही चूक झाल्यास मोठ्या मनाने पोटात घ्यावी. कथेची रंगत वाढविण्यासाठी काही इंग्रजी शब्दांचा वापर करत आहे.

मायमराठी : शर्थी आणि अटी

उम.टा. त बातमी आणि सकाळमध्ये अग्रलेख. हा अग्रलेख इतक्या प्रभावी भाषेत लिहिला आहे की त्याहून अधिक टिप्पणीची गरज नाही. लक्षात घेऊन चर्चा करण्यासारख्या वाटलेल्या मुद्द्यांना मी येथे अधोरेखित केलेले आहे.


सकाळचा अग्रलेख : मायमराठी : शर्थी आणि अटी
दि. १६ डिसेंबर २००६

सर्वच शाळा गिरवणार मराठीचे धडे!

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये ही एक चांगली बातमी वाचायला मिळाली.:


म.टा.तील मूळ बातमी : सर्वच शाळा गिरवणार मराठीचे धडे!
शुक्रवार दि. १५ डिसेंबर २००६


' सीबीएसई ' आणि ' आयसीएसई ' बोर्डांना सरकार देणार आदेश

शब्द साधना - ४.


  1. लाईफ स्टाइल बदलत चालली आहे.
  2. सध्या ट्रेंड काय आहे?
  3. तुला कशात करियर करायचे आहे?
  4. ट्रॅडिशन प्रमाणे काय करणार आहे?
  5. या टिप्स वाचून ठेव.

नवसाहित्याचा कालखंड

नमस्कार,
परवाच 'नक्षत्रांचे देणे- कवी मंगेश पाडगावकर' ही तबकडी पाहत होतो.
त्यामध्ये, श्री. शंकर वैद्य म्हणतात की, '५०-५५ चा कालखंड हा नवसाहित्याचा कालखंड म्हणून ओळखला जातो. पिपात मेले ओल्या उंदीर, सहनौ टरकतो सर्वे जंतू निराशयः अशा तऱ्हेच्या कविता या कालखंडात झाल्या.... '

साबणगाथा

विविध उपग्रह वाहिन्यांवर चाललेल्या साबणगाथा (सोप-ऑपेरा) पाहिल्या की उपग्रह हा आपल्या पत्रिकेत शनी-मंगळ वा राहू-केतू आदी बलाढ्य ग्रहांपेक्षाही अधिक पीडक आहे हे पटायला प्रत्यवाय नसावा. पत्रिकेत सगळे ग्रह एकमेकांना “पाहतात” असे ऐकून आहे. उपग्रहाची वक्रदृष्टी हाही त्यातलाच प्रकार असावा. असोत बापडा. इंग्रजीत एक वचन आहे - “जर तुम्ही त्यांचा पराभव करू शकत नसाल तर त्यांना सामील व्हा!” याच अनुषंगाने साबणगाथा कशी बनवता येईल यावर खल करू लागलो. त्या लिहिणा-या नामवंत लेखक-लेखिकांच्या मुलाखती घेतल्या. येथे नामवंत या शब्दातील नाम हे राष्ट्रभाषेतून घेतले आहे. त्यांत एक म्हण आहे, “बदनाम हुएँ तो क्या हुआ, बदनाम हुएँ, पर नाम तो हुआ ।” यच्चयावत सगळ्या शायरांना आडवे पाडील अशा त्या वचनातील नाम ध्यानात ठेवले म्हणजे साबणगाथांचा उगम निराळा शोधायला नको.

अनंत-३

अनंत या संकल्पनेचे दोन कवडसे आपण या आधी पाहिले आहेत. आज अजून एक कवडसा शोधण्याचा विचार मनात आला. तत्काळ दोन प्रश्न उपस्थित झाले.


१. अनंत या तत्त्वाचे किती प्रकार असतील?
२. ह्या प्रकारांची संख्या अनंत असेल का?


यावर अनुमान लावण्यासाठी संख्यांना पाचारण केले. सगळ्या सम संख्यांनी (२,४,६,८…) दरबारी कानडा आळवायला सुरुवात केली. लगेचच सगळ्या विषम संख्याही (१, ३,६,९,…) जोडीला सुर धरून नाचू लागल्या. त्यांच्या नृत्यात त्या संख्या निरनिराळ्या चमू बनवीत होत्या. चमूंचे समूहनृत्य सुरू झाले. नवीन चमू बनत होत्या आणि जुन्या विसर्जित होत्या. प्रथम सगळ्या वर्ग संख्यांची चमू आली (१, ४, ९, १६, २५, ३६…). निमिषार्धातच ती विसर्जित होऊन घन संख्यांची चमू बनली (१, ८, २७, ६४, १२५…). क्रमशः चमूंचे वैविध्य वाढत गेले. हा सगळा प्रकार इतका आकस्मिक होता की सगळ्या संख्यांना हे नृत्यगान आवरण्याची विनंती केली.

अनंत-२

अंत नसलेला तो अनंत! अंत म्हणजे काय? दुःखाचा अंत कशास म्हणावे? अधिक विचार करता असे जाणवते की अंत म्हणजे वस्तुतः बदल होय. दुःखदायक परिस्थिती बदलून जी दुःखविरहित परिस्थिती निर्माण होते तिलाच आपण दुःखाचा अंत मानतो. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव आहे. जग या शब्दाची व्याख्याच “जनयति गमयति” आहे. जनयति म्हणजे निर्माण होणारे आणि गमयति म्हणजे नाश पावणारे. थोडक्यात आरंभ तेथे अंत हा जगाचा सिद्धांत आहे.

बेल्जियम कहाणी - ६

     खरे तर हा भाग फ़्रान्स मधिल आहे आणि यात पहिल्या गोष्टींशी फ़ार संबंध नाही, पण तरी  संदर्भ असावा म्हणून याच सदरात लिहीत आहे. २५ नोव्हेंबर ला मी बेल्जियम मधे तीन महिने पूर्ण केले. त्याच दिवसाबद्दल....