डॉ. विद्याधर ओक यांचे संशोधन: २२ श्रुतींचे मेलोडियम - ठाणे येथील कार्यक्रम आणि प्राथमिक आढावा

दि. १७ डिसेंबर २००६ रोजी सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे येथे एक संगीतविषयक पण नेहमीपेक्षा वेगळा कार्यक्रम झाला त्याची व त्या विषयाची थोडी माहिती येथे देत आहे.
हा लेख या विषयावरील प्राथमिक स्वरूपाचा लेख आहे. शक्य झाल्यास आणखी लिहिण्याचा विचार आहे.

पार्श्वभूमी
सुमारे महिन्या-दीड महिन्यापूर्वी सकाळी-सकाळी घाईच्या वेळी आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरचा एक कार्यक्रम ओझरता कानी पडला. डॉ. विद्याधर ओक यांचे २२ श्रुतीविषयक संशोधन व त्यांनी स्वत: निर्मिलेले वाद्य मेलोडियम आणि डॉ. गोविंद केतकर यांचे "स्वरांक" (बुद्ध्यंक असतो तसा) या नव्या संकल्पनेबद्दलचे संशोधन या दोन्हींचा थोडक्यात आढावा त्यात घेतलेला होता. हे दोन्ही विषय कोणाही संगीतप्रेमीचे कुतूहल जागृत करणारे होते.
नंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला लोकसत्तेत श्री. सदाशिव बाक्रे यांचे डॉ. ओक व त्यांचे संशोधन यावरील लेखवजा पत्र वाचनात आले त्यामुळे उत्सुकता वाढली.
या पार्श्वभूमीवर ठाणे येथील कार्यक्रमाची घोषणा ऐकली व त्याला हजर राहण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. ती सुदैवाने अंशत: का होईना सफल झाली.

एक ट्रॅफिकजाम विकत घेतला...!!! - ३ (अंत)

तो बाहेर पडणार इतक्यात डी.के. नी हाक मारली... राज एकदम थांबला आणि डी.के. काय बोलतात याची वाट पाहू लागला.


"राज, आपले ऑफिस तर ९ वाजता सुरू होते मग आता पावणे आठ वाजाता तू कुठे निघाला आहेस?" - डी.के.


"शाल्वीला एअरपोर्टवर सोडायला" - राजने डी.कें.वर बॉम्बच टाकला. सुवर्णाताईसुद्धा राजकडे विस्मयाने पाहतंच बसल्या. तो पूर्ण तयारी करून निघाला होता.. आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच असाच निर्धार करून तो बाहेर पडला होता.

काकाजी गेले

आज सकाळच्या वृत्तपत्रातील "दाजी भाटवडेकर यांचे देहावसान" ही बातमी वाचून मन सुन्न झाले. त्यांची इतर जुनी मराठी किंवा संस्कृत नाटके पहाण्याची फारशी संधी मिळाली नसली तरी 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकातील 'काकाजी'  ही एकच भूमिका त्यांचे नांव स्मरणात कायमचे कोरून ठेवण्यासाठी पुरेशी आहे.

फ्रोह वाईनाख्टन!!!

याआधी  'नाताळची चाहूल'
सारं घरदार आता नाताळसाठी सज्ज झालेलं असतं...(पुढे)


पहिला आडव्हेंट झाला की नाताळच्या मेजवान्यांची आमंत्रणं सुरू होतात. कितीतरी जण नाताळच्या बाजारात ग्लुवाईन पार्टी करतात.मित्रमंडळी आपसात नाताळचे जेवण घेतात.ऑफिसांतूनही नाताळमेजवानी आयोजित केली जाते.हा सण जर्मनीत मुख्यत्वे कुटुंबाबरोबरच साजरा करतात.आपले आईवडील आणि भावंडांबरोबरच नाताळ साजरा करण्याकडे सर्वांचा कल असतो.बाकी मित्रमंडळींबरोबर म्हणून तर पहिल्या आडव्हेंटनंतर मेजवान्या सुरू होतात.
ख्रिस उल्मला त्याचे आईवडील आणि दोघी बहिणींबरोबर नाताळ साजरा करतो,तर सुझान मानहाईम जवळच्या एका छोट्या खेड्यात आपल्या आईबाबांबरोबर असते. रोमेन आपले नव्वदीचे आजोबा आणि आईवडीलांसोबत असतो तर श्वेनिया आपली पोझिशन बाजूला ठेवून आपल्या वडलांच्या बेकरीत केक आणि बिस्किटांची पाकिटे बांधायला उभी असते.ख्रिस्टियाना आपले बाबा नाताळभेट म्हणून"तुम्ही मुले अशीच प्रगती करा हेच दरवर्षी मागतात" हे ऐकल्यावर आईबापाचे हृदय स्थल,काल,धर्म,वंशाच्या पलीकडे जाऊन सारखेच आहे हे मनात आल्याशिवाय राहत नाही.
इथे नाताळच्या पूर्वसंध्येला 'हायलिश आबेंड' म्हणजे 'पवित्र संध्याकाळ' असे संबोधतात आणि मुख्य सण त्याच दिवशी साजरा करतात आणि २५,२६ तारखेला काका,मामा,आत्या,मावशी वगैरे इतर नातेवाईकांच्या,जवळच्या मित्रांच्या भेटी घेतात.आमचे आजीआजोबा नाताळची पूर्वसंध्या इथे साजरी करतात आणि मग दुसऱ्या,तिसऱ्या दिवशी त्यांचे सगळे कुटुंबीय आजीच्या बहिणीकडे,हेडीकडे जमतात.आमची ओळख जेव्हा नवीन होती तेव्हा एकदा सहज जर्मन नाताळबद्दल विचारलं होतं, तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक नाताळ आम्ही आजीआजोबांबरोबर साजरा करतो.
संध्याकाळी ५.३०,६ च्या सुमाराला चर्च मध्ये नाताळचा पहिला मास असतो आणि दुसरा रात्री ११ ला!आमच्या घरापासून रमतगमत चालत गेले तरी १० मिनिटाच्या अंतरावर चर्च आहे पण तरीही पावणेपाचच्या सुमाराला आजी सगळ्यांना घराबाहेर काढते आणि ५ च्या सुमाराला आमची फौज तिथे हजर असते. सगळे चर्च रिकामे असले तरी तिची विशिष्ट जागा आहे तिथेच बसण्याचा तिचा कल असतो.रस्त्याने जाताना दर वेळी लहानपणी दसऱ्याला घंटाळीच्या देवळात आईबाबांबरोबर जायचे त्याची हटकून आठवण होते. चर्च मध्ये नाटकाचा पडदा वर जायची,तिसऱ्या घंटेची वाट पाहत असल्यासारखी स्थिती असते.लहान मुलं चांदण्यावाल्या चंदेरी काठ्या घेऊन उभी असतात.एक ताई त्यांना त्यांची 'एन्ट्री' समजावून देत असते,ऑर्गनवाला ऑर्गन जुळवून घेत असतो,येशूचा गोठा,मेणबत्त्या,माईक इ. गोष्टी व्यवस्थित आहेत ना हे कुणी पाहून जातो, सगळं ठीक आहे ना? हे एकदा पाद्रीबाबा पाहून जातो.आम्ही आपले त्या ठराविक जागेवर बसून ते सगळे पाहत आजीचे कुजबुजत्या आवाजातले धावते समालोचन ऐकत बसलेले असतो. हळूहळू लोक जमायला लागतात. लहान मोठे आबालवृद्ध सगळे यायला सुरुवात होते. चिमुकल्या ३,४ महिन्यांच्या बाळांनासुद्धा परड्यात घालून त्यांच्या आया घेऊन येतात. बाबागाड्यातूनही मुलांना आणतात.विशीबाविशीतली प्रेमी युगुलं येतात आणि आदल्याच दिवशी ९१ पूर्ण केलेली वेल्श आजीही असते,तर कुणी श्रावणबाळ चाकांच्या खुर्चीवरून आपल्या पित्याला घेऊन येतो.सगळे चर्च भरून जाते,लोक मग बाहेरच्या दालनातही जाऊन उभे राहतात.प्रतीक्षा असते आता येशूजन्माच्या सोहळ्याची..
वेळ झाली की फादर, त्याच्यामागे चांदण्या लावलेली चंदेरी काठ्या घेतलेली लहान मुलं आणि बाकीचा लवाजमा येतो.मंद प्रकाशातले दीप उजळले जातात.एक ताई मग मेणबत्ती घेऊन येते,आणि ज्योतीने ज्योत लावते.बायबल मधले काही उतारे वाचून दाखवते,ऑर्गनचे सूर वाजायला लागतात,सारे उठून उभे राहतात आणि प्रार्थनेला सुरुवात होते.धूपाच्या वासाने आणि ऑर्गनच्या मंद सुरांनी वातावरणात जणू मंतरलेपणा येतो. नाताळची प्रसिद्ध गाणी सारे गाऊ लागतात.
    "आज शुद्ध रात्र,पवित्र रात्र.. येशू जन्मला..." अशा अर्थाचे गाणे सुरू झाले की मला नेहमी " राम जन्मला ग सखी.." आठवतं.ख्रिस्त आणि कृष्णामधलं काही साम्यही आठवत राहतं.दोघेही मध्यरात्री जन्मले,जन्मापासून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत आले.एक गाईगुरांमध्ये वाढला तर दुसरा शेळ्यामेंढ्यांमध्ये..तिकडे गाणी सुरूच असतात,माझं मन असं  कुठेही भरकटत राहतं. जन्मोत्सवाची गाणी झाली की पाद्रीबाबा सर्वांसाठी प्रार्थना करतो,छोटेसे प्रवचन देतो.या वर्षी "ख्रिश्चन,मुस्लिम,बौद्ध,हिंदू सगळे धर्म सारखेच!"  असा संदेश दिल्याने जुन्या विचारसरणीच्या लोकांत थोडी खळबळ उडाली!मग फादर सर्वांना नाताळच्या शुभेच्छा देतो.फ्रोह वाईनाख्टन! फ्रोहेस फेस्ट! अशा नाताळच्या शुभेच्छा आपल्या आजूबाजूच्यांना देऊन झाल्या की फादरबाबा सगळ्यांना प्रसादाचे बिस्किट देतो.रांगेत एकेकजण त्याच्याकडे जातात, गुडघ्यात लवून अभिवादन करतात आणि प्रसाद घेऊन येतात. हा प्रसाद फक्त कॅथलिक ख्रिश्चनांनाच मिळतो.आजी कॅथलिक आणि आजोबा प्रोटेस्टंट! त्यामुळे आजी आपली एकटी एकटी जाऊन प्रसाद खाऊन येते.आजोबांना सुद्धा देत नाही याची आम्हाला फार गंमत वाटते.
फादरबाबा रुप्याच्या पेल्यातून रेड वाइन आणि प्रसादाचे बिस्किट त्याच्यामागे अर्धचंद्राकार उभ्या असलेल्या चर्चच्या पुजारीमंडळाला आणि चंदेरी काठ्या घेतलेल्या मुलांना देतो आणि सर्वात शेवटी स्वतः पितो.परत एकदा सर्वांना नाताळ शुभेच्छा देऊन लोकांची पांगापांग होते.
गणपतीची आरास पाहावी तसे लोक मग येशूचा गोठा,नाताळझाडाची आरास पाहण्यात गुंग होतात.आम्हीही मग आरास पाहतो.आजी तिच्या मित्रमंडळींशी,फादरशी ओळख करून देते आणि रमतगमत आम्ही घरी येतो.
ख्रिसबाऊम म्हणजे नाताळच्या झाडामागे भेटवस्तू दडवून ठेवलेल्या असतात. आम्हीही त्यांना द्यायच्या भेटी तिथे लपवतो.आजोबा मग टेपरेकॉर्डरवर परत नाताळगाणी लावतात. सार्वजनिक आरती झाली तरी घरच्या गणपतीची पूजा,आरती वेगळी असतेच ना,तसेच काहीसे!आजीचे नाताळझाड पारंपारिक पद्धतीने सजवलेले असते.झाडावर चिमुकले चमचमते सोनेरी,चंदेरी गोल लोलक,चांदण्या,यक्षकिन्नर असतात.येशूचा पाळणा,बाळयेशूची प्रतिमाही पायथ्याशी ठेवलेली असते.रंगीत मणी लावलेली बिस्किटे,चॉकलेटे आणि कलात्मकरीत्या मांडलेली नाताळफराळाची बिस्किटे चैत्रगौरीच्या आराशीची आठवण करून देतात.
बारा महिन्याच्या बारा मेणबत्त्या मग आजोबा लावतात,सगळे झाडासमोर उभे राहतात."रोजची मीठभाकर देणाऱ्या आकाशातल्या बापा,आम्हाला असेच सुखी,समाधानी,निरोगी ठेव."अशा आशयाची प्रार्थना म्हणतात.मग पितरांसाठी,जवळच्या मित्रमंडळींपैकी कोणी गेले असेल तर त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. गेल्या वर्षी माझ्या सासूबाई अचानक गेल्या,तेव्हा एक प्रार्थना त्यांच्यासाठीही होते,आणि आम्हाला भरून येतं.एकमेकांच्या गळाभेटी घेऊन मग नाताळच्या शुभेच्छा देतात आणि वाईनाक्ट्समानने ख्रिसबाऊमखाली आणून ठेवलेली नाताळभेट लगेचच उघडून पाहतात आणि आवडलेल्या भेटीबद्दल त्याला धन्यवाद देतात.
सेक्ट म्हणजे जर्मन शँपेन मग फसफसते आणि नाताळची मुख्य मेजवानी सुरू होते.बऱ्याच ठिकाणी टर्कीचे महत्त्व फार असते पण इथे मात्र जेवणात टर्कीचे विशेष महत्त्व नसते तर बटाटयाचे विशिष्ट सालाद आणि उकडलेली अंडी वाईसवुर्ष्ट  म्हणजे पांढऱ्या सॉसेजबरोबर खातात. जोडीला चीजबरोबर बेक केलेले बटाटे,पेअर आणि एक प्रकारचे मऊ चीज यांचा पदार्थ,विविध प्रकारचे पाव आणि बिस्किटे असतातच.दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ तारखेला एंट म्हणजे बदक किंवा गाजं म्हणजे बदक आणि टर्की यांच्यामधला (त्याच फॅमिलीतला)एक पक्षी जेवणात असतो. आजीचा आग्रह एकीकडे चालू असतो.गप्पांच्या नादात दोन घास जास्तच जातात. जेवणानंतर ऍपलपाय, ग्रीसपुडिंग,रोटंग्रुट्झ म्हणजे एक विशिष्ट बेरीफ्रुट्सची जेली यापैकी एखादे डेझर्ट असते. जेवणे झाली तरी हात वाळवत गप्पा मात्र चालूच असतात.विषय रूळ बदलत राहतात.मंद संगीत वातावरण जादूभरलं करत असते.मनात ते चित्र तसंच जपून ठेवून मग एका आठवड्याने येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागताला आम्ही उत्सुक होतो. Flemming Aaji Aajoba

सवाई गंधर्व महोत्सवामुळे हुकलेल्या मैफिली

सात डिसेंबर ते दहा डिसेंबरपर्यंत पुण्याच्या रमणबाग शाळेच्या प्रांगणात शास्त्रीय संगीताचा मळा फुलला होता. वेगवेगळ्या घराण्यांच्या विविध शैलीतील गायन वादनाला बहर आला होता. त्याचा आनंद घेण्यासाठी हजारो रसिक तेथे गर्दी करीत होते. पण गंमत म्हणजे नेमक्या याच कालावधीत त्याच पुणे शहरात संगीतविषयक कांही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम इतर ठिकाणी सुद्धा चालले होते. तसे पाहतां मुंबई व पुण्यामधील वेगवेगळ्या सभागृहात रोजच कांही ना कांही कार्यक्रम सुरूच असतात. रोज उठून आपण कुठे ते पाहतो? पण त्यातील निदान तीन कार्यक्रमांना हजर राहण्याचा प्रयत्न करावा असे एरवी वाटावे असे ते होते.

आहे कठीण परि...

 


आहे कठीण परि हो आनंददाता
तू मूलतत्त्व त्याचे जाणून घेता


वरील दोन ओळी डोळ्यासमोर ठेवून पुढील लेख लिहिले आहेत. हे लेख वाचून लोकांना गणिताबद्दल गोडी वाटायला लागेल अशी अपेक्षा करणे चुकीचेच  नव्हे तर वेडेपणाचेही ठरेल. पण हे लेख वाचून गणिताची भीती किंवा नावड थोडी जरी कमी झाली तरी मला खूप समाधान वाटेल. गणिताच्या अभ्यासकांना मात्र ह्यात नवीन काही मिळणार नाही याची नम्र जाणीव आहे.

घारगे

वाढणी
२ जण

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • लाल/पिवळा भोपळ्याचा कीस १ वाटी
  • गूळ १ वाटी
  • तांदुळाचे पीठ अर्धी वाटी
  • रवा अर्धी वाटी
  • कणीक अदपाव वाटी
  • साजूक तूप अर्धा चमचा

मार्गदर्शन

एक ट्रॅफिकजाम विकत घेतला...!!! - २

आणि तो तिथून बाकी काहीही न बोलता बाहेर पडला आणि कॉलेज जवळच्या 'मधुसूदन' मध्ये आला..........


अजून शाल्वी आली नव्हती. तो माडीवर जाऊन खिडकीशेजारच्या टेबलवर बसला. मनात असंख्य विचार होते. 'आताच शाल्वीला विचारावे का? काय म्हणेल ती? नकार देईल का? का ती सुद्धा माझ्यावर प्रेम करते? पण मग तसे असते तर काहीतरी बोलली असती. का फक्त एक मित्र म्हणून पाहते ती माझ्याकडे? का तिचे तिथेच लंडनमध्ये कोणाशीतरी..... छे छे !!! काहीतरीच....'
"हाय! राज.... lookig smart and handsome." - शाल्वीच्या आवाजाने राज् एकदम भानावर आला.मनातले सगळे विचार झटकून टाकले.
"ओह! शाल्वी, तू पण काही कमी सुंदर नाही आहेस..ये ना..have a seat, come on." - राजचा चेहरा एकदम खुलला.
"कसा आहेस?? आता काय बाबा.. तू सुद्धा आकाशगंगा बिल्डर्स चा मेंबर झालास. मजा आहे."- शाल्वी.
"कसली गं आलीय मजा.. कामाच्या व्यापातून् डोकंच वर निघत नाही. माझं सोड गं, तू बोल .. काय म्हणतंय लंडन..?? जम बसला का तुझा आता..?" - राज.
"हो.. थोडा थोडा." -शाल्वी.
तिला आताच विचारावे... राजने विचार केला.
"आबाकाका, २ कॉफी द्या प्लीज." - राजने नेहमीच्या वेटरला सांगितले. वेटरला सुद्धा काका म्हणून हाक मारणाऱ्या राजचे शाल्वीला नेहमी कौतुक वाटे. आजही ते भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले आणि राजने ते पाहिले.. तिने लगेचच आपले लक्ष नाही असे दाखवण्यासाठी आपली मान वळवली. वेटर कॉफी ठेवून् गेला. राज ने शाल्वीला कॉफी दिली आणि स्वतः:ही घेतली.
"शाल्वी एक विचारू का?" - राजने विषयाची सुरुवात केली.
"बोल ना!" - गरम गरम कॉफीचा एक घोट घेऊन शाल्वी म्हणाली.राज शब्दांची जुळवाजुळव करू लागला.
"आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून...." "हाय शाल्वी!" एकदम असा आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक मुलगी त्या दोघांच्या टेबलकडे चालत येताना दिसली.
"ओह हाय! राज, ही माझी मावस बहीण.. दिव्या. हिला मी एकडेच् ये म्हटले.. अरे, आम्हाला दोघींना शॉपिंगला जायचे आहे. तुला भेटून् आम्ही परस्परच जाऊ" - शाल्वी.
"हाय दिव्या!" - राज. "हाय!" - दिव्या.
" ओ.के. पण राज तू काहीतरी बोलत होतास..कॉलेजमध्ये काय म्हणालास?" - शाल्वी.
"काही नाही. नंतर कधीतरी बोलू आपण. आता तुम्ही शॉपिंग करून् या. आपण परत भेटूच. ओ.के. "- राज.
"ओ.के. मग परत कधी भेटशील... ए, नाहीतर असं करूया का.. आपला सगळा ग्रुप मिळून् कुठेतरी फिरायला जाऊया का? मजा येईल." - शाल्वी.
"ठीक आहे. मी बघतो कोण कोण भेटतंय ते आणि मग ठरवून कळवतो तुला."- राज्.
"चल मग निघते मी. मला नक्की कळव. बाय!" - शाल्वी.
"हो. नक्की. उद्या फोन करतो तुला. चल बाय."- राज.
शाल्वी निघून गेली. राजने एक दीर्घ सुस्कारा सोडला. आजचा बेत फसला तर! पुढे बघू. असे म्हणून् राज् उठला आणि कॉफीचे बिल देऊन बाहेर पडला आणि तडक घरी आला.
नेहमी ऑफिसानंतर पूल खेळायला जाणारा हा राज.. आज घरी लवकर आला होता.
"राज, काय झाले? शाल्वी ला भेटलास का? विचारलंस का तिला? काय म्हणाली ती?" - सुवर्णाताई.
"हो.. भेटलो तिला पण विचारू नाही शकलो." - राज.
"राज, असं करून् कसं चालेल? अरे, किती दिवस असा तू कुढत राहणार आहेस? कधीतरी तुला हिंमत करवीच लागेल ना? तुला कधीतरी सत्याला सामोरं जावंच लागेल." - सुवर्णाताई त्याला समजावत होत्या.
पण राजला आता, ट्रीप ऍरेंज करायचे वेध लागले होते. खंडाळ्याला जायचे सगळ्यांना घेऊन आणि संधी पाहून् शाल्वीला विचाराचे.. असे त्याने ठरवले. त्याच्या शब्दाला मित्रमंडळींपैकी कोणीही नाही म्हणणार नाही याची त्याला खात्री होती. सगळी जमवाजमव झाली. त्याने सगळीकडे फोन केले. एक मिनी बस बुक केली. शाल्वीला तसे कळवले. येणाऱ्या शनिवारी सकाळी लवकर निघायचे ठरले.
मधल्या २-३ दिवसांत तो शाल्वीला फोन करायला विसरला नव्हता. शनिवार केव्हा येईल असे झाले होते. आणि मग शनिवार उजाडला. ठरलेल्या ठिकाणी सगळे जमले. बस आली, सगळे बसमध्ये चढून् आपापल्या सीटवर बसले... प......ण......! शाल्वी एकदम पुढे बसली होती आणि राजला एकदम पाठीमागची सीट मिळाली होती. म्हणजे बसमध्ये विषय काढायचा प्रश्नच मिटला... राज थोडा नाराज झाला. पण अजून अख्खा दिवस आहे हातात... अशी त्याने स्वतः:ची समजूत घातली.
संपूर्ण ट्रीपमध्ये राज आणि शाल्वी खूप कमी वेळेला दोघेच असे एकत्र आले.शाल्वी बरोबर नेहमी कोणी ना कोणी तरी असे. त्यामुळे राजला तिच्याशी बोलायची संधी मिळत नव्हती. शाल्वी मात्र खूप खूश होती. खूप दिवसांनी सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटल्यामुळे एकदम आनंदात होती. राज मात्र तिच्याशी बोलायसाठी धडपडत होता. पूर्ण दिवस संपला.. परतीची वेळ झाली पण राजला तिच्याशी बोलता नाही आले. रात्री उशिरा सगळे परतले. राजही कंटाळून गेला होता. अंथरुणावर पडल्या पडल्या त्याला झोप लागली.
सकाळी उठल्यावर सुवर्णाताईंनी त्याला नाश्त्यासाठी हाक मारली. नाश्त्याच्या टेबलवर डी.के.आणि सुवर्णाताई बसले होते. त्याने आईकडे पाहिले. त्यांनी नजरेनेच त्याला "काल काय झाले?" असे विचारले. त्यानेही मानेनेच "काहीच नाही" म्हणून सांगितले. डी.के. ना यातील काहीच कल्पना नव्हती. आणि कल्पना असती तर.... बापरे!!!!!!!
दिवस पुढे पुढे सरकत होते. जसा शाल्वीचा परत जायचा दिवस जवळ जवळ येत होता तसा राज अस्वस्थ होत होता. त्याला डि.कें. च्याकडे विषय काढावा असे एकदा वाटे पण ते कितपत समजून् घेतील याची त्याला शंकाच होती. तो मधल्या दिवसांमध्ये १-२ वेळा शाल्वीला भेटला सुद्धा पण काहीतरी कारण व्हायचे आणि मग तो विषय निघायचाच नाही. राजला आता स्वतः:च्या बुजरेपणाची लाज वाटू लागली. काय करावं काही सुचत नव्हतं.
त्यात आणखी भर म्हणून् की काय.. तो आईशी एकदा या विषयावर बोलताना.. अचानक डी.के. तिथे आले आणि त्यांनी मायलेकांचे बोलणे ऐकले......... झाले..! तो पूर्ण दिवसभर राजला पैसा किती महत्त्वाचा हे ऐकून घ्यावे लागले. आणि शेवटी, शाल्वीचा विचार डोक्यातून काढून टाक अशी सक्त ताकीदही राजला मिळाली.
"आम्ही, तुझे लग्न बिल्डर्स असोसिएशनचे सेक्रेटरी, आदित्य रांजेकरांच्या मुलीशी ठरविले आहे. तेव्हा त्या मिडलक्लास मुलीचा विचार डोक्यातून् काढून टाक. नाहीतर या प्रकरणात मला माझे बाकीचे सोर्सेस वापरावे लागतील." - डी.के. तावातावाने बोलत होते. राजला ही हेच अपेक्षित होतं त्यांच्याकडून. सुवर्णाताई हताश होऊन राजकडे पाहत होत्या.
आता... उद्या शाल्वी जायची होती परत. आजच राजला तिच्याशी बोलायचे होते.. काहीही करून. तो दिवसभर तिच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करत होता पण ती बहुतेक घरी नव्हती. शेवटी संध्याकाळी ६.०० वाजता फोनवर ती भेटली.
"हाय शाल्वी, राज बोलतोय" - राज.
"हा, बोल राज."- शाल्वी.
"अगं मी दिवसभर फोन लावत होतो.. पण.." - राज.
"अरे! मला उद्या न्यायसाठी बऱ्याच वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून मी आणि आई खरेदीसाठी गेलो होतो. आणि मग तिथूनच माझ्या आत्याकडे जेवायला गेलो. मी उद्या जाणार म्हणून तिने जेवायला बोलावले होते. बाबाही तिथेच होते ना.. त्यामुळे घरात कोणीच नव्हते." -शाल्वी.
"बरं तू आत्ता मला भेटू शकतेस का?" - राज.
"नाही रे, राज. खूप कंटाळा आला आहे हिंडून.. आणि मुख्य म्हणजे अजून् माझे पॅकिंग व्हायचे आहे. खूप सामान अजून भरायचे आहे. उद्या दुपारी १२.३० ची फ्लाईट आहे.म्हणजे घरातून मला कमीतकमी ८.०० वाजता तरी निघावे लागेल. या मुंबईच्या ट्रॅफिकमधून तिथे पोहोचायलाच ९.३० वाजतील. मग काय रिपोर्टिंगची वेळच होईल ना. प्लीज राज...." शाल्वी समजावत होती.
"तू कशी जाणार आहेस एअरपोर्टला?" - राज.
"टॅक्सिने.. अरे आईची तब्बेत् थोडी बिघडली आहे म्हणून मग मीच आई-बाबांना येऊ नका म्हटले एअरपोर्टवर. माझी मीच जाईन मग." -शाल्वी.
"हे बघ, मी येतो तुला सोडायला एअरपोर्टवर.. उद्या बरोबर पावणे आठ ला येतो तुला घ्यायला.. तयार राहा." - राज.
"अरे पण.. तुझे ऑफिस??? उगीच कशाला...." -शाल्वी.
"गप्प बस. उद्या येतोय मी तयार राहा." - राजला अधिकार वाणीने तिच्याशी बोलताना ऐकून शाल्वीला आश्चर्य वाटले...आणि खूप छानही वाटले. 'ठीक आहे.' म्हणून् तिने फोन बंद केला.
दुसर्यादिवशी सकाळी आवरून् ती राजची वाट पाहत बसल. इतक्यात तिच्या आत्याचा फोन आला. आत्याने तिच्यासाठी विणलेला स्वेटर काल शाल्वी तिथेच विसरली होती.. तो जाताजाता घेऊन जा असे आत्याने सांगितले.. तिला नाही म्हणवेना..जाताजाता येईन तो स्वेटर न्यायला असे तिने कबूल केले.
राजही सकाळी लवकर उठून् तयार झाला. तो बाहेर पडणार इतक्यात डी.के. नी हाक मारली... राज एकदम थांबला आणि डी.के. काय बोलतात याची वाट पाहू लागला.

ह्रदयाने विचार करणारा माणूस. . .१

संगीताने... विशेषतः शास्त्रीय संगीताने मनाला शांती मिळते, व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतात, अस्वस्थता कमी होते हे बरेच काही ऐकलेले, व थोडेफार अनुभवलेही आहे, परंतु स्वभावात बदल होतो की मूळ प्रसन्न स्वभावाला त्यामुळे खतपाणी मिळते हा एक वादाचा मुद्दा होऊ शकेल. 'प्रसन्न' हे  विशेषण  शाळा कॉलेज व कथा कादंबऱ्या वाचनात वर्णनामध्येच बरेचदा ऐकले होते. पण ते फक्त चेहऱ्यांतच नसून पूर्ण व्यक्तिमत्त्व तसे असू शकते, हे आयुष्यात कधी प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल, त्याचा प्रत्यय येईल हे स्वप्नीही नव्हते. पण मला संगीतक्षेत्रातल्या उस्मानखॉं या मान्यवराच्या, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा, हृदयातून विचार करण्याचा भरपूर प्रत्यय आला. त्याचेच हे काही अंशी शब्दांकन करण्याचा प्रयत्न. 

नानकटाई

वाढणी
लहान आकाराच्या -३४

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • रवा -१ कप
  • मैदा-१ कप
  • चनाडाळीचे पीठ(बेसन)-१ कप
  • साखर-१ कप
  • तुप-१ कप
  • मीठ-एक चिमुटभर

मार्गदर्शन
तुपात साखर विरघळून त्यात इतर सर्व साहित्य मिसळणे. हे मिश्रण ३० मिनिट झाकून ठेवावे. ओवन ३७५ डिग्री फॅरनहाईट(१९० डिग्री सेल्सिअस) साठी प्रिहीट करावे. लहान आकाराच्या नानकटाई बनवून १५ मिनिटासाठी बेक कराव्यात. १० मिनिटानंतर थंड झाल्यावर  खायला तयार!!

टीपा