लवचिक तत्त्वे?
"काय तत्त्व तत्त्व लावलं आहेस रे मघापासून!
तत्त्वांमागे फक्त ती षंढ लोकं लपतात ज्यांना कायम हवे ते केले असता होणाऱ्या परिणामांची भीती असते!"
ऍडव्होकेट जयराज सूर्यवंशी यांनी एक मोठा घोट घेत अबोला सोडला!
पुढचा घोट आत ढकलून, ते पुढे बोलते झाले
"योग्यायोग्य, नीती-अनीती हे सगळे आपापल्या वैयक्तिक दृष्टिकोनावर अवलंबून असतं.
चांगलं वाईटाच्या रेषा आपण आपले ठरवतो."