कोठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर भाजपची अवस्था "दैव देते आणि कर्म नेते" अशी झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या , महापुराचे थैमान अश्या आपत्ती आल्या असूनही जनतेने "दगडापेक्षा वीट मऊ" असा विचार करून युतीला अगदी काठावरचे नसले तरी राज्य चालवण्याजोगे बहुमत दिले होते. शिवसेनेने मुख्य मंत्रीपदाचा आग्रह धरला नसता तर सर्व काही बऱ्यापैकी सुरळीत झाले असते.
सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली आणि उठून बसल्यावर सौ.ची काहीतरी खुडबूड ऐकू आली व पाठोपाठ तिने आत येऊन पुष्पगुच्छ हातात ठेवत "वाढदिवसाच्या शुभेच्छा" म्हटल्यावर लक्षात आले की काही वर्षापूर्वी आजच्या दिवशी या पृथ्वीवर आपले आगमन झाले होते.तसे पाहिले तर हा दिवस स्वतःपेक्षा इतरांनीच लक्षात ठेवायला हवा कारण आपण जन्मताना पंचांग किंवा कॅलेंडर शोधून "अरे वा !
"जातिआधारित विवाहसंस्थेची बरखास्ती" या लोक्सत्ता १४ नोवेंबर १९ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखात श्री मधु कांबळे यांनी जातिनिर्मूलनासाठी जातिबाह्य विवाह हाच जालिम उपाय आहे असे प्रतिपादन केले आहे. पण आरक्षणास धक्का लावणे हा पर्याय नाही असेही त्याचबरोबर प्रतिपादिले आहे.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.