त्रिकोण/चौकोन/दृष्टिकोन

त्रिकोण- तीन कोन असलेली वस्तू(संस्कृत)


चौकोन/ ण- चार कोनांची आकृती(संस्कृत) - हा शद्ब चौकोन असा वाचनात आला आहे. 'ण'  उपयोग केव्हा करतात?

दृष्टिकोन/ण- यातील मूळ शब्द दृष्टी आहे.


दृष्टिकोण हा शब्द केव्हा वापरतात आणि दृष्टिकोन केव्हा वापरतात?

हुतात्मा भगतसिंग - एक संपन्न व्यक्तिमत्व

२८ सप्टेंबर, २००६ - आज हुतात्मा भगतसिंग यांच्या जन्मदिनास ९९ वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्या जन्मशताब्दीवर्षाचा हा पहिला दिवस! त्या निमित्ताने या महात्म्याला ही आदरांजली.


इतिहास हा जेते लिहितात. अर्थातच त्यांना अनुकूल असा. साहजिकच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मा भगतसिंगांचे चरित्र अवघ्या तीन परिच्छेदात संपते. पहिला परिच्छेद लाहोर येथील सॊंडर्स वधाचा, दुसरा संसदेतील बॊंबस्फोटाचा आणि तिसरा व अखेरचा त्यांच्या हसतमुखाने व ताठ मानेने फाशी जाण्याचा. मात्र प्रत्यक्षात या असामान्य व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. या असामान्य पुरुषाचे जीवनसार माझ्यासारख्या सुमार बुद्धीच्या माणसाने काय सांगावे? पण तरीही केवळ त्यांच्यावरील भक्तीखातर त्यांचे काही पैलू दाखविण्याचा हा प्रयत्न.

वधूसंशोधन... शुद्ध 'मराठी'!

 


( मुलगा मुलीच्या घरी तिला 'पाहायला' गेला आहे. आजकालच्या प्रथेप्रमाणे वडीलधारे त्या दोघांना 'एकटे' सोडतात.)


मुलगी : तुम्ही काय करता?


मुलगा (मिष्कील स्वरात) : आंघोळ!!!! (आता प्रश्ान् विचारण्याची त्याची पाळी. तो विचारतो...) तुम्हाला काय येतं?

श्रीमत् आद्य शंकराचार्यांच्या जीवनांतील एक प्रसंग

भारताच्या इतिहासांत अनेक अनेक महान व परम थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांपैकी आद्य शंकराचार्य हे एक अद्‌भुत  व्यक्तिमत्त्व. वैदिक धर्माला अगदी अवकळा आलेली असताना, वैदिक धर्म भारतातून अगदी नाहीसा होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना शंकराचार्य परमेश्वराच्या ' यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ..' उक्तीप्रमाणे भारत भूमीवर अवतरले, आणि वेदांचे प्रामाण्य व ईश्वराचे असित्व सिद्ध करून वैदिक धर्माची बिघडलेली घडी नीट केली. आपल्या आचरणाने ज्ञानमार्ग, भक्तिमार्गाची उज्ज्वल परंपरा परत स्थापन केली.
        जन्म इ.स. 509 - (जन्म काळ निश्चित कोणता ह्यावर बरेच वाद आहेत). केरळातील कालटी नांवाचे  गाव. वडील शिवगुरु व आई अर्यांबा. भगवान शंकराच्या दीर्घ उपासनेनंतर त्यांना वर म्हणून प्राप्त झालेले हे पुत्ररत्न. तल्लख बुद्धी व स्मरणशक्ती मुळे पाचव्या वर्षीच लिहिण्या वाचनाचे ज्ञान झाल्यामुळे शिवगुरुंनी लगेच मुंज  करून टाकली आणि थोड्याच दिवसात शिवगुरु आजारी पडून परलोकवासी झाले. आठव्या वर्षी चारही वेद झाले, बाराव्या वर्षी सर्व शास्त्राभ्यास संपला आणि सोळाव्या वर्षी गीता, उपनिषदे व ब्रह्मसूत्र यांवर भाष्ये लिहून झाली. पुढे सोळा वर्षे धर्मजागृतीचे कार्य करून दिव्यलोकी प्रयाण , असे हे अवघ्या 32 वर्षाचे कार्य.
        आचार्यांनी अनेक वेळा देशाटन केले. सोबत नेहमी मोठा शिष्य समुदाय असायचा. एकदा प्रयागमध्ये प्रचार करीत असताना एक कुष्ठ रोगी एका झाडाला दोर लावून गळफास लावण्याच्या तयारीत दिसला. लांबूनच आचार्य कणखर आवाजात ओरडले " अरे थांब " आणि त्याच्या जवळ गेले. रोगाने जर्जर झालेला, चेहरा विद्रूप झाल्याने भूतासारखा दिसत असलेला, सूर्य प्रकाशामुळे त्याला धड पाहणेही त्रासदायक वाटत होते अशा त्या तरुणाने  आचार्यांच्या पायावर लोळण घातली. आचार्यांनी मोठ्या प्रेमाने त्याला उठवले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला, आणि अहो आश्चर्य , त्या तरुणाचा कुष्ठ रोग एकदम नाहीसा होऊन त्याला तेजस्वी कांति प्राप्त झाली. अतिशय आनंदाने त्याने परत आचार्यांच्या पायाला मिठी मारली. इतर शिष्य मंडळी भेदरलेल्या अवस्थेत हे सर्व दूरून पहात होती. त्यांनी आचार्यांच्या नावे मोठा जयघोष करून आसमंत दुमदुमून टाकले. तो तरुण म्हणाला, मोक्षप्राप्तीसाठी गुरुच्या शोधांत फिरत असताना या व्याधीने त्याला ग्रासले व जीवन असह्य होत असल्यामुळे त्याने आपला अंत करायचे ठरवले होते. पुढे म्हणाला, माझा भाव जाणून माझ्यावर कृपा करा, मला दीक्षा द्या. त्याचा शिष्यत्वाचा भाव जागृत झालेला पाहून आचार्यांनी विचारले -
आचार्य - 'किं ज्योतिस्तव ?' कोणत्या प्रकाशानें हे जग बघतोस.
तरुण  - 'भानुमान अह्‌नि मे, रात्रौ प्रदीपादिकम ' दिवसा सूर्यप्रकाश व रात्री दीपादिच्या साह्याने.
आचार्य - पण सूर्य व दीप हे कशाच्या साह्याने पाहतोस ?
तरुण  - ' चक्षुः ' , डोळ्यानें.
आचार्य - आणि डोळे मिटल्यावर.
आता तरुण अंतर्मुख झाला. क्षणांत विचारांची आवर्तने झाली. विचार पक्का झाला आणि म्हणाला -
तरुण  - ' धीः ' बुद्धीच्या योगाने.
आचार्य - पण बुद्धिचे दर्शन कशामुळे होते ?
तरुण  - ज्याने दर्शन होते तो म्हणजे ' मी ' , आणि आपल्याच शरीराकडे त्रयस्थपणे बघून त्याच्या मनांत विचार आला ' अहं ब्रह्मास्मि '
आचार्य - ' म्हणजे परमज्योति म्हणून जे म्हणतात ते तूंच की ? '
तरुण  - ' तदस्मि प्रभो ' होय गुरुमहाराज ती परमज्योती म्हणजे मीच.
    इंस्टंट मुक्ती. हर्षभरित झालेला तो तरुण रोमांचित झाला, गद्गद झाला आणि आचार्यांच्या पायाला परत मिठी मारली. आनंदाने डोळ्यातून घळघळा अश्रू वाहात जणूं आचार्यांचे चरण धुऊ लागला. आचार्यांनी भाववेग ओसरण्यासाठी काही वेळ जाऊ दिला आणि त्याच्या खांद्याला धरून त्याला उठवीत म्हणाले " उदंका ऊठ. " उदंक म्हणजे कलंक नष्ट झालेला. त्या तरुणाला नवे नाव , नवे आयुष्य मिळाले आणि प्रत्येक जीव जी अनुभुति मिळवण्याकरिता आयुष्यभर धडपडत असतो ती अनुभूति मिळाली. हे सर्व होईपर्यंत बालपणापासून सतत आचार्यांसोबत असणारे चित्सुखाचार्य मनोमन ह्या संभाषणाची जुळवाजुळव करीत होते  -
  किं ज्योतिस्तव भानुमानह्‌नि मे , रात्रौ प्रदीपादिकं |
      स्यादेवं रविदीपदर्शनविधौ , किं ज्योतिराख्याहि मे |
  चक्षुस्तस्य निमीलनादिसमये , किं धीर्धियो दर्शने |
      किं तत्राहमतो भवान्परमकं , ज्योतिस्तदस्मि प्रभो ||
[ शेवटच्या चरणांतील पहिले अक्षर अर्थबोधासाठी खरे तर तिसऱ्या चरणाच्या शेवटी लागते, पण चालीसाठी मी ते चवथ्या चरणांत जोडले आहे - चाल ? रामरक्षेतील - रामो राजमणि सदा विजयते , रामं रमेशं भजे - प्रमाणे ]
आचार्यांप्रमाणेंच चित्सुखाचार्यांनाही कोटि कोटि प्रणाम. नुसतेच शंकराचार्यांशी सावलीप्रमाणे सतत राहिले नाहीत - आचार्यांची प्रत्येक कृती आपल्यापर्यंत पोचवली म्हणून.

मुलीचे वय

नमस्कार,


लग्न ही गोष्ट सर्वांच्याच जीवनातील महत्त्वाची घटना असते. एकदाचे लग्नाचे वय झाले की मुली बघायला जाणे, भावी जोडीदाराविषयी च्या अपेक्षा रेखाटत बसणे ह्या गोष्टींनी आयुष्यातील नवीन पर्वाला सुरुवात होते. तर यासंबंधीचा एक विषय मला मनोगतींपुढे चर्चेसाठी, मतांसाठी आणि त्यांचे अनुभव इथील तरुण मनोगतींसाठी उपयोगी पडतील या दृष्टीने ठेवायचा आहे. तो म्हणजे -

वजन वाढत नाही?

वजन कमी करण्याविषयी चर्चा वाचून हे लिहावेसे वाटले.


कितीही खाल्ले तरी वजन वाढत नाही. जिकडे तिकडे मिताहाराची आणि त्यावाचून उद्भवणाऱ्या रोगांची चर्चा ऐकून नक्की काय खावे, काय करावे सुचत नाही. अश्या समदुःखींसाठी हे सूत्र (= फॉर्म्युला)!

'लोकशाही'तील 'राज'कारण

देशाचा कारभार चालवण्याच्या कामाला सर्रास राजकारण म्हणतात. 'लोक'शाहीच्या या युगांत 'राज' हे पूर्वपद असलेला शब्द योग्य वाटत नाही. त्याऐवजी त्यासाठी लोककारण, देशकारण, राष्ट्रकारण, असा काहीतरी शब्द वापरावयास हवा. दुसरे असे की 'राज' या पूर्वपदामुळे त्या व्यवसायांत असणाऱ्या मंडळींत कुठेतरी राजेपणाची भावना असते. त्यामुळे त्यांना 'इतर लोकांवर सत्ता', 'आपल्या स्वार्थासाठी 'सैन्य' उभारणे' व 'स्वत:चे स्थान टिकविण्यासाठी इतरांविरुद्ध कारस्थाने' या गोष्टी अनुषंगिक निसर्गदत्त हक्क वाटतात. तसेच या व्यवसायांत नसलेली माणसे स्वत:ला प्रजा किंवा सामान्य माणसे समजतात व राजकारणी लोकांविषयी 'हेच आपले तारक व मारक, यांचा आपल्यावर अधिकार आहे, आपले जगणे व मरणे यांच्यासाठीच आहे, आपले यांच्यापुढे काही चालणार नाही' असे विचार मनांत बाळगून पूर्वी राजाकडे ज्या नजरेने लोक पाहात असत त्या नजरेने राजकारणी मंडळींकडे पाहतात. ही मानसिकता लोकशाहीला मारक आहे. म्हणून देशाचा कारभार चालवण्याच्या संदर्भांत राजकारण या शब्दाला (व राजकारणालाही) स्थान असू नये असे वाटते.