तात्पर्यकथाः दोन गाढवे

(इमेलमधून आलेली कथा. मूळ लेखक अज्ञात.)
कोणे एके काळी एका धोब्याकडे दोन गाढवे होतीः गाढव क आणि गाढव ख. दोघांना सारखाच भार वाहून न्यायचा होता.
क ने विचार केला की आपण मालकाला प्रभावित करु. म्हणून क ने जास्त ओझे वहायला सुरुवात केली. मालक खूष झाला आणि त्याने ख कडून पण जास्त ओझे वाहण्याची अपेक्षा करायला सुरुवात केली. ख जास्त ओझे वाहू शकला नाही. म्हणून मालकाने त्याला मारले.

मनोगती संमेलन - एक कल्पनाविलास - भाग ३

हे लेखन वाचण्याचे नियम आतापर्यंत सर्वांना माहिती झालेले आहेतच. ( यात यापूर्वी लिहीलेले दोन भाग 'मनोगतीं'नी वाचलेले आहेत हे सुप्त गृहितक दडले आहे हे 'चाणाक्ष' मनोगतींच्या लक्षात येईलच!). त्यामुळे नमन न लांबवता वृत्तांताचा हा पुढचा भागः

मनोगती संमेलन - एक कल्पनाविलास - भाग ३

(सन्जोप राव साहेबांनी न पाहिलेले)मनोगती संमेलन-एक कल्पनाविलास-१

सर्व नियम सन्जोप रावसाहेबांच्या संमेलनासारखेच (तंतोतंत!)


----------------------------------------------------------------


अस्ताव्यस्त संमेलनाला वठणीवर आणण्यासाठी कुणीतरी अध्यक्ष नेमला पाहिज़े होता, अशी कुज़बुज़ स्त्रीवर्गात चालू झाली. आणि ती तिकडे चालू झाल्यामुळे साहजिकच (हे 'साहजिकच' आहे ना, ते 'अपेक्षेप्रमाणे, सर्वानुमते' असे वाचावे!) प्रवासींचे नाव पुढे आले. पण प्रवासींना शोधायचे कसे, यावर एकमत होईना.

बालगोष्ट (३)

ढोंगी बगळा


उन्हाळा वाढत चालला होता. नद्या, नाले, ओढे, डोंगरावरून पडणारे ओहोळ कोरडे पडू लागले. रानातील गवत सुकले. पाणथळ जागेच्या आश्रयाने पक्षी घरटी बांधू लागले.


एक बगळा झाडाच्या शेंड्यावर बसला होता. सूर्य मावळत होता. बगळ्याची नजर दूरवर असलेल्या एका तळ्याकडे लागली होती. तळ्यात खूप मासे फिरत असलेले त्याला दिसत होते. आपल्याला ते कसे मिळतील या विचारात असता सूर्यास्त झाला. झाडावरच तो झोपी गेला.

सुलताना (भाग - २)

मध्यरात्रीनंतर कसल्यातरी आवाजानं राजारामची झोप चाळवली गेली.  पडल्या पडल्याच त्यानं डोळे किलकिले केले.  वेळेचा काहीच अंदाज येत नव्हता.  गुहेत काळोख मिट्ट होता.  डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं.  रातकिड्यांनी एका सुरात किरकिर लावली होती.  पलिकडल्या जंगलातल्या पानांची सळसळ अन फांद्यांचे एकमेकांवर घासले गेल्याचे आवाज येत होते.  ओढ्याच्या पाण्याचा एक संथ प्रवाह ऐकू येत होता.  आणि राजारामच्या लक्षात आलं की या साऱ्या आवाजाबरोबरच गुहेतनंच आणखी कसलातरी आवाज येतोय... कोणाच्या तरी श्वासोश्वासाचा पण आवाज...  नक्कीच... राजारामच्या ओठांना घशाला कोरड पडली, हातापायाला कापरं भरल्यासारखं झालं.  गुहेत राजारामशिवाय अजूनही कोणीतरी होतं .... पण म्हणजे कोण .. हा श्वासोश्वास माणसाचा नाही ... म्हणजे कुठलं तरी श्वापद .. खासच ...  राजारामनं डाव्या हातानं चाचपून बंदुक जवळच असल्याची खात्री करून घेतली. उजव्या हाताला सुरा होता तो त्यानं जवळ घेतला आणि त्याची मूठ हातात घट्ट पकडली.  दोन्ही कोपरांनी जमिनीवर जोर देऊन त्यानं डोकं हलकेच वर उचललं.  अंधारात त्याच्या डोळ्यांनी सावध वेध घ्यायला सुरवात केली... आणि त्याच्या पासून साधारण तीन चार ढांगांवर  गुहेच्या दरवाज्याजवळ दोन पिवळे दिवे चमकले ... बापरे ... सर्रकन राजारामच्या अंगावर काटा उभा राहिला... तिथेच काहीतरी होतं ... पण काहीतरी म्हणजे काय? .. वाघ .. की गवा की अस्वल... नक्की अंदाज येत नव्हता, पण श्वापद मोठं होतं खासच..    

आनंदी आनंद गडे! (जालनिशी)

वाचनालयाच्या कोपऱ्यात दुर्लक्षिलेली अनेक पुस्तके असतात. अनेकदा या घुळीतही माणकं सापडतात. एकदा मी असं ठरवलं होतं की काही काळ अनुवादित पुस्तकंच वाचायची. आमच्या ग्रंथालयातल्या काकांचं माझ्यावर सुपर लक्ष असायचं. मी चुकून मिल्स ऍन्ड बून्स तर वाचत नाहीये ना याकडे ते लक्ष ठेवून असायचे. "आपल्या डोळ्यांसमोर लहानाच्या मोठ्या झालेल्या या मुलीला चांगली संस्कारक्षम आणि कसदार साहित्याने परिपूर्ण पुस्तकं वाचायला मिळावीत " असा थोर हेतू त्यामागे होता हे मला माहीत असल्यामुळे मलाही त्यात वावगं असं काहीच वाटलं नाही (याचा अर्थ मी मिल्स ऍन्ड बून्स वाचलीच नाहीत असा मात्र नाही.. पण ती वेगळी कथा आहे... पुन्हा केंव्हातरी :) )

जड कोण

१ किलो लोखंड आणि १ किलो कापूस यात अधिक जड कोण?


इथे १ किलो म्हणजे पृथ्वीवरचे त्यांचे वजन.


हा प्रश्न निरर्थक नाही. अधिक स्पष्ट करण्यासाठी एक hint देता येईल, पण त्याशिवाय सोडवता येत असेल तर पाहूया!