हिंदुस्तानी संगीत ४ - पण पट्टी कोणतीः पांढरी २ की काळी ४?

आपल्या आवाजाला योग्य अशा कोणत्या पट्टीत गावे हे आपण नक्की कसे ठरवायचे?
गायक कोणत्या पट्टीत गातो आहे ते मूलस्थान, ती पट्टी, आपल्याला / ऐकणाऱ्याला कशी कळणार कशी ?
याआधीच्या लेखात वरील दोन प्रश्न उपस्थित केले होते, त्यांची उत्तरे या लेखात पाहू.

आपली पट्टी ठरवणे
यासाठी तशी पेटी अत्यावश्यक आहे असे नाही, पण असल्यास आधाराला हाताशी घेऊया.
मध्य सप्तकातली पां १ कळ दाबून तो स्वर स्वतःच्या आवाजात (आऽऽऽऽ असा) लावा. सहज लागेल. मग मंद्र सप्तकातली पां ७ कळ दाबून तो स्वर लावा. असे मागे मागे जात सर्वात खालचा कोणता स्वर आवाजाला त्रास न होता किंवा आरामात लागतो तो शोधून काढा. या स्वराला आपल्याला मंद्र पंचम करायचे आहे.
(उदाहरणादाखल, समजा मंद्र काळी ४)
आता या स्वराला सा मानून सा-रे-ग-म हे स्वर म्हणा व कुठे येऊन पोचलात तो स्वर पकडा (ओळीने पेटीच्या कळी मोजल्या तर हा ६वा स्वर येतो, म्हणजे मंद्र काळी ४ पासून सुरुवात केली की आपण मध्य काळी १ ला आलो).
ही तुमची प्रायोगिक पट्टी (म्हणजे येथे काळी १). हिला आता मूळ सा म्हणूया.
आता ही कितपत जमते हे पहाण्यासाठी स्वर वर-वर न्या - सारेगमपधनीर्सा. आणखी वर चला - र्सा-र्रे-र्ग, इथपर्यंत त्रास न होता आवाज जातोय का?
हा स्वर (तार सप्तकातला गंधार) नीट, स्वच्छपणे म्हणता येत असल्यास हीच तुमची पट्टी असे समजता येईल. अर्थात तुमच्या आवाजाचा आवाका एवढा असेल असे येथे गृहीत धरलेले आहे. आवाजाला थोडा ताण देऊन यापेक्षा एक स्वर खाली किंवा वर बहुधा म्हणता येतोच. 
अशा पद्धतीने ठरवलेली पट्टी बहुतेक प्रकारच्या गायनाला चालते, कारण गायनाचा बराच मोठा भाग मध्य सप्तकात असतो. आता एखाद्या गाण्यात मंद्र पंचमाच्या खालचे किंवा तार गंधाराच्या वरचे स्वर असू शकतात. असे गाणे म्हणण्यासाठी तात्पुरती पट्टी वर-खाली करून बघावे. शंभरात एखादे गाणे आपल्या आवाजाच्या आवाक्यापेक्षा जास्त लांबचे स्वर मागणारे असते (उदा. मंद्र ग किंवा तार ध) ते गाणे आपल्याला म्हणता येणार नाही असे समजावे. चुकीच्या स्वरात किंवा पट्ट्या बदलून गाण्यापेक्षा हा समजूतदारपणा बरा.
काही वेळा एखादे उडते गीत गाण्यासाठी वरीलप्रमाणे ठरवलेल्या पट्टीच्या मध्यमाला सा समजून गायिले तर अधिक प्रभावी होऊ शकते. याला मध्यमात गाणे असे म्हणतात. अशा गीताचा स्वरआवाका बहुधा एका सप्तकापुरताच असतो, त्यामुळे अडचण येत नाही.

पुरण पोळी

वाढणी
२ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
120

जिन्नस

  • १/४ किलो मैदा, १ वाटी तांदळाची पिठी
  • १/२ किलो चण्याची डाळ
  • १/२ किलो गुळ (चिकीचा गुळ नाही)
  • १/४ वाटी तेल, दुध, केशर,साजुक तुप
  • जायफळ पूड, वेलची पूड, १" सुंठेची पूड, १०/१२ काळे मिरी पूड,
  • मीठ चवीपुरते

मार्गदर्शन

चण्याची डाळ स्वच्छ धुवुन पाणी घालून शिजत ठेवावी. डाळ शिजली की चाळणी मधे ओतावी, डाळीचे पाणी व थोडी डाळ कटाच्या आमटी साठी बाजुला काढावी.

अशीच एक बालकथा...

(अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा, बाटलीतला/ली जिनी वगैरेंच्या धर्तीवरची अशीच एक लहानपणी वाचलेली [आणि आवडलेली] ही एक बालकथा. सहज आठवली, द्यावीशी वाटली, म्हणून चिकटवली - अर्थात [मूळ कथेला धक्का न लावता] शब्दांत किंचित फेरफार करून!)

मनोगती संमेलन - एक कल्पनाविलास

हे लिखाण वाचण्यापूर्वी काही गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक आहे.
१. या लिखाणाचे वर्गीकरण पहा. विनोद आणि विरंगुळा यापलिकडे हे लिखाण गांभीर्याने घेऊ नये.
२. लिखाणाच्या सोयीसाठी सर्व पात्रांचा एकेरी उल्लेख केला आहे.  वय, अनुभव याविषयी संपूर्ण आदर ठेवूनच. 
३. सर्व पात्रे प्रत्यक्षातील.  प्रसंग संपूर्णपणे काल्पनिक.
४. पुन्हा एकदाः  विनोद आणि विरंगुळा यापलिकडे हे लिखाण गांभीर्याने घेऊ नये.
तर आता

शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रश्‍न की लैंगिक विषय? महत्त्वाचे काय?

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात पंतप्रधान दौरा

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कुणाचेच लक्ष नाही. विदर्भातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करतोय. यावर शासनकर्ते वेगवेगळे पॅकेज आणि दौरे काढतात.

शब्दार्थ

कोणी मला ह्या शब्दांचा अर्थ कळू शकेल का?

१. गुदडी (गुदडीपर्यंत हाग्याले जाता येत नाही)
२. हाग्या
३. वख्खर (हॉऊ शकेल तर इंग्लीष मधे अर्थ पाहिजे)
४. बैलांच्या खुब्यांत परान्यांचे खॉचे मारून त्यांना धावड्वीत होती.
५. नात्वांना आपल्यासमोर बसवून धमन्या पळवीत होती.