मीना प्रभू आणि हातकणंगलेकर यांचा अध्यक्ष पदाच्या साठमारीचा खेळ (किंवा कलगी तुरा म्हणा) मन विषण्ण करून गेला. हे तथा कथित बुद्धिवादी (आजकालचे बुद्धिवादी म्हणजे मास्तरकी करणारे, पुस्तके खरडणारे आणि राज्य सरकारचे लाळघोटे पणाने पाय चाटून मिळणारा तुकडा चघळणारे), मराठी भाषेचे रक्षण कर्ते. वर शहाजोग पणे पत्रके काढून ’मला निवडणूक लढवायची नव्हती’ ’माझ्या चाहत्यांनी आग्रह केला म्हणून’ अशी टिमकी वाजवणारे (अग अग म्हशी मला कुठे नेशी). अरे म्हणा की ’हो मला हाव आहे अध्यक्ष बनायची’ ’माझी लाळ टपकते आहे सरकारी तुकड्यात वाटमारी करायची’
९८९००९८९००..(दाबला.)
'वेलकम टु एअरटेल कस्टमर सर्व्हिस. प्रेस १ फॉर इंग्लिश, २ फॉर हिंदी, ३ फॉर मराठी'
३ (दाबला.)
'प्रीपेड माहिती साठी १ दाबा, रिचार्ज साठी २ दाबा, नवीन कार्ड च्या माहितीसाठी ३ दाबा.'
१ (दाबला.)
'अकाउंट बॅलन्स च्या माहितीसाठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा'
१ (दाबला.)
'ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा.'
....(काहीच नाही दाबले. काय दाबावे कळले नाही. 'वॉइस रिस्पॉन्स लावणार्याचा गळा दाबण्यासाठी ४ दाबा' असे पुढे आहे काय हो?)
'तुम्ही दाबलेला नंबर योग्य नाही.ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा, कॉल चालू असताना मागच्या मेनुकडे जाण्यासाठी ७ दाबा, कस्टमर सर्व्हिस शी बोलण्यासाठी ९ दाबा.'
९. (दाबला.आता नंबर दाबून दाबून मेंदूला थकवा आला आहे.)
'हॅलो वेलकम टु एअरटेल. हाउ कॅन आय हेल्प यु?'
(अरे चांडाळा,मराठीसाठी इतके आकडे मूर्ख म्हणून दाबले का लेका मी?)
'डु यु नो मराठी?'
'नो मॅम, आय कॅन ओन्ली अंडरस्टँड लिटल बिट ऑफ इट.कान्ट स्पीक.'
(अरे फुल्या फुल्या फुल्या, चुल्लूभर पानीमे डूब मर! मला इंग्रजी कामापुरती येत असली तरी इंग्रजीत कचाकचा भांडता येत नाही ना रे.त्याला मातृभाषाच बरी.'ओ, काय सर्व्हिस देता का झx मारता?' चा आवेश आंग्लभाषेत आणता येणारे का मला?)
या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर खराखुरा कार्यक्रम सुरू झाला. यशवंत देवांचा हास्य-विडंबन काव्यगायनाचा कार्यक्रम होता. झाल्या प्रकारानंतर संताप अजून शमला नव्हता त्यात हा कार्यक्रम म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार वाटला. 'अती झालं आणि हसू आलं' अशी म्हण आहे पण इतके अती होऊनही कशाचंच हसू येईना. काही लोक (अतिमहत्त्वाचे वि.आ.. असावेत) हसलेले ऐकू येत होते, पण त्यांच्यापेक्षाही मंचावरची मंडळीच जास्त हसत आहेत असे वाटत होते. बराच वेळ काय चाललंय काही कळत नव्हते. संतापाने वळलेल्या मुठी टाळ्यांसाठी खुलत नव्हत्या. थोड्या विडंबन गायनानंतर यशवंत देवांनी एका कवितेचे वाचन सुरू केले. गणपतीवरची कविता होती, "दरवर्षी येत होतो, पुढच्या वर्षी येणार नाही" कवितेने चांगलीच पकड घेतली. कविता संपली आणि वळलेल्या मुठी पहिल्यांदाच टाळ्यांसाठी खुल्या झाल्या. मनापासून दाद गेली. यशवंत देवांनीही नेमकं याचवेळी हात जोडून ' सुरुवातीला जे झालं, ते झालं, तुमची दाद मिळाली, तुमच्या-आमच्यामधला पडदा दूर झाला हीच आम्हाला मिळालेली खरी पावती' असं सांगितलं. थोडं वाईट वाटलं. खरंच, कलाकार त्यांचा कार्यक्रम चोखच करत होते. झाल्या प्रकारात त्यांचा काही दोषही नव्हता. पण आम्हीही काही जाणूनबुजून करत नव्हतो. कुठे, कुणाचं, कसं, काय चुकत होतं कळत नव्हतं. हळूहळू कार्यक्रमाचा आस्वाद घेणं शक्य होऊ लागलं. पण आसनांची पर्यायी व्यवस्था फारशी सुखावह नव्हती. आसने मंचाच्या इतक्या जवळ होती की वर मान वर करून-करून दुखायला लागली होती. ध्वनिक्षेपकांचे आवाज छातीवर ढोल पिटल्यासारखे आदळत होते.
कार्यक्रम जसजसा जेवणाच्या वेळेकडे सरकू लागला तशी पुन्हा एक चिंता नव्याने भेडसावू लागली. जेवायला गेल्यावर पुन्हा खुर्च्यांचे काय? कारण नंतरच तर आशाताईंच्या मराठी गीतांचा मुख्य कार्यक्रम होता. जेवायला जावे की नाही? जेवण की आशाताई? आशाताई की जेवण? शेवटी काहींनी जागेचे रक्षण करायचे आणि इतरांनी पटापट जेवून यायचे, ते आल्यावर जागेचे रक्षण करणा-यांनी जेवायला जायचे असे ठरले. या कार्यक्रमाच्या शेवटी जेवण्यासाठी पांगापांग होण्यापूर्वीच श्री विनय आपटे मंचावर आले आणि त्यांनी सांगितले, "आता जेवणाची विश्रांती होत आहे. आसनांच्या बाबतीत सुरुवातीला आपण सर्वांनी सर्वसम्मतीने(?) जो तोडगा काढला आहे तो मान्य करून जेवणानंतरही आता ज्या आसनांवर आपण बसलेलो आहोत त्याच आसनांवर सर्वांनी बसावे." कधी, कुणी आणि कसा तोडगा काढला? 'सर्वसम्मती' चा नेमका अर्थ काय? पुढच्या रांगेचे कित्येक हक्कदार पार मागे नाइलाजाने 60 व्या रांगेतही बसले होते. त्यांची संमती घेतली होती काय? कुणालाच काही कळले नाही. निवेदिकेनेही सांगितले की मग आशाताई आल्यावर सुरळीत कार्यक्रम सुरू होईल. थोडक्यात काय? आशाताई आल्यावर तमाशे नकोत. अदृश्य धमकीवजा हुकूमच वाटला तो! श्री आपटेंच्या निवेदनानंतरही एक दोघं खुर्ची जाण्याच्या भयाने जेवायलाच गेले नाहीत. एकाचं तर म्हणणं पडलं संयोजकांनी 'पैसे परत करू' सांगितले आहे. मग त्यांचे जेवण कसे जेवायचे?' शेवटी मराठी माणूस! पण मराठी माणसाचं हे रूप कुणाला दिसत कसं नाही?
जेवणानंतर घाईघाईने जागेवर परतलो. आसनांच्या रक्षणकर्त्याला सर्वच आसनांचे रक्षण करणे जमले नव्हते. आमच्या आसनांवर एक दांपत्य आपल्या अपत्यासह विराजमान झालेले होते. आम्ही उठायला सांगितल्यावर ते आपण अतिमहत्त्वाच्या व्यक्ती असल्याच्या प्रवेशिका दाखवू लागले. आम्ही त्यांना विनय आपटेंच्या निवेदनाची आठवण करून दिली, तर व्हीआयपीजना निदान पहिली-दुसरी रांग तरी नको का अशी आम्हालाच विचारणा! आम्ही ठणकावून सांगितले, 'बाबारे, आम्ही विशेष महत्त्वाच्या व्यक्ती नाही. पण आम्ही सामान्य माणसं आहोत त्यामुळे आम्ही आवाज करणार, तमाशा नको असेल तर निमूटपणे ऊठ.' तिघींनी तीन तोंडांनी आवाज सुरू केला. आता मात्र असे होऊ लागले तर आशाताई आल्यावर त्यांच्याच शेजारी जाऊन बसावे लागेल असं म्हटल्यावर ते उठले आणि थोड्या अंतरावरच्या दुस-या आसनांवर जाऊन बसले. नंतर तिकडून वाद-विवाद कानावर येत होते. पण सगळ्यांनाच लढाया जिंकता येत नाहीत आणि नेहमीच सत्याचा विजय होतो असे नाही, त्यामुळे नंतरही ते अतिमहत्त्व तिथेच वास्तव्य करून असल्याचे दिसत होते. मनस्ताप संपण्याची लक्षणं दिसत नव्हती. जर प्रतिसाद अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला होता तर विशेष आमंत्रित इतके कशाला बोलावलेत असं विचारल्यावर उत्तर मिळाले होते की हे विशेष आमंत्रित आशाताईंचेच असतात, त्यांना आम्ही कसे नाही म्हणणार? आता ही उत्तरे देणारे सचिन ट्रॅव्हल्सचे अधिकृत लोक होते की भलतेच कुणी होते हेही कळायला मार्ग नव्हता. आणखी एकीला याच प्रश्नाचे उत्तर मिळाले की तिथल्या पोलिसांनीच सांगितलं आमचे 80 लोक सोडले नाहीत तर कार्यक्रम होऊ देणार नाही, म्हणून त्यांना सोडावे लागले. पोलिसांची रीतसर परवानगी घेऊनच कार्यक्रम होणार होता मग या धमकीला बळी पडण्याचे कारण काय? उलट-सुलट विचारांनी डोकं भणभणून गेलं. याच दरम्यान समदु:खींचे दूरध्वनी क्रमांक, पत्ते, ईमेल पत्ते लिहून दिले-घेतले गेले आणि नंतरही याचा पाठपुरावा करायचे ठरले.
आणि.... इतक्यात दुधाळ रंगाच्या चमचमत्या साडीतल्या आशाताई सुधीर गाडगीळांसोबत मंचावर अवतरल्या. बंदिस्त स्टुडिओतील कोजागरीच्या चंद्र-चांदण्याची कमतरता क्षणात भरून निघाली. सभागृह आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या सन्मानार्थ उठून उभे राहिले. अगदी जवळून आशाताईंचे दर्शन घडले. आशाताई रसिकांशी अगदी थेट संवाद साधत तब्बल तीन तास गायल्या. 'मी आशा..' या नव्या गाण्याने सुरुवात करीत 'मागे उभा मंगेश', 'का रे दुरावा', 'मलमली तारुण्य माझे', 'आज कुणी तरी यावे', 'विसरशील खास मला', 'चांदण्यात फिरताना', 'कधी रे येशील तू', 'तरुण आहे रात्र अजुनी', 'पांडुरंग कांती', 'गोमू संगतीनं', 'जांभुळ पिकल्या झाडाखाली', 'रेशमाच्या रेघांनी', 'बुगडी माजी सांडली गं', 'उष:काल होता होता', 'कठिण कठिण किती', 'शूरा मी वंदिले', 'चांदणे शिंपीत जाशी', 'नाचनाचुनी अती मी दमले', 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' अशी विविधता असलेली एकाहून एक सरस गाणी त्यांनी पेश केली. रसिक श्रोत्यांच्या आग्रहाला 'दोन ओळी तरी गाते' असं म्हणून त्यांचं मान देणं सुखावत होत. मध्येच विनोद, कधी सुखदु:खाच्या गप्पागोष्टी, गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेच्या आठवणी यात रसिकांना त्या अगदी सहजपणे सामील करून घेत होत्या. 'रसिकांच्या प्रेमामुळेच मी आजवर अकरा हजारांवर गाणी गाऊ शकले' असं सांगून त्यांनी उपस्थित-अनुपस्थित रसिकांना जो बहुमान दिला त्यामुळे आधीचा मनस्ताप, अपमान, भांडणं याचा काही काळ का होईना अगदी पूर्ण विसर पडला. दु:ख- भोग आशाताईंनाही चुकले नाहीत. त्यांनीच ऐकविलेल्या ' भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले' या ओळींची सार्थकती पटली. 'उष:काल होता होता काळरात्र झाली' या गाण्यानंतर आशाताईंनी सांगितलं ' मला माझ्या वयाच्या पंचाहत्तरीतही आयुष्याच्या मशाली पुन्हा पेटवाव्याश्या वाटतात.' खूप टाळ्या दिल्या रसिक श्रोत्यांनी त्यांच्या या उद्गाराला! तेव्हाच ठरवलं मशाली पेटत्या ठेवायलाच हव्यात. भांडणं, मनस्ताप, फसवणूक, गृहीत धरलं जाणं, एकतर्फी निर्णय लादला जाणं... काहीच विसरता कामा नये. आजूबाजूला मशाली पेटूच न देणारी, पेटल्या तरी त्या विझवायच्या प्रयत्नात असणा-यांची संख्याही अधिक आहे. आपण पडलो सामान्य. पण सामान्यांच्या जगी ही असामान्य सामर्थ्य वसत असते याचीही जाणीव शांता शेळक्यांनी पूर्वीच करून दिलीय. हे सारं विसरता कामा नये.
आता एक शंका अजून डोकं वर काढू लागली, आशाताईंचं गाणं ऐकलं की लोक सगळं विसरून जातील हेही संयोजकांनी गृहीत धरले होते की काय? असं असेल तर चक्क आम्हाला फशी पाडण्यासाठी आशाताईंचाही वापर केला गेला होता असेच म्हणावे लागेल. हे तर फारच भयंकर होते. आशाताईंपर्यंत सुरुवातीच्या वादळाची खबरबात पोहोचू नये, त्यांच्यासमोर सगळं कसं सुरळीत पार पडावं हे प्रयत्न या संशयालाच बळकटी देत होते.
आशाताईंच्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत मिलिंद इंगळेंनीही थोडा गारवा आणला. ऋषिकेश रानडेंचीही छान साथ होती. त्यांनी 'शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती' गाऊन पुन्हा निर्भयतेची याद ताजी करून दिली. गाणी तीच पण सुरुवातीच्या कटु प्रसंगांमुळे त्यांचे संदर्भ कसे सतत त्याच त्या विचारांभोवती घुटमळत होते. सल असातसा नव्हताच.
कार्यक्रमाबद्दल वर्तमानपत्रातून वृत्तांत आला. आशाताईंच्या गाण्याबद्दल खूप छान आणि भरभरून लिहिलं गेलं. त्यात सुरुवातीच्या वादळाचा ओझरता उल्लेख आला. कित्येकांना तो दुधात पडलेल्या माशीसारखा वाटला असेल, पण त्याचा ओझरता का होईना उल्लेख करणं भाग पडलं हे विशेष. तसा हा मामला अनुल्लेखाने मारण्यासारखा किंवा मरण्यासारखा नव्हताच. पण त्या उल्लेखामध्ये श्रोते-प्रेक्षक नाराज होते आणि त्यांनी आसनांवरून भांडणं केली असा सूर दिसला. प्रत्यक्षात त्यांची भूमिका काय होती, संयोजकांच्या चुका काय होत्या हा कुणाच्या लेखाचा विषयच नव्हता. शेवटी श्रोते-प्रेक्षक असंघटित, त्यांच्याशी कसेही वागले तरी ते काय करू शकतात? ही वृत्ती बळावू नये, तिकिट काढून कार्यक्रमाला येणा-यांनीही आपल्या हक्कांबाबत जागरूक असावे, निदान एकदा घडले हे पुन्हा घडू नये इतपत समज संयोजकांनाही यावी यावर विचार कसा होणार? लोक लवकर अशा घटना विसरतात. पुन्हा-पुन्हा फसतात. मलाही नंतर अंधुकसं आठवलं की आधीच्याही एका कार्यक्रमात खूप काही तरी गोंधळ होता असं कुणीतरी सांगितल्याचं ! म्हणजे आपणच मूर्ख. स्वत:चा मूर्खपणाही मान्य करून टाकला अगदी त्या सतराव्या रांगेसारखा.
ऑफिसमध्ये गेल्यावर सगळ्यांनी विचारलं, कार्यक्रम कसा झाला म्हणून. विशेष काही बोलावं असं वाटत नव्हतं. चर्चेत कळलं की दरवर्षीचंच आहे हे. कार्यक्रम खुल्यावर जाहीर करायचा मग रात्री 10 नंतर खुल्यावर कार्यक्रम करायला परवानगी नाही म्हणून तो बंदिस्त करायचा. जाहिरातीत स्वप्नवत चित्र उभं करायचं. लहान मुलांसह सगळे, आबालवृद्ध कार्यक्रमाला कसे आरामात येऊ शकतात हे ठासून सांगायचं. भरमसाठ विशेष आमंत्रित बोलवायचे, भरमसाठ तिकिटं खपवायची आणि पैसे खर्च करून येणा-या रसिक प्रेक्षकांची कोंडी करायची. हे म्हणे नेहमीचेच आहे. कदाचित एकदा कार्यक्रमाला येऊन गेलेले लोक परत कधी तिकडे फिरकत नसतील पण नवे-नवे बकरे सापडतातच ना! हे जर दरवर्षीच असं होत असेल तर यशवंत देवांची कविता, 'दर वर्षी येत होतो पुढच्या वर्षी येणार नाही' थोडी बदलून म्हणावं वाटलं, 'इतकी वर्ष येत नव्हतो, दर वर्षी येणार आहे.' जाऊ, पुढच्या वर्षीही नक्की जाऊ, अधिक सावध, अधिक संगठित होऊन. बघूच, कालचा गोंधळ बरा होता असा अनुभव येतो की खरंच या अनुभवातून नीटनेटक्या संयोजनाचे काही पाठ गिरवले गेल्याचे जाणवते ते!
एका वयोवृद्ध जोडप्याची प्रतिक्रिया तर फारच विषण्ण करणारी होती. त्यांना सगळीकडच्या प्रचंड रांगांचा इतका त्रास झाला की ते म्हणाले, 'यांनी तिकिटे काढताना म्हाता-यांनी येऊ नका असे सांगितले असते तर फार बरे झाले असते. आम्ही आशाताईंचे गाणे म्हणून आलो.' आशाताईं आपल्या स्वरलहरींचे चांदणे शिंपीत गेल्या ख-या, पण कित्येकांवर पूनम सहलीचा चांद मातला मातला म्हणायचीच वेळ आली. म्हणूनच वाटलं आपण मात्र घेतला वसा टाकून चालणार नाही. मशाली पेटविण्याचा वसा.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या 'हॅलो सचिन प्रवासी' कार्यक्रमात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सचिन ट्रॅव्हल्सने आयोजित केलेल्या आशाताईंच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाविषयी ऐकले आणि इतर कुठलाच विचार न करता मैत्रिणींना पटापट फोन करून कार्यक्रमाला जायचे ठरवले. मराठी मनाचा उदंड उत्साह आणि हौस, आशाताईंच्या सुरांची मोहिनी, मराठी गीतांची मेजवानी शिवाय निमित्त कोजागिरीचे! मग आणखी विचार कसला करणार? लगेच तिकिटांसाठी धाव घेतली. तशी तिकिटं जरा महागच वाटली पण आशाताईंचे सूर प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी आणि मराठी माणसाची हौस यापुढे ते वाटणं टिकलं नाही. सर्वात पुढचं तिकिट 2232/- रुपये (करांसहित) होतं. आशाताईंचे गाणे खूप जवळून ऐकायला आणि पहायला मिळावे म्हणून पुढचीच तिकिटं काढली. तिकिटांवरचे आसन क्रमांकही नीट पाहून घेतले. पनवेलच्या स्वप्ननगरीत खुल्या मैदानात कार्यक्रमाचे आयोजन, अर्धवर्तुळाकार बसण्याची व्यवस्था, खाण्या-पिण्याची व जेवणाची व्यवस्था, मुंबई-पुण्याहून पनवेलला नेण्या-आणण्याची वातानुकूलित किंवा साधी वाहन व्यवस्था इत्यादीची व्यवस्थित माहिती तिकिटं काढताना मिळाली होती. सगळं अगदी कसं छान-छान वाटत होतं.
कोजागिरी पौर्णिमा तशी दोन दिवस आधीच होऊन गेली होती, पण लोकांच्या सुट्टीची सोय पाहून पूनम सहल 27 ऑक्टोबरच्या शनिवारी आयोजित केली होती. दुपारी चार वाजता दादरहून शिवाजी पार्कच्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळून आमची गाडी सुटणार होती. पण सकाळीच फोन आला की चारच्या ऐवजी तीन वाजता या म्हणून! माझ्या मैत्रिणीला वेळेबाबतच्या या कोटेकोरपणाबद्दल शंकाच होती. तिने "तीन म्हणजे सव्वा तीन, साडे तीन, पावणे चार असे आम्हाला तिष्ठत नाही ना ठेवणार?" असे स्पष्टच विचारून घेतले. यावर "नाही हो, हे सचिन ट्रॅव्हल्स आहे." असे अगदी छातीठोक गर्व से कहो छाप उत्तर मिळाले. आत्तापर्यंत सगळी व्यवस्था स्वत:च करत सर्वत्र प्रवास करणा-या आमच्या सारख्या बिचा-यांना काय कळणार सचिन ट्रॅव्हल्स काय चीज आहे ते ! पण घोडं मैदान जवळच होतं. सचिन ट्रॅव्हल्स काय चीज आहे ते कळायला फार वेळ जावा लागला नाही. पुन्हा फोन...
"मी सचिन ट्रॅव्हल्स मधून बोलतेय. तुम्ही ---- बोलताय का?"
"हो"
"अहो, आता नं कायर्क्रमाच्या ठिकाणात जरा बदल झालाय. आधी तो खुल्या मैदानात होणार होता पण तिकडे डास खूप आहेत. किडेही भरपूर आहेत. शिवाय दव भरपूर पडतं. मग तुम्हाला कार्यक्रमाचा नीट आस्वाद घेता यावा म्हणून आम्ही आता तो वातानुकूलित नितिन देसाई स्टुडिओत करायचा ठरवलंय."
अरे वा! आमची किती काळजी ! आम्हाला डास चावतील म्हणून कार्यक्रम खुल्या मैदानात न करता बंदिस्त स्टुडिओत? आणि मग त्या कोजागिरीच्या चंद्राचं काय? काही तरी गडबड वाटली. म्हणून तिला विचारलंच, "अहो, पण ठिकाण बदलताना आम्हाला कुठे विचारलंत? म्हणजे अगदी आमच्यासाठी करत आहात हे सगळे म्हणून विचारतेय. ए.सी.चा त्रासही होऊ शकतो एखाद्याला. बरं, आहे कुठे हे ठिकाण?"
"पनवेलपासून 17 कि.मी. अंतरावर.... आणि आता तुमचे सीट नंबर बदललेत. कारण आधीची व्यवस्था खुल्यावर होती. तेंव्हा जास्त लोक एका रांगेत बसले असते. पण आता स्टुडिओत असल्याने 17व्या रांगेत 21, 22, 23 ..असे तुमचे.सीट नंबर असतील."
अच्छा, म्हणजे खरी गोम इथे होती तर !
"नाही चालणार. मला आमच्या ग्रूपमधल्या सगळ्यांना विचारावे लागेल. नाही तर सगळे पैसे परत करावे लागतील तुम्हाला. अगदी शेवटच्या क्षणी हे सांगण्याचे कारण?"
"हे कालच ठरलं. कारण तिकडे खूप डास..." पुन्हा तिच्या डासांची भुणभूण सुरू झाली. माझ्या आधी ती माझ्या एका मैत्रिणीशीही बोललीच होती. मला म्हणाली पुन्हा अर्ध्या तासाने फोन करते तोवर तुम्ही तुमच्या ग्रूपमधल्या इतरांना विचारून ठेवा. बरोबर अर्ध्या तासाने पुन्हा फोन. पुन्हा डास-किडे...इ...इ. शिवाय विनम्र विनंती "मॅडम, तुम्ही तिकिटं रद्द करू नका. बाकी कार्यक्रम अगदी आहे तस्साच होणार आहे, त्यात काहीच फरक नाही. फक्त तुमच्या सीट्स आता 17 व्या...." अगदी वैताग आला. अजून सगळ्यांशी बोलणे झाले नसल्याचे सांगितल्यावर पुन्हा अर्ध्या तासाने तिचा फोन. तिकिटं रद्द करणे शक्य नव्हते कारण कोल्हापूरहून एक ग्रूप यायचा होता. तो पुण्यात येऊन सचिन ट्रॅव्हल्सच्या पूनम सहलीत सहभागी व्हायचा होता. त्यांनी कोल्हापूर सकाळी 6 वाजताच सोडलं होतं. कार्यक्रमाचं ठिकाण खुल्यावरून बंदिस्त करण्याचं कारण आशाताईंची सुरक्षा, रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम करण्यात कायद्याची येणारी अडचण असे कोणतेही दिले असते तर ते मान्य केले असते पण 'आपल्याच भल्यासाठी' हा जो आव होता तो संतापजनक होता. शिवाय त्यासाठी आम्ही मागच्या रांगेतले आसनक्रमांक निमूटपणे मान्य करावेत या दृष्टीने चाललेला प्रयत्नही उबग आणणारा होता. लाडिक सुरात कार्यक्रमाला कसा अपेक्षेपेक्षा उदंडच प्रतिसाद मिळाला हेही ऐकविण्यात आले. पण झेपत नसताना ठरल्यापेक्षा जास्त तिकिटं विकायला सांगितलं कुणी होतं? शिवाय सुरुवातीच्या काही रांगा अतिमहत्वाच्या विशेष आमंत्रितांसाठी राखीव होत्या. काहीच पटत नव्हतं तरी केवळ आशाताईंच्या गाण्यासाठी हे सगळं सहन करून आणि सतरावी रांग मान्य करून कार्यक्रमाला जाण्याची तडजोड स्वीकारली.
ठीक पावणे तीन वाजता मीनाताईं ठाकरेंचा पुतळा गाठला. सिल्क साड्यांची सळसळ, गजरे, मंद सुवासाचे सेंट शिंपडलेली गानवेडी सुगंधित गर्दी. थव्या-थव्याने लोक पुतळ्याभोवती जमू लागले. तीन, सव्वा तीन, साडे तीन, पावणे चार, चार, सव्वा चार.... मंडळी तिष्ठत होती. आमची सोडून वेगवेगळ्या बसगाड्यांचा पुकारा होत होता आणि त्या रवाना होत होत्या. पाच-सहा गाड्या गेल्यानंतर आमची गाडी आली आणि सव्वा चारच्या सुमारास सुटली. गाडीमध्येही ठिकाण बदलाबद्दल तीच-तीच माहिती दिली गेली. नंतर कार्यक्रमाची माहिती, यात खाण्या-पिण्याबद्दलची जास्त. आधी नाश्ता, मग यशवंत देवांचा कार्यक्रम, नंतर जेवण, मग आशा भोसलेंचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम, तो झाल्यावर मसाला दूध आणि शेवटी आशा भोसलेंच्या हिंदी गाण्यांवर नृत्यांचा कार्यक्रम. रात्री कार्यक्रमात कुणाला झोप येऊ नये म्हणून सतत चहा-कॉफीची सोय असल्याचेही सांगण्यात आले.
संध्याकाळी सहाच्या सुमारास नितिन देसाई स्टुडिओच्या दारात पोहोचलो. ब-याच गाड्या येऊन ठेपल्या होत्या. पुणे, दादर, बोरीवली, ठाणे नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या असंख्य बसगाड्या पाहून आतल्या गदीर्ची कल्पना आली. आत गेलो तर आधी पोहोचलेल्या लोकांचा नाश्ता सुरू झाला होता. ध्वनिवधर्कावरून वेगवेगळ्या सूचना दिल्या जात होत्या. 'बदललेल्या ठिकाणामुळे बदललेले नवे आसनक्रमांक असलेल्या प्रवेशिका देण्याची व्यवस्था समोरच्या झाडाखाली करण्यात आली आहे.', ' 'टॉयलेटची व्यवस्था माझ्या डाव्या हाताला आहे' 'नाश्ता तयार आहे, सर्वांनी नाश्ता करून घ्यावा ' अशा सगळ्या सूचना एका पाठोपाठ एक येत होत्या. पण बोलणारी व्यक्ती दिसत नसल्याने समोरचे झाड कुठे आहे आणि डावा हात कुठे आहे हे कळत नव्हते. मोठमोठ्या रांगा मात्र सगळीकडे दिसत होत्या. नाश्त्याची व्यवस्था समोरच दिसली त्यामुळे तिकडे आधी मोर्चा वळवला. नाश्त्याची सोय अतिशय उत्तम होती.
प्रचंड जनसंख्येमुळे नाश्ता, चहा, नवीन प्रवेशिका आणि टॉयलेट अशा सर्वच ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. जुन्या आसन क्रमांकांच्या मोजक्याच याद्या आणि नवीन आसन व्यवस्थेची माहिती देणारे अपुरे संगणक. अगदीच तुटपुंज्या यंत्रणेच्या आधारावर काम चालले होते. नवे आसनक्रमांक बसमध्येच देऊन हा प्रश्न सोडवता आला असता. पण कित्येकांना आपली आसनांची रांग अचानक भलतीच मागे गेली आहे याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे लोकांना एकदा मुक्कामावर नेऊन सोडले की त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्यावाचून गत्यंतर नाही, तिकिटे रद्द होण्याची शक्यता नाही असा हिशेबी विचार या मागे असावा अशी शंका यायला लागली. भली मोठी रांग झाडाखाली वळसे घेत उभी असतानाच थोड्याच वेळात आतमध्ये कार्यक्रम सुरू होत असल्याची कुणकुण लागली. लोकांमध्ये अस्वस्थता वाढली. रांग तर जागच्या जागीच खिळल्यासारखी होती. शेवटी ज्यांची तिकिटे 2232/- रुपयांची आहेत त्यांनी नवीन आसनक्रमांक न घेताच सभागृहात प्रवेश करावा असे सांगण्यात आले. इतरांचे काय हा विचार मनात घेऊनच तिकडे धाव घेतली. आरंभीच्या कार्यक्रमाचे कलाकार मंचावर स्थानापन्न झाले होते. प्रवेशद्वारावरच सांगण्यात आले, 'सगळे लोक पुढे जाऊन बसले आहेत, आत खूप गोंधळ आहे त्यामुळे आम्ही तुमच्या आसनांची खात्री देऊ शकत नाही.' म्हणजे? 'सचिन ट्रॅव्हल्स' च्या एका गणवेशधारी माणसाला पकडले आणि त्याला 17 व्या रांगेतल्या आमच्या आसनक्रमांकांवर आमची बसण्याची व्यवस्था करून द्यायला सांगितले. कारण 17व्याच काय त्यानंतरच्या कित्येक रांगांवर लोकांनी बसून घेतले होते. आमची आसने मिळवून देणे, ज्यांनी आम्हाला आसनक्रमांक दिले त्यांचेच काम आहे, आम्हाला त्यासाठी व्यक्तिश: कुणाशी भांडावे लागू नये अशी आमची रास्त इच्छा होती. पण त्या स्वयंसेवकाने एकंदरीत परिस्थिती पाहिली आणि बाहेर पळ काढला. आतमध्ये 'सचिन'चा एकही स्वयंसेवक नव्हता. मंचावर यशवंत देवांच्या संचाने आपली वाद्ये परजायला सुरुवात केली होती. आता थेट मंचावरच धाव घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आमच्यासारखे असंख्य होते. मराठी माणसाच्या सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावरही तो निमूट राहील हे शक्य नव्हते. आमच्यासारखीच अनेकांनी मंचाकडे धाव घेतली.
संयोजक आणि श्रोते-प्रेक्षक यांच्यात वादावादी सुरू झाली. लोक पैसे परत मागू लागले. पुन्हा परत मूळ ठिकाणी पोहोचविण्याची मागणी करू लागले. सचिन जकातदार स्वत: मंचावर हजर होते. पुन्हा तीच-तीच स्पष्टीकरणं दिली जात होती. 'अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रतिसाद', 'डास-किडे-दव', 'ए.सी.ची सोय' इत्यादी इत्यादी. लोक बधेनात. मग 'चुका होतात माणसाच्या हातून जरा समजून घ्या.' हे सुरू झालं. पण या झालेल्या चुका नव्हत्याच, केलेत्या कृती होत्या. एका शब्दाने लोकांना आपआपल्याच आसनांवर बसण्याची विनंती केली जात नव्हती. खरं तर चूक लोकांची नव्हतीच! लोक इमानदारीत आपल्या आसनांवर बसले होते. काही लोकांच्या आसनांबद्दल प्रश्न निर्माण झाला होता. ही मंडळी जेंव्हा आपल्या आसनांबद्दल तक्रार करायला मंचावर गेली तेंव्हा त्यांची योग्य व्यवस्था करणं योग्य ठरलं असतं. प्रश्न सुटला असता. पण त्यांना सूचना दिली गेली, "ठीक आहे, पुढे जिथे कुठे जागा शिल्लक असतील तिथे बसून घ्या. कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होत आहे." ही सूचना ध्वनिवर्धकावरून दिली गेल्याने तमाम लोकांना ही सूचना सर्वांसाठीच आहे असे वाटले आणि ते आपल्या आसनांवरून उठून पुढच्या सर्व रिकाम्या आसनांवर जाऊन बसले. इथूनच पुढच्या सगळ्या गोंधळाला सुरुवात झाली.
पाच हजार श्रोत्यांची अपेक्षा करणा-यांना त्याहून कमीच असलेल्या लोकांची व्यवस्था नीट का करता येऊ नये? हे आपल्या आवाक्या बाहेर जाते आहे असे वाटल्यावर तिकिट विक्री थांबवली का नाही? ' मुलं-बाळं असणा-यांनाही कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा म्हणून आम्ही मुलांचीही वेगळी व्यवस्था केली आहे, शिवाय डॉक्टरांचीही उपस्थिती असेल' अशी जाहिरात करणा-यांना साधे पाच-दहा स्वयंसेवक आसनांच्या व्यवस्थेवर का नेमता येऊ नयेत? नवीन आसनक्रमांक आणि सतरावी रांग आम्ही मान्य केली होती तरी ती सुद्धा देण्याची व्यवस्था करणे संयोजकांना अशक्य का व्हावे? प्रश्न अनेक होते. संयोजकांकडे उत्तरे नव्हती.
व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले होते. लोकही ऐकेनात. अतिमहत्वाच्या विशेष आमंत्रित व्यक्तींसाठी सुरुवातीच्या अनेक रांगा खर्ची पडलेल्या दिसत होत्या. त्यांची वक्तव्ये आणि आम्हालाच समजावण्याचे प्रयत्न तर भयंकरच होते. 'अहो, ते म्हणताहेत ना चूक झाली म्हणून, मग आता बसून घ्या ना जागा असेल तिथे. कार्यक्रम सुरू कसा होणार?', 'ही मराठी माणसं म्हणजे जातील तिथे भांडतातच. जरा समजून घ्यायला नको', ' खुर्चीचा मोह मराठी माणसाला कधी सुटलाय ?' ही सगळी मल्लीनाथी आपली मराठी माणसेच करीत होती जी अतिमहत्वाच्या विशेष आमंत्रित व्यक्ती म्हणून कार्यक्रमासाठी दिडकीही न मोजता आली होती! प्रश्न पैशाचा नाही असं कितीही म्हटलं तरी शेवटी प्रश्न पैशाचासुद्धा होताच की! आमच्या खुर्च्या आम्हाला देणं जर शक्य नसेल तर पैसे परत करा या मागणीचा जोर वाढला. आशाताईंच्या गाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, इतके पैसे मोजून मनस्ताप विकत नव्हता घ्यायचा आम्हाला हे लोकांच म्हणणं.
काहीच तोडगा निघत नसल्यानं लोकांनी पैसे परत मागणं यात काही गैर नव्हतं. 'लोक काय हो, करतील थोडा वेळ आरडाओरड आणि कार्यक्रम सुरू झाला की बसतील गप्प दिसेल त्या खुर्चीवर' असं मराठी माणसाला कुठेतरी गृहीत धरल्याचं जाणवत होतं. फसवणुकीचं दु:ख आणि संताप तर होताच. पण मराठी माणूस भांडकुदळच अशी प्रतिमा उभी करताना मराठी माणूस कष्टाने कमावतो आणि ते हौसेखातर खर्च करतो या वास्तवाकडे दुर्लक्ष होत होतं.
मंचाकडे धाव घेणा-यांची संख्या वाढली. शाब्दिक चकमकींना जास्त धार चढली. 'आम्ही काही करू शकत नाही' अशासारख्या उत्तरांनी सन्माननीय तोडग्याची आशा मावळली तशी आदराची भावना लोपून सभ्य भाषा 'अरे-तुरे' वर आली. पुढचे पाऊल धक्काबुक्की आणि शेवटचा टप्पा पोलिसांना पाचारण! क्रमाक्रमाने हे सर्व टप्पे पार पडले. व्ववस्थापक आणि श्रोते-प्रेक्षक यांना एकमेकांपासून दूर करून सुरक्षित अंतरावर ठेवण्यात पोलीस यशस्वी झाले. पण समोरची गर्दी हटली नव्हती. शेवटी मंचापासून विशेष आमंत्रितांच्या पहिल्या रांगेपर्यंतच्या मोकळ्या जागेत खुर्च्या टाकायचे ठरले. मंचावरूनच प्लास्टिकच्या खुर्च्या खाली द्यायला सुरुवात झाली. यात दांडगाई करू शकले ते टिकले. आम्ही ढकलाढकली आणि दांडगाई करून तीन खुर्च्या मिळवू शकलो. ग्रूप पांगला. एकत्रितपणे कार्यक्रमाचा आनंद लुटण्याच्या कल्पनेला सुरुंग लागला. थोड्याथोड्या वेळाने एकमेकींना आपल्या जागा देण्यासाठी मागे-पुढे करायचे ठरवले. संताप धुमसत होता पण प्राप्त परिस्थितीला शरण जाण्याव्यतिरिक्त दुसरा इलाज नव्हता.
क्रमश:
यु.एस. ला आल्यानंतर दर ११ महिन्यानी कंपनी (नवऱ्याची) एकदा भारतात जाण्यास परवानगी देते. तशीच आम्हालाही मिळाली. आणि त्यातून नणंदेचे लग्न ठरले आणि मी आत्याही झाले. भावाला मुलगा झाला. म्हणून आम्ही तिच्या लग्नाला आणि भाच्याच्या बारशाला पोहोचू अशा दृष्टीने बेत ठरवले. दिर-जाऊ कॅनडातून निघणार आणि आम्ही न्युअर्क वरून. पण काही कारणाने नवऱ्याला आमच्यासोबत यायला जमणार नव्हते. तो नंतर ८-१० दिवसांनी निघणार होता. मुंबईवरून पुढे पुण्याला एकत्र जाता यावे या हिशोबाने दिराचे विमान ज्यावेळेत मुंबईत पोहोचणार होते साधारण त्याच वेळेत आमचे (मी आणि माझा लेक) विमान पोहोचेल आशीच वेळ पाहून एअर इंडियाचे बुंकिंग केले होते. दिर-जाऊ रात्री ११.०० ला पोहोचणार होते तर आम्ही रात्री ११.३० ला. म्हणजे वेळ तशी योग्यच होती. टिकीट कंफर्म झाल्याचे समजल्यावर माझे शॉपिंग सुरू झाले. कोणासाठी काय काय न्यायचे... नणंदेसाठी काय घ्यायचे..छोट्या भाच्यासाठी काय घ्यायचे..? चॉकलेटस, परफ्यूम्स, शांपू, कॉस्मेटिक्स.. भरपूर खरेदी झाली. बॅगा बरून त्याचं वजनही करून झालं. हार्टफोर्डवरून न्युअर्क पर्यंत जाण्यासाठी C.T. लिमो चं बुकिंग ही करून झालं. २३ फेब्रु. रात्री ९.३० ला फ्लाइट होतं. चेक इन साठी ६.०० ला पोहोचणं आवश्यक होतं. त्या हिशोबाने दुपरी १२.३० च्या सि.टी. लिमो चं बुकिंग केलं. नवरा आम्हाला एअरपोर्टला सोडून रात्री न्यूयॉर्क ला मित्राकडे जाणार होता. सग्गळं सग्गळं कसं अगदी मनासारखं जमलं होतं. पण........
एक दोन दिवसापूर्वीची संध्याकाळ.मी घरी एकटाच होतो.समोर कागद व लेखणी घेऊन बसलो.काही तरी सुचत होतं पण नीट आकारत नव्हतं.खिडकीतून बाहेरचं दिसणाऱं आकाश निळसर होतं. मी भरकटल्यासारखा लिहत गेलो.
निळं आभाळ आहे निळं घरटं
निळ्या चिमणीचं...
"अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना", एक लहान मुलगा मला म्हणत होता.
दुपारी बेल वाजल्यावर मी दरवाजा उघडला. समोर दोन ८/१० वर्षांची मुले एका पिशवीतून काही कागद काढत होते. त्यातील एक मुलगा मला म्हणाला "अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना". मला हसू आले. त्या मुलाचे वाक्य मार्मिक होते. मी तो कागद घेण्याकरीता वाट बघत होतो. पत्रक हिंदीत होते. "क्या पटाखे फोडना जरूरी है?" ह्या संबंधी.