कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ....

’क’ या अक्षरापासून सुरू होणारे ’कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ...’ हे वाक्य सर्वांना माहितीच आहे. अशीच इतर अक्षरांपासून सुरू होणारी ही काही वाक्ये.
(यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही.)

कुठे बरं वाचलंय हे? -४

परवा ज्येष्ठ महिन्यात पुण्यामध्ये जलप्रलय झाला आणि लोकांचे प्रचंड नुकसान झाले. हजारो घरे बुडाली. चिखल, राड, घाण यांनी सर्व पुणे शहर भरून गेले आहे, इत्यादी बातम्या बाहेर पसरल्या तशी सबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली. आपल्या -----त तर अर्थातच फारच गोंधळ उडाला. त्याचे कारण अगदी उघड होते. एक तर, ----- हे गाव तसे लहान असले तरे पुण्यापासून अवघे सव्वाशे दीडशे मैल अंतरावर होते. तेव्हा पुण्यातल्या हाहाःकाराचा परिणाम -----त होणे स्वाभाविक होते. पुणे आणि ----- हे दोन महत्त्वाची गावे, शिवाय पाण्यानेच जोडली गेलेली होती. पुण्याची मुळामुठा पुढे भीमेला मिळते. या भीमेला नंतर नीरा नदी सामील होते. त्या नीरा नदीच्या काठाने पाचपंचवीस कोस गेल्यावर खळखळीचा ओढा ०००००जवळ नदीला मिळतो. या ओढ्याला जे इतर ओढे मिळाले आहेत त्यातच ~~~चा ओढा आहे. या ~~~च्या ओढ्यातच -----चा ओढा एकदम घुसलेला आहे. त्यामुळे पुणे आणि ----- ही पाण्याने जोडली गेलेली गावे आहेत याबद्दल निदान -----त तरी कोणाचे दुमत नव्हते. एक पावसाळ्यातले महिना दोन महिने सोडले तर एरवी या ओढ्यांना अजिबात पाणी नसते म्हणून, नाहीतर एखाद्या नावेने हे दळणवळण सहज चालू ठेवता येईल अशी वस्तुस्थिती होती. त्यामुळे -----च्या लोकांत या जलप्रलयाची वार्ता कळल्यावर फारच खळखळ उडाली. हे पुण्याचे भयंकर पाणी -----त येऊन आपलेही गाव पाण्यात बुडून तर जाणार नाही अशी भीती नेहमीप्रमाणेच या लोकांना वाटावी हे स्वाभाविक होते; व या खळखळीचे आणखी एक कारण होते. -----तल्या अनेक मंडळींची नातीगोती पुण्यात होती. ही नातीही काही लांबची नव्हती, जवळचीच होती. ११ १११चा सख्खा मावसमेव्हणा मुंढव्याला हमाल होता. २२ २२२२च्या चुलतभावाचे पुण्यात वर्षासहामहिन्यांनी जाणेयेणे होते. ३३ ३३३च्या साडूचे घर पुण्यातच कोठे तरी होते आणि ४४४४ ४४४चे जरी नात्यातले कुणी नव्हते तरी पुणे नावाचे एक मोठे गाव आहे आणि तेथे बरीच माणसे राहतात, ही गोष्ट त्याने ऐकलेली होती. ५५ ५५५५ने तर वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी शहर पुणे प्रत्यक्ष पाहिलेले होते. त्यामुळे तर पुण्याबद्दल त्याला इतरांपेक्षा बरीच माहिती होती. इतक्या गोष्टी असल्यावर पुण्यातील हाहाःकाराचा परिणाम -----वर होऊ नये तर काय व्हावे...?

गोपालकाला: एक आगळावेगळा चित्रपट

 

'नुने बनवलेला चित्रपटांचा लगदा' उर्फ ए. बी. सी. एल. आता सादर करीत आहोत आमचा आगामी, चाकोरीबाहेरच्या, मनोरंजक, अप्रतिम, मनातल्या अनेक भावतरंगाचा वेध घेणार्‍या,सर्व प्रकारच्या तांत्रिक करामतींनी खच्चून भरलेल्या इ.इ. असा चित्रपट : 'गोपालकाला'. हा चित्रपट शोले, दि. दु. ले.जा. ,धू१, धू२, ल. र. मु. भा. आदी चित्रपटांचा उच्चांक मोडेल अशी आमची पुरेपूर खात्री आहे. चित्रपटाची कथा ही अशी:

आनंद, अत्यानंद आणि अंत

सूचना : पूर्ण वाचल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नये.... :-)

एक होता आनंद आणि त्याचा मित्र अत्यानंद.

दोन्ही एकदा भेटले. भेटल्यावर त्यांचा कार्यक्रम ठरलेला. दारू सिगारेटी पिणे. दारुचे तीन चार ग्लास आणि सिगरेटी पिऊन झाल्यावर आनंद म्हणाला,

पत्ता शोधणे - एक कला

६४ कला कोणत्या आहेत हो? त्यात पत्ता शोधणे ही कला ही समाविष्ट आहे का? नसल्यास करता येईल का?

का? सांगतो.
सिनेमा चालबाज:
शक्ति कपूर पहिल्यांदा शहरात येतो. तो कादर खानला एक पत्ता (अनुपम खेरचा) विचारतो. कादर खान चाकू काढून त्याच्याकडील सामान लुटून घेतो. शक्ति कपूर विचारतो, " अरे, पत्ता तर सांग". कादर खान म्हणतो," ऐसा करो, यहाँ से आगे जाओ. चौक पे बायें मुड जाना. अगले चौक से बायें मुड जाना. तो फिर आगे एक और चौक आयेगा. वहा से फिर बायें मुडना. अंत में और एक बार बाये मुडना. तुम यहॉं आओगे. तुम मुझे मिलोगे. मैं फिर तुम्हे लूट लुंगा."

आणखी एक जीवदान...!

मुंबईत स्थायिक होऊन तीन वर्षे झाली. काही आठवड्यापूर्वीच घेतलेल्या ब्लॅक होंडा सिटीतून कुठेतरी दूर बाहेरगावी जाऊन यावेसे एकसारखे वाटत होते. पण कधी, कसे, कुठे हे काही ठरत नव्हते.

"बायकोच्या गावी कोल्हापूरला का नाही? येता- येता आपलं बेळगावही करता येईल", चकली खाता-खाता एक सुपीक विचार माझ्या डोक्यात शिरला. तसा तो बोलून दाखवण्यासाठी मी माझ्या सौ ला- जानूला- हाक मारली.  तशी ती कधी डायरेक्ट येतच नाही माझ्याकडे. म्हणजे तसे नव्हे! हातातली कामं आवरत किंवा आपल्या बोलिभाषेत 'मल्टिटास्किंग' करत ती मलाही उरकते. गेली दोन-तीन वर्षं हे असंच सुरू आहे. याही वेळी असेच घडले. स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीत येताना तिच्या हातात होते रांगोळीचे डबे! ते डबे घेऊन ती बाहेरच्या दारापाशी गेली; परतताना वर्तमानपत्र घेतलं आणि ती अक्षरशः हबकलीच!

महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थिती: अवलोकन आणि वेध - भाग २

शिवसेनेचा जन्म होऊन एकेचाळीस वर्षे झाली. या कालावधीत शिवसेनेने जितक्या कोलांट्याउड्या मारल्या आहेत तितक्या एकादा विदूषक मारता तर एखादा जीवनगौरव पुरस्कार मिळवून जाता. प्रजासमाजवादी पक्षाशी युती, मग ती तोडणे (या प्रकरणात प्रमोद नवलकर समाजवाद्यांकडून शिवसेनेकडे हस्तांतरित झाले), कम्युनिस्टांना रक्तरंजित (कॉ कृष्णा देसाईंचा खून कुणी केला हे उघड गुपित आहे) विरोध, त्यासाठी वसंतराव नाईकांच्या (आणि नंतर वसंतदादा पाटलांच्या) आश्रयाखालील 'वसंतसेना' असे हेटाळणीखोर बिरूदही दुर्लक्षित करणे, दत्ता सामंतांच्या वाढत्या वर्चस्वामुळे घाबरून शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी उघड (अगदी शिवाजी पार्काच्या व्यासपीठावर) हातमिळवणी, भाजपबरोबर युती, मग ती तोडून परत वेगळी चूल, त्याच काळात पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत लागलेला हिंदुत्त्वाचा शोध (त्या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा जनता पक्षाच्या उमेदवाराला होता), मग प्रमोद महाजनांनी कष्टाने घडवून आणलेली आणि काहीही करून टिकवलेली युती..... चांगलेच रंगीत-संगीत चित्र आहे.

महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थिती: अवलोकन आणि वेध - भाग १

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गेली दोन वर्षे सर्वसाधारणपणे 'स्थिर' म्हणता येईल. अर्थात 'स्थिर' हा सापेक्ष शब्द आहे. आत्ता कर्नाटकात वा गुजरातमध्ये जे चालू आहे त्या तुलनेत स्थिर.

या दोन वर्षांतील मोठ्या घडामोडी कुठल्या, तर नारायण राणेंचे आणि राज ठाकरेंचे निर्गमन. पण त्या दोन्ही गोष्टी एका पक्षाची सदस्यसंख्या थोडीशी वाढवण्याला आणि एका नवीन पक्षाला जन्म द्यायला कारणीभूत ठरल्या एवढेच. अख्ख्या महाराष्ट्रावर त्या घडामोडींचा परिणाम झाल्याचे काही दिसून येत नाही. त्यामुळे त्या घडामोडींचा 'विशेष' परामर्श घेण्याची गरज नाही. प्रत्येक पक्षाचा हिशेब मांडताना त्यांची दखल घेतली जाईलच.

...बरसात

बस स्टॉपवर येऊन थांबली, आणि घाईघाईनं रांगेतली गर्दी पुढंपुढं सरकू लागली. रांगेबाहेरच्या त्या काहीश्या वयस्कर इसमाशी बोलणार्‍या तिला बहुधा गर्दीची ही घाई कळलीच नव्हती. मागून दोनचार जणांनी आवाज दिल्यावर तिची पावलं जडपणे पुढं सरकली. तो इसमही तिच्याइतक्याच जडपणानं बाजूनं पुढेपुढे सरकत चालत होता. रांगेबरोबर तीदेखील एखाद्या यंत्रासारखी बसमध्ये चढली आणि रिकाम्या राहिलेल्या एकमेव बाकावर चक्क विंडो मिळाल्यानं तिचा चेहेरा खुलला. तो इसमही मग बसबाहेर विंडोजवळ येऊन उभा राहिला. आता बस जवळपास भरली होती. पुढचा सिग्नल बंद होता म्हणून ती स्टॉपवर उभी होती. तेवढ्यात त्या इसमाशी किती बोलू अन काय असं तिला झालं होतं...

अश्या मुलांना कोण सावरेल सिगरेट,दारू का वाचनाची सवय

      आज चवथा दिवस माझा मित्र माझ्याकडे हाच प्रश्न विचारतो आहे ती अशी का वागते आहे? काय झाल काही माहित नाही फोन नाही मेसेज नाही मिस कॉल नाही.पाच दिवसा अगोदर प्रोबलेम आहे सांगितल होत.त्या दोघांच्या बाबतीत लिहायच झाल तर हा माझ्या सोबत कामाला आहे आणी ती कुवेतला काही दिवसासाठी गेली आहे.फोनच जास्त बिल येईल म्हणून दोघांच मेसेज आणि मिस कॉल द्यायच ठरल होत.प्रोबलेम काय तर तिकडे राहणाऱ्या एका मुलाने तिला आर्थिक मदत करून तिला लग्नाची मागणी घातली होती.हा हा हा या प्रोबलेम वर पण हसायला येईल पण मुलिंच हे वागण ईतक सोप नसत‌.त्याला समोर अस अस्वस्थ बघताना एका मागोमाग दुसरी सिगरेट लाईट करताना बघीतल्यावर कळतच नव्हत मन कोणाच जळतय त्याच की माझ‍.जणू माझ्याच मनात दडवून ठेवलेले प्रश्न तो मला विचारत होता ती अशी का वागते? वाचनाची आवड आणि न उलगडणाऱ्या या प्रश्नाकडे दुऱ्लक्ष करता करता दिड वर्षानंतर मी ही त्याच्या बरोबर या प्रश्नाची उत्तर शोधू लागलो होतो. तो बोलतच होता त्याचे प्रश्न संपतच नव्हते मी काय समजायच यार या सगळ्यात रात्र भर झोप नाही आठवड्याच्या शेवटी दोन बियर मारणार आणि झोपून जाणार त्याच हे सगळ वागण बोलण बघीतल्यावर मला ही वाटू लागल हा प्रश्न खरच गंभीर आहे पण याची उत्तर माझ्याकडे ही नव्हती.त्याच बोलण खुप झाल आता आता मी सेटल होणार भरपूर पेसा कमवणार.या सगळ्यावर बोलता बोलता मी बोलून गेलो अरे तू सेटल व्हायच्या मार्गावर आहेस अरे आपल वय २४ वयाच्या २६-२८ मध्ये लोक सेटल होतात.हे बोलल्या बोलल्या थोडयाफार प्रमाणात मला प्रश्नाचा उलगडा झाल्यासारखा वाटला आणि म्हणालो खुप कमी वयात आपण प्रेमाच्या भानगडीत पडलो रे.                                 मुळात मुलिंना लवकर समज येते त्यात ही हि गोष्ट सुद्धा येत असावी बहूतेक.मुल ही कायम त्याच दिवसात राहतात ते म्हणजे प्रेमालतले सुरवातीचे काही वर्ष. मुलींनेही कायम त्याच दिवसात राहाव अशी मुल अपेक्षा करतात.मुल ही तिच्याकडून न मिळणाऱ्या वेळेत भांडाभांड करून ते दिवस फुकट घालवतात अस वाटत.त्या वेळेत सिगरेटी फुंकत दारू पित बसण्यापेक्षा एखाद पुस्तक वाचून होईल एखादी नवीन माहिती मिळवावी अस वाटायला हव.मुलिंचा वेळ लग्नाअगोदर ही घर आणि नोकरी संभाळण्यात जातो.पण लग्नाच्या वेळी मुली सगळ्या बाजूने विचार करतात. काय होईल जर मित्राची प्रेयसी बोलली की माझ्या घरचे माझ्यावर त्या मुलाशी लग्न करण्याची जबरदस्ती करत आहेत मी तुझ्याशी लग्न करते घेउन जाशील तुझ्या घरी आत्ता मला लग्न करशील माझ्याशी आता.त्यावेळेस मुलाकडे काय असेल तिच्याबरोबर घालवलेले अगोदरचे क्षण की सध्या हे करण्याच्या परिस्थितीत नाही आहोत ही समज.