वारी---७

               अमेरिकेत जाण्यापूर्वी पद्मश्री पु̮.ल.देशपांडे यांचा " एक बेपत्ता  देश" या शीर्षकाचा लेख वाचला होता.त्यात त्यांच्या अमेरिकावास्तव्यात ते बाहेर पडले असताना एका म्हातारीला एक पत्ता विचारायला जातात तेव्हा ती म्हातारी कशी थरथर कापायला लागते कारण एकट्यादुकट्या व्यक्तीला गाठून लुबाडण्याचे प्रसंग बरेच घडत असल्यामुळे हा आपल्यावर चाल करायला आलाय की काय अशी अनुभवामुळे तिला कशी भीती वाटते याचा उल्लेख असल्यामुळे मी फिरायला बाहेर पडल्यावर अमेरिकन म्हाताऱ्या बाईला आपल्या कोठल्याही कृतीमुळे भीती वाटू नये याची दक्षता घ्यायचे ठरवले होते (तरुणीच्या बाबतीत माझ्याबरोबर सौ. असल्यामुळे ही शक्यता नव्हती )पण या अमेरिकनांनी त्याही बाबतीत आमची दांडी उडवली.कारण एकदा मी आणि सौ. दोघेही फिरायला बाहेर पडलो.आम्हाला फारशी थंडी वाजत नसल्यामुळे आम्ही साधे स्वेटर्स घालून बाहेर पडलो तर एक अमेरिकन म्हातारा आमच्याजवळ येऊन अगदी कनवाळूपणे म्हणाला."अरे तुम्ही एवढ्या थडीत फक्त साधे स्वेटर्स घालून काय बाहेर पडलाय जॅकेटस घाला उद्यापासून . " अमेरिकन माणसे अगदीच माणूसघाणी किंवा माणसांना घाबरणारी असतात ही माझी गैरसमजूत दूर केल्याबद्दल आणि  आम्हाला प्रेमळ सल्ला दिल्याबद्दल त्या म्हाताऱ्याचे दुसऱ्या म्हाताऱ्याने(म्हणजे मी) आभार मानले आणि आम्ही पुढे गेलो.त्यानंतर पुढे एकदा माझ्या मित्राच्या मुलाकडे ( तो माझ्या मुलाचा मित्रही आहे.) आम्ही रहायला गेलो तेव्हा सकाळी फिरायला गेलो तेव्हा त्याच्या  अमेरिकन तरुण शेजारणीनेही मला गूड मॉर्निंग केले आणि तू माझ्या शेजाऱ्याचा पाहुणा आहेस ना अशी माझी विचारपूस पण केली.रस्त्यावर बऱ्याच अमेरिकनांनी गुडमॉर्निंग म्हणून आपल्या देशाविषयीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला उलट मधूनमधून दिसणाऱ्या भारतीय वाटणाऱ्यानी आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला ( आमच्याविषयी ते पण असेच म्हणत असतील) .पण एकूणच येथील लोक समोर येणाऱ्या व्यक्तीला हाय हॅलो म्हणतातच असे दिसले. अगदी तिकिटाच्या खिडकीत गेलेला माणूस अगोदर हाय म्हणूनच तिकिट मागणार.तरीही या देशाला एक बेपत्ता देश असा किताब पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या चोखंदळ व्यक्तीने का द्यावा समजले नाही. अर्थात त्यांच्याच सांगण्याप्रमाणे " हर गार्डाची शिट्टी न्यारी " त्याप्रमाणे अमेरिकेचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा.
                आम्ही तर कोणत्याही वेळी निर्धास्तपणे हिंडत होतो पण एकदा आमच्या मित्राकडे आम्ही दोघेच त्याचे घर जवळ असल्याने पायीच गेलो असता परतायला थोडा अंधार झाला तर त्यांच्या सुनेने आता चालत परत जाऊ नका असे सांगून आम्हाला आपल्या गाडीतून सोडण्याची तयारी दाखवली कारण आमच्या परतीच्या रस्त्यावर काही मुलांनी रस्त्यावर जाणाऱ्या व्यक्तीना लुटण्याचा प्रयत्न केला असे तिला समजले होते. आपल्याकडेही अगदी दिवसा ढवळ्या स्त्रियांच्या गळ्यातील साखळ्या,मंगळसूत्र घेऊन पसार होण्याचे असे प्रकार चालतातच.पण तरीही मर्द मराठ्यांनी अंगावर दागिने घालून बाहेर पडण्याची परंपरा सोडलेली नाही. पुण्यात असताना तर माझ्या एका मित्राला सकाळी नऊ वाजता तो रस्त्यावरून चालत असताना अगदी साळसूदपणे एका स्कूटरवाल्याने थांबवले आणि " अहो काका ते गृहस्थ तुम्हाला बोलावत आहेत असे सांगितले.माझ्या मित्राने थांबून पाहिले तर त्या व्यक्तीने जवळ येऊन " अहो काका पुढे दंगा सुरू झाला आहे तुमची आंगठी, घड्याळ आणि चेन काढून जपून ठेवा म्हणून त्याला अंगठी घड्याळ आणि चेन काढायला लावली आणि त्यालाच रुमालात गुंडाळायला लावली आणि त्याच्या हातातून घेऊन त्याच्या खिशात ठेवण्याचे नाटक केले.आमच्या मित्राने"तुम्ही कोण विचारल्यावर गुप्त पोलिस असे सांगितले आणि निघून गेला.थोड्या वेळाने मित्राने खिशात हात घालून पाहिले तर काय आंगठी,चेन आणि घड्याळ बेपत्ता.एकूण आपला देश बेपत्ता नसला तरी येथे वस्तू आणि कधीकधी माणसेही बेपत्ता होतात  हे खरे ! एक गोष्ट मात्र खरी आपल्या देशात रस्त्यावर एकटेदुकटे असणे क्वचितच शक्य असते आणि येथे मात्र रस्त्यावर हिंडणारे लोक कमीच.एकदा तर मी रस्ता चुकलो तर योग्य रस्ता विचारण्यासाठी मला अक्षरशः माणसे हुडकत हिंडावे लागले. 
        फिरण्यासाठी सगळेच रस्ते मोकळे असल्यामुळे  मी बऱ्याच रस्त्यांचा शोध घेतला.रस्त्याना वेगवेगळ्या प्रकारे संबोधण्याचे कारण काही मला कळले नाही.कधी रोड,तर कधी स्ट्रीट तर कधी अव्हेन्यू तर कधी ड्राइव्ह तर कधी बुलेवार्ड,तर कधी नुसतेच सीटी ( हा कशाचा शॉर्ट फॉर्म आहे?),हायवेला रूट म्हणतात.आपल्याकडेही पूर्वी बोळ(शालूकरांचा) गल्ली (तपकीर),आळी ( दाणे)असे काही शब्दभेद होते पण आता मात्र शुद्ध रोड हा बहुतांशी एकच पर्याय वापरला जातो. अगदीच मराठीचा अभिमानी असेल तर मार्ग अथवा पथ हे शब्द वापरतोऽनेक रस्त्यांच्या पाहणीत येथील घरांचे बरेच नमुने पहायला मिळाले. बाहेरून पहायला घरे एकाद्या काड्या पेटीच्या घरासारखी भासतात कारण लाकडाचा जास्तीतजास्त वापर हिंवाळ्यात बर्फ घरावर साठायला नको म्हणून छते उतरती आणि भिंतींवरसुद्धा तिरप्या लाकडी पट्ट्या बसवलेल्या असतात̱ छतांना ती उतरती असल्यामुळे हिरवा , तपकिरी.करडा, निळा  वेगवेगळे रंग दिलेले दिसू शकले आणि लाकडी भिंतीना पण. घरासमोर भरपूर मोकळी जागा आणि त्यावर हिरवेगार लॉन‌ समोर सुंदर फुलझाडे आणि त्यांच्यावर आलेली सुंदर फुले सकाळी शेजारच्या घरातील म्हातारी माणसे देवपुजेला पळवत नाहीत̮. लॉनवर छान संगमरवरी पुतळे आणि त्याना धक्का लागेल अशी मुळीच काळजी लोकांना वाटत नाही हे आश्चर्य.कारण आमच्या भारतातल्या घरापुढील बागेतील फुले आम्ही उठण्यापूर्वी शेजारच्या आजींच्या देवांची पूजा करण्यासाठी गायब होतात एवढेच काय समोर ठेवलेली कचऱ्याची कुंडीसुद्धा टिकत नाही.येथे जागेचा तुटवडा नसल्यामुळे घरेही चांगलीच प्रशस्त असावीत. असावीत म्हणण्याचे कारण मी काही एकूण एक घरे पाहिली नाहीत पण पाहिली तेवढी कमीतकमी दहा हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळावर बांधलेली आणि तीन शयनकक्ष तीन विश्राम खोल्या (रेस्टरूम) आणि तळघरयुक्त.तळघरात संगीतवाद्ये,टेबलटेनिसचे टेबल आणि बऱ्याच वस्तूंचा साठा असतो.माझ्या एका विद्यार्थ्याने जागा विकत घेऊन घर बांधले आहे त्यात सात शयनकक्ष आहेत.त्या नवराबायकोस एकच मुलगी आहें नवरा कामावर गेल्यावर मुलीला शोधत राहणे एवढे एकच काम बायकोला पुरत असेल.सुजितनेही दोन वर्षानी मोठे घर विकत घेतले त्यातही तीन शयनकक्ष आहेतच.बहुतेक घरे  तीन पातळ्यांची म्हणजे तळघर,तळमजला आणि पहिला मजला‌ शयनकक्ष पहिल्या मजल्यावर तळमजल्यावर दिवाणखाना, स्वयंपाकघर,आणी कुटुंबखोली (फॅमिली रूम) अशी रचना असणारी असतात‌. समोर व मागे बऱ्यापैकी लॉन असतेच.काही फुलझाडांचे ताटवे, मोठी झाडेपण दिसली,मात्र फळझाडे घराच्या आवारात कमी दिसली̱. घराला कुंपण घालण्याची पद्धत कमीच दिसली यावरून शेजाऱ्यांशी जागेच्या मालकीवरून वाद होत नसावेत.माझे घर बांधून कांपाउंड वॉलसुद्धा झाल्यावर ती आपल्या हद्दीतून गेल्याचा दावा नंतर घर बांधणाऱ्या माझ्या शेजाऱ्याने कसा केला होता आणि आपली कांपाउंड वॉल माझ्या हद्दीतून नेण्याचा कसा प्रयत्न केला होता याची यावेळी आठवण झाली. बागेतील फुले फळे किंवा शोभेच्या वस्तू पळवल्या जाण्याची भीती लोकांना वाटत नसावी. त्यामुळे गृहसंकुलातदेखील लोक लहान मुलांच्या सायकलीसारख्या वस्तू बेदिक्कत बाहेर राहू देतात.कारण घरात अडचण होते.त्यामुळे पुढच्या आमच्या वारीत मी तीन वर्षाच्या नातवास घेऊन फिरायला गेल्यावर अशी बाहेर असलेली सायकल वापरायचा हट्ट तो करू लागल्यावर माझी पंचाईत झाली.  .`
          रस्त्यावरून जाताना काही दुकानांची नावे पाहिल्यावर येथील लोकाना आपल्यासारखी काव्यदृष्टी नाही याची जाणीव झाली.केस कापण्याचे कोठलेही दुकान असले तर त्यावर नाव नुसते हेअर कट किंवा नेल्स (नखे कापण्यासाठी वेगळे दुकान प्रथमच पाहिले.आपल्याकडे सलूनमध्ये सर्वच गोष्टी एकत्र करण्याची पद्धत!)किंवा कॉफीच्या दुकानावर एक्ष्प्रेसो अथवा जी असेल ती कॉफी किंवा लाँड्रीला नुसते वॉशर. बुटांच्या दुकानाला नाव काय तर म्हणे पेलेस शूज .आपल्याकडे कसे चैतन्य फूटवेअर, उत्कर्ष लाँड्री अशी नावे वाचूनच दुकानात शिरायला उत्साह येतो.साड्यांच्या दुकानांची नावे तर काय विचारायलाच नको.वस्तू वापरण्याच्या बाबतीत सारख्या नवीननवीन वस्तूंचा आग्रह धरणारे अमेरिकन लोक नावांच्याच बाबतीत येवढे कंजूष का काही समजले नाही. या बाबतीत त्यांच्या इंग्रज परंपरेचा वारसा त्यांनी सोडला नाही असे दिसते (भो पंचम जॉर्ज )त्यामुळे मुलाला बापाचेच नाव ज्यूनिअर म्हणून लावायची पद्धत बऱ्याच वेळा वापरलेली दिसते‍. जॉर्ज बुशसुद्धा या तडाक्यातून सुटले नाहीत.आपण पहिल्यापासूनच नावे ठेवण्याच्या ( म्हणजे दुसरा अर्थ नव्हे) कलेत पारंगत त्यामुळे विष्णुसहस्त्र नाम आपल्याकडे असते आणि तरीही मूल होताना आणखी नव्या नावाचा शोध अगदी इंटरनेटवर घेतला जातो. त्यामुळे शेक्सपीयरने नावात काय आहे असे म्हटले असले तरी आपल्याकडे तरी नावातच सर्व काही आहे हे निश्चित !
          

       

अमेरिकायण! (भाग १४: शिकागो ३)

मिलेनियम पार्क म्हणजे अनेक नॅशनल पार्क्सप्रमाणे फक्त उंच झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट, खेळणारी चिमुरडी वगैरे असा जर (माझ्यासारखा) समज असेल तर तो पूर्ण चुकीचा आहे. हे पार्क म्हणजे आधुनिक सार्वजनिक स्थापत्याचा उत्तम नमुना म्हणावं लागेल. अगदी नुकतंच २००४ मध्ये या पार्कला हे नवीन रूप देण्यात आलं. म्हणजे इथे झाडं वगैरे आहेतच पण इथल्या तीन महत्त्वाच्या जागा म्हणजे, 'प्रिट्झकर पॅव्हेलियन', 'क्लाउड गेट' आणि 'क्राऊन फाउंटन'. या तीनही जागा आपापल्या प्रकारात 'एकमेव'('युनिक') आहेत .

अमेरिकायण! (भाग १३ : शिकागो२ - शहराच्या अंतरंगांत)

"I give you Chicago. It is not London and Harvard. It is not Paris and buttermilk. It is American in every chitling and sparerib. It is alive from snout to tail" खरय हे! शिकागो हे अत्यंत जिवंत शहर आहे! गर्दी बऱ्याच शहरात असते पण शिकागोत जाणवतो तो जातिवंत खानदानी जिवंतपणा क्वचितच कुठे जाणवला असेल. एखादं मद्य अतिशय जसं हळूहळू चढतं तसं हे शहर तुमच्यात हळूहळू भिनू लागतं. या शहराला एका शब्दात बसवायचं तर त्याच वर्णन "सुबक" असं करावं लागेलं. इतके प्रशस्त रस्ते तेही शहराच्या मुख्य भागात (डाऊन टाऊन) फार क्वचितच असावेत. नाक्यानाक्यावर कलात्मक शिल्पांनी नटलेलं हे शहर दोन दिवसात बांधणं थोडं कठीणच होतं.

मराठी माया - दिवाळी अंक

मराठी सिने-नाट्य सृष्टीचा प्रसार व्हावा
आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत
पोचावी ह्या उद्देशाने आम्ही "मराठी माया"
ही वेबसाईट सुरु केली.
ह्या वेबसाईट वर मराठी चित्रपट, नाटकं, आणि
दूरचित्रवाणी संबंधीत परीक्षण, फोटो, वॉलपेपर्स,
व्हिडीओ क्लीप, गाणी ईत्यादी माहिती आहे.

आम्हाला जगाच्या कानाकोपर्‍यातून मिळालेला
ऊत्स्फूर्त प्रतिसाद आणि अनेक लोकांचे
सहाय्य ह्यामुळे ही वेबसाईट दिवसेंदिवस
लोकप्रिय होत आहे.

आनन्दाचे डोही

           'कधी वाटतं आयुष्य नुसतंच वाहून गेलं

  मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना जगणंच राहून गेलं'

 किती खरंय हे सध्या 'खूप बिझे आहे यार' हे वाक्य 'इंडिया शाईनिंग' पेक्षा जोरात आहे. म्हटलं तर याचा परस्परसंबंधही खूप जवळचा आहे. पण कधी वेळ मिळालाच विचार करायला, तर, वाटतं, बिझी असणं हे खरंच जगणं की जगायचा आटापिटा करणं? आणि जगणं म्हणजे तरी काय? माझ्यासारख्या सामान्यबुद्धीची व्यक्ती म्हणेल, 'निर्मल आनंद'. हो, डोकं शिणवूनही आपली पाटी कोरेच राहत असेल, वर मूळ प्रश्नाला कपाळावरच्या आठ्यांच्या जाळीत अडकून पडायला होत असेल, तर 'निर्मल आनंद' हे सोपं सुटसुटीत उत्तर आहे.

जानू

... त्यानंतर मी जानूला आजतागायत पाहिलेलं नाही

*****

     दिवाळीच्या आधीचे दहा-एक दिवस म्हणजे जानूच्या वरकमाईचा 'पीक पीरिअड'. अख्ख्या चाळीची - चाळीतली घरे धरून - साफसफाई करण्याचं कंत्राट त्याच्या हातात पडलं, की घराघरातून मिळणारी दिवाळी, चाळीच्या सफाईची कमिटीने ठरवलेली रक्कम आणि गोडाधोडाचं जेवण यात त्याचीही दिवाळी चांगलीच साजरी व्हायची. माझ्या आईबाबांच्या महिन्याच्या घेणेकर्‍यांच्या यादीत दिवाळीच्या महिन्यात पोस्टमन, टेलिफोनवाले,भंगी यांच्या जोडीला जानूचंही नाव सामील व्हायचं. अभ्यंगस्नानानंतरचा फराळ चवीचवीने खाण्यात नि गप्पाटप्पा करण्यात घरातील मंडळी मश्गूल, फटाके उडवण्यात आम्ही पोरं मग्न आणि जवळच्या 'समुद्रा'मध्ये नारिंगी मारण्यात जानू बुडालेला. बोळातल्या सप्तरंगी फरशीवर पडलेले भुईचक्रांचे नि अनाराचे डाग, त्यांचे जळून गेलेले तुकडे, फुटलेल्या लक्ष्मी बारच्या दारूचा वास, फुलबाज्यांच्या कांड्या दुसर्‍या दिवशी गायब दिसत; तिकडे डोकीला चट्टेरीपट्टेरी गुलाबी-पांढरा मफलर गुंडाळून जानू वाकडातिकडा झोपलेला असायचा. त्या चट्ट्यापट्ट्यांत विणलेले स्वतःच्याच आयुष्याचे कित्येक रंग, त्याला बोळातल्या मीटरबॉक्सच्या आसपास कबुतरांनी घातलेल्या शिटांच्या रांगोळीसारखे तरी वाटले असतील का, याचा विचार मी अजूनही करतो आहे.
     आयुष्यभर लाल आणि राखाडी अशा दोनच चड्ड्यांमध्ये जानू वावरत असावा. जानू बाल्या नव्हता. गळ्यात रुमाल नाही, पायात घुंगरू नाही, तोंडी बाल्यांची भाषा नाही नि बोलण्यात ते हेल नाहीत. फक्त चड्डी, काखेत आणि मानेजवळ झुरळांनी खाऊन झालेल्या लहानमोठ्या भोकांच्या नक्षीचा बाह्यांचा गंजीफ्रॉक, मातकट तपकिरी पण तजेलदार त्वचा, मिठाईवरच्या चांदीच्या वर्खासारखे वाटणारे खुरट्या गवतासारखे छातीवरचे नि डोक्यावरचे चंदेरी-राखाडी केस, पिवळट तर्राट डोळे, ओठांवर, गालांवर नि हनुवटीवर इंच-दीड इंच वाढलेले तण, ट्रकमध्ये भिरकावलेलं धान्याचं पोतं जसं एकाच बाजूने आत जातं; तसं करदोर्‍याचा वर एकाच बाजूने खपाटीला गेलेलं पोट, आणि गावच्या भातशेतीपासून राजकारणापर्यंत सगळ्या विषयांवर हक्काने बोलताना पाच मिनिटांनी एकदा या रेटने गंजीफ्रॉक वर करून गजकर्ण झाल्यासारखा कंबर कराकरा खाजवणारा जानू पाहतच मी लहानाचा मोठा झालो. मतदानाला आणि लग्नसमारंभाला जाताना लाल चड्डीवर घालायचा काळे त्रिकोण-चौकोन-वर्तुळे असलेला भूमितीय बुशकोट, पानाची चंची, दाढीचं सामान, त्यातच फुटक्या आरशाच्या काचेचा तुकडा, कंगवा आणि माझ्या शाळेच्या दप्तरापेक्षा जराशी मोठी एक पत्र्याची ट्रंक ही जानूची जन्मभराची पुंजी. इतक्या मोजक्या (की मोडक्या) पुंजीत त्याने आपल्या मुलीचं - सोनीचं लग्न लावलं, बायकोच्या शेवटच्या दिवसात मुंबईतूनच तिचं आजारपण काढलं, आपल्या मुलाला - दाम्याला जेमतेम शिकवून मुंबईत नोकरीला आणलं. चौदा-पंधरा वर्षांपूर्वी बोळात दामूबरोबर गोट्या खेळताना हाच पोरगा उद्या आमच्या घरी जानूबरोबर भांडी घासायला येईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. धुणीभांडी हा जानूचा खानदानी रोजगार असावा बहुतेक!
     जानू भुवडला कोंकणातल्या तळे गावातून बनूताईंनी दादरला आमच्या चाळीत आणलं. गिजा,आनंदी, शेवंता, नारायण, बाबू, रोंग्या ... किती नावं घ्यावीत?! आजकाल बड्या धेंडांच्या वॉचमनची केबिन असते तेव्हढ्या आकाराच्या, चाळीत शिरल्याशिरल्या चौकाला लागून असलेल्या एका खोलीत चाळीच्या सात गड्यांचं कुटुंब जेवायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं... जानू त्यांच्यातल्या सगळ्यात नशीबवान गडी. त्याने आल्यापासूनच धरलेला तिसरा मजला कधी सोडलाच नाही. घराघरातून मिळणारं दिवसाचं उरलेलं जेवण, कधीकधी सेंट्रल लंच होमचा तळलेला थंडगार बांगडा, सुका फळफळीत भात आणि समुद्राची नारिंगी यापुढे त्याला काही शिजवायची गरजच पडली नाही. पण अशा रावसाहेबी थाटांपुढे त्याने कामात कुचराई केली नाही. इमानेइतबारे धुणीभांडी करत राहिला. अभ्यास केला नाही तर थोतरीत ठेवून देताना समस्त आयांनी "कार्ट्या, जानू व्हायचंय का?"म्हणून त्याचा तसा आदर्शही काही काळ आम्हा सगळ्यांपुढे ठेवलाच होता. असं म्हटल्यावर जानूही तंबाखूने तांबडेपिवळे झालेले दात विचकून "फुकनीच्या, लिव नीट न्हाय्तर ही माज्या बापाचा सत्कार कराय्लिये" म्हणून विचित्र हसायचा. त्याचं ते शिवराळ हसणं मात्र त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला साजेसंच होतं. जानूला भडकलेलं मी कधी पाहिलंय असं नीट आठवत नाही. जेव्हा तो हसायचा नाही तेव्हा भडकलेला, वैतागलेलाच असायचा, असंही कदाचित म्हणता येईल. त्याच्या चेहर्‍यावरच्या सतरंज्या झोपताना, भांडी घासताना, पेपर वाचताना (खरे तर बघताना!) आणि शिव्या देताना सारख्याच रिन्कल फ्री असायच्या. त्याच समर्पित कर्मयोगी भावनेनं तो भांड्यांना राखुंडी लावायचा, ती विसळायचा.
     माझ्या वडिलांच्या पिढीपासून चाळीतलं प्रत्येक पोर तीनेक वर्षाचं होईस्तोवर जानूबरोबर खेळलेलं आहे. मी सुद्धा. माझ्यासोबत किंबहुना माझ्यामागे सहा-सात वर्षांनी वाढलेल्यांनादेखील जानूची गावरान बडबडगीतं आजही तोंडपाठ आहेत. शेजारच्या प्रियांकाचं नावही नीट न घेता येणारा जानूच फक्त तिला गौरी म्हणतो. गौरी हे आपल्याच लेकीचं दुसरं नाव आहे, हे तिच्या आईवडिलांच्याही लक्षात नसेल कदाचित, पण जानूला मात्र बरोबर माहीत आहे. मी, प्रियांका, कुणाल, अमोघ ... डावा हात वर करून, उजवा हात कमरेवर ठेवून, गुडघ्यात जरासं वाकून ढुंगण हलवत नाचणारं आमच्यापैकी कोणीतरी आणि समोर अगदी तसाच नाचणारा जानू असं छायाचित्र माझ्या आठवणींचे अल्बम सोडून दुसरीकडे कुठेही नाही. वयोमानानुसार जानूचं शरीर थकलं, पण त्याचं पोरं खेळवणं थकलं नाही, नाचगाणं थकलं नाही; गावाकडच्या गोष्टी थकल्या नाहीत आणि त्याचं ते विचित्र हसणंही थकलं नाही. जानूशी आमची मैत्री न रुचलेल्या काही दुष्ट आईवडिलांनी तो करणी करत असल्याची कंडीही काही काळ पिकवली होती. एका मध्यरात्री "धरलान् धरलान् आईच्याने ... ये भोकाच्या ... छाताडावरचा ऊट ... धरलान् धरलान्"असं भेसूर ओरडत झोपेतून उठून शून्यात गेलेला जानू बघितल्यापासून तर या अफवांना अधिकच जोर आला. सुदैवाने त्याची परिणती जानूची चाळीतली कामं जाण्यात आणि आमच्यासारख्या अनेकांच्या आयुष्याची सुरुवातीची तीन वर्षं बेरंग होण्यात झाली नाही, याचं समाधान आहे. का कोण जाणे, पण जानूचं पोरांवरचं आणि पोरांचं जानूवरचं प्रेम, ते जिव्हाळ्याचे बंध यांना पालक वर्गाकडूनही स्वीकृती मिळू लागली असावी, असं आज वाटतं.
     चाळीच्या चौकातली दहीहंडी जानूच्या गाण्यांशिवाय चालूच व्हायची नाही. गडी आणि आम्ही मुलं एकत्र येऊन दहीहंडी साजरी करायचो. चाळीतल्या आम्हा मुलांप्रमाणेच हंडी फोडण्याचा मान गड्यांमध्येही कोणालातरी कधीतरी मिळायचाच. पण 'येक दोन तीन चार, जनाबायीची प्वरं हुशार','ल्लाल ल्लाल पागुटं गुलाबी श्येला, जानूमामा गेला जीव झाला येडा' ही सगळी गाणी जानूने - आणि त्याच्या मागोमाग आम्ही - म्हटल्याशिवाय टांगलेल्या हंडीभोवती फेर धरायचाही उत्साह कुणाच्यात संचारायचा नाही. त्याच्या आवाजाने मग चाळ जागी व्हायची आणि आमच्यावर दुधापाण्याचे अभिषेक व्हायचे. हंडीनंतरचं गूळखोबरं वाटायलाही जानूच चाळभर फिरायचा. अंघोळी वगैरे आटोपून आम्ही आणलेल्या समोशांवर ताव मारायचो आणि जानू मात्र तेव्हा सरळ 'समुद्रा'च्या वाटेवर असायचा. होळीच्या रात्री बोंबा मारायला जातीने हजर आणि कार्यतत्पर असणारा जानू दुसर्‍या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी मात्र नेमाने गायब असायचा. संध्याकाळी तो चाळीत गपगुमान फिरताना, काम करताना दिसला की त्याच्या डोक्यावरचा गुलाल पाहून त्याची रंगपंचमी रंगीत आणि नारिंगीने सुगंधितही झालेली आहे, हे कळायला कुणी तज्ज्ञ लागायचा नाही. पण चाळीतल्या अशा प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाचा जानू एक अविभाज्य घटक असायचा. गणपतीच्या वेळी साधा आरतीला गेलाबाजार आरतीचा प्रसाद हाणायलाही चौकात न उतरणारा जानू नाटकाच्या रात्री फुकटात मसाला कॉफी प्यायला मिळते म्हणून आणि दुसर्‍या दिवशी महाप्रसादाला चमचमीत जेवायला मिळतं म्हणून (अर्थातच फुकटात!) बरोबर हजेरी लावायचा. लोक देवाच्या भक्तीत दंग असताना याची मोरीत भांड्याकुंड्यांशी भजनं रंगलेली असत. किंबहुना देवाशी त्याचं भांड्यांमुळेच भांडण असावं, असंसुद्धा वाटतं कधीकधी.
     आमच्यासारखे काही महाभाग जानूत गुंतणं स्वाभाविक होतं. पण जानू आमच्याबरोबरच आमच्या आजीआजोबांच्या पिढीतही गुंतला होता. माझी आजी भ्रमिष्टावस्थेत "जानू जरा माळ्यावरची शेव काढून देतोस का रे?" असं बरळली असताना हेलावून त्याने तिच्या पायावर डोकं ठेवलं होतं. "संध्याकाळी देतो आजी" यापलीकडे तो काही बोलू शकला नाही. आजपर्यंत फक्त त्या दिवशीच मी त्याच्या चेहर्‍यावरची सतरंजी विस्कटलेली पाहिली.
     कामाच्या वेळी यंत्रवत्, आत्ममग्न काम; आणि काम नसेल तेव्हा निव्वळ टाईमपास, हे जानूच्या जगण्याचं सूत्र. जानू जरासा बेदरकार होता, व्यसनी होता, हे सगळं खरं आहे. पण त्याने कधी स्वतःच्या व्यसनांचा तमाशा केला नाही. दारू पिऊन आलेला असला, तरी आरडाओरडा, धिंगाणा नाही; मोठमोठ्याने अर्वाच्य शिवीगाळ नाही. "बाबा लय पितु" असं दामूही दोनेक वर्षांपूर्वी म्हणू लागला होता. तटस्थपणे त्याच्या पिण्याची कारणं शोधून काढायचं सामंजस्य, इच्छा, वेळ, कुवत - यांपैकी काही एक माझ्याकडे त्यावेळी नव्हतं. ना त्याची परिस्थिती, दु:ख वगैरे समजून घेण्याचं माहात्म्य होतं. जानूच्या वर्तणुकीतून तो मला जसा उलगडत गेला, तसा मी त्याचे हे सगळे रंग बघत गेलो. जानूचं जगण्याचं तत्त्वज्ञान काय, याचा अर्थही माझ्याच परीने लावलेला. उद्या त्याला असे भलतेसलते प्रश्न विचारायला गेलो, तर तो मला वेड्यात काढेल आणि असा काही (नेहमीसारखाच!) विचित्र हसेल, की माझ्यासारख्या पांढरपेशाला शरम वाटेल. असे चौकटीतले विचारच माझ्यासारख्यांना यंत्रांमागच्या भावना कळू देत नाहीत, असं वाटतं. मी भारत सोडून येताना बोळात जानू नेहमीसारखाच झोपला होता. भारतभेटीच्या वेळी "काय जानू, काय म्हन्तासा?" असं विचारायची संधी मिळेल आणि जानूही त्याला शिवराळ हसून उत्तर देईल असं वाटलं. म्हणूनच मी त्यावेळी त्याच्या पाया पडण्यासाठीही त्याला उठवलं नाही.

मुंबई-पुणे-मुंबई

गेल्या काही दिवसांत मनोगतावर ई-चळवळ उभी राहत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. कामानिमित्त किंवा अनेक कारणांसाठी आपल्याला मुंबई-पुणे प्रवास करायची वेळ येते. वोल्व्हो बसेस सुरू झाल्यापासून आम्ही बरेच वेळा त्याचा उपयोग करतो. सुरवातीला ही सेवा चांगली होती. त्यानंतर सध्या जी परिस्थिती आहे ती प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी आहे असा अनुभव आहे.
       १.   प्रत्येक कंपनीच्या बसेसचा मार्ग वेगवेगळा असतो, पण कावळ्याच्या छत्रीप्रमाणे ठिकठिकाणी उगवलेले एजंट बरोबर माहिती देत नसल्यामुळे डेक्कनला उतरणाऱ्या प्रवाशाला शिवाजीनगरला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर उतरण्याची वेळ येते.
२. मुंबईहून निघणाऱ्या बसेस बोरिवली पासून अनेक ठिकाणी प्रवासी घेत वेळ काढतातच, पण हल्ली चेंबूर व वाशी इथेही संताप येईल इतका वेळ काढतात.
३. बस थांबलेली असताना अनेक फेरीवाले आंत येऊन काहीबाही दीडपट किमतीला विकत असतात.
४. मधल्या फूड मॉलच्या थांब्यावर १० मिनिटे सांगून अर्धा तास घालवतात.(याला काही प्रवासीही जबाबदार असतात)
५. व्हिडिओवर दाखवण्यात येणारे अभिरुचिशून्य सिनेमे जबरदस्तीने पाहावे लागतात, आजवर कोणीही एकत्र येऊन हा सिनेमा बंद करा असे सांगितल्याचे पाहण्यात नाही. सिनेमा सुरू होण्यापूर्वी व नंतर आचरट बडबडीचा एफएम रेडिओ सहन करावा लागतो.
६. पुण्याहून परत येताना तर डेक्कनवर पकडलेली बस सव्वा ते दीड तासांच्या कोथरूड-पौड-औंध-पाषाण अशा  उलटसुलट पुणे दर्शनानंतर महामार्गाला लागते. मुंबईला पोचल्यावर जर बोरिवली बस असेल तर, दादरच्या घुसवलेल्या प्रवाशांना, अचानक सायनला उतरायला सांगितल्यामुळे होणारी भांडणे, हा आता नित्याचाच भाग झाला आहे.
७. शनिवार-रविवारचे जास्त दर सोमवार दुपारी १२ पर्यंत लावण्यात येतात.

एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे.

तर त्यात गैर ते काय? (उत्तरार्ध)

ह्या साहित्यिक राजकारणाच्या शेणात वळवळणाऱ्या किड्यांना एकच सांगायचे आहे की, माझी लोकशाहीच्या ढाच्यात निवडणुकीला ना नाही. पण हे प्रतिष्ठा जपून (पणाला न लावून) करता आले असते, मतदारांना एक साधे पत्र पाठवून मत देण्याची विनंती करता आली असती, चिखल फेकेची काय गरज होती?