वारी--९

न्यू जर्सी एडिसन ला आल्यावर लगेच जेट लॅगचा त्रास होईल अशी अपेक्षा होती.पण तसे न होता उलट झोपच उडून गेली.कदाचित पुष्पक मधील कमाल हसनला गोंगाट नसलेल्या जागी झोप येत नाही तसे प्रदूषण -हवेचे आणि ध्वनीचेही- नसल्यामुळेच की काय कोणास ठाऊक .आमच्या पुण्याच्या सदनिकासंकुलात वाहनाच्या हॉर्नचा वापर एकमेकांना आव्हान करण्यासाठी केला जातो् आणि हा आपला वारसा अगदी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पासूनचा आहे.इथे अमेरिकेत आल्यापासून हॉर्नचा आवाज काढणे हे असभ्यतेचे समजण्यात येते की काय अशी शंका येते  उगीचच हॉर्न  वाजवल्याबद्दल शिक्षा होत असावी. आपल्याकडे कसे रस्त्यात रणशिंग फुंकत असल्यासारखे हॉर्न वाजवत वाहने चालवत असतात  हॉर्न हे एकादे मनोरंजन करण्याचे  किंवा कुणालाही घराबाहेर बोलावण्यासाठी वापरायचे साधन आहे अशी लोकांची समजूत असते. हॉर्नचा आवाज कमी वाटतो म्हणून की काय रस्त्यात निरनिराळी घोषणायुद्धे चालू असतात.ध्वनिप्रदूषणामुळे बरीच जनता बहिरी झाली असली तरी आपला हा छंद सुटत नाही. येथे मात्र सारे कसे शांतशांत वाटत होते.तीच गोष्ट प्रदूषणाची.आपल्याकडे पोल्यूशन तपासणी करणाऱ्या पोलिसांच्या गाड्यातून आणि जवळजवळ सर्व सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनातून धुराचे लोट बाहेर पडत असतात.येथे त्याचाही मागमूस नव्हता त्यामुळे आणि  निघाल्यापासूनच्या दगदगीमुळे आणि नंतरही काही दिवस नीट झोप न लागल्यामुळे सर्दी आणि खोकल्याने मला बेजार करून टाकले तरीही दैनंदिन व्यवहार मी कसेतरी पार पाडत होतो.इन्शुअरन्स काढला असला तरी सर्दीखोकल्यासाठी डॉक्टरकडे जावेसे वाटेना,त्यामुळे नेहमीच्याच ज्या गोळ्या मी बरोबर आणल्या होत्या त्यांचा वापर आणि गरम पाण्याच्या गुळण्या, व्हिक्सची वाफ घेणे अशा उपायांचा अवलंब करूनच आपले दुखणे हटवण्याचा माझा इरादा होता आणि तेच योग्य होते हे पुढे माझ्या मुलाला सर्दीखोकला झाल्यावर येथील डॉक्टरांनी जो अंटिबायॉटिक्सचा मारा त्याच्यावर केला त्यावरून समजले.त्यादृष्टीने भारतात असणे खूपच फायदेशीर असते असे वाटले. येथे अगोदर इन्शुअरन्स असल्याशिवाय डॉक्टरकडे प्रवेशच नसतो म्हटले तरी चालेल.आणि परत डॉक्टरची अपोइंटमेंट मिळण्यापूर्वी रोग किंवा रोगी संपण्याची शक्यता असते.एकूण डॉक्टरांची वृत्ती लोकांना घाबरवण्याची असते आणि त्यामुळे आपल्या बुद्धीने उपचार करणे शक्यच नसते. त्यामुळे बरेच भारतीय आयुर्वेदिक उपचार सोयिस्कर, स्वस्त आणि खात्रीलायक असतात तेही करायला भारतातून गेलेल्या नव्या पिढीचे ( म्हणजे आमच्या पुढच्या ) लोक घाबरतात. अगदी लहानपणी मुलाला मधाचे बोट चाटवण्याची आपली भारतीय पद्धत तर इथे मधाची चवही वर्षाच्या आतील मुलास द्यायची नाही.तीच गोष्ट वरच्या दुधाची.आमच्या पहिल्या नातवाला गायीचे दूध चौथ्या पाचव्या महिन्यात आम्ही देऊ लागलो आणि त्याचा अमेरिकेत जन्मलेला धाकटा भाऊ मात्र वर्षाचा झाला तरी अजून पावडरचे दूधच -त्याला फॉर्म्युला म्हणतात म्हणे- पीत आहे. माझ्या सात वर्षाच्या नातवाची दाढ किडली ती काढण्यासाठी दंतवैद्याची ऍपॉइंटमेंट घेऊन मुलगा आणि सून त्याला घेऊन गेले तर तेथे दोन तास वाट पाहून डॉक्टरकडे गेल्यावर हा आता अडल्ट झाला आहे आणि त्याचा इन्शुअरन्स तो किड असताना काढला होता ,त्याचा इन्शुअरन्स ऍडल्ट या सदरात काढून ऍडल्टचे दात काढणाऱ्या दंतवैद्याकडे त्याला न्या अशी त्याची बोळवण करण्यात आली.आता ज्या दंतवैद्याला  दात काढता येतात त्याला  लहान मुलाचे दात काढणे काय किंवा मोठ्या माणसाचे काय काय फरक पडणार आहे ?मी तर माझे आणि माझ्या ह्याच नातवाच्या बापाचे ( तो त्यावेळी सात आठ वर्षाचाच होता ) एकाच डॉक्टरकडून एकाच बैठकीत ( किंवा खुर्चीत )काढून आलो होतो ( पहा मनोगत दिवाळी अंक अक्कलदाढ आली तर हा माझाच अनुभव)याची आठवण होऊन या डॉक्टरला काय म्हणावे असे म्हणून कपाळावर हात मारून घेतला. बर [float=font:nayanB;breadth:200;background:F3F2F0;color:CC6714;place:top;size:18;]पुन्हा ऍडल्टचे दात काढणाऱ्या डॉक्टरची ऍपॉइंटमेंट घेण्यासाठी इन्शुअरन्स कव्हर नाही त्यासाठी पुन्हा इन्शुअरन्स कंपनीला कळवून वाट पाहा. मला वाटते तोपर्यंत नातवाचा दात आपोआपच पडेल.[/float]
             मेडिकल इन्शुअरन्स हा आणखी वेगळाच प्रकार आहे.त्यात काही गोष्टींचा समावेश होतो तर काहींचा नाही आणि हे आपण आजारी पडल्यावरच कळते. आपल्याला ज्या टेस्ट घ्यायला सांगतात त्याचा अहवाल आपल्या हातात पडत नाही तो सरळ ज्या डॉक्टरकडून औषधोपचार घेता त्याच्याकडेच पाठवला जातो.वैद्यकीय बाबींवर होणारा खर्च अगदी डोळे पांढरे करणारा असतो.अमेरिकेतच परिचय झालेले माझे एक मित्र हृदयविकाराने आजारी पडले आणि त्यानी इन्शुअरन्स काढला असूनही त्यांच्या उपचाराचा खर्च इतका झाला की त्यातील काही भाग अजून देण्याचे बाकी आहे असे त्यांच्या मुलाकडून आम्ही पुढच्या वारीवर आलो तेव्हां कळले. 
                     येथे सदनिकेत आजूबाजूला कोण आहे याचा पत्ता कमीच लागतो,कारण दारावर नावाचे फलक लावण्याची पद्धत नाही.पण काही कारणामुळे अगदी शेजारी त्याचबरोबर आमच्या बरोबर खाली पण कोण राहते त्याचा पत्ता लागलाच.एकदा आमचे वॉशिंग मशीन बंद पडल्यामुळे सुजितने संकुल कार्यालयास फोन केला आणि त्यानी माणूस पाठवतो म्हणून सांगितल्यावर तो कामावर गेला.आमच्या भारतीय अनुभावानुसार सुजित घरी परत आल्यावरच किंवा त्यानंतरही काही वेळा फोन केल्याव्र माणूस ये ईल अशी अपेक्षा होती.पण थोड्याच वेळाने दारावरील बेल टरारली. अशा वेळी कोण येणार आणि तेही सुजित घरी नसताना तरीही आम्ही भीतभीत दरवाजा किलकिला केला.एक उंचापुरा गोरा माणूस दारात उभा राहून काहीतरी सांगत होता पण त्याचे इंग्लिश आमच्या कळण्यापलिकडले होते ,आता याला घरात घ्यायचे की नाही हा पेच आम्हाला पडला.सुदैवाने आमच्या शेजारच्या सदनिकेतील व्यक्ती बाहेर डोकावली आणि त्याने तो आलेला माणूस संकुल कार्यालयाने पाठवलेला आहे असे सांगितले.आमचे वॉशिंग मशीन बंद पडले आहे हे त्यानेच त्याला सांगितले.आलेल्या माणसाचे बोलणे तो स्पॅनिश असल्यामुळे आम्हाला कळले नव्हते.आमच्या शेजाऱ्याने दुभाषाचे काम केले आणि आमची अडचण दूर झाली. आमचा हा शेजारी मुंबईचाच होता आणि गुजराती असला तरी त्याला मराठी बऱ्यापैकी येत होते.पुढे त्याच्या आईची आणि माझ्या सौ. ची बरीच दोस्ती झाली. त्यानंतर तो मधूनमधून गप्पा मारू लागला. तरी घरी येऊन बसण्याची प्रथा नाहीच म्हटले तर चालेल.
          आमच्या बरोबर खाली राहणारा पण भारतीयच होता पण त्याचा परिचय जरा वेगळ्या संदर्भात झाला.एक दिवस आम्ही दोघेच घरात असताना दुपारी जरा वामकुक्षी घेत असताना बेल वाजली.आम्ही आश्चर्याने दार उघडले तर एक साधारण पंचवीस वर्षाची भारतीय तरुणी दारात उभी."अंकल, यू आर मेकिंग नॉइज अंड आय कॅनॉट स्लीप" अस त्रासिक मुद्रेने ती म्हणत होती.आमच्या चालण्याचा आवाज होत असे हे खरे पण आम्ही चालत नसताना होत असेल असे वाटले नव्हते.तिला आम्हीही विश्रांतीच घेत होतो असे सांगितल्यावर चेहरा आणखीच वाकडा करून निघून गेली. सुजित ऑफिसमधून आल्यावर त्याला सांगितल्यावर तो म्हणाला,"तिला असे वर येऊन आपल्याला सांगण्याचे कारण नव्हते" ते प्रकरण तेवढ्यावरच मिटेल असे वाटले होते पण त्यानंतरही आम्ही एकदा रात्री उशीरा घरी आल्यावर त्या नवराबायकोला त्रास झाल्याचे नवऱ्याने आम्हाला वर येऊन सांगितले त्यावेळी सुजित असल्यामुळे त्याने त्याला "व्हाय आर यू इस्टर्बिंग अस? यू कॅन मेक कंप्लेंटटू अपार्टमेंट ऑफिस" असा दम दिला.ते एक सिंधी जोडपे होते. पुढे पुढे आम्ही चालू लागलो की ते खालून छतावर काहीतरी आपटून आवाज काढायचे.थोडक्यात आमचे अघोषित ध्वनियुद्धच चालू झाले पण त्याचा शेवट कसा होईल याचाच आम्ही विचार करत असताना आश्चर्य म्हणजे एकदिवस खरोखरच आम्हाला संकुलकार्यालयाकडून पत्र आले आणि त्यात तुमच्याखाली राहणाऱ्या भाडेकरूला छतावर आवाज करून तुम्ही त्रास देता आणि अशी तक्रारपुन्हा  आल्यास तुम्हाला सदनिका सोडावी लागेल" अशी नोटिस आली. त्यानंतर आम्ही ते पत्र घेऊन सदनिका कार्यालयात गेलो तेव्हा तेथे असलेल्या सदनिका प्रतिनिधी ती एक तरुण स्त्रीच होती आम्हाला धीर देऊन  "असा आवाज येतच असतो याची आम्हाला जाणीव आहे" असे सांगितले.त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो तरीही आमच्यासारख्या नवागतांची झोप काही दिवस उडवायला ती घटना पुरेशी झाली. भारतात शासकीय गृहसंकुलात राहत असताना शेजाऱ्यांशी भांडण्याचे काही प्रसंग आले होते पण त्यामुळे घरातून हकालपट्टी होण्याची ताकीद मिळाली नव्हती.तेथे आपली भांडणे आपाआपसात मिटवावी असा शासकीय दृष्टिकोण होता.आबानी अशावेळी तंटामुक्त गाव तशी तंटामुक्त सदनिकेची योजना लागू केली असती.पण येथे मात्र या कारणामुळे लहान मुले असणाऱ्या पालकांना वरच्या मजल्यावर राहणे ही शिक्षाच वाटत असणार असे वाटले.
          आम्ही येथे आल्यापासून आणखी एक महत्त्वाची जाणवण्यासारखी गोष्ट म्हणजे वीज पाणी आणि फोन अखंड चालू होते ते कधी बंद आहेत असे जाणवले नाही.भारतातून येणाऱ्याना ही गोष्ट खासच जाणवणार विशेषतः नियमित भारनियमनाला तोंड देणाऱ्या आम्हाला तरी.भारनियमनामुळे बराच वेळ वाया जातो हे खरेच पण गप्पा मारायला तो एक महत्त्वाचा विषय मात्र असतो आणि त्याबाबतीत आम्ही पुण्याचे लोक त्याहूनही मुंबई (उपनगरातील नव्हे)चे लोक किती भाग्यवान आहोत याचा टेंभा मरवण्यातील शान काही औरच !  आम्ही येथे आल्यावर एकदाच काय ती वीज गायब झाली पण तरीही सुजितकडे गरम पाणी गॅसच्या बॉयलरवरच होत असल्याने आम्हाला ती गोष्ट विशेष जाणवेपर्यंत वीज पुन्हा सुरूही झाली.पुण्यात अलिकडे भारनियमन बरेच कमी प्रमाणात असले तरी त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे कामाचेही तंत्र बसवावे लागते.केबलवाल्याचे आणि आमचे भारनियमन वेगवेगळ्या वेळात असल्याने दूरदर्शन दुप्पट काळ बंद असते.या सगळ्या गोष्टींच्या अभावामुळे बरेच वाटले. सुजितच्या घरातच वॉशिंग मशीन असल्यामुळे कपडे हवे तेव्हां धुवून टाकता येत होते  त्यामुळे कपडे धुणारी बाई आली आता अंघोळ करून घ्या असा लकडा लावण्याचे सौ. चे सौख्य हिरावले गेले होते आणि माझी एक डोकेदुखी कमी झाली होती!काही सदनिकांत स्वतंत्र वॉशिंग मशीन नसते त्यांच्यासाठी सार्वजनिक वस्त्रस्वच्छता केंद्र संपूर्ण संकुलासाठी असून त्यात बरीच यंत्रे ठेवलेली असतात आणि ठराविक रकाम देऊन तेथे कपडे घेऊन जाऊन ठराविक रक्कम देऊन कपडे धुवून घेता येतात.आमच्या जवळील गुजराती बहुल वसाहतीत ही सोय होती.प्रथम त्यात काही नाणी टाकून यंत्र वापरण्याची सोय होती  परंतु गुजूभाईनी त्यातून शक्कल काढून अमेरिकन नाण्यांच्याच आकाराची भारतीय नाणी टाकून स्वस्तात कपडे धुवून घेण्याची क्लुप्ती योजल्यामुळे ती व्यवस्था बंद करून सरळ सरळ प्रथम कपड्यांच्या आकारमानानुसार रक्कम घेऊनच यंत्र वापरण्याची परवानगी देण्यात येते.तेथे बराच वेळ जात असल्यामुळे बरेच लोक आठवड्यातून एकदा अगर दोनदाच कपडे धुण्याचा उपक्रम करतात.
           

मराठी पुस्तकांचा तडाखेबंद खप

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचून बरे वाटले. सर्वांना ती वाचून तिच्यावर विचारांची देवाणघेवाण करता यावी ह्यासाठी ती येथे उतरवून ठेवत आहे. विचार करण्यासारख्या वाक्यांना अधोरेखित केलेले आहे.

ईसकाळातली मूळ बातमी : कोण म्हणतं मराठी पुस्तकं खपत नाहीत?
(नीला शर्मा)
 
पुणे, ता. २१ - मराठी पुस्तकांचा तडाखेबंद खप होण्याचे सुखद चित्र सध्या शहरात दिसते आहे.
"सकाळ' आयोजित "शब्दरत्न ग्रंथ प्रदर्शना'ला भेट देणाऱ्या महाराष्ट्रभरच्या वाचकांची अलोट गर्दी पाहिली तर याची खात्रीच पटते! सध्या शहरात एकाच वेळी चार ग्रंथ प्रदर्शने सुरू असून, वाचकांना सुमारे २५० प्रकाशन संस्थांची ३५ हजारांच्या आसपास शीर्षकांची पुस्तके पुरवायला ती सज्ज आहेत.

कहाणी आभारप्रदर्शनाची

अमेरिकेत सर्वप्रथम जे 'यात्रेकरू' आले ते सगळे इंग्लंडमधल्या इंग्लिश सेपरेटिस्ट चर्चचे (प्युरिटन पंथ) सदस्य होते. ते आधी इंग्लंडात राहत होते आणि धार्मिक छळापासून सुटका होण्यासाठी हॉलंडला पळून गेलेले होते. तेथे धार्मिक सहिष्णुता जास्त जाणवत होती. पण त्यांना डच जीवनपद्धती अपवित्र वाटायला लागली, त्यामुळे अधिक चांगल्या जीवनासाठी लंडनच्या एका समभाग संस्थेशी वाटाघाटी करून त्यांनी अमेरिकेच्या यात्रेसाठी अर्थसाहाय्य मिळवले. जहाजावरचे बहुसंख्यजण हे धार्मिक फुटीरतेशी संबंधित नसून संस्थेच्या स्वारस्यांचे भले पाहण्यासाठी होते. आद्यवसितांपैकी सुमारे एक तृतियांश लोक धार्मिक फुटीर होते.

कै. प्रमोद नवलकरांचे तीन लेख

प्रमोद नवलकर गेल्याची बातमी काल म.टा. वाचली आणि अतिशय दुःख झाले.

म.टा.त झपाटलेली लेखणी ह्या सदरात नवलकरांचे लेख सातत्याने येत असत. त्यातील काही लेख म.टा. त येथे दिलेले आहेत, ते  सर्वांनी अवश्य वाचावेत.
नवलकरांची झपाटलेली लेखणी (निवडक लेख)

थॅन्क्सगिविन्ग डे ची महती

थॅन्क्सगिविन्ग डे येत आहे. म्हणजेच उद्या आहे हा... अमेरीकेत...

थॅन्क्सगिविन्ग डे नोव्हेंबर महिन्याच्या ४थ्या गुरुवारी साजरा करतात. ऐकून आहे की आदल्या दिवशी रात्रीपासुनच मोठ्या मोठ्या रांगा लागतात मॉल्ससमोर. खरे आहे का हो हे? नेमके काय काय आणि कसे कसे करतात. खरेच सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स च्या वस्तू कमी किमतीत मिळतात का?

आमचा एक विषाणू दिवस

२५ एप्रिल १९९९.
संध्याकाळी ६/७ च्या दरम्यान मी माझ्या संगणकावर DOS मध्ये विषाणूविरोधी संरक्षणाची संहिता चालवत होतो. का माहित नाही पण माझ्या संगणकावर विंडोजवर ते चालत नव्हते. त्यात त्याला C ड्राईव्ह मध्ये काही विषाणू मिळाले. ते मी काढून टाकले. पण D ड्राईव्ह तपासता आली नाही. कारण ती संकुचित होती(compressed). तेव्हा विषाणू मिळणे म्हणजे खास काही वाटत नव्हते.

आमचं कोल्हापुर

मी काढलेले काही फोटो ह्या दिवाळी सुट्टीत.

लिंक देतोय पाहा आणि सांगा आमच कोल्हापुर आवडल का ते.

कॅप्शन ला माहिती पण लिहिली आहे बऱ्यापैकी.

बाकी काय सगळ ठिक ना?? मजेत ना??  कशी झाली सगळ्यांची दिवाळी??

फटाके फोडले की नाही? फराळावर ताव मारला की नाहि?  मला तर बुवा चिवडा,चकली आवडते.

अमेरिकायण! (भाग १५ : धोबीघाट)

आपल्याकडे कपडे धुणे हा दैनंदिन भाग आहे पण अमेरिकेत हा एक साप्ताहिक (कधीकधी पाक्षिक  ) सोहळा असतो. आठवडाभराचे कपडे एकत्र मोठ्या यंत्रात यथास्थित खंगाळल्यानंतर तेवढ्याच मोठ्या यंत्रात ते वाळायला घातले जातात. अमेरिकेत घरे मोठी असल्याने काही घरांतच ही यंत्रे असतात. पण बऱ्याच ठिकाणी कपडे धुणे हा सार्वजनिक प्रकार असतो आणि त्यासाठी "लाँड्रामार्ट" नावाचे सार्वजनिक कपडे स्वच्छतालय ठिकठिकाणी दिसेल. याला आम्ही धोबीघाट म्हणतो. आपल्या धोबीघाटावर जसे अनेक धोब्यांना एका वेळी कपडे धुवायची सोय असते तसेच हे, फक्त धोब्यांऐवजी तेच काम करणारी यंत्रे रांगेत लावलेली असतात.

दुनियादारी!

" ....अगदी सॉलिड पुस्तक आहे, लायब्ररीतून पळवून आण पण वाच(माझं ढापू नको, माझ्याकडे मागू नको!!!!) एक्दा वाचच. वेडी होशील....."
तो मला तावातावाने सांगत होता. कॉलेजमधे असताना आम्ही रोज भेटायचो. आता तो नोकरीनिमित्त कधी न ऐकलेल्या प्रदेशांच्या सफरीवर असतो सारखा. मग कधीतरी स्वारी पुण्यात अवतरली की आम्ही भेटतो. जरा मॅगी नाहीतर 'ऑफिसच्या कॅन्टीनमधे जे देतात ते' ही खाद्यपदार्थांची व्याख्या बदलते आणि ' वैशाली ' चं खरंखुरं वडा सांबार (इथे मी स्वप्नात तर नाही ना म्हणून नकळत स्वतःला एक चिमटा काढून घेते...) आणि अस्सल कॉफी (मशीनची नव्हे... खरी! गॅसवर केलेली!!) मी आधाश्यासारखी ओरपते. अशाच एका भेटीत तो मला पिळायची जुनी हौस भागवून घेत होता. बोलता बोलता विषय पुस्तकांवर आला. मी हल्ली इंग्रजी पुस्तकंच जास्त वाचते हे ऐकून तो ठसका लागेपर्यंत हसला.
 "इंग्रजीचा क्लास असतो की काय हापिसात तुझ्या?"
"गप्प बैस. बेडूक.. डुक्कर ... हिप्पोपोटॅमस कुठला.."  आमची उत्क्रांतीची साखळी त्याला ऐकवून मीही चिडल्याचं नाटक केलं.
"काय तू? इतकी वर्ष फर्गी मधे राहून तुला साध्या शिव्या पण देता येत नाहीत? इंग्रजी सोड निदान मराठी तरी...."
"बोकडा...." शेवटी मी त्याच्या राशीला आलेच...
"पांढऱ्या कॉलरला इस्त्री करून ती शिष्ठ इंग्रजी पुस्तकं वाचणं पुरे करा आता जरा. आम्ही बोकड असू पण तुम्ही मुंगीएवढ्या पण नाही झालात अजून मॅडम...."
"ए गपे. .." आता माझ्याकडचे भेसूर प्राणीही संपत आले होते.
"सभ्य आणि संस्कारक्षम अशी सगळी मराठी पुस्तकं मी वाचली आहेत आधीच. मला नको सांगूस..." आणि मी संस्कारक्षम मराठी पुस्तकांची यादी पाढा म्हणावा तशी म्हणायला सुरुवात केली.
"स्वामी, राजा शिवछत्रपती, मृत्युंजय, व्यासपर्व, राधेय, श्रीमान योगी ..."
२०-२० वर्ल्ड कप फायनल मॅचमधे पाकड्यांनी युवीला आठात गारद केला तसा माझ्या पाढ्याला पायबंद घालत तो म्हणाला
"सुशि वाचलायस? "
"होऽऽऽऽऽ...    कल्पांत, मंदार पटवर्धन, तिसारा"
"एवढंच?"
"हो...." इथे मी बुचकळ्यात. माझ्या मराठी वाचनाचा अभिमान फुग्यासारखा फुटायला आलेला.
"दुनियादारी वाचलंयस?"
"नाही... "
"सिरियल पाहून वाचायचं नाही असं ठरवलंस का?"
"नाय बा. ये किस चिडिया का नाम है?"
"कप्पाळ माझं. माझे आई, तुला जरा शहाणं करायलाच हवं आता... एवढी घोडी झालीस तरी अजून 'संस्कारक्षम' पुस्तकं वाचायला शळेत जातेस का अजून?"
त्याने माझ्यापुढे अक्षरशः दोन्ही हात जोडले होते. मीही जरा अस्वस्थ झालेच होते. हा बाबाजी मला चक्क शेंबडी म्हणत होता. त्याच दिवशी ठरलं की हे दुनियादारी प्रकरण काय आहे हे बघायचंच. एका शनिवारी मुद्दाम वेळ काढून मी लायब्ररीमधे गेले. दुनियादारीची मागणी करताना तिथली मुलगी माझ्याकडे पिंजऱ्यातलं अस्वल पाहिल्यासारखी पाहणार अशी माझी जवळजवळ खात्री होती. पण जराही शोधाशोध न करता ठामपणे म्हणाली, " ते सध्या वाचायला गेलंय.... पण तुझ्यासाठी ठेवून देते मी बाजूला..."
        पुढच्या शनिवारी  दुनियादारी घेऊन मी घरी आले. शनिवारची खास कामं आणि शनिवारी रात्री जमणारा आमचा ई-अड्डा यांच्यात मला ते पुस्तकाचं लक्षातही नव्हतं. रात्री झोपायच्या आधी सहज म्हणून मी दुनियादारी उघडलं. प्रस्तावनेनेच लक्ष वेधून घेतलं. एका काल्पनिक कॉलेजच्या कट्ट्यावरची ही एक काल्पनिक सत्यकथा आहे.... असलं काही फक्त सुशि च लिहू शकतो. सगळ्यात लक्षात राहिलं ते " विकत घेऊन, ढापून, शेअर करून आणि शक्य त्या मार्गाने दुनियादारी वाचणाऱ्या आणि तिच्या सहा आवृत्त्या हातोहात खपवणाऱ्या वाचकांना केलेलं अभिवादन ". पहिल्या पानापासून 'सुशि' टच जिकडेतिकडे जाणवत होता. पहिल्या परिच्छेदापासूनच पुस्तकाने जी पकड घेतली की बास. हे पुस्तक झपाटून टाकतं. जादू करतं. [float=font:swapnil;size:20;breadth:200;place:top;]आता कॉलेज कट्टा म्हटल्यावर ज्या काही गोष्टी मस्ट आहेत त्या सगळ्या इथे योग्य प्रमाणात आहेत. भेळ एकदम जमली आहे.[/float] (सुशि स्वतः कॉलेजमधे असताना काय चीज असेल असाही एक विचार माझ्या मनात डोकावून गेला.) श्रेयस, दिग्या, शिरीन आणि एम के या व्यक्तिरेखा विसराव्या म्हटलं तरी विसरता येणाऱ्यातल्या नाहीत. कट्ट्यावरचा इरसालपणा मात्र एकदम  ओरिजिनल आणि अस्सल!. कट्ट्यावर भेटलेले एकेक नमुने अक्षरशः महान आहेत. जिकडे तिकडे रचनाकाराचे हस्तस्पर्श ठळकपणे दिसतात. घटनांचा वेग आणि वर्णनशैली वाचणाऱ्याला एक क्षणभरसुद्धा पुस्तकातून बाहेर येऊ देत नाही. हे जग अनोखं तरीही चिरपरिचित वाटतं.   डाय हार्ड सुशि पंख्यांच्या पुस्तकावर पडणाऱ्या उड्या मला स्पष्ट दिसल्या. एका अनोख्या तरीही परिचित जगाची ही सफर अविस्मरणीय आहे. एकदा हातात घेतल्यावर पुस्तक संपेपर्यंत मी ते खाली ठेवू शकले नाही. हळूहळू मीही सुशि फॅन होणार हे मला पुरतं कळून चुकलं.
        माझी एस. पी. मधली वर्षं प्रॅक्टिकल्स, बेगर स्ट्रीट/ गर्ल्स हॉस्टेल रेक्टरांच्या रिकाम्या बंगल्यामागच्या झाडाखाली नाहीतर थेट क्लासमध्ये एवढ्याच ठिकाणी गेली. त्यामुळे " एस. पी. चा कट्टा नेमका आहे तरी कुठे? " हा प्रश्न ऐकून बाबांनी आपल्या बायफोकल चष्म्याच्या काचेवरून माझ्याकडे जरा संशयानेच पाहिलं. ही आता आपली काय फिरकी घेणार असा प्रश्न त्यांना पडला होता. शिवाय एस पी तून बाहेर पडून एवढी वर्षं झाल्यावर हा बॉम्ब मी त्यांच्यावर का टाकतेय हेही त्यांना समजलं नसावं. मी कारण सांगितल्यावर मात्र ते त्यांच्या 'कट्ट्यावर' हरवून गेले आणि मी पुन्हा एकदा पुस्तकात हरवून गेले .
        जसजसं पुस्तक पुढे सरकलं तसतसा एसपी चा सगळा चिरपरिचित परिसर डोळ्यासमोर उभा होता आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एखाद्या चित्रपटासारख्या घटना घडत होत्या. पण केवळ सगळा परिसर ओळखीचा आहे एवढंच त्या घटना मनाला भिडायचं कारण आहे असं काही वाटलं नाही. उनाड आणि अवखळ वाऱ्यासारखं ते कॉलेज लाईफचं 'स्पिरिट' इथे सूत्रधार म्हणून काम करत होतं. आणि सगळी मंडळी त्या स्पिरिटच्या रंगपंचमीत नखशिखान्त भिजत होती. सगळा कट्टा त्या रंगांमध्ये भिजून जात होता.  या सगळ्याचं वेगळं वर्णन मी काय करणार? त्यातून सुशिने लिहिल्यानंतर आम्ही कोण लिहिणारे...
        त्यातला टारगटपणा, मारामाऱ्या, प्रेमप्रकरणं वगरे गोष्टींमधे तसं काही नाविन्य नाही पण हे पुस्तक लिहिलं गेलं तेंव्हा त्यात सॉलिड चार्म असणार हे नक्की जाणवत होतं. श्रेयस, दिग्या, प्रीत, रीन ही  मुख्य स्टार मंडळी डोळ्यासमोर सहज उभी राहत होती. त्यांच्यात आणि आमच्यात जनरेशन गॅप नक्कीच होती पण काळी एकच्या मध्य सप्तकात गाणाऱ्यांचे आणि काळी एकला मंद्र मानून गाणाऱ्यां आमचे सूर सुपरिंपोझ होऊन तंतोतंत जुळावेत तसं काहीसं होत होतं. भाषा, फॅशन आणि विषय बदलले तरी त्यांच्यात - आमच्यात मूळ तत्त्व एकच आहे हे जाणवत होतं. अर्थात पुढच्या पिढीला  मागची पिढी नेहमीच शामळू वाटते त्याला मीही अपवाद नाही. पण एका अनिर्बंध वयातले ते मनस्वी दिवस पिढीला बांधील नाहीत. आमच्या कट्ट्याच्या जागा वेगळ्या असतील आणि 'कडक' वाटणारी, भक्ती करण्याची ठिकाणं वेगळी असतील पण वय तेच होतं. दुनियादारी म्हणजे ते वय चाफ्याच्या फुलांच्या घरी केलेल्या अत्तरासारखं बाटलीत भरून ठेवलंय की काय असं वाटलं मला. त्यातल्या अनेक गोष्टी मला पटल्या नसतील पण तरीही पुस्तक मात्र मनापासून पटलं.
        या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते एखाद्या वर्तुळासारखं आहे. कुठल्याही पानापासून वाचायला सुरुवात केली तरी आपल्याला अचूक धागे लागत जातात. हे सुशि चं जग पुस्तकाच्या पानांच्या  द्विमितीत राहतच नाही. बघता बघता ते आपल्या मनातलं गजबजलेलं गाव होऊन जातं. डोळ्यासमोर दिसायला लागतं.   ' अलका ' पासून मंडईपर्यंतच्या त्या चिरपरिचित परिसरात पुन्हा एकदा भ्रमंती करून आल्यावर मला पुन्हा एकदा ताजंतवानं झाल्यासारखं वाटलं. खूप छान वाटलं. सुशि ची ही अजब दुनिया आणि त्याची तितकीच अजब दुनियादारी वाचणाऱ्या प्रत्येकाच्या भूतकाळातल्या एका लाडक्या दुनियेला नकळत स्पर्श करून जाते. तरुणाईच्या उड्या पडण्यासाठी आणखी काय हवं?
        अर्थात मला शेवट फारसा आवडला नाही आणि पिढीतल्या अंतरामुळे असेल कदाचित पण प्रेमभंगाबद्दल इतका गळा काढण्यासारखं त्यात काही असावं असं मला वाटलं नाही. शेवटचं आकाशाचं रूपक मात्र ' टचिंग '. तरीसुद्धा प्रेम आणि प्रेमभंग ही इतकी गळा काढण्याची आणि टिपं गाळायची गोष्ट नाही असं पुन्हा पुन्हा वाटून गेलं. अर्थात कॉलेजवरच्या कादंबरीमध्ये प्रेमकथा नाहीत म्हणजे केमिस्ट्री प्रॅक्टिकलमधून टायट्रेशन काढून टाकणं किंवा सी प्लस प्लस च्या अभ्यासक्रमातून vtbl वगळण्यासारखं आहे हेही पटल्यामुळे इन स्पाईट ऑफ ऑल दॅट पुस्तक जाम आवडून गेलं हे मात्र खरं. आमच्या पिढीने अनेक प्रेमप्रकरणं पाहिली, जपली, फुलवली आणि क्षुल्लक कारणांवरून मोडतानाही पाहिली. पण कुठेही या दुःखाचं प्रदर्शन करावं किंवा त्याबद्दल फिल्मी पद्धतीने शोक व्यक्त करावा असं आम्हाला वाटलं नाही. याचा अर्थ आम्हाला दुःखच झालं नाही असा निश्चितच नाही पण माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये तरी ते दुःख स्बीकारून पुढे जाण्याचा शहाणपणा आहे म्हणूनही हा भाग मला इतका पटला नसेल. हेच बहुधा पिढीचं अंतर आहे.  पण जाता जाता माझ्या आई - बाबा - काका - मामा - मावशी - आत्यांच्या पिढीचं कॉलेज लाईफ जवळून बघितल्याचा सूक्ष्म आनंदही नक्कीच मिळाला.
        नोकरीत सत्तेचे गुलाम होताना आपल्या हातून सर्वपथम हे बेडर, बेफिकीर वय हिरावून घेतलं जातं ही जाणीव अस्वस्थ करून गेली. पुस्तक वाचायला लागलेले तीन - साडेतीन तास आणि गमावलेली रात्रभराची झोप सत्कारणी लागल्यासारखी वाटली. त्या धुंदीतच संगणक सुरू केला आणि बोलण्याच्या खिडकीत त्या मित्राला शोधायचा खूप प्रयत्न केला. इतक्या अपरात्री(!) मी रेघेवर आलेली बघून बऱ्याच इतर मित्रमैत्रिणींनी चिंता व्यक्त केली पण हातातून कायमच्या निसटून गेलेल्या त्या वेड्या वयासारखाच तोही कुठेतरी निसटला आहे बहुतेक.  आता कधीतरी माझा शिळा झालेला निरोप वाचून तो मला फोन करेल. मग आम्ही पूर्वीच्याच जिव्हाळ्याने गप्पादेखिल मारू. अर्थात या वेळी त्याचा उद्धार करण्यासाठी मला ऍनिमल किंगडमवर अवलंबून रहावं लागणार नाही याबद्दल मला खात्री आहे. आठवून आठवून (अर्थातच फुल्यांसहित) सुशिने शिकवलेली लाखोली मी त्याला वाहणारच आहे. पण पुस्तक वाचून झाल्याझाल्या मला त्याला जे काही उत्कटतेने सांगावंसं वाटलं होतं ती ऊर्मी त्या संवादात असेल का? मला ठाऊक नाही.
--अदिती
(१९ नोव्हेंबर २००७,
कार्तिक शुद्ध ९ शके १९२९)