ऊर्जेचे अंतरंग-०७

ऊर्जेचे अंतरंग-०७: शून्य ऊर्जेकडे आणि ऊर्जस्वलतेकडे वाटचाल

वाफेतली ऊर्जा काढून घेतली तर त्याचे पाणी होते. पाण्यातली ऊर्जा काढून घेतली तर त्याचा बर्फ होतो. बर्फातली ऊर्जा काढून घेतली तर त्याचे काय होते? त्याचे तापमान ऊर्जा काढून घेत जावी तसतसे घटत जाते. बर्फाला जसजसे निववत जावे तसतसे निववणाऱ्या पदार्थाचे तापमान वाढत जाते. म्हणजे मग तो पदार्थ पुन्हा निववू शकत नाही. जेव्हा निववणारे पदार्थच संपत जातात तेव्हा मग बर्फाला आणखी निववणे शक्य होत नाही. कारण मग त्या तापमानापेक्षा कमी तापमानाचे निववणारे पदार्थच उपलब्ध होत नाहीत. अशा तापमानाला निव्वळ शून्य अंश तापमान म्हणतात. लॉर्ड केल्विन ह्यांनी त्याचा शोध लावला म्हणून त्याला शून्य अंश केल्विन म्हणू लागले. प्रत्यक्षात हे तापमान -२७३.१६ अंश सेल्शिअस एवढे असते.

अंधश्रद्ध भाग - ३

अंधश्रद्ध - भाग २ वरुन पुढे चालू

"रीमा, बेटा हे काय चाललंय? कुठे आहेस तू? कशी आहेस?"
"बरी आहे गं आई," आईने कार्यक्रम पाहिला असावा हे जाणून रीमा म्हणाली. "घरात आहे, टीव्हीसमोरच. कार्यक्रम अमावास्येच्या रात्री चित्रित झाला ना! दोन दिवसांपूर्वी. लाइव टेलेकास्ट नाहीये. काळजी करू नकोस."
"ते काही नाही! तू नीघ आत्ता आणि असशील तशी उठून खोपोलीला ये.  हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबायला हवं,"रडवेल्या होऊन वसुंधराताई म्हणाल्या.
"रात्रीचे साडे दहा वाजायला आले आहेत आई. आता कुठे निघू म्हणतेस? ऑफिसात उद्या कामही आहे. पुढच्या आठवड्यात येते, काळजी नको गं करूस. मी बरी आहे. दोन दिवस झाले या गोष्टीला. सगळं काही सुरळीत चाललंय."
"नाही, ते काही नाही. मला काहीही ऐकून घ्यायचे नाही. आत्ताच नीघ, मी नाही धीर धरू शकत उद्या सकाळपर्यंत. खोपोली काही लांब नाही, रात्रीच्यावेळी तासा दिडतासात पोहोचशील. उद्याचा काय भरवसा, तू नवीन कारणे देशील, टाळशील. तुला कधी बघते असं झालंय."
"हम्म! मी अगदी व्यवस्थित आहे." रीमाला काय बोलावे सुचत नव्हते.
"मला खूप काळजी वाटते आहे. नको करूस असली कामं, सोडून दे सोडून दे म्हणून कधीची सांगत होते." वसुंधराताईंना हुंदका आवरला नाही. नानासाहेबांनी त्यांच्या हातातून फोन घेतला.
"रीमा, तुला शक्य होईल का यायला?" शांतपणे त्यांनी विचारले."उद्या सकाळीच नीघ. इतक्या रात्री नको. आई जरा जास्तच हळवी झालीये, तिचं ब्लडप्रेशर वाढलंय असं वाटतंय. मी बघतो तिच्याकडे पण उद्या आलीस तर मलाही बरं वाटेल."
"बाबा, आता तुम्हीही? ठीक आहे. मी उद्या घरी येते."
"पण तुझं काम?"
"आई जरा जास्तच काळजीत दिसत्ये, कसही करून कोणत्याही परिस्थितीत मी येतेच."रीमाने वचन दिले तसा नानासाहेबांनी फोन ठेवून दिला.

अजुन २६ रस्त्यांवर बि.आर.टी.....बोंबला....

दिल्लीतील आय आय टी ने पालिकेत दिलेल्या प्रस्तावानुसार, अजुन २६ रस्त्यांवर बि.आर.टि योजनेचा विचार करण्यास सांगितला आहे.....

त्यासाठी निधी उपलब्ध आहे तो ५७६ कोटी रुपयांचा....!!        म्हणजे हयातले ४०% आधिच चोरापोरांवर जाणार, नियमित वेळेत काम होणार नाहि आणि नंतर पुन्हा निधी ची मागणी होणार....!!

पिवळ्या चेहऱ्याचे रहस्य - ३

"तिचा दुसरा नवरा जेव्हा त्या घरात गेला तेव्हा मिसेस मन्रोची जी अवस्था झाली होती त्याचं आणखी काय स्पष्टीकरण देता येईल? माझा असा तर्क आहे की तिच्या पहिल्या नवऱ्याला काही तरी वाईट सवयी लागल्या असतील किंवा काहीतरी गलिच्छ आजार झाला असेल. ही बाई मग त्याच्या तावडीतून सुटून इंग्लंडला आली, नाव बदललं आणि नव्याने आयुष्याला सुरुवात केली. दुसऱ्या पतीला कुणाचा तरी मृत्यूचा दाखला आपल्या पतीचा म्हणून दाखवला. पण काही वर्षांनी  मिसेस मन्रोच्या पहिल्या नवऱ्याला तिचा पत्ता लागला आणि त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. शंभर पौंड देऊन त्यांची पीडा टाळण्याचा मिसेस मन्रोचा विचार असणार. पण त्यावर भागलं नाही. केवळ पैसे मागून तो थांबला नाही तर मन्रो परिवाराच्या जवळ येऊन राहिला. ह्या माणसाला आणखी कुणाची मदत मिळत असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

रोहिंग्या आणि डान्सिंग विथ द स्टार्स...

एक घाणीने बरबटलेलं गटार, खरंतर रस्ताच. बाजूला झोपडपट्टी. समोर थोडी मोकळी जागा. निळ्या गणवेषातला एक पोलिस काठी आपटंत येतो. मोकळ्या जागेत खेळणारी मुलं उधळून पळतात. एक पांगळं मूल मागेच रखडतं. पोलिस त्याच्यावर काठी उगारून त्याला धमकावतो. कदाचित पोलिसालाही त्या मुलाची दया येते. त्या मुलाला तसंच सोडून तो पुढे जातो. ते पांगळं मूल तसंच गटारात पडून रहातं. त्याचे टपोरे डोळे पाण्याने भरतात. अश्रू नाही, ते संताप, दुःख, असहायता, अपमान ह्याने भरतात. कोणी लहानपणीच मोठं केलं ह्या लहान मुलांना?

.......रोहिंग्या. बांग्लादेश आणि बर्मा ह्यांच्यातल्या एका वादाचं कारण. बर्मामधल्या एका मुस्लिम जमातीला रोहिंग्या म्हणतात. ते आश्रित म्हणून बांग्लादेशात रहातात. ऑफिशियल नंबर बावीस हजार. विस्थापित, आश्रित, रेफ्युजी......

शाळा. शाळेत मुलं काहितरी घोकतायत. काहितरी नाही, इंग्लिश आहे ते. "आय ऍम समथिंग" असं काहिसं. एक पोरगेलसा शिक्षक शिकवतोय. चक्क लूंगी लावून. कारणंच तसं आहे. तो रेफ्युजी असल्याने त्याने पँट घालणं त्याच्या दर्जाला साजेसं नाही. लुंगी ऎवजी पँट घातल्यामुळे खाव्या लागलेल्या माराचे व्रण अजूनही त्याच्या पाठीवर ताजे आहेत.

......मुसलमान म्हणून ते बर्मामधे वेगळे काढले जातात. लोकशाही नाही, व्यक्तीस्वातंत्र्य नाही. बांग्लादेश मुसलमान देश, लोकशाही देश म्हणून रोहिंग्यांचे लोंढेच्या लोंढे बांग्लादेशात येतात. पण त्यांच्यासाठी तरी कुठे ते आपले आहेत? उपरे म्हणून त्यांच्यावर लोकांचा आणि सिस्टिम चा सुद्धा राग आहे.......

एक धडधाकट माणूस चक्क ढसाढसा रडतोय. त्याच्या बायकोसमोर, मुलांसमोर. मुलांना दोन वेळेला जेवायला पण मिळत नाही असं डोळ्यात आर्जव आणून आणून सांगतोय. तो एक भांडं दाखवतो. त्यात जेवण म्हणून बनवलेलं काहीतरी असतं. हे मिश्रण आणि भात. सकाळ संध्याकाळ हेच खायचं. तेसुद्धा जर पुरेशी धनधान्याची मदत मिळाली तर. वर पोलिसांचा मार आहेच. आता त्याच्या बायकोलाही रडू येतंय. पोरगं मात्र मातीशी खेळण्यात दंगलंय. एक बचाकभर माती उचलून ते सरळ तोंडात टाकतं.

......बावीस हजार रोहिंग्या बांग्लादेश बर्मा सीमेवरच्या रेफ्युजी कँप मधे रहातात. संयुक्त राष्ट्रांकडून हे कँपस चालवले जातात. पण अनधिकृतपणे बांग्लादेशात रहाणार्‍या रोहिंग्यांची संख्या एक लाखाहूनही अधिक आहे. त्यांना रेफ्युजी कँप मधे ज्या काही तुटपुंज्या सोयी मिळतात त्याही मिळंत नाहीत......

एक बाई आपल्या झोपडीसमोर बसलेय. तिची मुलं कसलासा पाला समोरच्या रानातून तोडून आणतात. तोच पाला ती शिजवतेय अन्न म्हणून. सात मुलं आहेत तिला. नवर्‍याला बर्मा मधे मारलं म्हणून ती मुलांना घेवून बांग्लादेशात पळून आली. पण ती अनधिकृत रेफ्युजी आहे. मुलं अधाशासारखी त्या पाल्याकडे बघतायत. ती बाई डोळ्यात असवं आणून सांगतेय. तिला आणि तिच्या नवर्‍याला बर्मिज सॆनिकांनी कॆदेत टाकलं. सतत बलात्कार. सातातली किती मुलं नवर्‍याची आणि किती दुसर्‍यांची हे सांगणंदेखील तिला शक्य नाही. तिला तिच्या मुलीची अशी अवस्था करायची नाहीये. चवदा वर्षाची आहे तिची मुलगी. पण तिला ती कुठेही जावू देत नाही. आजूबाजूचे लोक अचकट विचकट बोलतात, घरापर्यंत येवून तिला पाठव म्हणून धमकावतात.

.....रोहिंग्या लोकांविरुद्ध बांग्लादेशींमध्ये असंतोष खदखदतोय. ते स्वस्तात कामं करतात आणि स्थानिकांचा रोजगार पळवतात. ह्यामुळे स्थानिकांकडून त्यांना काही मदत मिळणं अशक्य आहे. सरकारही ते उपरे असल्याने त्यांच्यासाठी काहीही करू इच्छित नाही. बर्मा सरकारने तर त्यांचं राष्ट्रियत्व नाकारलंय. हा तिढा इतक्यात सुटण्याची चिन्ह नाहीत म्हणून मदत देणार्‍या देशांनीही हात आखडता घ्यायचं ठरवलंय. पण तरीही एक आशेचा किरण अद्याप आहे......

एका छोट्या हॉलमधे अनेक लहान लहान मुलं आणि त्यांच्या आया बसल्यायत. प्रत्येकीच्या हातात एक चंदेरी पिशवी आहे. ती एका बाजूने फोडून त्यातलं चाटण आया मुलांना खायला घालतायत. मेडिसिन सॅन्स फ्रंटियर्स (MSF) अर्थात डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स ह्या संस्थेचा एक स्वय़ंसेवक सांगतोय की रोहिंग्या विस्थापितांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण खूप आहे. कारण कुपोषण. म्हणून MSF तर्फे हे पोषक अन्न बालकांना दिलं जातंय. ते बालकांना तर आवडतंच आणि त्याचा पुरवठा करणंही तितकसं अवघड नाही. हळूहळू इथल्या बालकांचं पोषण ह्यामुळे सुधारेल.

......असा आहे हा तिढा. ना घरका न घाटका. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. एकोणिसशे नव्वद सालापासून लोक रेफ्युजी म्हणून रहातायत. पंधरा वर्ष झाली. लहानांचे तरूण झाले. त्यांनी बाहेरचं जग पाहिलंच नाही. तरूण उताराला लागले उद्याच्या आशेवर. म्हातारे मेले चांगल्या कबरीची स्वप्न पहात. पण बांग्लादेश, बर्मा आणि त्यांच्यातला हा तिढा आहे तसे आहेत. आणि रोहिंग्या आहेत कायमस्वरूपी रेफ्युजी......

निवेदक आपलं निवेदन संपवतो. श्रेयनामावली सुरू होते. आम्ही बघणारे मात्र सुन्न. कशा अवस्थेत लोकं रहातात? आणि आपण फालतू कारणांसाठी रडत असतो. हे विषय पण गुंतागुंतीचे. रोहिंग्या बांग्लादेशात रेफ्युजी. बांग्लादेशी भारतात रेफ्युजी. आणि भारतीय पश्चिमी देशांत. रेफ्युजी नसले तरी तसलंच काहीतरी. विचारांची वावटळ मनात सुरू होते.

इतक्यात श्रेयनामावली संपून जाहिराती सुरू होतात. मी चटकन भानावर येतो. घड्याळाकडे लक्ष जातं. साडेसात. मी जवळ जवळ किंचाळतोच बायकोच्या अंगावर. अगं "डान्सिंग विथ द स्टार्स" सुरू झालं असेल. तार्‍यांच्या भाऊगर्दीत रोहिंग्या अस्पष्ट होत जातात.

अंधश्रद्ध - भाग २

अंधश्रद्ध - भाग १ वरून पुढे चालू....

पुढचा संपूर्ण आठवडा वसुंधराताईंना कोणतेही स्वप्न पडले नाही. रोज रात्री त्यांना शांत झोप लागत होती. त्यानंतरही बरेच दिवस उलटले. त्यांच्या मनातील भीतीही कमी झाली होती. दर शुक्रवारी रात्री १० वाजता रीमाच्या कार्यक्रमाचे प्रसारण होत असे. मनात धाकधूक ठेवूनच त्या टीव्ही सुरू करत परंतु गेले काही आठवडे विशेष घडले नव्हते.

आजही रीमाचा कार्यक्रम पाहण्यासाठी त्या आणि नानासाहेब रात्रीची जेवणे झाल्यावर दिवाणखान्यात काहीतरी वाचत बसले होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी टीव्ही सुरू केला. आजचा कार्यक्रम अघोर विधी आणि पूजांबाबत होता. त्यासाठी रीमा आणि तिचा चमू मुंबईला लागून असलेल्या कान्हेरी जवळच्या जंगलात गेले होते. तेथील एका आड गुंफेत अघोर पंथाचे विधी चालतात आणि अमावास्येच्या रात्री काही विशेष पूजा तेथे केल्या जातात असा त्यांना सुगावा लागला होता.

कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हा कान्हेरीतील एका अंधाऱ्या आड पायवाटेवर कॅमेऱ्यासमोर रीमा आपले छोटेखानी भाषण देत होती.

"या जगात कोणीही अश्रद्ध नाही. प्रत्येक माणूस सश्रद्धच असतो. प्रत्येकाच्या श्रद्धा वेगळ्या असतात, त्याची खोली वेगळी असते, आयाम वेगळे असतात. ज्या श्रद्धांवर आपला विश्वास नाही त्याला आपण अंधश्रद्धेचे नाव देतो. एखादा माणूस देवावर अजिबात श्रद्धा ठेवत नसेल परंतु आपल्या आईवडिलांवर श्रद्धा बाळगून असेल, तर एखादा आपल्या कामावर श्रद्धा बाळगून असेल, गुरुवर, कलेवर, अभ्यासावर. माणसाच्या श्रद्धा आणि श्रद्धास्थाने वेगवेगळी असतात. एखादी विद्या, शास्त्र पुरातन आहे, आज तिचे महत्त्व उरले नसेल किंवा कमी झाले असेल म्हणजे ते थोतांड असेलच असे नाही. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, एखाद्या प्राण्याला किंबहुना कुत्र्याला माणसाच्या शरीराचा, त्याने वापरलेल्या वस्तूचा, हातरुमाल किंवा चपला यांचा अचूक वास येतो. त्यावरून तो हरवलेली गोष्ट, जागा, माणूस हुडकून काढू शकतो. समजा घ्राणेंद्रिय जागृत करण्याची ही कला किंवा ज्याला सिद्धी असे म्हणू माणसाने अवगत केली तर केवळ एखाद्याच्या हातरुमालाचा, केसांच्या पुंजक्याच्या आणि अशा इतर लहानसहान गोष्टींवरून इतरांचे स्वभाववर्णन करता येईल, त्या माणसाबद्दल बरेच काही सांगता येईल. तंत्रसाधनेतून अशा अनेक सिद्धी प्राप्त होतात असे काही तज्ज्ञांचे मत असते, जे इतर वेळेस भोंदूबाबांकडून चमत्कार, सिद्धी, जादू म्हणून खपवले जाते.  हे करणी, नवस, जादूटोणा कुठेतरी याच विचारांशी संलग्न आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज आम्ही अघोरींना भेट देत आहोत. अघोर म्हणजे रक्त पिणारे, बळी देणारे, मृत व्यक्तीचे मांसभक्षण करणारे असा सर्वसाधारण समज असतो परंतु अघोर म्हणजे ज्याने स्वत:ला आठ प्रकारच्या दुर्गुणांपासून मुक्त केले आहे तो. हे दुर्गुण म्हणजे अपेक्षा, अभिमान, भीती, हाव, घृणा, बीभत्स, शारीरिक सुख आणि दांभिकता. यापासून मुक्ती मिळाली तर जीवाला कोणताही घोर राहत नाही आणि म्हणून यावर विजय मिळवणार्‍याला म्हणतात अघोर आणि साधनेला म्हणतात अघोर विद्या. जो हे साधतो तो शिव म्हणजे पवित्र असतो आणि त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात, तांत्रिक विद्येत तो प्रगती करतो.

तरीही आजच्या या युगात अशा शक्तींच्या मागे लागलेल्या व्यक्तींना या साधनेची काहीही माहिती नसते आणि अर्धवट ज्ञानाच्या आधारे ते आपली शक्ती व्यर्थ घालवतात याचे आम्ही आज चित्रण करणार आहोत."

रीमाचे भाषण ऐकून वसुंधराताईंना शिसारी आली. "अहो, यावेळी तुम्हीच तिला सांगा की ही असली कामं करू नकोस म्हणून. कुठे जाते ही पोरगी रात्रीबेरात्री या आडरानात. हे सर्व पुरे झालं आता. मला भीती वाटते हे सगळं बघून. तिला वेळीच थांबवायला हवे."

"गप गं! मला कार्यक्रम बघू दे आणि तिची आख्खी टीम आहे तिच्याबरोबर. उगीच काळजी करत बसतेस. काही होत नाही. अशा ठिकाणी साध्या वेषातले दोन पोलिसही  बरोबर येतात म्हणून सांगत होती मागे ती." नानासाहेब उद्गारले.
"तुमचीच फूस आहे तिला. सोन्यासारखी एकुलती एक मुलगी, तिला काही होऊ नये एवढीच माझी इच्छा," वसुंधराताईंच्या आवाजात काळजी भरली होती, त्यांनी आपले लक्ष पुन्हा टीव्हीकडे वळवले.

रीमा आणि तिचे सहकारी पूजेच्या ठिकाणी पोहोचले होते. समोरचे दृश्य पाहून वसुंधराताईंना मळमळून आले. जटा वाढवलेले आणि अंगाला भस्माचे पट्टे लावलेले काही साधू धीरगंभीर आवाजात काही मंत्रोच्चार करत होते, आजूबाजूला कोंबड्यांच्या रक्ताचा सडा पडला होता. जमिनीत त्रिशूळ खोचलेले होते, भिंतींवर मशाली पेटवल्या होत्या. जवळच कालीच्या मूर्तीची पूजा सुरू होती. धुरकट आणि कोंदट वातावरणात रीमा आणि तिचे सहकारी कार्यक्रमाचे चित्रण करत होते. अचानक कॅमेरा हालल्यासारखा वाटला आणि सोबत काहीजणांचे चढवलेले आवाज.

"यहाँ आना मना है। किसने आने दिया? चले जाव वरना नतीजा अच्छा नहीं होगा।"
"हम ये विधियाँ लोगोंतक पहुँचा रहे हैं। यही हमारा काम है, क्यों नहीं कर सकते?"

आवाज चढले होते. आपापसातील बाचाबाची वाढत चालली होती. कॅमेऱ्याशी हिसकाहिसकीही सुरू होती. इतक्यात पन्नाशीच्या आसपासचा एक जटाधारी साधू कॅमेऱ्यासमोर येऊन उभा राहिला, त्याच्या घार्‍या डोळ्यात खुनशी भाव होते. त्याने रीमाकडे नजर रोखली आणि थंड आवाजात तो म्हणाला, "लडकी यहाँ से निकल। यहाँ आकर बहुत बडी गलती कर दी। इस साधनाको आप लोगोंने खंडित किया, नतीजा तो भुगतनाही पडेगा।"

अंधश्रद्ध - भाग १

लेखन प्रकार: गूढकथा

रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. बाहेरची रहदारी मंदावली होती. वसुंधराताईंनी हातातील कादंबरी मिटली आणि व्हरांड्याकडे नजर टाकली. संध्याकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता. आताही पावसाची मोठी सर आली होती. व्हरांड्यातील दिव्याच्या मंद प्रकाशात संगमरवरी जमिनीवर पडणारे पावसाचे टपोरे थेंब आजूबाजूच्या निरव शांततेचा भंग करत होते. वसुंधराताईंनी एक सुस्कारा सोडला. त्या आरामखुर्चीतून उठायला जाणार एवढ्यात कोणीतरी दारावरची बेल वाजवली. "कोण असेल बरं पावसाचं इतक्या रात्री?" असा विचार करत त्या दरवाज्यापाशी आल्या. पुन्हा बेल वाजली. वसुंधराताईंनी पीप-होलला डोळा लावून बाहेर पाहिले. दाराबाहेर रीमा ओलीचिंब होऊन थरथरत उभी होती. तिला दारापलीकडे वसुंधराताईंची चाहूल लागली तशी ती ओरडून म्हणाली,"आई! दरवाजा उघड लवकर. प्लीज, लवकर कर." तिच्या आवाजात अजिजी होती. वसुंधराताईंचा हात कडीवर गेला आणि तेथेच थबकला. क्षणभराने निर्विकारपणे त्या माघारी फिरल्या. बाहेरून रीमा बेल वाजवत होती. दरवाजाही ठोठावत होती. "आई! उघड ना गं दार, असं काय करत्येस? आई मी रीमा, आई गं! ए आई उघड ना गं दरवाजा!" रीमा काकुळतीने आईला सांगत होती. वसुंधराताईंनी शांतपणे दिवा मालवला, जसे काहीच घडले नव्हते आणि त्या झोपायच्या खोलीत जायला वळल्या.

घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते. वसुंधराताई खाडकन गादीवर उठून बसल्या. हवेत गारवा होता तरी त्यांना दरदरून घाम फुटला होता. गेल्या सलग तीन रात्री त्यांना हे एकच स्वप्न पडत होते. रीमा, त्यांची एकुलती एक मुलगी मुंबईला राहत होती. शिकत असताना होस्टेलवर राहायची आणि आता नोकरी लागल्यावर तिला मुंबईच्या उपनगरात ऑफिसकडून फ्लॅट मिळाला होता. नानासाहेबांनी रिटायर झाल्यावर खोपोलीला हा बंगला बांधला होता. नानासाहेब आणि वसुंधराताई खोपोलीला आरामशीर निवृत्त आयुष्य जगत होते. ऑफिसने तिला कारही दिली होती. रीमा महिन्यातून एकदा शनिवार रविवारी आई-बाबांना भेटायला खोपोलीला एक चक्कर टाकायचीच. तशी वसुंधराताईंची इच्छा असायची की प्रत्येक शनिवार रविवार तिने आपल्यासोबत घरी घालवावा परंतु रीमाच्या नोकरीमुळे, कामातील व्यग्रतेमुळे ते शक्य होत नव्हते.

रीमाने ग्रॅज्युएशननंतर जर्नालिझमचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. गेले वर्षभर मुंबईतील एका अग्रगण्य टीव्ही चॅनेलच्या दैनंदिन बातम्यांच्या कार्यक्रमासाठी ती काही ठळक बातम्या गोळा करत होती. काही महिन्यांपूर्वी तिच्या बॉसने बढती आणि सोबत एक आगळीवेगळी जबाबदारी तिच्या गळ्यात टाकली होती. त्यानुसार काही 'हटके' बातम्या तिला गोळा करायच्या होत्या. त्यांच्या टीव्ही चॅनेलला अंधश्रद्धा, बुवाबाजी, करणी, मंत्र-तंत्र, भुताटकी अशा थोड्याशा वेगळ्या विषयांवर एक टाइम-स्लॉट टाकायचा होता. रीमाच्या बेधडक स्वभावाची पुरेपुर कल्पना असलेल्या तिच्या बॉसला रीमाशिवाय दुसरा कोणताही वार्ताहर या कामगिरीसाठी सुचणे केवळ अशक्य होते. रीमानेही आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. महिन्याभरात तिने आणि तिच्या चमूने मुंबईतील एक बंगाली बाबा आणि त्यानंतर भानामतीच्या एका प्रकरणाचा छडा लावला होता. अगदी हिरिरीने त्यांनी या प्रकरणांचा पाठपुरावा केला होता. स्वत: रीमाचा या बुवाबाजी, भुतेखेते, देवदेवस्कीसारख्या गोष्टींवर काडीमात्र विश्वास नव्हता. परंतु त्या बंगालीबाबाचे बिंग फुटल्यावर त्याने रीमाला बरेच शिव्याशाप दिले होते आणि याचे चित्रण वसुंधराताईंनी पाहिल्यापासून त्या हवालदिल झाल्या होत्या.

रीमाला फोन करून त्यांनी परोपरीने हे काम न करण्याबाबत सुचवले होते. परंतु ऐकेल तर ती रीमा कसली? तिने निक्षून आईला सांगितले होते की हे काम तिला मनापासून आवडते आणि ती ते करत राहणार. बहुधा त्याचा परिपाक वसुंधराताईंना या स्वप्नांत दिसत होता. सकाळ झाल्यावर आधी रीमाला फोन लावायचा असे ठरवून त्या पुन्हा गादीवर पडल्या.

जिंका जिंका परिस्थिती ( विन-विन सिच्युएशन)

हल्ली मोठमोठ्या 'कॉर्पोरेटस्‌' मधून "जिंका जिंका परिस्थिती( विन-विन सिच्युएशन) हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. शहरातून थेट खेड्यापर्यंत हा शब्दप्रयोग पोहोचला आहे. मनुष्यांच्या सान्निध्यात राहून गाई-म्हशीही आता या शब्दप्रयोगाचा वापर करून बऱ्यापैकी फायदा पदरात पाडून घेऊ लागल्या आहेत. तो कसा? ते पाहू.

कुणी 'डोंबल' या शब्दाचा नक्की अर्थ सांगेल का?

मराठीत 'डोंबल' हा शब्द पुन: पुन्हा ऐकू येतो.पण त्याचा स्पष्ट अर्थ कळत नाही.

अर्थ कसला आलाय डोंबलाचा? अर्थ काय सांगू , डोंबल? असं मात्र म्हणू नका. :)

उत्तराच्या प्रतीक्षेत...

पिवळ्या चेहऱ्याचे रहस्य - २

पिवळ्या चेहऱ्याचे रहस्य - २

"मि.होम्स, त्या चेहऱ्यात काय वेगळं होतं मला सांगता येणार नाही. पण तो चेहरा पाहून माझ्या अंगावर एकदम भीतीने शहाराच आला. त्या चेहऱ्यात काहीतरी अमानवी आणि अनैसर्गिक असं होतं. जरा जवळून बघू या हा प्रकार तरी काय आहे, असे मनाशी म्हणत मी पुढे गेलो पण त्याच क्षणाला तो चेहरा एकदम कुठल्यातरी शक्तीने खेचल्यासारखा अदृश्य  झाला. मी थोडा वेळ तिथेच विचार करत थांबलो. तो चेहरा स्त्रीचा होता की पुरुषाचा ह्याबद्दल मला काहीच सांगता येणार नाही. पण त्याचा रंग मात्र मी कधीच विसरणार नाही. तो रंग पिवळसर पांढुरका होता आणि त्यात निश्चितपणे काही तरी अनैसर्गिक होतं.  ही काय भानगड आहे ते बघूच या असे मनाशी म्हणत मी सरळ त्या घरासमोर गेलो आणि दार वाजवलं. एका जराशा खाष्ट दिसणाऱ्या बाईने दार उघडले आणि जरा तुटकपणेच विचारले, ’काय पाहिजे तुम्हाला?’
"मी म्हटलं, ’काही नाही. मी इथे जवळच राहतो. काही मदत वगैरे लागली तर सांगा. कसलाही संकोच... ’
" ’आम्हाला लागेल तेव्हा आम्ही बघू’ असं म्हणून तिने धाडकन दार लावून घेतलं. मला त्या बाईच्या वागण्याचा खूपच राग आला. घरी आलो तरी झाला प्रकार माझ्या डोक्यातून जाईना. मी बायकोला ह्याबद्दल काहीच बोललो नाही कारण ती जरा भित्री आहे. मी फक्त तिला सांगितलं की मैदानापलीकडच्या घरात कुणीतरी रहायला आलेत. त्यावर ती काहीच बोलली नाही.