काबुल एक्सप्रेस

कबीर खान या दिग्दर्शकाच्या 'सेहर' या चित्रपटाविषयी मी पूर्वी लिहिले होते. त्याचाच 'काबुल एक्सप्रेस' हा चित्रपट पाहिला. ९/११ या घटनेनंतर अल-कायदा आणि तालिबानची पाळेमुळे उध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. त्या कारवाईत पाकिस्तानी सैन्यही सामिल झाले होते. तालिबान हे अमेरिका आणि पाकिस्ताननेच उभे केलेले भूत- पण आता मात्र पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये एकही पाकिस्तानी सैनिक नाही असे म्हणून हात झटकून टाकले. तालिबानच्या उभारणीसाठी पाकिस्तानातून गेलेल्या सैनिकांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच करवत नाही. या सगळ्या घटनांचे वार्तांकन करण्यासाठी जगभरातून वार्ताहर अफगाणिस्तानमध्ये गेले. असेच दोन भारतीय तरुण  आणि एक अमेरिकन वार्ताहर तरुणी, त्यांना काबुलपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतलेला एक अफगाणी ड्रायव्हर आणि या सगळ्यांना ओलीस धरुन पाकिस्तानी सीमेपर्यंत पोचण्याची धडपड करणारा एक पाकिस्तान आर्मीचा 'तालिब' यांची ही कथा.

या कथेत नायक-नायिका नाहीत, खलनायकही नाही.(गाणे-बिणे तर नाहीच नाही!) या वार्ताहरांना ओलीस धरणारा तालिबही तसा क्रूर वगैरे नाही. परिस्थितीच्या आणि नियतीच्या अगम्य चक्रात भरडले जाणारे हे अगदी साधे लोक आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि स्वार्थ यात त्यांची आयुष्ये होरपळून निघालेली आहेत. या साध्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांची ही चटका लावणारी कथा. यातल्या पात्रांच्या बोलण्यातून आजूबाजूच्या परिस्थितीला स्पर्श होत जातो. अफगाणिस्तानमधील भग्न इमारती, उध्वस्त झालेली शहरे आणि त्याबरोबरच ढासळलेले लोक पाहून अंगावर शहारा येतो. काय दोष आहे या लोकांचा? त्यांना ना तर तालिबानशी काही मतलब आहे, ना अमेरिकेशी. का त्यांचा आयुष्याची अशी न संपणारी फरफट सुरु आहे? आणि कधीपर्यंत?

'काबुल एक्सप्रेस' अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत नाही. पण तो तुम्हाला मुळापासून हादरवून टाकतो. अफगाणिस्तानच्या पाकिस्तानी सीमेवर अमेरिकन सैनिकांनी पकडून आणलेल्या 'तालिब' मध्ये 'आपले' किती लोक आहेत या चिंतेने तडफडणारा पाकिस्तानी सैनिक - पण एकही पाकिस्तानी 'तालिब' नाही असे सरकारनेच जाहीर केल्याने त्याला तसे सांगताही येत नाही- त्या 'तालिब' पैकी पळून जाणाऱ्या एकावर गोळ्या मारतो, पण त्या त्याला लागू नयेत अशा बेताने. न जाणो तो 'आपला' असला तर! पण अमेरिकन सैनिकांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. एक अमेरिकन सैनिक सहजपणे गोळी मारुन त्या 'तालिब' ला ठार करतो. तो अफगाणी असे, की पाकिस्तानी! युद्धाची ही अपरिहार्य निष्ठुरता आपल्याला स्पर्श करुन जाते. अस्वस्थ करुन जाते.

'अ गुड क्राफ्टसमन कॅन प्रोड्यूस अ मास्टरपीस विथ इंफिरिअर टूल्स' हे पटावे अशी कबीर खानची या चित्रपटातली कामगिरी आहे. अर्थात अर्शद वारसी हे काही 'इंफिरिअर टूल' नाही - नॉट बाय एनी स्ट्रेच ऑफ इमॅजिनेशन! पण जॉन अब्राहम या माणसाविषयी बाकी आदर वाटावा असे त्याने आत्तापर्यंत काही केल्याचे स्मरणात नाही.( बिपाशा बसूशी मैत्री सोडून!) पण 'काबुल एक्सप्रेस' हा संपूर्ण दिग्दर्शकाचाच चित्रपट आहे. अफगाणिस्तानच्या भग्न अवशेषांमध्ये  व्यायाम करणारा जॉन आणि त्याच्याकडे मान वळवून कुतुहलाने पहाणारा एक अफगाणी छोकरा. तुलाही करायचाय व्यायाम माझ्याबरोबर? ये... जॉन त्याला खुणेनेच बोलावतो. तो छोकरा उठून उभा रहातो. त्याच्या एका पायाच्या जागेवर पोकळी आहे... कुबडीवर रेलून तो जॉनकडे बघतो आणि आपल्या आत कुठेतरी काहीतरी तुटतं..  काबुलच्या त्या खडबडीत रस्त्यावर तालिबच्या हातातल्या रेडिओवर कुठल्यातरी हिंदुस्थानी रेडिओ स्टेशनची खरखर ऐकू येते.. नंतर अस्पष्टपणे काही ओळखीचे सूर ऐकू येतात...
'मै जिंदगीका साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवेमें उडाता चला गया..'
नकळत हे दोन्ही भारतीय स्वतःशी गुणगुणायला लागतात. हळूच त्यात एक तिसरा सूर मिसळतो. तो असतो त्या 'तालिब' चा. तुमची हिंदी गाणी, तुमचे हिंदी चित्रपट.. अहो, आमचंच आहे तेही सगळं... आम्ही तर म्हणतोच की 'माधुरी दिक्षीत दो, काश्मीर लो...' मग हा भेसूर चेहऱ्याचा पाकिस्तानी तालिब आपल्याला सरहदीपलीकडचा आपलाच कुणी सगा वाटायला लागतो. गुलजारच्या 'सरहद...' ची आठवण येते.. अर्शद तर त्याला शेवटी म्हणतोच, इम्रान साहेब, तुम्ही काही एवढे वाईट नाही आहात. तुम्ही जर तालिब नसतात, तर कदाचित आपण चांगले दोस्तही होऊ शकलो असतो.... एक दीर्घ सुस्कारा टाकून तालिब म्हणतो. " ते तुम्ही लोक म्हणता ना, तसं... अगले जनममें..." 

महाराष्ट्र दरिद्री नाही हे सिद्ध करा : श्रीराम लागू ह्यांचे विचार

आजच्या ईसकाळ मध्ये ही बातमी वाचायला मिळाली. सर्वांना माहिती व्हावी आणि तीवर विचारांची देवाणघेवाण करता यावी ह्या हेतूने ती येथे उतरवून ठेवलेली आहे.

ईसकाळमधील बातमी : महाराष्ट्र दरिद्री नाही हे सिद्ध करा - श्रीराम लागू

संवयी

माणूस हा संवयींचा गुलाम असतो असे म्हणतात. यापैकी कांही सभोवतालच्या परिस्थितीमुळे लागतात, कांही आनुवंशिक असतात तर कांही मुद्दामहून लावून घेतलेल्या असतात. प्रत्येक आईवडिलांना (स्वतःला नसल्यातरी) आपल्या मुलांना आदर्श संवयी लागाव्या असे वाटत असते. प्रत्यक्षांत मात्र तसे होत नाही. संवयी चांगल्या की वाईट हे ठरवण्यापेक्षा त्यांचे फक्त निरीक्ष्ण करणे जास्त मनोरंजक ठरेल.
                           सकाळी उठण्याचे प्रकारच पहा, लवकर उठणारे, अतिलवकर उठणारे, उशीरा उठणारे आणि चक्क बारा वाजता उठणारे! त्यातले पोटप्रकार आणखी मजेशीर. जाग आल्यावर पटकन उठणारे, कधी न संपणारी ५ मिनिटांची सवलत मागणारे तर कांही उठवल्यावर शहामृगासारखी उशीत मान खुपसून बसणारे.
                          एकदा उठल्यावर तर नाना तऱ्हा ! दांत घासणारे, न घासणारे. पोट म्हणजे पाण्याचे पिंप असावे असे पाणी पिणारे. चहाशिवाय पुढचे कुठलेच काम न होणारे. वर्तमानपत्र न मिळाल्यास अस्वस्थ होणारे. कधी एकदा आंघोळ करतोय असे वाटण्यापासून ते आंघोळ ही एक शिक्षा आहे असे मानणारे. प्रातर्विधीमधे सुद्धा मिंटोका काम घंटेमे पासून ते जुम्मे के जुम्मेपर्यंत अनेक प्रकार आहेत. पण त्यापेक्षा आपण अधिक चांगल्या विषयाकडे म्हणजे जेवणाकडे वळू या.
                           उदरभरणापासून ते चाखत माखत खाणाऱ्या खवैयांपर्यंत अनेक नमुने बघायला मिळतात. माणूस खातो किती यापेक्षा तो कसे खातो यावरुन त्याच्या स्वभाववैशिष्ठ्यांबद्दल बरेच आडाखे बांधता येतात. कांहीजण व्यवस्थित नीटसपणे जेवतात तर बरेचसे आपल्याबरोबर किडामुंगीलाही जेवू घालतात, चेहेऱ्यालाही भरवतात आणि शेवटी तर त्यांचे ताट बघायला लागू नये म्हणून आजुबाजूचे लवकरच आवरते घेतात.
                           लहानपणी आपण चालायला लागलो की सर्वांना किती आनंद होतो! त्या लुटुलुटू  चालण्याचे पुढे अनेक वैचित्र्यपूर्ण चालींमधे रुपांतर होते. शिस्तीत चालणे, डुलत डुलत चालणे, पोंक काढून चालणे, वाघ मागे लागल्यासारखे चालणे, रस्ता आपल्याच बापाचा असल्याप्रमाणे चालणे, उडत उडत चालणे असे सर्वसाधारण प्रकार तर बघायला मिळतातच पण वाटेत येणारी प्रत्येक वस्तु ठोकरणे, समोरुन येणाऱ्यास मुंगीस मुंगीने भिडावे तसे कडमडणे, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनाच हूल देणे असेही प्रकार पहावयास मिळतात.
                           बोलणे ही एक कला आहे. पण बोलताना ज्या विविध लकबी आपण पहातो त्याही मजेदार असतात. राजधानीच्या वेगापासून ते बैलगाडीच्या वेगाने बोलणाऱ्या व्यक्ति असतात. सहज बोलणे, नाटकी बोलणे, नारोशंकराच्या घंटेसारखे मोठ्या आवाजांत बोलणे, कायम तिरकसच बोलणे, दुसऱ्याला बोलूच न देणे हे मुख्य प्रकार तर बोलत असताना तोंडाच्या, ओठांच्या विचित्र हालचाली, हातवारे करणे, डोळे मिचकावणे हे प्रकारही दृष्टीस पडतात.
                          हंसण्याच्या संवयींचे तर असंख्य प्रकार! गडगडाटी हंसणे, चोरटे हंसणे, फिसकन हंसणे, खिंकाळणे, बायकी आवाजात हंसणे, हिस्टेरिकल हंसणे याबरोबरच अजिबात आवाज न करता हंसणे, ओठ वाकडे करुन छदमी हंसणे, काही सेकंदापुरते स्मित करुन लगेच गंभीर होणे, डोळ्यात पाणी येईपर्यंत हंसणे असे प्रकार तर खरेच पण डोळ्यांत पाणी असताना खोटे खोटे हंसणे ही कला विशेष!
                          या सवयींपेक्षा वेगळ्या आणि खास भारतीय संवयी म्हणजे चारचौघांसमोर नाकात बोटे घालणे, नखे कुरतडणे, पचकन थुंकणे, खाकरुन बेडके काढणे, शिंकरणे आणि रस्त्याच्या कडेलाच विधि करणे. लोकांना किळस वाटणाऱ्या संवयींचे उदात्तीकरण करणारेही कधी दिसतात. शरीराच्या कुठल्याही द्वारातून बाहेर वायु सोडताना " हरि ओम" म्हणणारी माणसे अन्य कुठल्या देशात भेटणार ?
   शेवटी जाता जाता सांगायची खास संवय म्हणजे टीका करण्याची! आपल्या देशात तर तो जन्मसिद्ध हक्क आहे. येताजाता आजुबाजूच्या परिस्थितीवर, राजकारणावर, क्रिकेटवर, नातेवाईकांवर, शेजाऱ्यांवर, एकूणच सर्व व्यवस्थेवर टीका करत रहायचे पण उपाय सांगायचा नाही. कुठल्याही कामात विघ्न मात्र आणायचे. हा लेख लिहून प्रस्तुत लेखकही याच प्रकारांत गणला जाईल एवढीच फक्त भीति आहे !!

नारायण मूर्ती आणि राष्ट्रगीत.

मध्ये काही वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली होती की पुढील राष्ट्रपतीच्या पदासाठी नारायण मूर्ती यांचा विचार व्हावा अशी काही लोकांची इच्छा आहे. ही बातमी ऐकून मलाही बरे वाटले आणि असे झाले तर एक चांगला पायंडा पडेल असे माझे मत झाले. त्याचबरोबर राजशिष्टाचार मूर्तींना पाळणे कितपत शक्य होईल असाही एक विचार मनात तरळून गेलेला आठवतो.

राखीव क्षेत्र

शनिवार दि. १४/०४/०७ च्या लोकसत्ता मध्ये श्री. अरुणकुमार खैरे सचिव, विदर्भ बहुजन साहित्य संघ विदर्भ प्रदेश यांनी लोकमानस या सदरात पत्र लिहून असा मुद्दा मांडला आहे की चित्रपटक्षेत्रासारख्या ग्लॅमरस (हा त्यानीच वापरलेला शब्द) क्षेत्रात कलाकार मंडळी पूर्णत: उच्चवर्णीय आणि गर्भश्रीमंत कुटुंबातील असतात तेव्हा शासनाने प्रत्येक निर्मात्याला त्याच्या आगामी चित्रपटात एकूण कलाकारांच्या ३० टक्के भूमिका मागासवर्गियांना दिल्या पाहिजेत अशी अट घालावी. असे करणे योग्य ठरेल का ?माननीय अर्जुनसिंगजीना हा विचार अजून कसा सुचला नाही ? 
चित्रपट किंवा कोठल्याही कलाक्षेत्रात  उच्चवर्णीयानाही झगडल्याशिवाय आणि आपले प्रभुत्व सिद्ध केल्याशिवाय योग्य ते स्थान प्राप्त होते असा अनुभव नाही‌  शशी कपूर , राजेंद्रकुमार यांच्या मुलानाही तेथे प्रवेश मिळाला तरी पुढे फारसे कर्तृत्व न दाखवल्यामुळे त्याना कोणी विचारेनासे झाले. अशा क्षेत्रात राखीव जागांचे धोरण राबवणे अशक्यच आहे असे मला वाटते. याच पद्धतीने विचार केल्यास (आज बदनाम झालेल्या ) क्रिकेटमध्ये आणि इतर क्रीडाक्षेत्रातही  ३०% जागा  राखीव असाव्यात असाही आग्रह होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मनोगतीना यावर काय म्हणावे वाटते ?  

बीटाचे सूप

वाढणी
४ जण

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • मध्यम आकराचे बीट रूट
  • १ गाजर, १ कांदा
  • १ टोमॅटो
  • १ हिरवी मिरची
  • आलं १/२ "
  • मीठ, बटर २ टी स्पून, मिऱ्याची पावडर थोडी.

मार्गदर्शन

दिल्ली हाट-

दिल्ली हाट

अनेक मैत्रिणींकडून व नातेवाईकांकडून 'दिल्ली हाट' बद्दल ऐकले होते. आमच्या बॅगा भरुन झाल्या होत्या  आणि  विमान सुटायला बराच होता. त्यामुळे हॉटेलमधून आम्ही ठरवल्याप्रमाणे  सकाळीच  दिल्ली हाट कडे निघालो. उंच चकाचक अन् मोठाल्या मॉलरूपी विदेशी बाजारापेठांच्या आक्रमणाने दिल्ली हाटची गर्दी अन किंमत थोडीही कमी कशी झाली नव्हती ह्याचेच आश्चर्य आम्हाला वाटत होते. त्यामुळेच आमची उत्सुकता वाढली होती. अरविंद मार्गावर आयएन ए मार्केटसमोर 'दिल्ली हाट ' हा भलाथोरला खुला बाजार भरलेला असतो. आम्ही तेथे गेलो तेव्हा वाहने ठेवण्यासाठी भले मोठे प्रांगण होते आणि १०-१५ रूपयात योग्य जागेचे तिकीट काढले की झाले, शांतपणे बाजारहाट करण्यास मोकळे असे आमच्या लक्षात आले.

माहिती तंत्रज्ञानात मराठीचे योगदान : भटकर / शिकारपूर ह्यांचे विचार

कालच्या ईसकाळमध्ये ही बातमी वाचनात आली. संगणकावर मराठीच्या वापराविषयी चिंता किंवा गोडी असणाऱ्या सर्वांना विचारांची देवाणघेवाण करता यावी ह्या हेतूने ती बातमी येथे उतरवून काढली आहे :

ईसकाळ मधील बातमी : माहिती तंत्रज्ञानातील मराठीच्या योगदानाबाबत विचार करण्याची वेळ - विजय भटकर

पुणे, ता. १२ - ""माहिती तंत्रज्ञानात भारतीय भाषांचे आणि पर्यायाने मराठीचे काय योगदान आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे केले. ........
दीपक शिकारपूर लिखित "संगणकाची भरारी' या पुस्तकाचे प्रकाशन श्री. भटकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

पुण्याचे पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, ऑटोलाइन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक एम. राधाकृष्णन, नॅसडॅक दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक घनश्‍याम दास, बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, विद्यार्थी साहायक समितीच्या विश्‍वस्त निर्मलाताई पुरंदरे आदी या वेळी उपस्थित होते. भटकर पुढे म्हणाले, ""सध्या मराठीचे काय होणार अशी ओरड होत आहे. माहिती तंत्रज्ञानातही मराठीचा वापर अतिशय कमी आहे. या क्षेत्राचा आवाका लक्षात घेता संचार तंत्रज्ञान, सायबर लॉज, संगणक यावर मराठीसह सर्व भाषांत जास्तीत जास्त पुस्तकांची निर्मिती व्हायला हवी. भाषा विज्ञाननिष्ठ झाल्या तरच त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. यासाठी सध्याच्या इंटरनेटच्या युगात माहिती तंत्रज्ञानात भारतीय भाषांचे काय योगदान आहे, याचा विचार व्हायला हवा.''

संगणक आणि विज्ञानाचे प्रमाणबद्ध साहित्य इंटरनेटवर उपलब्ध व्हायला हवे आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोचायला हवे, असेही ते म्हणाले.

पुण्यातील आणि ग्रामीण भागातील युवा वाचकवर्ग समोर ठेवून पुस्तक लिहिल्याचे श्री. शिकारपूर यांनी सांगितले. आजपर्यंतची तंत्रज्ञानाची; तसेच या व्यवसायाची भरारी आणि ग्रामीण भागात तंत्रज्ञान पोचविण्यासाठी काय करता येईल, असे या पुस्तकाचे तीन भाग आहेत. संगणक क्षेत्रात धाकदपटशापेक्षा कौशल्यनिर्मिती आणि प्रशिक्षण या बाबी स्थानिकांना रोजगार देतील, असेही ते म्हणाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ११६वी जयंती.

दि.१४ एप्रिल रोजी "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर" यांची ११६ वी जयंती .त्यानिमित्त त्यांना मानपुर्वक अभिवादन.

आपला

कॉ.विकि