गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

मनोगत आणि मनोगतींना नविन वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.

क.लो.अ.,
शैलेश

मराठी नववर्षाच्या शुभेच्छा व संकल्प-

Gudi Padwa

हिंदू व मराठी नववर्ष चैत्र शुद्ध पाडवा (गुढीपाडवा) निमीत्त सर्व मनोगतींना हार्दिक शुभेच्छा !

Door hangingsDoor hangingsDoor hangings

म्हणींच्या राज्यातील फेरफटका

        विविध भारतीय भाषांतील म्हणींचा एक अनोखा संग्रह नुकताच वाचनात आला. त्याचे नाव आहे 'भारतीय कहावत संग्रह' आणि त्याचे संपादक आहेत श्री. विश्वनाथ नरवणे. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, पंजाबी, सिंधी, काश्मिरी, बंगाली, आसामी, ओडिया, तेलुगु, तामिळ, मल्याळम,कन्नड, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांतील म्हणी या संग्रहात आहेत.एखादी उक्ती, एखादा विचार घेऊन त्या आशयाच्या या सर्व भाषांतील म्हणी या संग्रहात दिल्या आहेत. सर्व म्हणी देवनागरीत असून त्यांचे हिंदी व इंग्रजी भाषांतर दिले आहे. हिंदीत राजस्थानी, भोजपुरी, संबळपुरी, तसेच चंपारन, दरभंगा,भागलपुर, शाहाबाद इत्यादि जिल्ह्यातील बोलीभाषांमधल्या म्हणींचा समावेश केला आहे तर मराठीत कोंकणी, गोव्याकडच्या म्हणीही दिल्या आहेत. या संग्रहाचे तीन खंड असून पहिल्या दोन खंडात समानार्थी म्हणी असून ज्यांचे वर्गीकरण होऊ शकले नाही अशा म्हणी  तिसऱ्या खंडात आहेत. हा संग्रह वाचून जी रोचक माहिती मिळाली त्यातली थोडीशी तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हा लेखप्रपंच.
        भारतीय भाषांवर संस्कृत भाषेचा प्रभाव असल्यामुळे संस्कृत वचनात दिलेले दृष्टांत इतर भाषांतील म्हणीतही आढळतात. उदाहरणार्थ 'निरस्तपादपे देशे एरण्डोपि द्रुमायते' या अर्थाच्या आणि हाच दृष्टांत वापरलेल्या म्हणी बहुतेक सर्व भाषांत आढळतात. मराठी' ओसाड गावी एरंड बळी', गुजराती 'उज्जड गाममां एरंडो प्रधान', आसामीत'गछ नोहोवा ठाइत एराइ बिरिख' या सर्व म्हणींचा शब्दश: अर्थ एकच आहे. अशाच शब्दश: अर्थाच्या तेलुगु, बंगाली आणि मल्याळम म्हणीही आहेत.
        सुविद्य लोकांच्या संभाषणात संस्कृतोद्भव म्हणींचा वापर असतो. पण त्याच आशयाच्या म्हणींमध्ये खेड्यातले लोक त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींचा दृष्टांत देतात. एरण्डाची जागा गाय घेते आणि 'वासरात लंगडी गाय शहाणी' होते. 'गावंढ्या गावात गाढवी सवाशीण होते'. हिंदीत' अंधो में काना राजा' होतो. तेलुगुत 'बिनगायींच्या गावात वांझ म्हैस महालक्ष्मी' होते̱. ग्रामीण भागातील लोकांचा संबंध पशु,शेती, शेतीची अवजारे, ग्रह-तारे, ढग, पाऊस या सर्वांशी असतो म्हणून त्यांच्या म्हणीतील दृष्टांतही या विषयांशी संबंधित असतात.
         भौगोलिक परिस्थिती, खाण्यापिण्याच्या पद्धती, चालीरीती या सगळ्यांचा प्रभाव म्हणींवर होत असतो.बंगाली, आसामी,ओडिया आणि मल्याळम भाषिकांमध्ये बरेचसे मत्स्याहारी. त्यामुळे त्यांच्या म्हणींमध्ये मासळीचा उल्लेख फार वेळा येतो. अयोग्य व्यक्तीला एखादी चांगली गोष्ट प्राप्त झाली तर काय होते याचे वर्णन  एका बंगाली म्हणीत  केले आहे. तिचा अर्थ असा आहे की नीट रांधता न येणारीच्या हातात पडल्यावर रोहू मासळी रडते अशासाठी की ही मला कशी काय रांधेल कुणास ठाऊक. 'चिंगुडि चिपिले मुण्डरे पित' ही ओडिया  म्हण आहे. चिंगुडी ही एक छोटी मासळी. ही अतिशय पित्तकारक असते. तिला नुसते बोटाने चेपले तरी डोके दुखते असा या म्हणीचा अर्थ. (मासे बोटाने चेपून ते ताजे आहेत की नाहीत हे ठरवतात.) निसर्गातील बदलाची चाहूल आधीच लागते असे सांगणारी एक ओडिया म्हण 'गरजंति मेघ, बरषंति पाणी, उठंति गडिशा (माशांचा एक प्रकार), बेळकाळ जाणि'. 'भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत'या अर्थाची एक बंगाली म्हण' पेट भरले भाजा माछ ( भाजलेली मच्छी) घसि-घसि (शेणासारखी) लागे'. 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत'ही म्हण मल्याळममध्ये झिंग्याची उडी गुडघ्यापर्यंत या अर्थी आहे. काश्मिरी लोकांच्या जेवणात भाताचे प्रमाण अधिक म्हणून त्यांच्या आहाराविषयी ही म्हण प्रचलित आहे' आओ कश्मिर अलबत्ता, खाओ कळहम का साग, भत्ता'    विविध भारतीय भाषांतील म्हणींचा एक अनोखा संग्रह नुकताच वाचनात आला. त्याचे नाव आहे 'भारतीय कहावत संग्रह' आणि त्याचे संपादक आहेत श्री. विश्वनाथ नरवणे. मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, पंजाबी, सिंधी, काश्मिरी, बंगाली, आसामी, ओडिया, तेलुगु, तामिळ, मल्याळम,कन्नड, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांतील म्हणी या संग्रहात आहेत.एखादी उक्ती, एखादा विचार घेऊन त्या आशयाच्या या सर्व भाषांतील म्हणी या संग्रहात दिल्या आहेत. सर्व म्हणी देवनागरीत असून त्यांचे हिंदी व इंग्रजी भाषांतर दिले आहे. हिंदीत राजस्थानी, भोजपुरी, संबळपुरी, तसेच चंपारन, दरभंगा,भागलपुर, शाहाबाद इत्यादि जिल्ह्यातील बोलीभाषांमधल्या म्हणींचा समावेश केला आहे तर मराठीत कोंकणी, गोव्याकडच्या म्हणीही दिल्या आहेत. या संग्रहाचे तीन खंड असून पहिल्या दोन खंडात समानार्थी म्हणी असून ज्यांचे वर्गीकरण होऊ शकले नाही अशा म्हणी  तिसऱ्या खंडात आहेत. हा संग्रह वाचून जी रोचक माहिती मिळाली त्यातली थोडीशी तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हा लेखप्रपंच.
        भारतीय भाषांवर संस्कृत भाषेचा प्रभाव असल्यामुळे संस्कृत वचनात दिलेले दृष्टांत इतर भाषांतील म्हणीतही आढळतात. उदाहरणार्थ 'निरस्तपादपे देशे एरण्डोपि द्रुमायते' या अर्थाच्या आणि हाच दृष्टांत वापरलेल्या म्हणी बहुतेक सर्व भाषांत आढळतात. मराठी' ओसाड गावी एरंड बळी', गुजराती 'उज्जड गाममां एरंडो प्रधान', आसामीत'गछ नोहोवा ठाइत एराइ बिरिख' या सर्व म्हणींचा शब्दश: अर्थ एकच आहे. अशाच शब्दश: अर्थाच्या तेलुगु, बंगाली आणि मल्याळम म्हणीही आहेत.
        सुविद्य लोकांच्या संभाषणात संस्कृतोद्भव म्हणींचा वापर असतो. पण त्याच आशयाच्या म्हणींमध्ये खेड्यातले लोक त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींचा दृष्टांत देतात. एरण्डाची जागा गाय घेते आणि 'वासरात लंगडी गाय शहाणी' होते. 'गावंढ्या गावात गाढवी सवाशीण होते'. हिंदीत' अंधो में काना राजा' होतो. तेलुगुत 'बिनगायींच्या गावात वांझ म्हैस महालक्ष्मी' होते̱. ग्रामीण भागातील लोकांचा संबंध पशु,शेती, शेतीची अवजारे, ग्रह-तारे, ढग, पाऊस या सर्वांशी असतो म्हणून त्यांच्या म्हणीतील दृष्टांतही या विषयांशी संबंधित असतात.
         भौगोलिक परिस्थिती, खाण्यापिण्याच्या पद्धती, चालीरीती या सगळ्यांचा प्रभाव म्हणींवर होत असतो.बंगाली, आसामी,ओडिया आणि मल्याळम भाषिकांमध्ये बरेचसे मत्स्याहारी. त्यामुळे त्यांच्या म्हणींमध्ये मासळीचा उल्लेख फार वेळा येतो. अयोग्य व्यक्तीला एखादी चांगली गोष्ट प्राप्त झाली तर काय होते याचे वर्णन  एका बंगाली म्हणीत  केले आहे. तिचा अर्थ असा आहे की नीट रांधता न येणारीच्या हातात पडल्यावर रोहू मासळी रडते अशासाठी की ही मला कशी काय रांधेल कुणास ठाऊक. 'चिंगुडि चिपिले मुण्डरे पित' ही ओडिया  म्हण आहे. चिंगुडी ही एक छोटी मासळी. ही अतिशय पित्तकारक असते. तिला नुसते बोटाने चेपले तरी डोके दुखते असा या म्हणीचा अर्थ. (मासे बोटाने चेपून ते ताजे आहेत की नाहीत हे ठरवतात.) निसर्गातील बदलाची चाहूल आधीच लागते असे सांगणारी एक ओडिया म्हण 'गरजंति मेघ, बरषंति पाणी, उठंति गडिशा (माशांचा एक प्रकार), बेळकाळ जाणि'. 'भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत'या अर्थाची एक बंगाली म्हण' पेट भरले भाजा माछ ( भाजलेली मच्छी) घसि-घसि (शेणासारखी) लागे'. 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत'ही म्हण मल्याळममध्ये झिंग्याची उडी गुडघ्यापर्यंत या अर्थी आहे. काश्मिरी लोकांच्या जेवणात भाताचे प्रमाण अधिक म्हणून त्यांच्या आहाराविषयी ही म्हण प्रचलित आहे' आओ कश्मिर अलबत्ता, खाओ कळहम का साग, भत्ता'
        महाराष्ट्रात गुळाचे उत्पन्न भरपूर. जेवणात, पक्वान्नातही गुळाचा सर्रास वापर केला जातो. म्हणून 'बंदर क्या जाने अद्रकका स्वाद' ही म्हण मराठीत 'गाढवाला गुळाची चव काय' अशी होते. तीच म्हण काश्मिरीत 'खर क्याह जानि जाफुरानक कदुर' (गाढवाला केशराची काय कदर)  होते. आसामी, ओडिया, मल्याळम भाषांतील म्हणींत नारळाला अमुल्य मानले आहे. म्हणून आसामी म्हण आहे 'बांदरे कि जाने नारिकलर मोल'. तामिळ आणि मल्याळम या भाषांत माकडाची जागा कुत्र्याने घेतली आहे. शेतकऱ्याला शहाळ्याच्या पाण्याच्या चव काय. त्याच्या लेखी ते तांदळाचे पाणी आहे अशा अर्थाची एक ओडिया म्हण आहे.
        म्हण कशी मधमाशीसारखी असावीड़ंखही असावा, मधही असावा आणि सुटसुटीतही असावी. या तीन गुणांबरोबर अनुप्रास असेल तर दुधात साखर. अनुप्रासामुळे म्हणी सहज मुखोद्गत होतात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात. नमुन्यादाखल या काही म्हणी.
        मराठी--हपापाचा माल गपापा.
                आला भेटीला, धरला वेठीला.
                जशी देणावळ तशी धुणावळ.
       बंगाली--परेर खाई घरेर गाई (दुसऱ्याचे खाईन, घरचे गुण गाईन)
        तेलुगु--मीकु माट माकु मूट (तुम्हाला शिव्या, आम्हाला गाठोडे )
        साहित्यालंकाराने नटलेल्या अशा कितीतरी म्हणी आहेत. 'आबरू जग में रहे तो जान जाना पश्म है' या उर्दू उक्तीचा सरळ अर्थ असा आहे की अब्रूपुढे जीव केसासमान तुच्छ आहे. पश्म म्हणजे केस. पण ही उक्ती श्लेषालंकाराचे उत्तम उदाहरण आहे. लखनौमध्ये 'आबरू' आणि 'जान जाना' नावाचे दोन शायर होते. त्यांची आपापसात खूप छेडछाड होत असे. आपापल्या शायरीतून ते एकमेकांची नेहमी रेवडी उडवत. वरील शेर आबरूचा आहे ज्यात त्याने  जान जानाला पश्म म्हटले आहे. पूर्ण शेर असा आहे.
        जो सती सतपर चढै तो पान खाना रस्म है
        आबरू जग में रहे तो जान जाना पश्म है
शब्दांचे खेळ करणारी अशीच एक हिंदी म्हण--चाकर है तो नाचा कर, ना नाचे तो ना चाकर .उर्दूमध्ये एखाद्याला सरळ सरळ मूर्ख किंवा उल्लू न म्हणता 'आदमी हो या बेदाल के बूदम' असे म्हणतात. दाल म्हणजे फारसी अक्षर 'द'.बूदममधून द काढून टाकला की उरते फक्त बूम आणि बूम म्हणजे उल्लू. असेच एखाद्याला कुत्रा म्हणायचा हा प्रकार. 'आदमी हो या संग-ए-बे नून'. संग-ए-बे नून म्हणजे अनुस्वाररहित संग. संग म्हणजे पत्थर. संगमधून अनुस्वार काढला तर रहातो सग म्हणजेच कुत्रा. 
        आता अतिशयोक्तीपूर्ण म्हणीचा नमुना-अडक्यांचे तेल आणले, सासुबाईंचे न्हाणे झाले, मामंजींची शेंडी झाली, उरले सुरले झाकून ठेवले,ते येऊन मांजराने सांडले, वेशीपर्यंत ओहोळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला.
        आपल्या दोषांचे खापर दुसऱ्याच्या माथी मारण्याच्या वृत्तीवर एक हिंदी म्हण अशी आहे--सोना कहे सुनारसे, " उत्तम मेरी जात
             काले मुंह की घुंगची तुले हमारे साथ"  घुंगची म्हणजे गुंज. सोने तोलण्यासाठी गुंजा वापरतात. गुंजा दोन प्रकारच्या असतात. एक संपूर्ण लाल आणि दुसऱ्या लाल रंगाच्याच पण त्यावर काळे डाग असलेल्या.सोनाराकडे सोने तक्रार करत आहे की माझी जात उत्तम पण काळतोंड्या गुंजांबरोबर तोलल्यामुळे मला बट्टा लागतो. यावर गुंजेचा सडेतोड जबाब असा की-- हम लालों की लालडी, लाल हमारा रंग
                                          काला रंग जबसे हुआ तुली नीचे के संग
मराठीतही अशीच चंदनाची तक्रार आहे--चंदन म्हणते सहाणबाई तुझी हीन जाती
                                          तुझिया संगे झाली माझ्या देहाची माती
वास्तविक सहाणेच्या संगत्त्तच चंदनाचे गुण वाढीस लागतात.
        स्त्रीच्या संगतीत पुरुषाचे अस्तित्वच नष्ट होते असे सांगणारी एक मजेदार गुजराती म्हण-- दाळनी सोबतथी चोखो नर मटी नारी बन्यो. याचा अर्थ असा की डाळीच्या संगतीत तांदूळ नराचा नारी झाला. डाळ स्त्रीलिंगी, तांदूळ पुल्लिंगी पण दोघांची मिळून जी खिचडी बनते ती मात्र स्त्रीलिंगी.
        एवढे मोठे भांडार माझ्यापुढे खुले आहे त्यातले काय लिहू आणि काय नको असे मला झाले आहे. पण सध्या इथेच थांबते. जाता जाता या संग्रहाची थोडीशी झलक दाखवते. .
                   आशय--- नाव मोठे, लक्षण खोटे  
        मराठी--- अक्कल नाही काडीची नि नाव सहस्रबुद्धे.
                  नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात भाकर उरेना.
                  नाव गंगाबाई, रांजणात पाणी नाही.
                  नाव महीपती, तिळभर जागा नाही हाती.
                  नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.
                  नाकाला नाही जागा आणि नाव चंद्रभागा 
                  नाम असे उदार कर्ण, कवडी देता जाई प्राण.  
        उर्दू----  आंख न नाक, मैं चांदसी 
                  आंखोके अंधे, नाम शेख रोशन 
                  ऊंटसे बडे, और नाम छोटे खान
                  डरे लोमडीसे, नाम दिलेरखान 
                  पढा न लिक्खा, नाम महंमद फाजिल
                  बदन में दम नहीं, नाम जोरावर खान
                  रंग कव्वे सा, और महताब(चंद्र) नाम 
        हिंदी---- आंख गड्डू, नाक मड्डू, सोहनी (सुंदर) नाम 
                   आंखो का अंधा, नाम नयनसुख
                   आल न दोम, नांव पंचकल्यान                                                   ( ना आयाळ  ना शेपूट आणि घोड्याचे नाव पंचकल्याण )
                   आवे न जावे, बृहस्पती कहलावे
                   उखरै बार नै नाम बरिआर के
                  ( केस उपटता येत नाही आणि नाव बली.) 
                   करनी कुत्ता के, नांव लछनदेव 
                   कानी कोडी पास नही, नाम करोडीमल 
                   जनम के कमबख्त (कमनशीबी), नाम बख्तावरसिंघ
                   जनम के मंगता, नाम दाताराम
                   झाड मान झूंपडी, तारागढ नाम 
                   (झुडुपाएवढी झोपडी, तिचे नाव तारागढ ) 
                   नाम पहाडसिंह, देह चिआं (चिंचुका) अस
                   नाम निर्मलदास, देह भर दादै दाद 
                   नाम हीरालाल, दमक कंकर सी भी नही
                   नाव कपूरचंद, गन्ह(गंध) गोबर  
                   नाव कुमारी, काम सतभतारी 
                   नाव दूधनाथ, लज्जित मठ्ठो के न (ताक ही चाखले नाही)
                   पढा न लिक्खा, नाम विद्याधर 
                   पहरणनै तो घागरो ही कोनी, नांव सिणगारी
                   (नेसायला घागरा नाही आणि नाव सिंगारी)
                    नाव धर्मात्मा, पून के लेसे न (पुण्याचा लेशही नाही)
                     

                    
                 
                  
                   
                  

                    
     

        
         
          
        
          
       

मेळघाट शिबीर

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव प्रेअर मल्टीपर्पज सोसायटी, शेगाव - शाखा कोलूपु मातृभू अंतर्गत संस्कार द्वारा आयोजित 'मेळघाट शिबीर' व्याघ्र प्रकल्प परिसरात- निसर्गाच्या सानिध्यात.

वयोगट- वय वर्षे ८ ते १५

शिबीर शुल्क - ऐच्छिक

गोडी अपूर्णतेची.....!

खरंच काही गोष्टी अपुर्‍याच हव्या असतात.  त्यातली ती अपूर्णतेची हुरहुर मनाला जे समाधान देते ना…… त्याची सर पूर्णत्वाला नक्कीच नाही.

आपण एखादं स्वप्नं बघतो…..आणि ते पूर्ण होण्यासाठी धावपळ करतो.  स्वप्नं पूर्ण होतं.  ते समाधान असतंच पण…….! हा ‘पण’ च तर महत्वाचा आहे ना  .    ते समाधान किती वेळ टिकतं…..? एका स्वप्नाची पूर्ती झाली की  आपण पुन्हा दुसरं स्वप्नं बघायला लागतो……. का….?  तर पूर्ण झालेल्या स्वप्नात आपण जास्त वेळ रमूच शकत नाही.  आपल्याला अपुर्‍या असलेल्या स्वप्नातच रमायला आवडतं.  ते पूर्ण कसं होईल, त्याच्यासाठी काय काय करायचं……. ह्या विचारात आपण जास्त रंगतो. 

शब्द साधना - १५.

कृपया मराठी शब्द सुचवा, वापरा आणि इतरांनाही मराठी शब्द वापरण्यासाठी प्रोत्साहीत करा.

  1. कपडे हँगर्स ला अडकवून ठेव.
  2. सर्वांनी गेटजवळ जमावे.
  3. हॉल मध्ये बाकीच्या सुचना देण्यात येतील.
  4. त्याने त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे.
  5. आपण थियेटर्स वर भेटू.
  6. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक.
  7. टॉयलेट कोठे आहे?
  8. समर कोर्सच्या जाहिराती येण्यास सुरवात होईलच.
  9. वेफर्स घेऊन या.
  10. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. ( कौन बनेंगा करोडपती मधील वाक्य.)

कलंत्री

ट ला ट री ला री

      मंदाताईकडे जायला मला निमित्त लागत नाही.तेथे मला नेहमीच मुक्तद्वार असते.त्या दिवशीही कॉलेजमधून येताना मनात आले आणि तिच्या घरात शिरलो. नेहमीप्रमाणे ताई आणि बापू गप्पा मारत बसले होते." घ्या आले तुमचे बंधुराज " असं नेहमीप्रमाणे माझ गडगडाटी स्वागत बापूनी केल.मी काही बोलण्यापूर्वी जणु माझा पाठलाग करीत आल्यासारखा संजू माझा भाचा , ताईचा मुलगा घरात शिरला.त्याच्या हातात दोन सुंदर गुळगुळीत मुखपृष्ठे असलेली पुस्तके होती.संजू इंटीरियर डेकोरेटरचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्याच्या व्यवसायाशी संबधित ती असावीत असा माझा अंदाज होता पण त्याने ती टेबलावर जवळजवळ आदळलीच त्यामुळे माझे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि पुस्तकावरील नावे वाचून मी तीन ताड उडालोच.कारण एका पुस्तकाचे नाव होते `प्रल्हादले ` आणि दुसऱ्याचे होते 'पटपोचंपी'.या नावांवरून ती त्याच्या व्यवसायासंबंधीची नसावीत हे ताबडतोब माझ्या लक्षात आले म्हणून ती हातात घेऊन चाळू लागलो तर ते काव्यसंग्रह निघाले.आणि मी अगदी चीतच झालो कारण काव्याची आवड संजूला किती आहे हे मला चांगलेच माहित होते. त्यामुळे त्याच्या हातात काव्यसंग्रह म्हणजे भुताहाती भागवत अशातला प्रकार होता म्हणून मी एकदम त्याच्यावर जवळजवळ ओरडलोच
" अरे संजू ही काय भानगड आहे एकदम दोनदोन कवितासंग्रह ?इंटीरियरमध्ये भिंतीवर काव्ये लिहायची पद्धत निघाली आहे का ?"
"मला वाटलेच होते असा काहीतरी गैरसमज होणार सगळ्यांचा पण आत्ताच त्या बर्दापुरकरांकडे गेलो होतो आणि त्याना म्हणे प्रीती म्हणाली होती---"  
ही प्रीती म्हणजे संजूची बायको आत कामात होती तरी आपला उद्धार झाल्याचे बरोबर तिच्या कानावर पडले आणि ' काय काय मी काय म्हणाले ?" संजूला वाक्यही पुरे करू न देता तरातरा बाहेर येऊन तिने विचारले.ती बाहेर आल्यामुळे मोकळेपणाने तिच्यावर तोंडसुख घेण्याची संधी आपण गमावली हे संजूच्या लक्षात आले.आणि स्वतःला सावरुन घेत तो म्हणाला
" अग हेच ग त्यादिवशी आपण बर्दापुरकरांकडे गेलो तेव्हा तू म्हणाली नाहीस का की तुला काव्याची खूप आवड आहे "
" अस म्हणाले का मी ?"त्यावर उसळून प्रीती म्हणाली,"तुला माहीत आहे ना मला काव्याची किती आवड आहे " " हो तर म्हणून तर तुझ्याशी लग्न केले ना मी " आता त्याना अधिक बोलू दिले तर काव्याची गंगा प्रीतीच्या डोळ्यातून वहायला लागायची म्हणून मध्ये हस्तक्षेप करीत मी म्हणालो
"अरे हो हो काव्य म्हणजे अगदी काहीतरी भयानक चीज असल्यासारख बोलताय,प्रीती मग तू काय बोलली होतीस बर्दापुरकराना की संजूवर ही आपत्ती कोसळली ?"
"काही नाही त्यादिवशी बोलताबोलता ब्रदापूरकर काव्य करतात असे म्हणाले तेव्हा  मी एवढेच म्हणाले की आम्ही साहित्यात रस घेणारी मंडळी कधीकधी एकत्र बसून एकमेकाचे किंवा एकमेकाना आवडलेले साहित्य वाचतो त्याच्यावर चर्चा करतो  मग झाल तेच निमित्त साधून त्यानी त्यांचे नुक्तेच प्रकाशित झालेले हे दोन काव्य संग्रह --" "आपल्याला भेट म्हणून ---?" त्याचे वाक्य पुरेही होऊ देता प्रीती उद्गारली,वाचायचे नसले तरी भेट मिळाल्याचा आनंद ती लपवू शकली नाही पण संजूच्या पुढच्या वाक्याने तिच्या आनंदावर पाणी पडले कारण तिला मध्येच थांबवीत संजू म्हणाला,"थांब तुझा गैरसमज होतो आहे,ही दोन पुस्तक मी विकत घेतलीत." : काय विकत घेतलीस ?" राघोबाना रामशास्त्र्यानी देहांत प्रायश्चित्त सुनावल्यावर आनंदीबाई आणि राघोबा या दोघानी एकदम " काय देहांत प्रायश्चित्त ?"  हा प्रश्न विचारावा अशा थाटात प्रीती ने  विचारले आणि त्या प्रश्नास  ज्या शांतपणे आणि ठामपणे रामशास्त्र्यानी उत्तर दिले त्याच शांतपणे "होय विकतच घेतली " असे उत्तर संजूने दिले तरीही प्रीतीचा काही त्यावर् विश्वास बसेना तेव्हा शेवटी ,"आता कस सांगू म्हणजे तुझा विश्वास बसेल?ठीक आहे ही पावतीच बघ तीनशे रुपयांची पुस्तकांच्या किंमतीची !" हातात पावतीचा कागद फडकवत संजू म्हणाला तेव्हा  मात्र प्रीतीची खात्री पटली.आणि नवऱ्याने तीनशे रुपये फुकट घालवले या कल्पनेने भडकून ती म्हणाली,"पण तुला हा अगाउपणा करायला कुणी सांगितला होता ?त्याना सांगायच नाही का प्रीती स्वतःच घेऊन जाईल म्हणून म्हणजे मी बरोबर कटवल असत त्याना "
" माझा पण ते विकत घ्यायचा विचार नव्हताच पण बर्दापूरकर म्हणाले तुमच्या मिसेसना साहित्याची बरीच गोडी दिसतेय त्याना माझे हे दोन नुकतेच प्रकाशित झालेले काव्यसंग्रह आवडतील ते घेऊन जा .अस म्हटल्यावर मला वाटल ते तुला भेट म्हणूनच देत आहेत !"
"आणि मग ?" प्रीतीने किंचाळून विचारले ," मग काय त्यापाठोपाठ ही पावतीही फाडून हातात ठेवल्यावर आता नको अस थोडच म्हणता येतय.बर जाऊदे आता आलेच आहेत अनायासे घरात तर वाचून टाक बर " संजू खोडसाळपणे म्हणाला,त्यावरील प्रीतीची प्रतिक्रिया अपेक्षित अशीच होती, " हे बघ ते कवितासंग्रह द्या म्हणून मी काही बर्दापूरकराना लोणी लावायला गेले नव्हते,ते तू आणले आहेस चांगले तीनशे रुपये घालवून आता ते वाचायची जबाबदारी तुझी "
" हे बघ तूही वाचू नकोस आणि मीही वाचत नाही मग तर झाल.तीनशे रुपयांच एवढ काय लावून घेतीस ?बर्दापूरकर  चार पाच लाखांच काम देणार आहेत मला तेव्हा त्यासाठी काव्यसंग्रह विकतच घ्यायची नव्हे तर ते वाचून त्यांचे रसग्रहण करायचीही तयारी आहे आपली." आपल्या नवऱ्याचा हा व्यावहारिक दृष्टिकोण प्रीतीला एकदम पटला.पण कवितासंग्रहाच्या नावामुळे माझी उत्सुकता चाळवली गेली होती म्हणून ते हातात घेत मी म्हणालो,"पण या पुस्तकांच्या नावांचा अर्थ काय ग ताई ?"
" बघू आण इकडे " इतकावेळ संभाषणात भाग घेता न आल्यामुळे बेचैन झालेल्या ताईला माझ्या प्रश्नाने हवी असलेली संधी मिळाली. अलीकडे कंपवातामुळे थरथरणारे तिचे हात एकदम दोन कवितासंग्रह हातात घेताना अधिकच थरथरत आहेत असा भास मला झाला त्यामुळे चेष्टेने मी म्हणालो,"अग ताई एवढे हात थरथरायला ते काही बापुरावांचे प्रेमपत्र नाही." " चल उगीच चावटपणा करू नको,"माझ्यावर डोळे वटारत ताई म्हणाली आणि त्याला पुढे पुरवणी जोडत म्हणाली, " आता एवढे मात्र खरे की त्या पत्रातल यांच अक्षर लावणे म्हणजे महाकर्मकठीण काम  असायच आणि जी काही वाचता यायची त्यांचा अर्थ लावणे हे त्याहूनही कठीण" " म्हणजे अगदी दा विंचि कोड उलगडण्याइतकच का?" मी आपल ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न केला. पण तिकडे पूर्ण दुर्लक्ष करीत बापूरावनी "म्हणून तर तुझ्यासारखी मास्तरीण बायको केली" हे आपल भरतवाक्य म्हटले आणि वर तिला जणु आव्हानच दिले "तेव्हा मास्तरीणबाई आता मुद्द्याच बोला आणि अर्थ सांगा " निवृत्त झाल्यापासून ताई हल्ली काही काही लिहू लागली होती आणि ते कोठेकोठे प्रसिद्धही होऊ लागल्यामुळे हे साहित्यिक आव्हान स्वीकारणे तिला क्रमप्राप्त होते." काय तुझ्या डोक्यात काही उजाडले का ?"  प्रल्हादले या शब्दावर विनोद करण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो.पण ताईने एकदम सिक्सरच मारला " अरे सोप आहे " पुस्तक उघडून चाळत ती म्हणाली," कवीच नाव प्रल्हाद आहे त्याला झालेली जाणीव म्हणजे प्रल्हादले " " माझा तर्क वेगळाच आहे,"मी आपली अक्कल पाजळली,"मला वाटत प्रल्हादाची दळे असा हा षष्ठी तत्पुरुष आहे त्याचा अर्थ प्रल्हादान लिहिलेली पाने ' तेवढ्यात् संजूलाही स्फूर्ती आली "अरे मामा,प्रल्हादाची दले म्हणजे पूर्वी आपल्या सैन्यात चतुरंग दले असायची तशी प्रल्हादाचे काव्यसैन्य आपल्यावर हल्ला करत आहेत." "आणि आमचा पार धुव्वा उडवत आहेत " त्याच्या सुरात सूर मिसळून प्रीतीन आपला राग व्यक्त  करून तीनशे रुपये वसूल करण्याचा प्रयत्न केला." बर हे पटपोचंपी काय प्रकरण आहे ?"आता बापूरावनाही उबळ आली "मला वाटत ते सरळ पोपटपंची असावे"असा अभिप्राय नोंदवीत ते म्हणाले आणि मलाही तो पटण्यासारखा वाटला पण ताईसाहेबाना स्फूर्तीचा झटका आला होता त्यामुळे तिला गप्प रहाणे अशक्य झाले असावे,"हे बघ त्यात एक मात्रा कमी पडली आहे " हा तिचा उद्गार ऐकल्यावर,"म्हणजे तुला लगेच गणमात्रा पण कळल्या वाटत " असा शेरा मी मारलाच."अरे ती मात्रा नव्हे अक्षरावरील मात्रा"ती मला पटवण्याचा प्रयत्न करत म्हणाली."आता कसली मात्रा ? आता मात्र तुझ्यापुढे कुणाची मात्रा चालणार नाही"मी आणखी अक्कल पाजळली .
"अरे पटपोचंपी मधल्या पो वर अजून एक मात्रा म्हणजे ते पटपौचंपी असे हवे " इति ताई
" मग त्यातून अर्थ निघणार का?" मी उपरोधाने म्हणालो
"निघणार म्हणजे काढता येईल " सावधगिरीने ती म्हणाली,"मग सांगा तो आम्हाला" गीतेमध्ये अर्जुनान श्रीकृष्णाला अवघड प्रमेयाचा अर्थ विचारावा अशा थाटात मी म्हणालो
" अरे अस बघ पट म्हणजे वस्त्र म्हणजे काव्यरूपी वस्त्र बर का पौ म्हणजे पौर्णिमा,चं म्हणजे चंद्र आणि पी म्हणजे पीयुष म्हणजे अमृत म्हणजे हे काव्यरूपी वस्त्र पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदणेरूपी अमृतासारखे आहे"ताईच्या मुद्रेवर विक्रमादित्यान वेताळाच्या अवघड प्रश्नास उत्तर दिल्यावर दिसणाऱ्रा जितं मया असा भाव दिसत होता.मात्र आम्ही वेताळ तिचे हे स्पष्टीकरण मान्य न करताच मूळ प्रश्नाच्या झाडाला  पुन्हा लटकणार हे तिला माहीत होतेच आणि शिवाय ते ओढुन ताणुन केलेले स्पष्टीकरण मला पटलेच नव्हते त्यामुळे मी म्हणालो,"अरे वा ताई ,काव्याचे पुस्तक नुसत तुझ्या हाती आले की लगेच तुलाही काव्य सुचू लागले की,पण काही म्हण ताई,या वेळी मला बापूरावांच मतच अधिक बरोबर आहे अस वाटत"
     नेहमीच गणित चुकुन भोपळ्याचा धनी होणाऱ्या मुलाच चुकुन एकाद गणित बरोबर आल्यावर त्याचा चेहरा खुलावा तसाच बापूरावांचा झाला होता, आणि त्याच खुषीत ते म्हणाले,"अरे माझ नेहमीच बरोबर असत पण हिला ते पटायला हव ना" 
"अस का म्हणतोस तू ?" त्यांच्या म्हणण्याची दखल न घेता ताईने विचारले.
" अगं हे वाचून बघ म्हणजे हे काव्य म्हणजे निव्वळ पोपटपंची आहे हे तुला पटेल,पोपटाला आपण काय बोलतो याचा अर्थ जसा माहीत नसतो तसच या कवीच आहे. "म्हणून एक कविता मी वाचून दाखवली
"देखा आनंद आनंद ।शुभ्र शांत मंद मंद ।जशी समईची वात ।तेवे मनमंदीरात ।
आता या चार ओळीतून अर्थ काय निघतो ?"
"आता आणखी हा एक नमुना पहा,
तज्ञ मी अतज्ञ मीहि।गूढ मी अगूढ मी । सुप्त मी असुप्त मीहि।वीर मी अवीर मी।"
"अरे मामा मीही थोडी भर घालू का?"संजूला स्फूर्ती आली आणि तो बडबडू लागला,
"मर्त्य मी अमर्त्य मीहि ।मूर्ख मी अमूर्ख मी ।रंक मी अरंक मीहि।संत मी असंत मी ।
भंग मी अभंग मीहि।संग मी असंग मी ।थांग मी अथांग मीहि ।शांत मी अशांत मी ।"
 "पुरे पुरे त्रस्त समंधा शांत रहा "त्याला थांबवत मी म्हणालो आणि पुस्तकाचे आणखी एक पान उलटून वाचू लागलो.
"कवितेचे नाव आहे र. ग. ल. ऐका बर
"थरथरल ग थरथरल ।मन माझ ग थरथरल ।भरभरल ग भरभरल ।आभाळ ढगानी भरभरल।सरसरल ग सरसरल । पाणी त्यातुन सरसरल ।"
मला मध्येच थांबवून संजू म्हणाला पुढ मी काय म्हणतो ऐका,
"सुरसुरल ग सुरसुरल।नाक सर्दिन सुरसुरल।"
"मग प्रीतीलाही काहीतरी (स्फुर)स्फुरल
"चुरचुरल ग चुरचुरल ।तव्यावर थालपिठ चुरचुरल।फसफसल ग फसफसल।दोश्याच पीठ फसफसल।"
आता सगळ्यानाच जोर आला आणि जणु वृंदगानच सुरु झाले.
" गडगडल ग गडगडल।जिन्यात कुणीतरी गडगडल ।धडधडल ग ।धडधडल । काळिज माझ ।धडधडल ।
"वसवसल ग वसवसल ।माझ्यावर कुणीतरीवसवसल।
"आता थांबा"विंचु चावला या भारुडात हो ऽ म्हणून सगळ्या लोकाना थांबवतात तसे थांबवत मी म्हणालो कारण लोकाना कवितेच्या इंगळीची चांगलीच बाधा झालेली दिसली
"अरे पण यातून काही अर्थ निघतोय का ?" शुद्धीवर असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे बापूराव विचारू लागले,ते बिचारे या काव्यगंगेत गटांगळ्या खात पार बावचाळून गेले होते.
"अहो पण अर्थ निघालाच पाहिजे का?"म्हणत पुढचे पान उलटून मी वाचू लागलो,
"आकाशातिल तारा निखळुन जमिनीवर कोसळल्या।
"जीवनातले रंगरूप लुटुनी लालडल्या ।"
आणखी एक नमुना,"चंद्रावर बैसुनिया।साद घालि प्रेमळशी।कोमल मन भिरभिरले ।गेले ते दाहीदिशी ।"
आणखी हे ऐका,
"प्राजक्ताची पुष्पे नाजुक।परागपूजन मनी बांधुनी।
मेंदी न्हाली रंगुन नटाली।मंजूळ रवे गावी गाणी।"
"थोडक्यात काय आपण लिहीत रहायच"ताईन समारोप करण्याचा प्रयत्न केला."आणि तू अर्थ लावायला आहेसच "मी पुस्ती जोडली आणि बैठक विसर्जित झाली.
             डुसऱ्या दिवशी सक्काळी सक्काळी फोन खणखणला .प्रीती बोलत होती,"मामा अहो मामा"प्रीती एवढ्या जोरात फोनवर बोलत होती की कुठ आग बीग लागली की काय असा भास झालापण पुढचा भाग ऐकल्यावर मात्र खरच आग लागली अस वाञल कारण प्रीती पुढ म्हणाली"अहो मामा,आईनी आज उठल्याउठल्या कविता केलीय""अरे वा ! वा!"उसन अवसान आणून मी म्हणालो.खरतर कालच्या कवितांचा ज्वर अजून उतरला नव्हता पण ताईच्या कवितेतून सुटका नव्हती म्हणून म्हणालो,"बर मग ती ऐकायला येऊ की ती कविता घेऊन इकडेच येतेय?"पण तेवढ्यात फोनवर ताईच नोलू लागली,"अरे ऐकतो आहेस ना?अरे आज सकाळी मजाच झाली"मी जीव मुठीत धरून तची मजा ऐकू लागलो,ती पुढे म्हणाली,"सकाळी लवकर जाग आली आणि खिडकीतून सहज डोकावून पाहिले तर खाली पारिजातकांच्या फुलांचा सडा पडला होता,तो सडा पाहून मला कविता सुचली,दाखवू का वाचून?"मला एक्दम 'सुजाता 'मधील कविता वाचणारा सुनील दत्त आणि ती ऐकत रडणारी नूतन आठवली अर्थात तिच्या रडण्याचे कारण माझ्यापेक्षा वेगळे होते.माझा चेहराही ताईला दिसत नव्हता हे माझे सुदैव !"हं ऐक"ताईन फर्मावल आणि मी काळीज घट्ट करून ऐकू लागलो,
"पंच पंच उष: काली ।जागृति मजला आली।
गवाक्षामधुनी खाली ।बघता मज दिसली।
वृष्टी फुलांची झाली प्राजक्ताच्या खाली।
मनमयूर धुंद होय।नृत्य करी वरखाली।
मन माझ मोहरल ।गंधधुंद भवताली।
ओंजळ पुष्पांची करुनी ।हृदयाजवळी धरली।
वाटे गुज पुष्प्र ही ।गूढ रम्य जणु वदली।
समय थोडका गेला । जीव कामातच रमला ।
दृष्टी खिडकीमधुनी।पुनरपि तेथे गेली।
वृष्टी फुलांची परि तीकोमेजुन गेलेली। 
दिसली मन खिन्न बने।आठवुनी स्थिति पहिली।
क्षणभंगुर सर्व असे जाणिव मजला झाली।"
"वा वा" मी दाद दिली .कविता अगदीच टाकाऊ नव्हती.तशा अर्थाची एक कविता पूर्वी वाचल्यासारखे वाटत होत पण एकसारख्या कल्पना दोन व्यक्तीना सुचू नये असे थोडेच आहे.
"मग काय आता दररोज एक कविता आणि एका महिन्यात मंदाकिले का ?"ताईच्या मंदाकिनी नावावर रल्हादले चा संदर्भ घेऊन कोटी करत मी म्हणालो.
"छे रे तू काय मला बर्दापूरकर समजलास की काय?"फोन बंद करत ती म्हणाली>
       दुसऱ्या दिवशी सकाळी ताईच फिरून येताना माझ्याकडे डोकावली,वाटले आजही कविता आणली असावी पण हातात कागद दिसत नव्हता की वही नव्हती.मी म्हटल सावरकरांप्रमाणे ताई कविता तयार करून लगेच पाठही करून टाकते की काय ?
"काय आज कोणती कविता?"मी उत्साहाने विचारले कारण आज बऱ्याच मोठ्या मानसिक तयारीन मी बसलो होतो,पण तिन माझी एकदम निराशा केली,आणि तिचे उत्तर ऐकून तर मी अवाकच झालो
"आज कविता नाही आणि कधीही नाही,काल केलेलीसुद्धा फाडून फेकून दिली"
"पण अस काय झाल एकदम?"मी आश्चर्यान विचारल.
"झाल काहीच नाही पण मलाच पटली नाही ती टला ट रीला री ची कसरत.उगीचच आली गेली उठली बसली करून काय कविता होत ?"
"पण कालची तुझी कविता पहिलाच प्रयत्न या दृष्टीने चांगली होती,तुझ्यात कवयित्रीचे सुप्त गुण आहेत"मी तिचा उत्साह वाढवण्यासाठी म्हणालो .
"ती तुझी समजूत बदलायला नको म्हणूनच मी कविता करण थांबवल!तो कविता कशाला करतेस यापेक्षा तू कविता का करत नाहीस अस कुणी विचारलेल मला बर वाटेल"
मी मात्र ताईच्याइतका समजूतदारपणा बर्दापूरकर आणि त्यांच्या समानशीलांमध्ये येवो अशी देवापाशी प्रार्थना करायचा मनोमनी निश्चय केला.

टीप:अशा प्रकारचे कवितासंग्रह खरोखरच आहेत‌ शिष्टतेचा भंग होऊ नये म्हणून कवी आणि कवितासंग्रहांची नावे उघड केली नाहीत.ताईची कविता तिने फाडून फेकून दिल्यामुळे माझ्या लक्षात राहिली तशी उद्द्गृत केली आहे. 

मृत्युंजय अमावस्या

॥ चलो शंभुतिर्थ ॥
धर्मविर छत्रपती संभाजी महाराजांचे समाधिस्थान, कोरेगाव भीमा जवळ, ता. शिरुर, जि. पुणे.
धर्मविर छत्रपती संभाजी महाराजांचा ३१८ वा बलिदानदिन
मृत्युंजय अमावस्या, शिवशके ३३३
रविवार दि.

याला काय म्हणावे?

आता काळ बदलला आहे. कदाचित नव्या पिढीतल्या मुलींची मानसिकताही बदलली असेल. ही गोष्ट पंधरा वीस वर्षापूर्वी घडलेली आहे. प्रमोद, प्रमिला, अनिकेत आणि अद्वैत यांचे एक सुरेख चौकोनी कुटुंब होते. प्रमोदला चांगली नोकरी होती, अनिकेत आणि अद्वैत त्या वेळेस शाळेत शिकत होते. प्रमिला त्या सर्वांची उत्तम काळजी घेत होती. अचानक एके दिवशी प्रमिलाच्या पोटात असह्य कळा येऊ लागल्या. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करायचे ठरवले. शेजारी पाजारी, मित्र मैत्रिणी वगैरे सगळी मंडळी मदतीला धावून आली. कोणी त्यांच्या घरी राहून मुलांकडे पाहिले, कोणी जेवण बनवून आणून दिले, कोणी आणखी तीनचार मित्रांना बरोबर आणले, त्या सर्वांनी रक्तदान केले, कोणी प्रमोदच्या सोबत सावलीसारखे हॉस्पिटलात राहिले, कोणी इतर लागेल ती धांवपळ केली. सारे कांही एकदाचे सुरळीतपणे पार पडले. शल्यक्रिया यशस्वी झाली. प्रमिलाला चार पांच दिवसांनी हॉस्पिटलातून डिस्चार्ज मिळणार असे ठरले.

माणिकगड

सह्याद्री हे असे एक व्यसन आहे की कोणी एकदा डोंगरात जाउन आले की पुढच्या शनिवारी पुन्हा जायचे वेध लागतात. शनिवार, १० मार्च सात वाजता सात शिलेदार जमलो होतो माणिकगड आणि सांकशी हे दोन दुर्ग सर करायला. मनोज, किर्ती, आरती, कूल, केशव तर होतेच पण बऱ्याच दिवसांनी धुमकेतू पण होता.