आज शब्द साधनेच्या मागील माझ्या भूमिकेबद्दल सांगण्याची वेळ आली आहे. व्यवहारात सर्वसाधारण पणे सिद्धांत हा अगोदर मांडला जातो आणि कृती / प्रात्यक्षिक नंतर केले जाते. सुदैवाने शब्द साधनेमध्ये प्रयोग अगोदर केला गेला आणि त्यामागील तत्त्व अथवा भावना नंतर सांगण्यात येत आहे हा मी माझा आणि यात भाग घेणाऱ्या सर्व मनोगतींचा बहुमान समजतो.
सर्वात प्रथम हे समजून घेतले पाहिजे की शब्द साधना या उपक्रमामागे काही ऐताहासिक भूमिका दडलेली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर भोसले घराण्याचे उत्तर दायित्व मान्य करावेच लागेल. त्यात वेळोजी, शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम आणि ताराबाई यांचा कृतज्ञतापुर्वक उल्लेख करावाच लागेल.