ऊर्जेचे अंतरंग-०३

ऊर्जेचे अंतरंग-०३: गतिज ऊर्जा

मी १९८४ मध्ये राष्ट्रीय हिमालयी पदभ्रमण कार्यक्रमांतर्गत वाटचाल करत असताना सुमारे १२,००० फुटांवर एक अनोखी 'पाणचक्की (हायड्रो-टर्बाईन)' पाहिली. तिथे कुणीच नव्हते. हिमालयात जाता-येता दिसतात तसलाच एक जोराचा पाण्याचा प्रवाह, मोठ्या देवदार वृक्षाच्या लांबलचक खोडाची पन्हळ आडवी करून त्यातून निमुळता करून एका जागी एका जमिनीसमांतर आडव्या, मोठ्या लाकडी चक्राच्या पात्यांवर सोडलेला होता. लाकडी चक्राच्या मध्यावर एका दगडी जात्याची वरची पात घट्ट बसविलेली होती. चक्र फिरताना ती वरची पात खालच्या दगडी पातीवर वेगाने गोल फिरत होती. जात्यांत जिथे धान्य टाकत असतात त्या तोंडावर वरती एक हिमालयातील महिला पाठीवर बाळगतात तसली घातवक्री (लॉगॅरिदमिक) बांबूची टोपली शेजारच्या खुंट्यांस बांधून ठेवलेली होती. त्यात वरपर्यंत मका भरलेला होता. खालच्या निमुळत्या बारीक टोकातून मक्याची छोटीशी धार जात्यात पडत होती. दळल्या जात होती. जात्याच्या खालच्या पाळीच्या खाली सर्वदूर एक जाड कापड पसरून ठेवलेले होते, पीठ गोळा करायला. आणि हिमालयातील नद्याही कशा तर कायम वाहत्या.

लग्न! उपवर मुलामुलींच्या अपेक्षा!!

मनोगतींनो!

सध्याच्या काळातील उपवर मुलामुलींची लग्ने ठरविणे व ती पार पाडणे हे त्यांच्या आईवडिलांसाठी (तसेच मुलामुलींसाठी) फार जिकरीचे झाले आहे असे मला वाटते. इथे मला ठरवून विवाह करण्याच्या पद्धतीबद्दल बोलायचे आहे.

आजच्या काळात पुर्ण शिक्षण झाल्यानंतर नोकरीत स्थिरस्थावर होईपर्यंत वयाची २५ वर्षे उलटून जातात. त्यानंतर लगेच जबाबदाऱ्या नकोत, जरा मोकळेपणाने वर्षभर काढून मग लग्नाचे बघावे असेच सर्व मुलांचे मत असते. (इथून पुढे सोयीसाठी मुले व मुलींसाठी मुले असाच शब्द वापरतो) ते बरोबर देखील आहे. त्यानंतर मग पारंपारिक पद्धतीने पाहण्याचा कार्यक्रम सुरू होतो. शक्यतो मुले २७-२८ पासून तर मुली २५ पासून सुरू करतात. त्यामध्ये मग त्यांच्या अपेक्षेनुरूप चाचणी/तपासणी/शोध सुरू होतो. ह्या सगळ्यात लग्न होईस्तोवर २९-३० (मुलांची) तर २७-२८ (मुलींची) उजाडतात. ह्यापुढे मुले वगैरे म्हणजे एकूणच कौटुंबीक जिवनात सर्वच उशीराने होते असे मला वाटते.

कोबीची वडी/पानगा

वाढणी
४ जणांसाठी भरपूर

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • अर्धा किलो हिरवा गार पानकोबी
  • २ मध्यम आकाराचे बटाटे, २/३ मध्यम आकाराचे कांदे.
  • पाव किलो मटारच्या शेंगांचे दाणे.
  • हिरव्या मिरच्या ६/७,कोथंबीर बारीक चिरून अर्धी वाटी,चवीपुरता आले
  • गोडेतेल एक वाटी
  • तांदळाचे व चण्याच्या डाळीचे पीठ - प्रत्येकी अर्धी वाटी
  • हळद, तिखट, हिंग,जीरे, मीठ, साखर चविनुसार

मार्गदर्शन

पूर्वतयारी:-

इथे ओशाळला गोबेल्स!

आजची ताजी बातमी: श्री. भट्टाचार्य यांच्या "स्वातंत्र्य लढ्यात नेताजींचे स्थान काय?" ह्या माहिती अधिकारा अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला गृहखात्याने निर्लज्ज उत्तर दिले आहे - "नेताजी देशभक्त असल्याचा कोणताही पुरावा सरकारकडे नाही!"

मॅट्रिक ते मॅट्रिक्स

"द मॅट्रिक्स" हा प्रसिद्ध इंग्रजी सिनेमा पाहिल्यावर असे मनांत आले की हा सिनेमा जर कोणी गांवाकडच्या व्यक्तिने पाहिला तर तो त्याची गोष्ट कशी सांगेल ? या कल्पनेवर ही कथा लिहिली आहे.

म्या सदा येळकाढूकर, मुक्काम मुंबै !! माज्या बापाची गांवी शेती हाये. पन् म्या शिकावं अशी माज्या आयबापाची लई विच्छा. तसा म्या गेलो साळंत, पन् म्यॅट्रिकला गाडी फेल ! लई धडका मारल्या बगा पन् काईच उपेग नाय जाला. टकुर्‍याचा भुगा व्हायची येळ आलती. म्हंजी व्हायाचं काय की मला झ्वाप यायची कंदीबी, झ्वापलेला असताना काय भन्नाट सपानं यायची राव ! पर कोनाला सांगाया ग्येलं तर येडं हाय म्हनायची. शेवटी बा थकला. मुंबैहून बारक्या आलावता गांवाकडं, त्याला म्हन्ला, याला चिटकव गड्या कुठतरी तिकडच, आता शेतीतबी काय र्‍हायलेलं न्हाई.
म्या आलो मंग हिकडच् बारक्यासंगट. बारक्याच्याच हापिसात लागलो. हापिस येकदम् झ्यॅक बगा. निसत्या चौकोनी छोट्या छोट्या उघड्या खोल्या येका साईडीला अन् दूसरीकडं ही केबिनांची रांग. खोल्यांमदी बसल्येली मानसं उबी र्‍हायली तरच दिसायची. हापिस येकदम आरश्यावानी चकाचक, अन् बाप्ये पन. बाया तर हिरवीनीसारकी कापडं घालून टकाटका चालायच्या. माजं काम सक्काळी साफसफाई, पानी भरनं आन् समद्या काचा पुसनं. सायेब लोकंबी चांगली. म्हंजी दुपारी थोडी डुलकी लागली तरी बोलायची न्हाईत. फायली येळच्यावेळेत नेउन दिल्या की जालं. माजी सपानं बगन्याची संवय चालूच व्हती. पन् सांगनार कुनाला अन् आईकनार कोन् ? बारक्या तर मला येडाच म्हनायचा.
येक दिवस बारक्या म्हनला, ये सद्या, लेका तुला म्यॅट्रिक व्हतां आलं न्हाइ कंदी. आता म्यॅट्रिक नांवाचा पिक्चर आलाय् आन् समदी लोकं खुळी जालीत त्याच्यापायीं. आपल्या सायबाची टायपिस ऍैन वक्ताला रुसली म्हनून मला दोन तिकटं दिलीत त्यानं. तर येनार का बगायला फुकटात ? तो बगितल्यावर तरी म्यॅट्रिक व्हशील लेका. म्या म्हनालो, जाऊ की, काय नाय तर थंडगार हवेत झ्वाप तरी मिळंल निवांत.
थेटर बगूनच गपगार झालतो, पिक्चर तर काय जबरी व्हतं राव माला जे समजलं तसं सांगतो तुमास्नी. पैल्याछूट येका बिल्डिंगीवर पोलिस आन् काळ्या गोगल घातलेल्या मानसांचा वेढा मंग गोळीबार. येक काळ्या कापडांतली बया कांपुटरवर, काळे चष्मेवाले तिला पकडायला बगतात. त्येच्या मायला, ती बया पळाया लागते, येका बिल्डिंगीवरुन दुसरीवर. गावंतच न्हाइ, जाते पळून. मंग येक पोरगा दिसतो, त्येला कांपुटर उठवतोय्, ते मंग हापिसात जाताय तेच्या. थितं फोनवर येक बाप्या सांगतो, तुज्या मागावर मानसं लागलीयात् तंवा पळ काढ लेकां. त्ये खाली वाकून पळतंय येका केबिनमंदी. थितं फोनवाला बाप्या तयाला खिडकीभाईर जायला सांगतो. ह्ये जातंय् पन् मोबाईल पाडतं खाली. मंग घाबरुन आंत येतं. काळे चष्मेवाले पकडतात आन् आडवा करुन येक र्‍हइमानी किडा त्याच्या प्वाटांत घालतात. त्ये बोंबलू पाहतं तर व्होठ शिवलेलं. जागं हुतं तर घरात खाटल्यावर. मायला, म्हंजी हा माज्यासारकाच दिसतुय, सपान बगनारा.

माहुली

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले जे काही किल्ले आहेत, त्यात माहुलीची बाल शिवाजीच्या काळापासून वर्णी लागेल. शिवरायांच्या जन्माच्या वेळी शहाजीराजांच्या ताब्यात असलेल्या या किल्ल्यावर बालपणी महाराज अनेकदा येउन गेले.

शनिवार २४ मार्चला मनोज, किर्ती, केशव, कूल असे पाच जण इंद्रायणी एक्सप्रेसने पुण्याहून कल्याणकडे निघालो, लोणावळ्याला फदि सामील झाला. कल्याणला उतरून ९.५० च्या कसारा लोकलने आसनगावकडे निघालो.

मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस

नमस्कार,

जय महाराष्ट्र !

काही दिवसांपूर्वी गडकरीला मच्छींद्र कांबळी यांचे  'भैय्या हातपाय पसरी हे नाटक पाहिले' आणि काही प्रश्न पडले. नाटकाच्या सुरवातीसच जेव्हा भैय्या प्रवेश करतो तेव्हा तो मच्छींद्र कांबळी यांस कांबळे असे संबोधतो. तेव्हा मच्छींद्र कांबळी त्यास आय (इंग्रजी आय) घाल असे सुनावतात. तेव्हा प्रश्न पडतो कांबळे बोलल्याने ते नाटकामध्ये भडकतात का ? नाटक सुंदर आहे .मराठी माणसाला विचार करायला लावणारे आहे.

नदी

त्या धरणावर ज्या-ज्या वेळी गेलो त्या-त्या वेळी न चुकता मी तो उंचवटा गाठायचो. धरणाची भिंत जिथं सुरू होते, तिथंच तो होता. तिथं थांबलं की नदी अशी सामोरी यायची. तिथून तिचं दर्शन घेण्याची उर्मी मला कधीही आवरता आली नव्हती. जितक्या वेळेस इथं आलो त्या प्रत्येक वेळी ही इच्छा मी हट्टानं पूर्ण करून घ्यायचो. याहीवेळी अपवाद होणार नव्हता. मला जायचं होतं पुढं गावांमध्ये. तरीही वाट थोडी वाकडी करून मी तिथं गेलोच.

नर्मदाई

सकाळी सात वाजता जीपने गरुडेश्वराचा पूल ओलांडला आणि ती उजवीकडे वळली. पुढं गरुडेश्वराचं मंदीर होतं आणि मंदिराखालीच घाट. आम्ही खरं तर रेस्ट हाऊसवर जाणार होतो; पण पुलाखालून वाहणारी नदी पाहताच जोडीदार मूडमध्ये आला. त्यानं जीपवाल्याला गाडी मंदिरापाशी लावण्यास सांगितली. मी त्याच्याकडं पाहू लागलो.

अभिनंदन प्रसाद-!

प्रसाद शिरगावकरांच्या गझला हल्ली मनोगतावर वाचायला मिळत नसल्या तरी त्यांनी चांगल्या गझला मनोगतावर दिल्या आहेत. नुकतीच त्यांनी व श्री. वैभव जोशी ह्यांनी http://www.marathigazal.com/ नांवाचे संकेतस्थळ खास मराठी गझलांच्या प्रसाराच्या उपक्रमासाठी सुरू केले असल्याची बातमी आजच्या म.टा. च्या 'मुंबई टाईम्स' पुरवणीतल्या मराठी वेब ह्या सदरात वाचावयास मिळाली.