मिरच्यांचे लोणचे-

वाढणी
बाटली भरून

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • अर्धा किलो - साधारण तिखट -जाड पोपटी हिरव्या मिरच्या
  • १०० ग्रॅम मोहरीची डाळ
  • ५/६ लिंबे - मोठ्या आकाराची
  • सैंधव (पादेमीठ) व मीठ - चविनुसार/अंदाजे
  • हिंग व हळद - १ चहाचा चमचा.
  • तेल - एक छोटी वाटी

मार्गदर्शन

नाताळची चाहूल!

नोव्हेंबर सरत आला की नाताळची चाहूल लागते.दुकानादुकानातून मोठीमोठी ख्रिसमसची झाडे सजू लागतात.दिव्यांच्या रोषणाईने करड्या,ढगाळ  संध्याकाळी थोड्या रंगीत होतात,त्यात 'जान' आल्यासारखी वाटते.पोस्टातून भेटकार्डे, भेटपाकिटे पाठवण्यासाठी गर्दी होते.नाताळचे खास बाजार मैदानात,चर्चच्या आवारांत, नदीकाठी भरायला लागतात.हौशे,गवशे आणि नवशांची गर्दी तेथे व्हायला लागते.मेणबत्त्यांचे असंख्य प्रकार,चांदण्यांच्या आकाराचे आकाशदिवे, रेनडियरची वीजेवर लुकलुकणारी गाडी,दिव्यांच्या रंगीत माळा,फुगे, भेटकार्डे, नाताळभेटी देण्यासाठी आकर्षक डबे,रंगीबेरंगी भेटकागद, नाताळची चित्रे असलेले टी-सेट,पेले..काय नसतं तिथे? संध्याकाळी कळपाकळपाने लोक हिंडू लागतात‌.

मुंबईतील जाळपोळ

आज दिनांक ३०.११.२००६ रोजी प.पू. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे जे पडसाद उमटले, जी जाळपोळ, हिंसक घटना घडल्या त्याबद्द्ल आपणास काय वाटते?


विटंबनेची घटना नक्कीच निषेधाची आहे मग ती कोणाचीही असो. पण त्याची प्रतिक्रिया योग्य आहे का?

मेजर मनीष हिराजी पितांबरे






गड आला, पण सिंह गेला

[म. टा. Thursday, November 30, 2006 12:44:59 am]

शब्दांबरोबरचा रम्य प्रवास

नमस्कार मंडळी,
परवाच 'नक्षत्रांचे देणे -शांता शेळके' या कार्यक्रमाची तबकडी पाहत होतो. त्यात त्या म्हणतात की त्यांचा प्रवास शब्दांपासून चालू झाला. अर्थापासून शब्दाकडे नाही तर शब्दाकडून अर्थाकडे असा. हे ऐकून मला वाटले की माझे सुद्धा बऱ्याच प्रमाणात असेच घडले. कधी लहानपणी 'राजा शिवछत्रपती' मध्ये मेघडंबरी हा शब्द वाचून मी फारच भारावला गेलो होतो. मग 'शब्दरत्नाकरात' त्याचा अर्थ पाहून अधिकच आनंद झाला आणि तो शब्द मनात ठसला.

सावधान! घर झपाटलेले आहे.....

(खालील लिखाण एक अनुभव मनोगतींशी वाटावा म्हणून केले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा माझा कोणताही मानस नाही. वाचावे आणि विसरून जावे.)


"काहीच्या काही...." समीर जवळ जवळ ओरडलाच. 


"अरे खोटं कशाला बोलू मी." मनीष त्याला पटवून देत होता.             

मनोवृत्ती की विकृती?

कानपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटम्बना झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली,तणाव निर्माण झाल्याची बातमी नुकतीच वाचली.ई-सकाळमधील एका बातमीनुसार दगडफ़ेकीला घाबरून एक व्यक्ती पळत-पळत रस्ता ओलांडत असताना वाहनाखाली चिरडून मरण पावली.माणसे जखमी होणे,सार्वजनिक  मालमत्तेचे नुकसान होणे या नित्याच्या आणि चिरपरिचित घटना देखील घडतच आहेत.

मनोगत कसे वाचावे?

प्रिय मनोगती सदस्य हो,

मनोगत वरील जुने/नवीन लेख शोधून वाचणे हे मला फार कष्टाचे होत आहे. मुखपृष्ठावर सगळे दिसेलच असे नाही, शिवाय ते बदलत राहते. कुठलीच RSS feed चालत नाही. "नवीन" आणि "अद्यावत" खुणा नेहमी बरोबर दिसत नाही. "शोधा" वापरूनही सगळे सापडेलच असेही नाही.

कॉन्फेस्ट - चित्र रंग



कॉन्फेस्ट


चित्र रंग


आणि मग मी अनु ला शोधायला लागलो.


अनु अजुनही पेंटींगच्या शमीयान्यातच असेल असे वाटून मी तेथे गेलो, पण ती तीथे नव्हतीच. तिथे खुपसे रंग मोठ्या पाच-पाच लिटर च्या कॅन्स मध्ये ठेवलेले होते. एक मोठ्या कागदांच गट्ठा एक टेबलवर होता. आणि अर्थातच खूप चित्रविचित्र प्रकरचे ब्रशेस. काही लोक लाकडी स्टँड वर कागद (आणि मन) लावून चित्र कढण्यात मग्न होते. ते काय चित्र काढत आहेत हे पहायला मी जरा डोकावलो आणि चाट च पडलो!

तेजस्विनी- शेवट !

सुरेखा ताईंचा पुढचा पूर्ण आठवडा विविध सत्कार समारंभाला हजेरी लावण्यात गेला.
लोक प्रतिनिधींना सरकारी नोकरी करता येत नसल्याने सुरेखा ताईंना नगरपालिका चालवत असलेली ती शाळा सोडावी लागणार होती. शाळेतल्या नोकरीचा राजीनामा देताना त्यांचे डोळे भरून आले होते..... शाळेने त्यांना निरोप द्यायचे ठरवले. सोबत झेड.पी. सदस्य झाल्याबद्दल सत्कारही करण्याचे योजिले होते. शाळेतला सत्कार समारंभ मोहिनी इंगळेच्या हस्ते झालेला होता. मोहिनीला निवडणुकीत हरल्याचे सोयर सुतकही नव्हते.
वैद्य बुवांनी घरी बोलवून सौ. च्या हस्ते सुरेखाताईंची खणानारळाने ओटी भरली व तोंड भरून 'गरीबांच्या कामाला ये' असा आशीर्वाद देत त्यांचा सत्कार करून निरोप दिला. 
येत्या सोमवारपासून सभागृह भरणार होते. अजून चार दिवस बाकी होते, सुरेखाताईंची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
**********************************
जिल्ह्यात एक एका सभासदाची जुळवा जुळव सुरू झाली. झेडपीच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवार कोण ह्यावर जोरदार चर्चा सुरू होती.
जिल्ह्यातल्या ४ सर्कल मधून झेड.पी.च्या ४८ जागा होत्या. भुसावळ, यावल, चोपडा व जामनेर सर्कलमधून भा.ज.मो. व जनजागृती पक्षाची सरशी झालेली होती. बावीस जागांपैकी चौदा जागांवर युतीला यश आलेले होते. आयोगाने मान्य केल्यास सावद्यात फेरमतदान झाले असते ते वेगळेच.... तर जळगाव, एदलाबाद सर्कल मधून विकास आघाडीने बाजी मारली होती. सव्वीस जागांपैकी अठरा जागा त्यांनी कमावल्या होत्या. काही बंडखोर व काही अपक्ष उमेदवार तळ्यात मळ्यांत करीत होते. पण एकूण परिस्थिती पाहता विकास आघाडी पक्षाचाच उमेदवार अध्यक्ष पदी येण्याचे जवळपास नक्की होते. आघाडीतल्या असंतुष्टांनी विरोधात मतदान केल्यासच राजेंद्र गाजरेंचा पराभव झाला असता. तशी शक्यता मात्र धूसर होती.