मनाची एकाग्रता व गीता

हाती घेतलेल्या कामावर मन एकाग्र करता आले नाही की आपण बाह्य जगांत गडबड, गोंधळ, गोंगाट असल्याची सबब सांगतो. काम आवडीचे असले तर भोवताली गडबड असल्याचे जाणवतही नाही. त्याचबरोबर मनाची एकाग्रता झाल्यास एरवी कंटाळवाणे वाटणारे कामही आवडू लागते. म्हणजे मन एकाग्र होत नाही म्हणून काम आवडत नाही व काम आवडत नाही म्हणून मन एकाग्र होत नाही असे हे दुष्ट चक्र आहे.

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ८

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ७  येथून पुढे. 

मग गोपाळ चोपडे उभा राहून साळसूदपणे म्हणे, "सर, हा प्रभाकर म्हणतो, नायडूने एका मॅचमध्ये सोळा सिक्सर्स मारले हे सारे झूट आहे. त्याचा त्यावर विश्वास बसत नाही. ब्रह्मदेवाला देखील इतके सिक्सर्स कधी मारता येणार नाहीत."

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ७

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ६  येथून पुढे.

अखेर तडजोड झाली. देवण्णावर औट झाले. पण नऊ धावा दिल्याखेरीज हा निर्णय स्वीकारण्याचे त्यांनी साफ नाकारले. आम्हाला नाइक मास्तरांच्या नाकावर पडलेला चेंडू पाहायला मिळाला नाही हे खरे; पण एका बॉलमध्ये नऊ धावा मिळवणारा खेळाडू इतरांना कुठे पाहायला मिळाला ? आज हेल्मेट, पॅड, रिस्टबँड असा शृंगार करून क्रिकेट खेळतात. शेळी लेंड्या टाकत राहते, त्याप्रमाणे व त्याच गतीने चार-पाच हजार धावा देखील काढतात. पण एका बॉलमध्ये नऊ धावा घेणारा देवण्णावर मास्तरांसारखा खेळाडू मात्र आता भूतली होणे नाही. There were giants in those days! आणि धावांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. मॅच संपल्यावर सगळेजण संध्याकाळी भीमाक्काच्या खानावळीत पालापाचोळा जेवण करत, व मार खाल्लेल्या टीमने तो खर्च करायचा असे. वास्तविक भीमाक्का मरून बरीच वर्षे झाली होती, पण जे मेल्यानंतर त्यांचा उल्लेख 'ते टिळकांचे कट्टर अभिमानी होते' असा झाला असता, असे जुनी लोक हट्टाने भीमाक्काची खानावळ असेच नाव वापरत. भीमाक्कानंतर तिचा मुलगा व त्याची बायको यांनी खानावळ चालवली ती 'क्षुधाशांति भवन' या जबरदस्त नावाने. नंतर आपला व्यवसाय कोणताही असला तरी नावात 'भारती' हा शब्द वापरण्याची लाट आली, आणि रिकामटेकडे लोक खानावळीला भूक-भारती म्हणू लागले. पण मुलगा व सून एव्हाना अंगाने अतिप्रशस्त वाढून बसली होती, आणि खानावळीचे नाव आपोआपच बदलले, आणि होऊन बसले- लठ्ठं भारती !

परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे

भाषा सल्लागार मंडळाने वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेच्या निर्मितीसाठी आधारभूत म्हणून ठरवून दिलेली निदेशक तत्त्वे


  • [संदर्भ : भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (मराठी-इंग्रजी);भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन.मुंबई -फेब्रुवारी,२००६.]

माझी कविता- एक रसग्रहण

माझी कविता- एक रसग्रहण



ईमेलने एक कविता मला एक दोनदा मिळाली. अगदी सामान्य अशी कविता.  त्यात आवडण्यासारखे  काय आहे? आणि न कळण्यासारखे तर काहीच नाही असे माझे पक्के मत झाले. ह्या कवितेचा कवी कोण ह्याचा उल्लेखही नव्हता. ह्यात काय विशेष?
अशी ही कविता ईमेलने एवढी फिरते का बरे? मनोगतावर वाहणारे रसग्रहणाचे वारे सध्या जोरात आहेत. तेव्हा रसग्रहण करावे ह्या हेतूने  मी पुन्हा त्याच ओळी वाचल्या. अहो मला अगदी भरभरून आले.

हासत येते, नाचत येते
विचारांचा हात धरूनी
कविता माझ्या मनात येते

पौष्टिक लाडू

वाढणी
५-६

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

शब्दांच्या जाती आणि चालीरीती

आंतरजालाच्या माध्यमातून मराठी व्याकरणाच्या किमान माहितीच्या उपलब्धतेचा टप्पा पार पडल्या नंतर सर्वंकष मराठी शब्दकोशही महत्त्वाची निकड आहे.


विक्षनरी (दुवा) हा मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प आहे. यात प्रत्येक शब्दाचे अर्थ ,समान अर्थी शब्द विरुद्धार्थी शब्द, मराठी व्याकरणा नुसार त्या शब्दाचे कूळ , मूळ शब्द, जाती , सामान्यरूपे, त्यातील प्रत्य्ये,संधी समास,विग्रह,पारिभाषिक संज्ञांच्या व्याख्या, शब्दाचे वाक्यात उपयोग करून दाखवणे, समानार्थी परभाषेतील शब्दांच्या नोंदी, शब्दांचे वर्गीकरण, हे सर्वंकष स्वरूपात अंतर्भूत करणे अपेक्षीत आहे.

"मला भारताची लाज वाटली"

काल भारतीय मित्रमंडळींबरोबर गप्पांत एकाने आमच्या दोन सहकाऱ्यांचे किस्से सांगितले. एक इंग्रज आणि एक फ्रेंच असे हे दोन सहकारी कामानिमित्ताने व नंतर फिरायला म्हणून नुकतेच भारतात जाऊन आले आहेत. ते दोघे आमच्या या मित्राच्या गटात काम करतात.

विमानाचे उड्डाण - भाग २ (आकारमान)

विमानांचा शोध लागल्यानंतर आतापर्यंत असंख्य प्रकारची विमाने तयार झाली. बॅटरीच्या शक्तीवर आकाशात उड्डाण घेणाऱ्या चिमुकल्या खेळण्यापासून ते महाकाय जंबो जेटपर्यंत अनेक आकारांची विमाने हवेत उडतांना पहावयास मिळतात. गेल्या शंभर वर्षात विमानांचे आकारमान कसे बदलत गेले, त्यात नवनवी भर कशी पडत गेली याचा थोडक्यात परामर्श या लेखात घेणार आहे. त्यांच्याबद्दल फूट, घनफूट, घनमीटर वगैरे तपशीलवार आकडेवारी खोदून काढण्यात फारसा अर्थ नाही. कोठल्याही परिमाणाचे पूर्ण आकलन त्या गोष्टी  नेहमी वापरणा-या लोकांनाच होते. मला तरी रक्तातील एच.डी.एल., एल.डी.एल.चे प्रमाण, वा अर्थकारणातील डब्ल्यू.पी.आय. किंवा बी.एस.ई. निर्देशांक वगैरेचे आकडे ऐकून त्यावरून कितीसा बोध होतो? तेंव्हा फारच महत्वाचे कांही मोजके आकडे देऊन बाकीचे नुसतेच वर्णन केलेले बरे असे मला वाटते.
 
राइट बंधूंनी आपल्या पहिल्या सुनियंत्रित विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण डिसेंबर १९०३ मध्ये केले पण त्यात अजूनही कांही तृटी शिल्लक होत्या असे त्यांना दिसले. त्या भरून काढण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करून त्यांनी १९०५ पर्यंत त्यांना समाधानकारक वाटणारे एक विमान तयार केले. पण आता पुढे काय? विमान उडवण्यातील हौस मौज बरीचशी भागली होती, सुनियंत्रित असे उडणारे यंत्र तयार करण्याचा जो ध्यास घेतला होता तो सफल झाला होता. त्यासाठी पदरमोड करून अवाच्या सवा खर्च झाला होता. त्यानंतर आता उदरनिर्वाहासाठी काय करायचे? हे प्रश्नचिन्ह समोर होते. त्यासाठी सायकल व्यवसायाकडे परत वळावेसे वाटत नव्हते. त्यांच्याकडून सायकली विकत घेणारे सर्वसामान्य लोक विमान विकत घेणार नव्हते. रोजच्या जीवनात त्याचा कांही उपयोग नव्हता. असले महागडे धूड घेऊन ते ठेवणार तरी कुठे? त्यासाठी दुसरे ग्राहक, उपभोक्ते शोधायला नाही तर निर्माण करायला हवे होते. या दृष्टीने त्यांनी अनेक लष्करी अधिकाऱ्यांना वारंवार भेटून सैनिकी कामगिरीसाठी विमानांचा उपयोग करण्याची गळ घातली. शेवटी त्यांनी थोडी विमाने विकत घ्यायचे मान्य केले पण त्याबरोबरच त्यांत निदान दोन माणसे बसण्याची सोय करून द्यायला सांगितले.

मी, एक सामान्य माणूस!

सकाळच्या रविवार पुरवणीतील एक लेख खाली देत आहे. 


लेख योगेश्‍वर गंधे यांनी लिहीला आहे. कित्येक लोकांना हे म्हणायंच असतं पण जमत नाही. खुप छान शब्दांत त्यांनी ही व्यथा मांडली आहे.


===================================


 


मी, एक सामान्य माणूस! गावकुसाबाहेरचा...