भोपळी मिरचीची चटणी

वाढणी
३-४ व्यक्ती

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • लाल रन्गाची भोपळी मिरची (२)
  • ३-४ सुक्या लाल मिरच्या
  • १ /२ चहा चमचा चिन्च पेस्ट
  • १-२ कढीपत्ता
  • मीठ चविनुसार

मार्गदर्शन

 भोपळी मिरचीचे बरीक तुकडे करुन तयर ठेवा.

भान्ड्यात तेल तापवा. त्यात मोहरी घाला.

मोहरी तडतडु लागली की त्यात चिमुट्भर हिन्ग व कढीपत्ता टाका.

त्यात भोपळी मिरचीचे तुकडे टाका,सुकी लाल मिरची टाका.

चीन्चेची पेस्ट टाका,चवीनुसार मीठ टाका.

इडली

वाढणी
४ जण

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • तांदुळ २ वाट्या (लाँग ग्रेन राइस)
  • उडदाची डाळ १ वाटी
  • चवीपुरते मीठ

मार्गदर्शन

२ वाट्या तांदुळ व १ वाटी डाळ दोन्ही वेगवेगळ्या पातेल्यात  दुपारी १२ ला भिजत घालणे. रात्री १० ला मिक्सर/ब्लेंडर मधून बारीक वाटून घेणे. वाटून  झालेले पीठ एका पातेल्यात झाकून ठेवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता न्याहरीला किंवा दुपारी १२ वाजता जेवायला इडली करणे. दुसऱ्यादिवशी हे झाकून ठेवलेले पीठ फसफसून वर येते. आंबट होते.

काही नवीन सुविधा

मराठी विकिपीडियावर सदस्याकरिता काही नवीन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.पहिली म्हणजे आद्याक्षरानुसार लेखांची सोपी अनुक्रमणिका.दुसरी महत्त्वाची सुविधा म्हणजे संपादन करताना कोणतीही विशिष्ट मराठीतील अक्षरे एका टिचकी सरशी सहज निवडता येतात. तिसरे विविध सुविधांनी युक्त म्हणजे मेन्यू बटन्सची संख्या पण वाढवली आहे.त्याशिवाय नावीन्यपूर्ण टेम्प्लेट्स म्हणजे तयार माहितीचौकटी वगैरे पण तयार होत आहेत.

गांगुलीची निवड

गांगुलीची निवड भारतीय संघात झालीय. हे चांगलं झालं की वाईट??


 माझ्यामते गांगुलीची निवड करायची काही गरज नव्हती. आपल्याला काय वाटते?


 त्यापेक्षा नवीन खेळाडूंची निवड करा ना...........


आणि पहिल्यांदा भारतीय संघाचा कोच

प्रायोजित साती

                            प्रायोजित साती


     आजकाल हे मला फार म्हणजे फारच जाणवायला लागलंय. म्हणजे या पूर्वीही असंच होतं, असंच चालतंही सगळीकडे , पण मला मात्र आता हे कुठेतरी खुपायला लागलंय.

भुत दिसलाच नाय

लहानपणापासुन गावातल्या भुतांच्या गोष्टी एकुन होतो. असेच एकदा काकांबरोबर गावी चाललो होतो. रात्री निघायचे होते. जी एसटी पकडणार होतो ती आमच्या गावात थांबणार नव्हती तर आमच्या  गावाच्या आधीच्या गावाला थांबणार होती. मध्यरात्री ३ वाजता एसटी त्या गावात आली. आम्ही उतरलो काकांना म्हटल एक तास थांबुया ४ नंतर जाउया कारण एकुन होतो ४ नंतर भुतांचा वावर नसतो. काका म्हणाला आताच जाउ या. म्ह्टल जाउया. आम्ही निघालो तेव्हड्यात दोन माणसे दिसली आम्हाल त्यांनी पाहीले म्हणाले कोणत्या गावचे आम्ही सांगीतले आम्ही या गावचे ते म्हणाले आम्ही पण त्याच गावचे चला जाऊया. आम्ही निघालो त्यांच्याबरोबर रस्त्यावर काळोख आम्ही चालतोय . मनात निरनिराळे विचार येत होते हे दोघ भुततर नाहीत ना. कारण आम्ही शांतपणे चाललो होतो. कोण कोणाशी बोलत नव्हते. प्रत्येकाच्या मनात भिती होती वाटत आपल्याबरोबर भुत तर नाहीत ना. तेवढ्यात मला वाटत होत की आपल्याबरोबर पांढऱ्या रंगाचे  कोणि तरी चालतय. मी घाबरलेलो पण सांगणार कोणाला मान खाली घालुन चालत होतो. तो पांढरा रंग कधी जवळ तर कधी लांब असा आमच्या बरोबर चालत होता. इथे माझी हवा गुल. तेवढ्यात गाव जवळ आले गावाच्या वेशीवर दिवा होता तेव्हा कळले तो पांढरा रंग रस्त्याच्या कडेला लावलेला पांढरा रंग होता. मनातल्या मनात हसत घराकडे निघालो कारण ४ वाजुन गेले होते. यावरुनच मनात असेल तर कीवा आपण मानत असेल तर आपल्याला भुतांचा भास होतो असे मला वाटत.

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ६

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ५  येथून पुढे.



सायमन मास्तरांचा तास संपला की शाळेतील दिवसाची सुगंधी घडी जात असे. त्यानंतर काचा मारलेले व बटाट्यांच्या सालीच्या रंगाच्या धोतरातले दातार मास्तर येत. मग आम्हाला एकदम उबदार, घरगुती व काही वेळा तर वाह्यात वाटू लागे. शाळेत एकदा पुस्तके टाकली की संध्याकाळपर्यंत तिकडे ढुंकून न पाहणारा थाडे देखील त्या तासाला हजर राहत असे. तो काही अभ्यासासाठी येत नसे. पण त्या वेळी वर्गात जी गंमत चाले ती त्याला आवडे.

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ५

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ४  येथून पुढे.



पण या धर्मराजामुळे मी गोत्यात आलो. दामले मास्तरांनी मला वर्गाबाहेर तर घातलेच, शिवाय प्रगतिपुस्तकावर 'उद्धट' असा शेरा लिहिला. त्यामुळे मला घरी देखील सक्तमजुरी मिळाली. पण या साऱ्या अवधीत आनंदाच्या काही गोष्टी घडल्या. नाही असे नाही. उत्तम मराठी हस्ताक्षरासाठी मला दोनदा बक्षिसे मिळाली. आमच्या शाळेचे अद्याप देशीकरण झाले नव्हते. आमचे प्रिन्सिपॉल अमेरिकेतून येत. एकदा डॉक्टर हिल नावाचे प्रिन्सिपॉल होते. निळा सूट घालून ते सावकाश शाळेभोवती फिरू लागले की 'ऐरावत' सरकत असल्याप्रमाणे दिसत. अशा फेऱ्या घालत असता त्यांच्या कोटाच्या बाहीत वेताची छडी असे. ती काही केवळ शोभेसाठी नसून तिची सणसणीत ओळख अनेकांना झाली होती. त्या दिवसांत प्रत्येक वर्गात मोठी चित्रे लावली जात. एकदा हिल आमच्या वर्गात आले व त्यांनी विचारले, "हे प्राचीन ऍम्फिथिएटर कुठे आहे?" खरे म्हणजे त्या चित्रावरच' रोम' असे लिहिले होते. पण ते सांगितल्यानंतर त्यांनी विचारले, "रोम कुठे आहे?"

हा नवा गोंधळ कसला.

आम्हा विद्यार्थ्यांना कॉलेजातल्या असंख्य ऍक्टिव्हीटीज मधून वेळ मिळाला व गप्पा मारायला कोणी मराठी मंडळी नसल्याचे जाणवले की मनोगताची तिव्रतेने आठवण येते.
मग कुठल्यातरी कॅफे वरून खिशाला/पॉकेटमनीला चाट देवून मनोगतावर यावे तर काहीतरी नविन प्रक्रिया झालेली असते.

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ४

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ३  येथून पुढे.


पण मला नेहमी नवल वाटायचे ते एका गोष्टीचे. दिवेकर तिसरीत दोनदा नापास झाला होता. जाधव गणितात उत्तम होता, पण त्याला इंग्रजी येत नसे. त्या दोघांचे होमवर्क अनेकदा मीच करून देत असे. पण निबंधात मात्र त्यांना नेहमी दहापैकी आठ-नऊ मार्क पडत. एक दिवस मी रागारागाने त्यांना विचारले, तर ते एकमेकांना ढकलत हसतच राहिले. मग दिवेकर म्हणाला, "तू माझा जिगरी दोस्त म्हणून सांगतो. यातली ग्यानबाची मेख अशी आहे बघ. माझ्याकडे दोन वर्षांच्या जुन्या वह्या आहेत. जाधवचे दोन भाऊ येथेच शिकून गेले. त्यांच्या वह्या त्याच्याजवळ आहेत. सडेकर मास्तरांचे सहा-सात विषय ठरलेले असतात. भारतातील बेकारी, युद्धे कशी थांबतील, दारुबंदी, प्रयत्ने वाळूचे, जातिभेद, खेड्यातील जीवन. दर खेपेला आम्ही तेच जुने निबंध उतरुन काढतो. मास्तर कधी तरी दोनचार वह्या पाहतात, आणि बाकीच्या वह्या त्यांची बायको तपासते. म्हणून आम्ही आमच्या निबंधावर दहापैकी आठ किंवा नऊ असे मार्क सुद्धा लिहून ठेवतो. मास्तरांना वाटते, बायकोने आधीच मार्क दिले आहेत. तर बायकोला वाटते मास्तरांनी या वह्या आधीच तपासलेल्या आहेत. आता बघ पुढल्या खेपेला देशभक्ती हा विषय येतो की नाही ते !"