कॉन्फेस्ट - मी मुक्तं!


कॉन्फेस्ट


मी मुक्तं!


आणि मग मी उठलो.  आल्यापासून अंघोळ अशी केलीच नव्हती. तंबू कडे  गेलो. अनु, सूझी शी बोलत बोलत अजून आवरतच होती. तिला थोडी मदत केली. अंघोळी चा प्रस्ताव मांडला. तीच्या मनात पण तेच होतं. पण ती म्हणाली की, पण जरा जपूनच, आधी जाऊन पाहूया कसे काय आहे ते.

एका मनोगतीची डायरी

२.४
छे! काय दिवस आलेत... आज इतकी सुंदर कवित लिहिली मनोगतावर. पण एक प्रतिसाद येईल तर शपथ्थ... काय करावं?
आज ऑफिसमधे वीकली रिपोर्ट द्यायचा होता. पण या कवितेच्या नादात राहूनच गेलं. आता उद्या होईल मारामारी. होऊ दे बघून घेऊ. पण अजून एकही प्रतिसाद कसा नाही?
बाकी कोणी नाही तरी भटकेराव नक्कीच देतील. द्यायलाच हवा. म्हणाले होते ते तसं. छे! उगाचच निश्चय केला की अर्धा तास याहू निरोपकाला हात लावायचा नाही. भटकेरावांशी बोललं नाही तर वेळ कसा पुढे सरकतच नाहीये असं वाटतंय.
त्यात ही उउर्ध्वश्रेणीकरणाची कटकट. मनोगताचं पान उघडायला किती वेळ लागतोय.... एवढ्यात एखादा प्रतिसाद आला असेल का? जाऊ दे. बघावंच उघडून.

मक्याच्या कणसांची भाजी

वाढणी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

पुणे कट्टा सहभाग

पुणे कट्ट्यामध्ये सहभागी होणाऱ्या मनोगतींसाठी या काही अखेरच्या सूचना:
१. शनिवार सायंकाळपासून कट्ट्यात सहभागी होणाऱ्यांनी कृपया मला गुरुवार सायंकाळपर्यंत व्य. नि. ने आपला सहभाग नक्की झाल्याचे कळवावे. त्यानुसार शनिवार सायंकाळच्या भोजनाची व्यवस्था करणे सोईचे होईल. व्यं. नि. पाठवताना कृपया आपली भोजनाची आवड (शाकाहारी / मांसाहारी) कळवावी.
२.रविवारी सकाळी येणाऱ्यांनीही आपला सहभाग नक्की करावा.
३. इतर तपशीलासाठी कृपया 'कार्यक्रम' या दुव्यातली पुणे कट्ट्याची माहिती पहावी.

'खानपान' किस्से!

ताजमहाल,बॉलिवूड आणि भारतीय जेवण यांचे फिरंगी मंडळींना विशेष आकर्षण आहे असे जाणवले.भारतीय दुकानात आणि उपाहारगृहात दिसणारी फिरंगी गर्दी पाहिली की हे आणखी प्रकर्षाने जाणवते.आमच्या काही सहकाऱ्यांचे आणि मित्रांचे खानपान किस्से सांगण्याचा मोह आवरत नाही.
इथे पंजाबी (सीमेच्या अलिकडचे आणि पलिकडचे) दुकाने आणि उपाहारगृहे बरीच आहेत,त्यामुळे लस्सी,समोसा,जिलबी इथे लोकप्रिय झालेली आहे.याच बरोबर बटाटेवडे आणि भजीप्रेमी झालेत आमचे ख्रिश्चन आणि सुझाना.त्यांना मी वडे आणि समोसे शिकवणार आणि 'तिरामिसु' ख्रिस मला शिकवणार असा आमचा भविष्यातला बेत आहे.
नील्स मुल्लर हा माणूस गेले ५,६ महिने 'नान' करण्याचे प्रयोग घरी करतो आहे,(त्याला सांगितलं,बाबा रे हे मला पण नाही येत करता अजून!) त्याच्या मेजाच्या खणात वेगवेगळ्या लोणच्यांच्या बाटल्या असतात.(लखूभाई पाठक झिंदाबाद!)आणि भारतातून येताना माझ्यासाठी 'रेसिपी बुक्स' आणा असं त्याचं सांगणं असतं.
आमची एक फ्रेंच मैत्रिण आहे पण ती राहते इंग्लंडात! तिलाही भारतीय जेवण खूप आवडतं.

'माणूस....' मला का आवडली?


जी. ए. कुलकर्णी यांची 'माणूस नावाचा बेटा' ही कथा 'मनोगत' वर उतरवून काढताना मला खूप आनंद मिळाला. या निमित्ताने हीच कथा मला का लिहावीशी वाटली या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा हा प्रयत्न:


जी.एं. चे लेखन इतके बहुस्पर्शी आणि विपुल आहे की ते सगळे वाचून पचवणे हेही तसे अवघडच. त्यात सरस निरस करणे तर जवळजवळ अशक्यप्रायच. तद्दन टाकाऊ किंवा हिणकस असे जी ए लिखाण जवळजवळ नाहीच. मग 'विदूषक', 'दूत', 'कसाब', 'अंजन' अशा कितीतरी एकाहून एक कथा असताना 'माणूस...' मला अधिक आवडली याचे पहिले कारण म्हणजे मला ती बरीचशी आत्मचरित्रात्मक वाटते. एखाद्या लेखकाच्या लिखाणावर प्रेम करणारा वाचक नकळत एक व्यक्ती म्हणून त्या लेखकातही गुंतत जातोच. जी.एं. चे व्यक्तिमत्व तर गूढ व त्यामुळे उत्सुकता अधिक चाळवणारे. स्वतःच्या आयुष्याला असे कडीकुलुपात बंदिस्त ठेवणाऱ्या जी.एं. नी एका बेसावध क्षणी एका झुळुकीसरशी आपल्या आयुष्यावरचा जाड पडदा किंचित बाजूला होऊ दिला आणि वाचकाला आपल्या खाजगी आयुष्यात थोडेसे डोकावू दिले. या कथेतील दत्तूसाठी जी.एं. ना दुसरीकडे कुठे पहावे लागले नसावेच.

देवाचे खाते

"देवाचे वचन" या मथळ्याखाली मनोगतावर एक एका वाक्याचा लेख प्रसिद्ध झाला होता. अनेक वाक्ये असलेल्या कांही प्रतिक्रिया त्बावर आल्या होत्या. कांही लोकांनी हे कुठल्या देवाचे वचन आहे याची चौकशी केली होती तर कांहीनी याबाबत माहिती दिली होती. मुळात देव आहे की नाही, असे कोणी म्हणते किंवा म्हणत नाही, देवाला बोलायला येते किंवा नाही वगैरे मुद्दे मांडणारे कांही प्रतिसाद होते. त्यातील कांही सरळ सोपे होते, कांहीमध्ये उपरोध, उपहास, विपर्यास वगैरे अलंकारांचा प्रयोग केला होता. त्यामधील एका प्रतिसादात केलेला "देवाचे खाते" हा शब्दप्रयोग मला आवडला व त्याबद्दल थोडेसे लिहावेसे वाटले.

विमानाचे उड्डाण - भाग ३ (वेग)

विमान म्हंटल्यावर त्याच्या आकाशांत उडण्याच्या पाठोपाठ दुसरा विचार मनात येतो तो त्याचा जलद वेग. विमानाचा प्रवास भरपूर महागडा असला तरी तो झपाट्याने वाढत आहे, पूर्वी फक्त श्रीमंतांची चैन समजला जाणारा विमान प्रवास आता मध्यमवर्गीय लोक वाढत्या प्रमाणात करू लागले आहेत, हवाईदलाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे या सगळ्यांचे मुख्य कारण विमानांची जलद गति व त्यामुळे होत असलेली अमूल्य वेळेची बचत. गेल्या शंभर वर्षात हा वेग कसा वाढत जाऊन एका पातळीवर स्थिरावला हे या भागांत पाहू.

जसा होता (आणि अनुभवला )तशा भारतावर प्रेम केलेला महामानव

भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या बाबासाहेब आंबेडकरांचा आज (डिसेंबर ६, २००६) पन्नासावा महानिर्वाण दिन. त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी दुसरा एक चर्चेचा धागा चालू आहे. येथे मात्र मी त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या बद्दल वाचलेल्या आणि ऐकलेल्या काही ऐतिहासिक गोष्टी संकलीत करत आहे. यात बाकीचे संदर्भ आठवणीत नसले तरी एक संदर्भ हा श्री. अविनाश धर्माधिकारी यांच्या "आपण त्यांच्या समान व्हावे " या व्याख्यान मालेतील बाबासाहेबांच्यावरील व्याख्यान्याचा आहे. आपण वाचून झाल्यावर जर अजून काही आठवत असेल तर यात अवश्य लिहा.

बेला कांसा

आम्ही राहतो त्या कोपऱ्यावरच एक छोटेसे कौलारू घर आहे. फरसबंद अंगणात कडेने मेपल्स लावले आहेत आणि त्यांच्या सावलीत उन्हाळ्यात टेबलखुर्च्या मांडलेल्या असतात आणि रंगीत छत्र्या त्यावर सावली धरत असतात. हिवाळ्यात मात्र टेबलेखुर्च्या आणि छत्र्या गुंडाळून ठेवलेल्या दिसतात.बाहेरची 'बेला कांसा' ही पाटी आणि त्या अंगणातल्या खुर्च्या आणि तिथे खातपीत बसलेली माणसे  यावरून समजते की ते कोणाचे राहण्याचे घर नाही तर उपाहारगृह आहे.