या शब्दांचा उगम कुठला?

स्पॅनिश आणि इतरही युरोपिअन भाषांचे मराठीतील शब्दांशी साधर्म्य दाखवणारा मनोगतावरील लेख व त्यावरील प्रतिसाद नुकताच वाचले.आपण लेखी आणि बोली मराठीत अनेकदा वापरतो असे काही शब्द नेमके कोठून निर्माण झाले आहेत? असा मला पडलेला प्रश्न येथे मांडत आहे.उदाहरणार्थ-निगडीत की निगडित(संबंधित या अर्थाने),दळभद्री,रटाळ,कंटाळा .

मुंबई विद्यापीठ आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी

मुंबई विद्यापीठ आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी



मुंबई विद्यापीठ हे १५० वे वर्ष साजरे करते आहे. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख मी मुंबई विद्यापीठाला व तेथे शिकणाऱ्या असंख्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अर्पण करतो.
जर तुम्हाला वाटत असेल की इंजिनिअरिंग चे विद्यार्थी साहित्यामध्ये कमकुवत असतील तर तो तुमचा निव्वळ गैरसमज आहे. पुढील शायरी वाचा, तुमचा हा गैरसमज नक्कीच दूर होईल...............

वो बाप हि क्या जिसकी बेटी नही
वो इंजिनिअर हि क्या जिसकी केटी नही.
एक बार में पास हुआ तो क्या किया,
बिना फेल हुये जिया तो क्या जिया
इंजिनिअर कॉलेजमें ईतने साल मरते है,
कभी कभी तो बाप और बेटे एक ही क्लास में पढते है.

वरील ओळी काही जणांना अजब वाटतील, पण ह्या आणि अशा कित्येक ओळी मुंबई विश्वविद्यालयाच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या जीवनात काही सुखाचे क्षण निर्माण करतात. प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सेमिस्टरला नापास होण्याची प्रथा या वर्षी देखिल ६५% हून अधिक विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. येथे मी विद्यार्थ्यांकडे भेदभाव न करता सुचीत करू इच्छितो की इंजिनिअरिंग चे विद्यार्थी हे बारावीला सरासरी ८०% गुण ( अपवाद फक्त बडे बाप के बेटे जे प्रवेश बाप की मेहनत की कमाई वर घेतात व नापास होऊन कॉलेजमधून बाहेर पडतात.) मिळवून प्रवेश मिळवतात. तरीही पास होणं अभावानेच आढळते. मग हे इंजिनिअरिंग आहे तरी काय. विद्यार्थी नापास का होतात? विद्यार्थी अभ्यास करत नाहीत हा मुद्दा मान्य न करण्यासारखा आहे, कारण जो विद्यार्थी बारावीला ८०% ते ९०% मार्क्स काढतो त्याला अभ्यास कधी व कसा करावा हे सांगण्याची गरज मला तरी नाही वाटत. मग दोष कोणाला द्यावा? मुंबई विश्वविद्यालयाच्या माजी इंजिनिअरिंग विद्यार्थी असल्या कारणाने मला हा लेख लिहावासा वाटतो.

विश्वविद्यालय :
१. विद्यार्थ्यांचे वर्ष हे जून महिन्यात सुरू व्हावे हि अपेक्षा असते, पण १५ ऑगस्टच्या अगोदर कॉलेजकडे कुत्रं देखिल फिरकत नाही. कॉलेज दरवर्षी १ ते २ महीने उशिरा सुरू होते, कारण लेट ऍडमिशन्स, कोर्टाची स्थगिती, मेडिकल एन्ट्रन्स आणि असेच बरेच काही. ऑगस्टमध्ये कॉलेज सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांकडून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या सत्रासाठी परीक्षेला बसण्याची अपेक्षा केली जाते. फक्त दोन महिन्यांनंतर परीक्षेला बसण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून पुढील बाबींची पूर्तता परीक्षेपूर्वी करण्यास सांगण्यात येते.
अ. कमीतकमी पाच विषयाच्या प्रात्यक्षिक व त्याचे जरनल (त्या विषयाच्या टीचर-इन-चार्ज कडून सर्टिफाय केलेल्या असाव्यात) पूर्णं लिहून सबमिट करायचे असते. या सोहळ्याला सबमिशन असे नाव दिले गेले आहे. खरोखरच ते एखाद्या मिशन पेक्षा कमी नसते.
ब. प्रत्येक विषयाच्या कमीत-कमी तीन असाइनमेन्टस् त्या सुद्धा दिलेल्या वेळेत पूर्णं करून. असाइनमेन्टस् म्हणजे अश्या प्रश्नांचा संच जो विद्यार्थ्यांकडून अ-४ च्या कागदावर उत्तर लिहून पूर्णं केला जातो. प्रश्नाची संख्या हि प्रत्येक शिक्षकाच्या स्वभावावर अवलंबून असते, पण शक्यतो ती जास्तच ठेवली जाते. वर्गातले काही किताबी किडेच ते सोडवतात आणि इतर छपरी पोरे त्याची नक्कल उतरवतात. त्यामुळे इंजिनिअरिंग चे विद्यार्थी जर तुम्हाला ट्रेनमध्ये, बेस्टचा बसमध्ये अथवा रेस्टॉरंट मध्ये काही लिहिताना दिसले तर आश्चर्य करण्याचे काहीही कारण नाही. तुम्ही कधी ७:२७ च्या अंधेरी-बेलापूर लोकलने कधी प्रवास केला आहे का? जर नसेल तर एकदा करूनच पाहा. जे भेटेल त्याचा आधार घेऊन इंजिनिअरिंग चे विद्यार्थी त्यांचे असाइनमेन्टस् खरडताना दिसतील.
क. त्यानंतर क्रमांक लागतो तो म्हणजे क्रॅश कोर्स मालिका, काही स्टुडंट्स कोचिंग क्लासला जातात त्यांना  पूर्वतयारी करायला लागते ( सर्वच गोष्टींची ), कारण बहुतेक कॉलेज त्यांच्या अभ्यासक्रमात खूपच मागे असतात.
२. परीक्षेचे वेळापत्रक कधीच नियमित नसते. हे कदाचित ऐकण्यास नवीन नसावे, परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर देखिल पुढे ढकलल्या जातात! सर्वात वाईट दृश्य म्हणजे परीक्षा प्रिपोन (वेळेअगोदर होण्याचे) होण्याचे.
३. मुंबई विद्यापीठात कोणालाच एखाद्या विषयाचा एखाद्या शाखेसाठी असलेला निश्चित पाठ्यक्रम माहीत नसतो. विद्यार्थी अंधारात तीर मारल्यासारखे कोचिंग क्लासने दिलेल्या अथवा सीनिअर विद्यार्थ्याच्या नोटस् वापरत असतात.
४. विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी करायला क्वचितच वेळ मिळतो. आणि केटी परीक्षा व रेग्युलर परीक्षा यांमध्ये खूपच कमी टाइम-गॅप असतो, कधी कधी तो नसतोही.
५. दुसरा एक बकवास विभाग म्हणजे विद्यापीठाचा एक्झॅम सेल विभाग. तुमची परीक्षा नापास झाला आहात? आणि तुमचा पेपर पुनर्तपासणी साठी दिला आहात? तर १००% चान्सेस आहेत की तुमचा पुनर्तपासणी निकाल तुम्हाला केटी परीक्षेनंतरच मिळेल. आजच्या हायटेक जमान्यात देखील विद्यापीठाचे स्वतःचे पोस्टल डिपार्टमेंट आहे. येथे मुद्दा असा आहे की पुनर्तपासणीसाठी विद्यापीठ एका पेपरकरता विद्यार्थ्याकडून रु.५०० घेते, या किमतीमध्ये विद्यापीठ एक चांगल्या प्रतीची कुरिअर सर्व्हिस वापरू शकते.
६. विद्यापीठाचे नियम प्रत्येक सत्रासाठी बदलत असतात, त्यामुळे मोर्चा, रॅली अटेंड करणे हा सर्वांसाठी कॉमन टाईमपास आहे. (व्हि. जे. टी. आय. चे गेट माझ्या समोरच तोडले गेले होते, त्याची आठवण झाली.)
७. विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका या नेहमी चुकांनी भरून असतात. अशावेळेस विद्यार्थ्यांना मार्काची भरपाई हि केवळ त्याने चूक निदर्शनास आणून दिली, अथवा नीटशी ऍडजस्टमेंट करून उत्तर मिळवण्यास यश मिळवले तरच मिळते. तीन तासांत विद्यार्थ्याने प्रश्नांची उत्तरे द्यावयाची असतात का प्रश्नपत्रिका काढणाराच्या चुका शोधायच्या असतात?
८. जरी नियमानुसार विद्यापीठाने परीक्षा उरकल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करावयाचा असला तरी, एकही निकाल वेळेवर लागत नाही..... जवळपास सर्वच निकाल तीन महिन्यांनंतरच लागतात! इतर विद्यापीठाचे बी. ई. चे विद्यार्थी जॉब मिळवत असतात तेव्हा मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी निकालाची वाट बघत असतात.
१. थोड्या अथवा काहीच सुविधा नसलेल्या कॉलेजांना अभियांत्रिकी कॉलेज चालवण्याचे लायसेन्स दिले जाते, त्यांच्या कार्यपद्धतीवर कोणाचेच नियंत्रण नसते. ( बहुतेक कॉलेजेस हे राजकारण्यांच्या मालकीचे असतात ज्यांच्यासाठी हे कॉलेज म्हणजे पैशाची झाड असतात ).
२. अभ्यासक्रम हा नियमितपणे कधीच रिव्यु केला जात नाही. विद्यार्थी त्यांच्या सीनिअर्सना महत्वाचा वाटलेला अभ्यासक्रम वापरत असतात जो कधी कधी अनुपयोगी ठरतो.
३. उत्तरपत्रिका ह्या अनक्वालिफाईड प्रोफेसरकडून तपासल्या जातात - बऱ्याचदा त्या विषयाचा त्याला गंधही नसतो! त्यामुळे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका याचा संबंध तुमच्या मतांनुसार कधीच लागत नाही.
प्रोफेसर:-
हा प्राणी मुख्यत्वे करून नुकतीच इंजिनिअरिंग ची डिग्री मिळवलेला पण कोणत्याही कंपनीत नोकरी न मिळवू शकलेला असतो. काहीजण त्यांमध्येच समाधान मिळवून दिवस ढकलतात. जवळपास सर्वच कॉलेजचे प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना ओझे देण्यात मोठा आनंद मानतात. त्यांच्या हातात २५ गुण असतात. ( जे विद्यार्थ्यांना त्यांच्या टर्मवर्क साठी द्यायचे असतात असे गृहित धरले जाते. )आणि विश्वास ठेवा, जर हे २५ गुण प्राध्यापकाकडून देण्याऐवजी घेतले गेले तर एकही विद्यार्थी हूं का चू करत नाही जसे काही ते मार्क्स त्याच्यासाठी नसतातच मुळी.
पालक :-
पालकांनी त्यांच्या पाल्याच्या परफॉर्मन्स बद्दल नेहमीच धीर धरला पाहिजे........... खासकरून मुंबई विद्यापीठाबाबतीत तरी. विद्यार्थ्याची नेहमीच चूक असते असं नाही त्यामध्ये घरातून त्यांच्या दु:खात भर टाकली जाते. पालकांना समजायला हवेय की केटी हा मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या जीवनातला महत्वाचा भाग आहे,...... जरी त्याची आवड असो वा नसो.
महत्वाची सूचना:-
इतर विद्यापीठ क्लास देताना फक्त शेवटच्या वर्षाचे गुण ( म्हणजे ७ व ८ वे सत्र ) विचारात घेतात. मुंबई विश्वविद्यालय सत्र क्र. ५, ६, ७ आणि ८ चे ऍव्हरेज गुण पकडतात !!! (मला ऐकिवात आले आहे की हि पद्धत आता बदलली आहे... कमनशीब आमचे.)
हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या खराब निकालाबद्दल त्यांना दोष देणे हे चुकीचे ठरते.
........प्रसिक

मराठी शब्द सुचवा स्पर्धा.

माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून मराठी भाषेच्या संबंधी एक उपक्रम सुरू करावा असे आहे. जेणेकरून आजच्या स्पर्धामय वातावरणाचा मराठीसाठी योग्य आणि अचूक वापर करता येईल.

मराठी बोलीभाषेत अकारणच अनेक परकीय शब्द धुडगूस घालत असतात. तेच तेच शब्द कानावर पडत असल्यामुळे नकळतच असे शब्द मूळ भाषेतील शब्दांना जवळपास बोलीभाषेतून हाकलूनच लावतात.

यासाठी जास्त तार्किक चर्चा न करता, आपण दैनंदिन वापरातील काही वाक्ये एखाद्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावीत ( एखाद्या सदराखाली) आणि वाचकांना त्या शब्दासाठी त्यांना वाटणारा समर्पक शब्द सुचवावा अश्या प्रकारची स्पर्धा घ्यावी. दुसऱ्या दिवशी / किंवा आठवड्यातून  आलेल्या पत्रातून विजेत्या स्पर्धकाचा उल्लेख करावा आणि आलेल्या मराठी भाषेतील शब्दांचा वापर करून परत तीच वाक्ये त्याच वर्तमानपत्रात छापावीत.

या स्पर्धांमुळे सर्वसामान्यांना मराठीमधील शब्द हुडकत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि नकळतच मराठी भाषेचे होणारे प्रदूषण कमी होण्यासाठी वावही मिळेल.

याबाबत मी जो काही विचार केला आहे तो असा,

१. प्रत्येक दिवशी अशी १० वाक्ये चांगल्या प्रख्यात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी.
२. त्याला वाचकांनी प्रतिसाद पोस्टकार्डा मार्फत अथवा पत्राद्वारे कळवावी.
३. त्यातील उत्तम प्रतिसादास काही पारितोषिक पेश्यांद्वारे, पुस्तकाच्या द्वारे अथवा मराठीतील नाटकाच्या, चित्रपटाच्या ध्वनिफीत देऊन करावा.
४. १० वाक्यात सोपी शब्द असलेली, अवघड शब्द आणि कोठे कोठे मराठीत नवीन शब्द शोधण्यास वाव मिळेल अशी वाक्ये असावीत. जेणे करून स्पर्धकांना मौज वाटेल आणि मराठीत शब्दांची वानवा नाही हे कळत नकळत लक्षातही येईल.
५. ही स्पर्धा (किमान) १०० दिवस चालावी.
६. या स्पर्धेत मध्ये केवळ इंग्रजी शब्दांनाच नव्हे तर, फारसी आणि इतर परकीय शब्दांना देखील प्रतिशब्द मिळावा अशी अपेक्षा आहे. उदा. अर्ज, परवानगी, दोस्त, माफी, तक्रार इत्यादी इत्यादी.
७. मराठीतील अनावश्यक संस्कृतप्रचूर शब्दांना देखील सोप्या आणि सहज शब्दांचा पर्याय मिळाव.


आता मला मनोगतवर कार्यरत असलेल्या मित्र आणि मैत्रिणींकडून खालील अपेक्षा आहे.

१. स्पर्धा अजून परिणामकारक होण्यासाठी काही सूचना आहेत काय?
२. आपणही अश्या वाक्यांना माझ्या पर्यंत व्यक्तिगत निरोपाद्वारे अथवा मनोगतावर प्रतिसादांतर्गत पाठवू शकाल. जेणेकरून अनायास माझ्याकडे स्पर्धेसाठी वाक्यांचे संकलन होत जाईल आणि मला माझा तितका सहभाग कमी ठेवता येईल.
३. मराठीभाषेच्या संवर्धनासाठी अश्याच काही योजना असतील तर मला कळवू शकता.
४. पुण्यातील मराठी प्रेमी या उपक्रमात सक्रिय भाग घेणार असतील तर त्यांचेही स्वागतच आहे.
५. स्पर्धेसाठी चांगले शीर्षक मिळाले तर अजून बरे होईल.


आपला,

द्वारकानाथ कलंत्री. 

काही मराठमोळे विनोद.

'' बाई बाई बाई, काय या आजकालच्या पोरी,'' गजराबाई पार्वतीकाकूंना सांगत होत्या, ''नवऱ्याबद्दल काय वाट्टेल ते बोलतात. चारचौघांत त्याची निंदानालस्ती करतात. आता आमचे हे कसे आहेत तुम्ही पाहताच आहात. मी म्हणून हे बावळट, मेंगळट ध्यान इतकी वर्षं सांभाळलं. त्यांचा सगळा मूर्खपणा आळशीपणा सावरून घेतला, पण इतक्या वर्षांत त्यांच्याबद्दल एकतरी उणा शब्द ऐकलायत का माझ्या तोंडून?!!!''

पिकलेल्या केळ्यांची भाजी

वाढणी
२,३ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

तेजस्विनी-४

    नानासाहेब पाटलांनी कपाळावर हात मारून घेतला. नको त्या वेळेस सुहास पाटलाने लचांड उभे केले होते. पक्षश्रेष्ठी कुठल्याही परिस्थितीत झाला प्रकार खपवून घेणार नाहीत ही गोष्ट ते जाणून होते. त्यांनी तातडीने जळगांवला फोन लावला. रावसाहेबच त्यांना ह्या प्रकारणातून तारतील ही त्यांची खात्री होती.
रावसाहेब गाजरे त्यांचे सख्खे मामा. बहिणीच्या मुलांवर, नाना, दिघू, प्रदीप त्यांचे अतोनात प्रेम होते. दिघू म्हणजे नानांच्या खालचा भाऊ संन्यास घेऊन परागंदा झाला. प्रदीप दुबईला गेला तो परतून आलाच नाही. तेथेच त्याने कसलातरी व्यवसाय सुरू केला. एका केरळी ख्रिस्ती मुलीशी लग्न केल्याचे निमित्त करून नानांनी त्याच्याशी संबंध तोडले व त्याला वाळीत टाकले.
आपोआपच वडिलोपार्जित सगळी मिळकत नानांची झाली. 
राजाभाऊ जाधवांच्या वडिलांची आई रावसाहेबांची दुसरी बहीण. राजाभाऊंच्या आजोबांशी तिचे लग्न झाल्यावर जाधव कुटुंबीयाचे जमिनींच्या वादावरून गाजरेंशी वाजले तेव्हा पासून गाजरे कुटुंबीयांनी जाधव कुटुंबाशी उभे वैर धरले. नानासाहेबांचे वडील सज्जन म्हणून त्यांनी वैर जरी नाही धरले तरी फक्त लग्न किंवा मर्तिक प्रसंगीच जाण्या इतके संबंध ठेवले.
रावसाहेब गाजरे "विकास आघाडी" चे मोठे प्रस्थ होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पक्षाचा जिल्ह्यातला आधारस्थंभ रावसाहेबांच्या वाड-वडिलांपासून चालत होता. सध्या वयोमानामुळे सक्रिय नसले तरी जिल्ह्यात पक्षाचे सर्वेसर्वा तेच होते. त्यांचा मुलगा, राजेंद्र्कडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद होते.
सुहासने अट्रावल वर केलेल्या हल्ल्याची तक्रार करण्यास सुरुवातीला अट्रावलकर तयार नव्हते. सरपंचांनी अजिजीने अट्रावलकरांना भानगडींपासून दूर राहण्याचे आवाहन केले परंतू ते ठरले नानासाहेब पाटलांच्या गोटातले..... चंद्या किंवा गण्या सारख्या तरुण रक्तात दादागिरी व अन्याया विरुद्ध दाद मागण्याची वृत्ती असल्यानेच फौजदार बोरसेंनी सुहास पटलाविरुद्ध प्रथमच लेखी तक्रार नोंदवली. तक्रारीत गुंडांच्या साहाय्याने गावावर सशस्त्र हल्ला केल्याचे नमूद करण्यात आल्याने तक्रार गंभीर स्वरूपाची होती.   
प्रथमच नानासाहेब पाटलांच्या अन्याया विरुद्ध पोलिसात तक्रार करायला कोणी धजावले होते.
पाटलांच्या दैवचक्राच्या उतरंडीची सुरुवात झालेली होती.
**************************************
महत्त्वाच्या विषयावरील चर्चेस, दूध महासंघाच्या कार्यालयातील चौथ्या मजल्यावरील बैठक कक्षांत, मंडळींना पाचारण करण्यात आलेले होते.
वासूभाऊ, विचारे, शेळके मास्तर, फिरके, देसाई, भराडे बाई, सुरेखा ताई, राजाभाऊ तसेच "जन जागृती" पक्षाच्या शाखांचे १९ पदाधिकारी, स्वत: संतोषभाऊ व त्यांचे स्वीय सहाय्यक, दूध महासंघाचा एक मराठी लघुलेखक व कारकून मिळून ३२ सदस्य बैठकीला उपस्थित होते.

कॉन्फेस्ट - इच्युका - मोआमा चा कुंभ मेळा?


इच्युका - मोआमा चा कुंभ मेळा?


कॉन्फेस्ट


(मराठी मध्ये पहील्यांदाच बहुदा!)

आणि मग एक धुळीचा रस्ता मुख्य रस्त्या पासुन आत वळला होता. आता पर्यंत आम्ही गाडीत बसुन तसे कंटाळ्लोच होतो. शिवाय चुकलो आहोत की बरोबर हे विचारयला रस्त्यावर कोणीच नाही. अनु पण कंटाळून गेली होती. छोटी गार्गी बराच काळ जागी होती तिने झोपही काढ्ली पण आता ती पण कुर्कूरत होती. आम्ही इच्युका - मोआमा या जोड गावा जवळ असलेल्या 'कॉनफेस्ट' या उत्सवा साठी चाललो होतो. आणी जवळ म्हणजे १०० किमी! इकडे गाव १०० किमी रहिलेले आणि पुढ्चे गाव फ़क्त २५०किमी. त्यात संध्याकाळ व्हायला लागलेली. तेव्ढ्यात मला हा धुळी चा रस्ता दिसला. समोर खूपसे कपडे पताका लावल्या सारखे लावले होते. त्यामुळे रस्ता पट्कन दिसला. आत वळल्या वर कळले की अजुन पण बरेच लोक आहेत. त्या कपड्यांखाली मोठ्या अक्शरात लिहीले होते 'Welcome to Confest - Cloths optional' आणि आम्ही एकमेकांच्या कडे पहिलं आणि त्या कार्स च्या रांगेत सामील झालो. मुख्य रस्त्या पासून उत्सवा ची जागा - कँम्प साइट, चांगली ५-६ किमी दूर होती. पण सगळे लोक मजेत आणि हसत खेळत दिसत होते. टॉम या माझ्या मित्राच्या सांगण्या वरुन आम्ही येथे आलो होतो. तो तर आधीच आला होता. आणि आमच्या साठी तंबू पण ठोकून ठेवणार होता. पण या संध्याकाळ च्या वातावरणात त्याला कुठे शोधणार आम्ही? त्यात गार्गी फक्त सहा महिन्यांची! मला त्या रांगेत असतांना जरा काळजीच वाटायला लागली. गेट वर पोहोचलो. स्वयंसेवकाने एकशेवीस डॉलर्स ची पावती दिली आणि आम्ही पुढे निघालो.
तोवर चांगलाच अंधार पडला. गाडी चे हेड लाईट्स लावुन चालवण्या इतका.

दुपारी इच्युका - मोआमा ला खाल्लेला पिझा पचून कावळे कोकलायला लागले होते. उत्सवाच्या ठिकाणी, लोकांनी, जागा शोधुन तंबू लावलेही होते.

तेवढ्यात जोरदार पावसाला सुरवात झाली! इतका जोरात की मला त्या कच्च्या र्स्त्यावरचे काहीच दिसेना! मग अंदाजाने गाडी पुढे नेत राहीलो. चाकं घसरत होते. प्रत्येक वळणाला गाडी वेडीवाकडी होत होती. मग झाडी खूपच गर्द झाली. तंबू पण जवळ - जवळ यायला लागले. पाउस जरा कमी झाला. लोक पण दिसायला लागले. मी काच खाली केली आणि एका माणसाला हात केला. तो जवळ आला, त्याला विचारले की
'आर देयर मोअर टेंट्स फ़र्दर?'
ऒ येस माइट देयर आर मोर... आर यु न्यु?

मी म्हणालो 'येस वुइ आर न्यु... इट इज अवर फर्स्ट टाइम'
तो म्हणाला 'ऒ वेलकम वेलकम टु कॉनफेस्ट...'
आणि चालायला लागला...

मी हळूहळू गाडी परत सूरु करुन टॉम ला शोधायला लागलो.

कां विमान उडते अधांतरी?

वर्ष दीड वर्षाच्या लहानग्याला खेळवतांना "इथं इथं बैस रे काऊ" म्हणत "भुर्रर्र उडून जा" म्हंटले की ते खिदळायला लागते. भुर्रर्र उडणारी चिमणी पाखरे त्याला खूप आवडतात. उगवत्या सूर्यबिंबाकडे झेप घेणारा बाल हनुमान, नारायण नारायण म्हणत वायुमार्गाने  स्वैर संचार करणारे नारदमुनी अशी पुराणातील पात्रे आणि असेच मनोगतीने हवेत उड्डाण करणारे सुपरमॅन, हीमॅन वगैरे कारटूनमधील कथानायक त्याला किशोरवयात भुरळ पाडतात. मला सुद्धा हवेत उडणाऱ्या गोष्टींचे लहानपणी प्रचंड आकर्षण होते. बारा तेरा वर्षाचा असतांना मुंबईला येण्याची पहिली संधी मिळाली तेंव्हा अगदी हट्ट धरून मी आधी सांताक्रूझचे विमानतळ पाहिले. राणीच्या बागेचे तसे आकर्षण होते, पण हत्ती, उंट, वाघ, सिंह वगैरे प्राणी मी सर्कशीत तरी पाहिलेले होते. मात्र जमीनीपर्यंत येऊन पोचणारा घूं घूं असा आवाज करीत आभाळातून हळू हळू सरकणारा विमानाचा एक बारीक ठिपकाच तेवढा क्वचित कधीतरी आमच्या लहान गांवातून दिसायचा. त्यामुळे त्याबद्दल वाटणारे गूढ अधिकच गडद होत असे.

मराठी इंग्रजीपेक्षा क्लिष्ट?

भाषेचा उपयोग कृति किंवा स्थितीचे वर्णन करण्यासाठी होत असल्यामुळे व हे कार्य मुख्यत्वेकरून क्रियापद करीत असल्यामुळे वाक्यरचनेंत क्रियापद हा सर्वांत महत्त्वाचा शब्द असतो. त्यामुळे कुठल्याही व्याकरणाच्या पुस्तकांत अर्धीअधिक पाने क्रियापदांची रूपे व इतर धातुसाधिते यांवर खर्ची पडलेली असतात.

जिवनामधील महत्त्वाचे घटक

 आपल्या रोजच्याच वापरातील काही गोष्टींनी आपल्या जीवनावर ताबा मिळवलेला असतो पण आपण एकदम गाफील राहतो व एक दिवशी वापरातील एखाद्या गोष्टीने दगा दिला तर काय मनस्ताप होतो ते आपल्यालाच माहीत मी खाली काही माझ्या रोजच्या वापरातील महत्वाच्या घटकांची माहिती लिहिली आहे व मी विचार केला अरे खरंच ह्यातील एखाद्या गोष्टीने दगा दिलातर माझा संपूर्ण दिवसच अस्ताव्यस्त होतो... असेच काही घटक तुमच्या जीवनामध्ये देखील असतील त्याची माहिती द्या.