डा-विंची कोड आणि भारतीय धर्मनिरपेक्षता!!!

खूप आले खूप गेले ... धर्म हो!! भारताला धर्म ही काही अपूर्वाई नव्हे. आम्ही "सर्वधर्मसमभाव" ही संज्ञा फार वेगळ्या अर्थाने वापरली. इंग्रजीत सांगायचे झालेच तर "loosely". DaVinci Code हा जगभर चालला, भारतात त्याच्यावर बंदी घाला म्हणे!! का? अरॆ युरोपात चालला. अमेरीकेत पळतोय अजून. मग भारतातल्या ख्रिस्ती समाजाला काय त्रास आहे? मी मानतो की, तो चित्रपट कॅथॉलिक चर्चच्या कल्पनेला धक्का पोहचवणारा आहे. पण तो ख्रिस्ती धर्माच्या विरोधात नाही. मग कसला हा विरोध?

सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे डॅन ब्राऊनची ही कथा निव्वळ कादंबरी आहे" हे सर्वांना मान्य असताना कसला न्याय मागता? तीन वर्षांनी जागे होऊन पुस्तकावर बंदी नकॊ तर, चित्रपटावर बंदी हवी असेल तर हे चूक आहे. बोला न्यायदेवता विजयी भवः।

अरे हे तर काहीच नाही, Jyllands-Posten ची महंमदावर व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली तेंव्हा भारत कुठॆही मागे नव्हता. आम्ही जगभर उठाव केला. मुसलमानी देशांनी करो अथवा न करो, आम्ही केला. मी त्या व्यंगचित्रांची प्रशंसा करत नाहीये.

हे तर जरा जास्त झाले की हिंदु मागे राहीले, बाबरी मशीद पाडताना त्यांनी स्वतःची मनमानी केलीच की. ते जर कमी असेल तर मुंबईत बाळ ठाकरेंचा फोटॊ लावा. आंधळॆ हिंदुत्व हे सगळ्यांना माहीतच आहे, जे राजकारणी लोकांनी देशाला शिकवले. हुसेनसाहेबांनी देवाची गलीच्छ चित्रॆ काढली त्यावेळी पण आम्ही संप केलाच होता ना?

मला फक्त इतकेच म्हणायचे की भारतात सर्व धर्मांना पुरेसा वाव आहे आणि त्याचा अनुयय करायला पुर्ण अधिकार आहे. कॊण कसा त्याचा वापर करतो, हा आपापला प्रष्ण आहे. एकंदरीत काय? सगळॆ धर्म अनुयायी मनमानी करण्यासाठी भारतात येतात. भारतीयत्व विसरून धर्माचं राजकारण करतात. त्यानंतर राजकारणात, करदायकांचा पॆसा स्वताःच्या खीशात भरतात. परदेशी दौरे करतात. प्रत्येक पश्चिमी देश भारताचा नकाशा काश्मिर सोडुन दाखवतो, सगळ्या परकीय विमान कंपन्या काश्मिर पाकीस्तानात दाखवतात. मला सांगा एका तरी भारतीय नागरीकाने सर्वोच्च न्यायालयात फर्याद दाखल केली का? त्या मध्ये कोणाचाच फायदा नाही. मग का ही उठाठेव करायची?

मुसलमानांना एकापेक्षा जास्त लग्ने करण्याची मुभा आहे, तसे हिंदुंना आरक्षण आहे. ख्रिस्ती लोक भारतात beef खाऊ शकतात. आपण सर्वधर्मनिरपेक्ष की सर्वधर्मिय? सगळ्यांना आपापल्या प्रमाणे वागु दिले आणि त्यासाठी कायदे बनवत राहीलो तर समानता येणार कशी?

पावसाची नक्षत्रे आणि वाहन

पावसाची नक्षत्रे आणि वाहन


दिनदर्शिकेवर जून ते ऑक्टोबर महिने पाहिल्यास काही तारखांना सूर्याचा नक्षत्र प्रवेश आणि त्याच्या वाहनाचे नाव लिहिलेले आढळते. उदा. ८ जून २००६ ला सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश - वाहन कोल्हा असे वाचायला मिळेल. पावसाची सहसा ९ नक्षत्रे मानली जातात. त्यावरूनच २७-९=० ही कूटप्रश्नाची कथा प्रसिद्ध आहे. पण दिनदर्शिकेत मृग ते स्वाती अशी एकूण ११ नक्षत्रे दिली जातात. मान्सूनपूर्व पावसाचे रोहिणी हे देखील नक्षत्र धरले जाते. सूर्याच्या भासमान भ्रमणमार्गात वर्षातील ठराविक दिवशी एक एक करीत २७ नक्षत्रे (आणि अर्थात १२ राशी) सूर्यापलिकडील आकाशात जात राहतात. हाच सूर्याचा नक्षत्र प्रवेश.
वाहन काढण्याची पद्धत: सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करेल त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्रनक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजावी आणि येणाऱ्या संख्येस ९ ने भागावे. जी बाकी उरेल त्यानुसार प्रत्येक अंकास एक एक प्राणी वाहन म्हणून दिला आहे.
_______________________________________________________ 
बाकी            वाहन            बाकी        वाहन
_______________________________________________________
०                हत्ती               ५          मोर
१                घोडा              ६          उंदीर 
२                कोल्हा            ७          म्हैस
३                बेडुक             ८          गाढव
४                मेंढा
_______________________________________________________

मनोगताची उजवी बाजू गायब!

मला आज मनोगतावर प्रवेश करताना खूप अडथळे येतायत. मनोगताची उजवी बाजूच गायब झाली आहे. पूर्ण उजवी पट्टी रिकामी आहे. आधी मला वाटलं माझ्या संगणकाचाच काहीतरी घोळ आहे पण माझ्या बहिणीला पण हाच अडथळा येतोय असं कळलं.


सगळ्यांनाच आज मनोगत अर्धवट दिसतय का?

चैत्र

जी.एं. च्या कथा फार दीर्घ असतात हा त्यांच्यावर नेहमी घेण्यात येणारा आक्षेप आहे. हे बरेचसे खरेही आहे. 'काजळमाया' या त्यांच्या कथासंग्रहातील कथाच बघा. एकेके कथा पंचवीस - तीस पानांची.  पण हे म्हणजे तीन मिनिटांची  (रिमीक्स) तबकडी ऐकणाऱ्याने 'तो तुमचा बडा ख्याल म्हणजे फारच मोठा असतो बुवा' अशी तक्रार करण्यासारखे आहे. पण जी.एं. नी काही अगदी छोट्या,तरीही विलक्षण परिणामकारक कथा लिहील्या आहेत. 'कुसुमगुंजा' हा एक अशा कथांचा संग्रह. जी.एं. च्या बऱ्याच कथा लघुकथेच्या निरगाठ, उकल अशा तंत्राने जाताना दिसतात. आणि काहीकाही कथांच्या शेवटात ते धक्कातंत्राचा इतका प्रभावी वापर करतात की वाचक शेवटच्या वाक्यानंतर हेलपाटत जातो.
'चैत्र' ही मला आवडलेली अशीच एक कथा. कथानायक परत एक छोटासा मुलगा. लहानशा खेड्यात रहाणारे त्याचे कुटुंब. घरी आई आणि बाबा. आर्थिक परिस्थिती बेताचीच. या खेड्यातल्या ज्येष्ठ इनामदारीणबाई त्यांच्या वाड्यावर चैत्राचं हळदीकुंकू ठेवतात. सगळ्या गावातल्या सवाष्णींना आमंत्रण जाते. इनामदार बाईंची नवी सून तिच्या दृष्टीने हलक्यासलक्या या अशा बायकांना बोलवायला नाखूशच असते. हा छोटा मुलगा आणि त्याची आई पन्हं-कोशिंबीर घ्यायला उभे असताना चारचौघात ती सून त्यांना म्हणते "हे काय, मगाशी येऊन गेलात ना तुम्ही? पन्ह्यासाठी किती हावरटपणा करायचा बाई माणसानं?"
या मुलाची आई शांतपणे देवापुढचं हळदीकुंकू उचलते आणि मुलाच्या हाताला धरून घरी येते. ती फारसे बोलत काहीच नाही, पण तिचे मन अगदी विस्कटून गेलेले असते. दुसरे वर्ष येते. आई आपले सगळे दागिने, घरातले किडूकमिडूक काढून बाबांसमोर ठेवते. म्हणते "हे सगळं विकावं लागलं तरी चालेल, पण मला सगळ्या गावाला हळदीकुंकवाला बोलवायचं आहे".  त्याप्रमाणे तसे ती करतेही. इनामदार बाई आणि त्यांची सून दोघीही आलेल्या असतात. इनामदार बाई त्यांचा कापरा हात आईच्या पाठीवर ठेवतात "हे बघ, माझे आता फार दिवस राहिले नाहीत. माझ्यासाठी म्हणून काही काही मनात ठेवू नकोस". आई त्यांना समाधानाने वाकून नमस्कार करते.
त्याही पुढचा चैत्र येतो. इनामदार बाई स्वतः हळदीकुंकवाचं बोलावणं करायला येतात. त्यांची चाहूल लागताच आई न्हाणीघरात आंघोळीला जाते. "नक्की यायचं बरं का..." असं सांगून इनामदार बाई देवासमोर हळदीकुंकू ठेवून निघून जातात.
आई बाहेर येते. "बिचाऱ्या इतक्या प्रेमानं इथपर्यंत आल्या, म्हटलं मुद्दाम कशाला त्यांच्यासमोर यावं?" ती मुलाला जवळ घेऊन म्हणते." आणि आज ना उद्या त्यांना कळणारच.."

कायद्याच ज्ञान

                सर्वसामान्य नागरिक असल्यामुळे कायदा पाळला पाहिजे असे मला वाटते.आता त्यात कायद्याविषयी आस्था हे कारण आहे की कायदा न पाळल्यामुळे होणाऱ्या शिक्षेची किंवा त्यामुळे होणाऱ्या नामुष्कीची भीती हे आहे हे सांगणे अवघड आहे.याबाबतीत आमच्या बाबुरावांच तत्वज्ञान जरा वेगळ आहे.ते म्हणतात कायदा गाढव आहे हे तर खरच पण तो पाळणारा त्याहून गाढव आहे.आणि कधीकधी मला तसा अनुभव येतो खरा.
            आता हेच पहाना पूर्वी रेडिओ वापऱायला परवाना लागे,जणु रेडिओ एकादे महाभयानक शस्त्र आहे,आता शस्त्रेही कोणीही बिगर परवाना वापरतो ते अलाहिदा!तर त्या काळात ३१ जानेवारीच्या आत पोस्ट ऑफिससमोरच्या रांगेत तासभर उभा राहून परवान्यासाठी दिलेल्या खास पोस्टाच्या तपकिरी रंगाच्या त्या पुस्तकावर तसाच खास शिक्का आत बसलेल्या माणसाने पंधरा रुपये घेऊन मारून दिल्यावर जग जिंकल्याच्या आनंदात मी घरी येई तेव्हा बाबुराव कुत्सित्पणे हसत माझ्याकडे बघून म्हणत 'मिळवले का एकदाचे स्वर्गाचे राज्य?अरे वेड्या तू घरी रेडिओ ऐकतोस की नाही हे पहाण्यापेक्षा खूप महत्वाची कामे पडली आहेत सरकारला "मला मात्र एकाद्या दिवशी बाबुरावच्या घरावर छापा पडला आहे आणि पोलिस त्याचा रेडिओ जप्त करून बरोबर बाबुरावलाही पकडून नेत आहेत असे दृश्य दिसायचे आणि बाबुरावचे कसे होणार याची मलाच धास्ती वाटायची.एकाद्याच्या घरात अमली द्रव्याचा साठा असला तरी त्याच्याकडून तो हलवला गेल्याची वर्दी आल्याशिवाय त्याच्या घरावर छापा टाकत नाहीत हे आत्ता आत्ता कुठे मला कळायला लागले,पण त्याबाबतीत बाबुराव तेव्हापासूनच बिन्धास्त! शेवटी एक दिवस कसे काय शासनाला बाबुरावच बरोबर आहेत हे समजले आणि रेडिओ वापरायला परवान्याची गरज नाही असा फतवा काढून ते मोकळे झाले.बाबुराव तेव्हा विजयी मुद्रेने मला म्हणाले"बघ काय सांगत होतो की नाही तुला? ' 
          आयकराच्याही बाबतीत तेच!नोकरीत असताना तर काय तो पगारातूनच कटला जायचा,पण आता सेवानिवृत्तीनंतरही आयकर पडत नसूनही जूनजुलैमध्येच एकदाचा करपरतीचा सरल,कठीण जो काही तक्ता असेल तो भरून दिल्यानंतरच मला गाढ झोप लागायला लागते. बाबुरावला तर अशा फालतू गोष्टी करायला वेळच नसतो आणि धंद्यामुळे त्याच्यामते त्याला करपात्र उत्पन्नच नसते,कसेतरी पोट भागते इतकेच.त्याचे पोट बरेच मोठे आहे.पण तो म्हणतो "अरे वेड्या तो अमिताभ बच्चन,जया बच्चन यांच्यापेक्षा तू मला बडा समजतोस का? त्यांच्याकडे तर किती पैसा आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे,बर कधीतरी काळा पैसा सफेद करण्याची मोहिम काढतीलच आपले माननीय वित्तमंत्री तेव्हा भरू थोडाफार कर,उगीच आत्तापासूनच कशाला?"
             मी घर बांधायचा विचार सुरू केला आणि घराचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी महापालिकेकडे पाठवला आणि मंजुरी येण्याची वाट पहात बसलो तेवढ्यात बाबुरावाने काम सुरूही केले.मी अगदी आश्चर्यचकित होऊन त्याला विचारले,"अरे तुला महापालिकेकडून परवानगी आली?'तेव्हा त्यानेच उलट मला प्रश्न विचारला,"त्यासाठी तू किती पैसे भरलेस?"त्यावेळी साधारण बांधकामासाठी निरनिराळ्या बाबींची पूर्तता करण्यासाठी काही हजार रुपये भरावे लागत,तो आकडा सांगितल्यावर तो म्हणाला "मग तुला मिळाली का परवानगी? " मी  मान हलवली आणि म्हणालो नाही,त्यावर तो म्हणाला,"मग वाट पहा"आणि खरेच मी वाट पहात राहिलो आणि बाबुराव घर बांधून मोकळा झाला.
             शेवटी मी न राहवून एकदा बाबुरावला विचारले,'अरे प्रत्येक बाबतीत तू अडकतोस की काय असे मला वाटते पण तूच माझ्या पुढे सटकतोस अशी कुठली जादूची कांडी आहे तुझ्याकडे?"यावर बाबुरावने गंभीरपणे उत्तर दिले,'कायद्याच ज्ञान "यावर मी जरा चिडूनच म्हणालो,"अरे तूच तर म्हणत होतास ना,कायदा गाढव असतो.कायदा पाळणारा तर त्याहून गाढव असतो.""अरे शहाण्या,मी   कायद्याच नाही म्हणत मी म्हणतोय काय द्यायच,म्हणजे कुठलाही कायदा आपण मोडला तर कोणाला आणि काय द्यायच याच ज्ञान !आता हे बघ सरकार कायदे कशाला करते?""ते लोकानी पाळावे आणि कारभार सुरळीत चालावा म्हणून" मी सहजपणे उत्तर दिले."चूक साफ चूक!सरकार कायदे अशासाठी करते की ते तुम्ही मोडावेत.ते मोडले की तुम्हाला त्यातून सुटता यावे यासाठी परत वेगळे कायदे असतात,मला त्या कायद्याच ज्ञान आहे हीच माझी जादूची कांडी!कळले का?"मला बुचकळ्यात टाकून बाबुराव निघून गेला.           

फुटबॉल विश्वचषक ०६-भाग ४

जर्मनी विरूध्द पोलंड - अखेरचा क्षण!!






 संपूर्ण सामना भर जर्मनीचे अयशस्वी ऍटॅक आणि पोलंडचा गोलकीपर बोराक याचा उत्कृष्ट बचाव याने 'गोलप्रेमीं'साठी काहीसा निराशाजनक ठरलेला हा सामना शेवटच्या मिनीटाला रंग बदलतो, आणि जर्मनीचा बरूशिया गोल ठोकण्यात यशस्वी होतो. यजमान जर्मनीच्या या १-० अशा विजयामुळे स्टेडियम मधल्या जवळजवळ पन्नास हजारांहून अधिक प्रेक्षकांची निराशा एका क्षणात कुठल्या कुठे पळून जाते.
 

तरीही शेवटचा काही वेळ सोडल्यास या सामन्याबद्दलच्या अपेक्षा फोल ठरल्या.
फाऊल्स, अनेक अयशस्वी कॉर्नर्स, पाडापाडी, खेळाडू बदल यासगळ्या मध्ये दोन्ही संघांना चेंडू स्वतःकडे राखता आला नाही. एका क्षणाला चेंडू एका टोकाला तर दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या. 
            या सामन्यामुळे ग्रुप ए मध्ये जर्मनीचा सलग दुसरा विजय झाला आहे. जर्मनीचे दुसरी फेरी  (नॉक आउट राउंड) मधले स्थान निश्चित झाले नसले तरी पहिले स्थान राखता आले आहे.

फुटबॉल विश्वचषक ०६- भाग ३

                    ब्राझील क्रोएशिआ सामना -- एक प्रश्नचिन्ह
        कालच्या ब्राझील विरुध्द क्रोएशिआ सामन्यात ब्राझीलचा क्रोएशिआवर १-० असा विजय. पण सु (दु)र्दैवाने हा विजय म्हणावासा दणदणीत झाला नाही. उलट ब्राझील आणि अर्थातच रोनाल्डोच्या खेळाबद्दल या सामन्याने अनेक प्रश्न निर्माण केले. त्यामुळे या सामन्याबद्दल फुटबॉल प्रेमींच्या मनात मिश्र भावना आहेत. म्हणजे क्रोएशिआच्या खेळाचे कौतुक करावे की ब्राझीलचे स्थान डळमळीत होईल की काय याची काळजी करावी अशी स्थिती.
     
     या खेळात स्टार रोनाल्डो किंवा रोनाल्डीन्हो या दोघांकडून एकही गोल झाला नाही. अर्थातच त्यांचे काम 'कक्का'ने केले आणि मध्यंतराच्या थोडे आधी म्हणजे ४३ व्या मिनीटाला लांबून शॉट मारला तो क्रोएशिआच्या जाळ्यात थडकला आणि जगभरातल्या ब्राझील 'भक्तां'च्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
         

कर्ज - ३

मला बळेच पलंगावर बसवून घेत त्या म्हणाल्या,"निक्की, तू एका क्षणासाठीही तुझ्या आकाशला विभागून घ्यायला तयार झाली नाहीस.. मी तर अख्खी २५ वर्षं तुझ्यासोबत.."
"बस्स ताई बस्स..." मी संतापाने थरथरत ओरडले,"इतकंच जर प्रेम होतं तुमचं त्यांच्यावर तर लग्नच का नाही केलंत त्यांच्याशी?"
उत्तर मिळालं.