भाषिक विनोद

महाराष्टाच्या विविध भागात फार विविध प्रकारे मराठी भाषा बोलली जाते.
आपण ज्या भागातले आहोत त्यानुसार आपण खूप शब्द आणी वाक्ये सहज बोलून जातो
आणी त्यातूनच विनोद निर्मिती होते. अश्या या बहुरंगी आणी बहुढंगी मराठी
भाषेस.



सांगली, कोल्हापूर कडचे लोक 'दिवा बंद कर' असे न म्हणता, 'दिवा काढ',
'बल्ब काढ' असे म्हणतात. कॉलेज ला असताना असे म्हणले की लगेच आमचे मित्र
बल्ब सॉकेट मधून काढत आणी म्हणत - हा घे काढला बल्ब.

कटलेट (भाज्यांचे)

वाढणी
२ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • २ बटाटे (ऊकडलेले) , १ गाजर (किसलेले), १ बीट (कीसलेले)
  • २ मिरच्या (बारीक चिरलेल्या), १ वाटी मटार (वाफ़वलेले), १/२ वाटी ब्रेडचा चुरा
  • आलं-लसुण (बारीक चिरलेले), मीठ, तिखट.

मार्गदर्शन

ऊकडलेला बटाटा, गाजर, बीट, मिरची, मिठ,तिखट, मटार, आलं लसुण आणि ब्रेडचा चुरा एका पातेल्यात एकत्र करुन मळून घ्यावे.

हव्या त्या आकाराचे कटलेट हातावर बनवून घेणे आणि फ़्राईंग पॅन मधे थोड्याश्या तेलावर दोन्हीबाजूने खमंग तळणे.

पूणेरी पाट्या

पूणेरी पाट्या


पूण्यात जास्त वेळा जायचे भाग्य लाभले नसले तरी प्रत्येक वेळी पूणेरी पाट्यांनी लक्ष वेधून घेतले.


कदाचित हा विषय मनोगतावर यापूर्वी चर्चिला- चर्विला गेला असेल, तर कृपया दुवा द्यावा (आणि माझा दुवा घ्यावा).

कुटाचे लाडू

वाढणी
२ जणांसाठी दिवसभर खायला

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • 2 चमचे शुद्ध तूप
  • 2 वाट्या शेंगदाणे भाजून त्यांचे केलेले कूट
  • पाऊण वाटी दळलेली साखर
  • अर्धा चमचा वेलचीपूड

मार्गदर्शन
तूप थाळीत फेसायला घ्या. ते हाताच्या उष्णतेने पातळ झाले की त्यात थोडी थोडी करून दळलेली साखर घालत फेसत रहा. साखर फेसून झाल्यावर दाण्याचे कूट आणि वेलचीपूड घालून लिंबाच्या आकाराचे लाडू वळा.

टीपा
फक्त 10 ते 15 मिनिटात होणारे हे उपासाचे लाडू खायचा आनंद घेण्यासाठी लगेचच करुन पहा.

बैठे कामःआराम की हराम?

नमस्कार. आम्ही माहिती तंत्रज्ञानातील आणि इतर संगणकीय बैठ्या क्षेत्रातील 'बुद्धिजीवी' वीर. आमचं डोकं आणि संगणकाच्या कळफलकावरील बोटे या दोनच काय त्या 'चालणाऱ्या' गोष्टी. हातही खूप चालतीलच असं नाही. 'ctrl A','कॉपी','कट','पेस्ट' ही वरदाने आम्ही जेव्हा संधी मिळेल तेव्हा वापरतोच.  

जैसे ऋतुपतीचे द्वार! (१)

नमस्कार,


आता वसंत सुरू झाला आहे, त्या निमित्ताने या चार ओळी लिहाव्या असं वाटलं.


खरं तर वसंताच्या आगमनाची चाहूल लागते ती माघातच! चैत्र, वैशाख हे वसंताचे महिने मानले जात असले तरी माघातल्या संक्रांतीनंतरच्या पंचमीपासूनच वसंताला सुरवात होते. पूर्वीच्या काळी माघ मासातील या वसंतपंचमी पासून वसंतोत्सवाला सुरुवात व्हायची. संक्रांतीनंतर सूर्याचं उत्तरगोलार्धात संक्रमण झाल्यानंतर हवेतली थंडी कमी होऊन वातावरण ऊबदार व्हायला लागतं, झाडांना नवी पालवी फुटू लागते, तसेच थंडीने जडावलेल्या शरीरात आणि मनातही चैतन्याचे अंकुर फुटू लागतात. या उल्हसित झालेल्या चित्तवृत्तींचे उत्सवात रुपांतर न झाले तरच नवल!

कोटा आणि राखीव जागा

आजच मला एक ई संदेश आला - राखीव जागा या प्रकाराविषयी. ज्या कुणाला शिक्षणसंस्थांमधे राखीव जागा असण्याबाबत निषेध नोंदवायचा असेल त्यांनी http://www.petitiononline.com/No_Quota/petition.html 
इथे नोंद करावी.


मी निषेध नोंदवला आहे.