हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना

हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना


आपण सारेच हा प्राणघातक आजार बाळगत असतो. आपले हृदय कितपत प्रभावित झालेले आहे याची आपल्याला कल्पना नसते. आणि मग आपण आपल्या शरीराने दिलेल्या पूर्वसंकेतांकडे पुरेसे लक्ष देण्यात अपयशी ठरतो. याकरता हे जाणणे आवश्यक असते की हृदयाघाताच्या पूर्वसूचना काय असतात.

काजुची बर्फ़ी

वाढणी
२०-२२ वड्या

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • १ वाटी डाळीचे पीठ,
  • १ वाटी काजुची बारीक केलेला (जास्त बारीक नको)
  • साधारण सव्वा वाटी साख़र (कमी गोड आवडत असेल तर साखर थोडी कमी)
  • वेलदोडे पूड
  • एक वाटी साजूक तूप

मार्गदर्शन

साजूक तूपावर डाळीचे पीठ भाजून घ्यावे.

कढईत साखर आणि थोडस पाणी घालुन एकतारी पाक करावा. त्यात डाळीचे पीठ  घालुन जरा परतावे . नंतर काजूची पावडर घालुन जरा परतावे . गोळा होत आला की वेलदोडे पूड घालावी.

अप्पम

वाढणी
चौघांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
360

जिन्नस

  • बासमती तांदूळ २ कप
  • नारळाचे दूध २ कप
  • यीस्ट अर्धा टी स्पून
  • शिजवलेला भात अर्धा कप
  • मीठ चवी पुरते
  • साखर १ टी स्पून

मार्गदर्शन

तांदूळ ३ तास पाण्यात भिजत ठेवा.

अर्ध्या नारळाचे २ कप दूध काढून घ्या. त्यातील अर्धी वाटी दूध, दुसऱ्या एका वाटीत, कोमट करून घ्या. त्यात साखर विरघळवून मग यीस्ट घाला आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.

हृदयविकारः १-झटका का येतो?

हृदयविकारः १-झटका का येतो?


शरीर निकास करू शकते त्यापेक्षा जास्त, मेदयुक्त पदार्थ सतत खात राहिल्यास, शरीर त्यांची विल्हेवाट लावू शकत नाही. त्यामुळे त्यांचे साठे शरीरात साचू लागतात. धमनीच्या भींतींवर मेदाची पुटे चढतात. ह्या पुटांना धमनी अस्तर म्हणतात. हृदयधमनीत अशाप्रकारे साचणाऱ्या सांख्यांमुळे धमनीची रुंदी कमी होते.

आमच्यातला राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव -५

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सध्यःस्थितिप्रेरित दोन नाटके' या टिकालेखातून घेतलेला उतारा ५ भागांत दिला आहे आहे.


वरील विधानावरून कोणास असे वाटेल की, आमचे धोरण आम्हामध्ये काहीच सद्गुण नाहीत असे म्हणण्याचे आहे. आम्हामध्ये सद्गुण आहेत, व ते विपुलही आहेत. ते इतके आहेत की, त्यांत आपणांस जगातील कोणत्याही राष्ट्राशी बरोबरी करता येईल. परंतु त्यांचा उपयोग आपली राजकीय स्थिती सुधारण्याकडे होण्यासारखा नाही. म्हणजे त्यांचे स्वरूप सार्वजनिक नसून खाजगी आहे. उदाहरणार्थ, आपणामध्ये काटकसर, साधेपणा,  शुचिर्भूतपणा वैवाहिक कर्तव्यनिष्ठा, धर्मश्रद्धा वगैरे काही अमोल सद्गुण आहेत. परंतु त्यांचा राजकीय स्थितीशी फारसा निकट संबंध नाही. विलायती कापड आपल्या साधेपणाच्या व काटकसरीच्या आड येते म्हणून, साखरेत हाडे व केशरात गाईचे रक्त असल्यामुळे आपला धर्म बाटतो म्हणून, काचेच्या चिमण्या वारंवार फुटून व घासलेट तेलाने घरास आगी लागून नुकसान होते म्हणून, त्या त्या विलायती जिनसांवर बहिष्कार घालण्याचा आपला प्रयत्न फलद्रुप होईल, हे खरे आहे. पण येथे त्या सद्गुणांच्या सामर्थ्याची मर्यादा संपली. काडतुसात धर्मनिषिद्ध  पदार्थ असतात या भ्रमावर १८५७ सालचे बंडाची इमारत रचली होती. परंतु त्या भ्रमाचा भोपळा फुटताच पुनः  चोहोस्वस्थताकडे  झाली; व हल्ली देशाची इतकी निकृष्टावस्था झाली असताही संतुष्ट असलेल्या देशी पलटणी बिनचरबीची काडतुसे प्रसंग पडल्यास आपल्या अनाथ देशबांधवांवर सोडण्यास तयार होतील. पण यात नवल कसचे? एखाद्या वस्तूत जितका जोम तितकेच काम ती देणार! जास्त कोठून देणार?

१५ मार्च २०९४- अंत ! - भाग-१

१५ मार्च २०९४.


सर्व जग एका संगणक प्रणाली मध्येच व्याप्त होऊन राहिले आहे.. हवेत  उडणाऱ्या ह्या गाड्या ..... उंच च्या उंच ह्या इमारती.... हो उंची वरून आठवले... आपल्याला खाली जाऊन तर महिना लोटला आहे.... होऊ दे रे बाबा महिना कोण जाणार सारखे सारखे १०KM खाली त्या जमीनी वर ? राहू दे पुढच्या महिन्या मध्ये पाहू.

आमच्यातला राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव -४

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सध्यःस्थितिप्रेरित दोन नाटके' या टिकालेखातून घेतलेला उतारा काही भागांत देण्याचा विचार आहे.


इंग्रजांनी हिंदुस्थान देश काबीज करताना वाटतील तसे व तितके अनाचार व अत्याचार केले. ही गोष्ट अगदी खरी आहे. परंतु, कोणत्याही समाजातील नीतिमत्तेची प्रत ठरविताना त्यातील मनुष्ये शत्रूंशी कसे वर्तन करतात, याचा विचार करता येत नाही. कारण वर दर्शविल्याप्रमाणे नीतीचा उगम व उपयोग समाजाच्या अंतर्व्यवस्थेपुरताच असतो. शत्रूशीही धर्माचरण करू पाहणाऱ्या अलौकिक पुरुषास आपण धर्मराजाच्या कोटीत गणू; परंतु तसे न करणाऱ्यास दोष लावता येणार नाही. हल्लीसुद्धा या देशात काही उन्मत्त इंग्रजांकडून  जे अनीतीचे प्रकार होत आहेत, त्यावरून त्यांच्या जातभाईंची अटकळ बांधणे कधीही रास्त होणार नाही. कारण स्वदेशातील लोकमताच्या दबावामुळे जे लोक सद्गुणी असतात, तेच तो दाब उडाल्यावर स्वेच्छाचारी होणे अगदी स्वाभाविक आहे.

रसमलाई

वाढणी
३ ते ४ व्यक्तींसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
240

जिन्नस

  • १ली. गायीचे दूध,पनीरसाठी
  • २ ली. म्हशीचे दूध, बासूंदीसाठी
  • १ चमचा सायट्रीक ऍसिड,
  • १.५+१ वाटी साखर,
  • ४ वाट्या पाणी,
  • चारोळी, बदाम, पिस्ता वगैरे.

मार्गदर्शन

आमच्यातला राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव -३

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सध्यःस्थितिप्रेरित दोन नाटके' या टिकालेखातून घेतलेला उतारा काही भागांत देण्याचा विचार आहे.


यानंतर हिंदुस्थानचा ज्या लोकांशी योग जुळून आला, ते सर्व जगात स्वातंत्र्य प्रिय म्हणून नावाजलेले होते. गुलामगिरीपासून जो पोचटपणा उत्पन्न होतो तो त्यांची अंगी नसून, उलट स्वातंत्र्याबरोबर वास्तव्य करणारा करारीपणा त्यांचे अंगी बाणला होता. हे लोक अन्यायाचे व जुलुमाचे पूर्ण द्वेष्टे होते; व त्यांच्या स्वातंत्र्य प्राप्तीस स्वराष्ट्र पुरेसे न वाटून तिने इतर देशांतही आपले ध्वज उभारिले होते. सुयंत्र राज्यव्यवस्था व लोकस्वातंत्र्य यांचे जितके योग्य मिश्रण शक्य असते, तितके यांच्या राज्यपद्धतीत असून त्या पद्धतीचे अनुकरण इतर राष्ट्रेही करू लागली होती. फ्रान्स व अमेरिका या देशांस प्रजासत्ताक राज्ये स्थापण्याचे कामी हेच लोक पर्यायाने गुरू झाले होते; व ग्रीस, रोम इत्यादी एकदा अत्युच्च शिखरास पोहोचून नंतर अवनतीच्या डोहात बुडालेली राष्ट्रे पुढे पुन्हा डोकी वर काढू लागणार होती, तीही याच लोकांचा कित्ता डोळ्यासमोर ठेवून. या लोकांनी पुढे ऑस्ट्रेलिया, कानडा वगैरे देशांस आपण होऊन स्वराज्य अर्पण केले. या लोकांचे करारीपणाचे तेज या प्रकारचे असल्यामुळे यांना हिंदुस्थानासारख्या तेजोहीन देशावर सहज विजय मिळवता आला.