अधुरी प्रेम कहाणी

पावसाळी दिवसातील ती दुपार होती, साधारण २-३ वाजले असतील पण सूर्याचा
कुठेच ठाव-ठिकाणा नव्हता.  आकाश काळ्या ढगांनी भरले होते, पावसाची
बारीक-बारीक रिपरिप चालूच होती.,



सगळी धरती हिरवी-गार झाली होती, नारळाची झाडे मुक्त होऊन वाहणाऱ्या वाऱ्या
बरोबर डोलत होती. घरात बसूनही कंटाळाच आला होता, मग कपडे चढवले, पायात
चप्पल अडकवली आणि

आत्माहुतिचा अमृतमहोत्सव

आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद (चंद्रशेखर सीताराम तिवारी) यांच्या तेजस्वी बलिदानास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे ते अखेरपर्यंत 'आजाद' राहीले, अनेक वर्षे जंग जंग पछाडूनही इंग्रज सरकार त्यांना पकडु शकले नाही.


एकदा भूमिगत क्रांतिकारक आग्रा येथील मुक्कामी असताना उघड्याबंब बसलेल्या आजादांकडे पहात भगतसिंह हसत म्हणाले की पंडितजी, तुम्हाला फ़ाशी द्यायचे तर इंग्रजाना दोन दोर आणावे लागतील, एक गळ्यात आणि एक पोटाभोवती. त्यावर एकदम उसळत आजादांनी आपले कमरेला डावीकडे खोचलेले मॉवजर उजव्या हातात घेतले आणि ते म्हणाले, देखो रणजीत (भगतसिंहांचे एच.एस.आर.ए. मधील सांकेतिक नाव) ये रस्सा फ़स्सा तुम्हे मुबारक हो, मुझे फ़ासी जानेका कोइ शौक नही. जब तक यह बमतुल बुखारा मेरे पास है, कोइ माई का लाल अपनी मा का दूध नही पिया जो हमे जिवीत पकड ले जाये.

गमभन - ऑनलाईन/ऑफलाईन टंकलेखन सुविधा

गमभन - टंकलेखन सुविधा

आज आपल्या सर्वांसाठी 'गमभन - टंकलेखन सुविधा' सादर करताना मला कार्यसाफल्याचा आनंद होत आहे.
ऑफलाईन आणि उच्चारानुरूप टंकलेखन करण्यासाठी बरेच जण शोध घेत होते/आहेत. आज मी मनोगताच्या टंकलेखन सुवेधेशी मिळती जुळती आणि उच्चारानुरूप चालणारी ऑफलाईन/ऑनलाईन टंकलेखन सुविधा आपल्या वापरासाठी येथे देत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर

ज्यांनी १८५७ च्या हुतात्म्याना हौतात्म्य मिळवुन दिले, ज्यांनी बदनाम ठरवलेल्या बंडाला स्वातंत्र्यसमर हे नाव दिले ते स्वातंत्र्यवीर सावरकर.लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांनी ज्यांचे हस्तलिखित ग्रंथांतरीत होण्यापूर्वी भयग्रस्त होवुन जप्त केले अणि तरीही जो ग्रंथ हॉलंड, अमेरिका व हिंदुस्थानात प्रसिद्ध झाला व लाखोंकडुन मुखोद्गत केला गेला, ज्या ग्रंथाने पुन्हा एकदा क्रांतीची ठिणगी पेटवली त्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' चे लेखक सावरकर

सिमला भजी

वाढणी
२ जण

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • सिमला उर्फ ढब्बू मिरची २ (लांब आकाराच्या)
  • डाळीचे पीठ १ वाटी, अधपाव वाटी तांदुळाचे पीठ
  • लाल तिखट १ चमचा, हळद अर्धपाव चमचा, हिंग चिमुटभर, मीठ
  • तळणीसाठी तेल

मार्गदर्शन

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

घरी गेले होते तेव्हा माझा भाचा,समीर याने पुढील कविता मला ऐकवली.

जंगलाच्या झाडीत वाघोबा लपले
म्हातारीला पाहून खुदकन् हसले
"थांब थांब म्हातारे कुठे चालली?
खाऊ दे तुजला, भूक फार लागली."
"थांब थांब वाघोबा, लेकीकडे जाऊ दे
लेकीचे लाडूपेढे मला खाऊ दे."
दोनचार दिवसांनी गंमत झाली
भोपळ्यात बसून म्हातारी आली
वाघोबाने भोपळा मध्येच अडविला
भोपळ्याच्या आतून आवाज आला,
"कशाची म्हातारी? कशाची कोतारी?
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक !"

'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' ही कथा माहिती असल्याने ह्या कवितेत काही भाग गळपटला असल्यासारखं वाटत आहे.

अन्नातून रोगप्रसार

मानवप्राणी अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असल्याने त्या सजीवांच्या आरोग्या-अनारोग्याचा त्याच्या प्रकृतीवर परिणाम होणे हे अगदी स्वाभाविक वाटते. मांसाहारामध्ये हा परिणाम बऱ्याचदा वाचनात आलेला आहेच ( उदा. बर्ड-फ्ल्यू ) परंतु हा धोका शाकाहारामध्येदेखील आहे का? हे जाणून घेण्याची इच्छा आहे.