आणि कविता खपल्या... (५)

आपल्या आयुष्यातल्या पेचप्रसंगांवर विचार करत करत दोघं जण भकास अवस्थेमधे शनिपाराच्या पायर्‍यांवर बसले होते. शनिवारचा दिवस, दुपारी बाराची वेळ आणि शनिपाराच्या पायर्‍यांवर बसलेलं हे उध्वस्त अवस्थेमधलं कवी जोडपं... आजु बाजुला तूफान गर्दी जमली होती.. पण त्या गर्दीकडेही त्यांच लक्ष नव्हतं...  (अर्थात गर्दी काही त्यांना बघायला जमली नव्हती! कोणतातरी सण होता म्हणे एक दोन दिवसात, तर त्यानिमित्त चितळ्यांकडे लागलेली रांग वळून पार शनिपारा पर्यंत आली होती त्याची गर्दी होती ती!)

आणि कविता खपल्या... (४)

मनोगत सोडून जायच्या आधी एकदा अश्रूभरल्या नयनांनी वगैरे त्या दोघांनी मनोगतावर आपण केलेली प्रतिभेची उधळण पुन्हा पुन्हा डोळ्यांत भरून घेतली. ती उधळण आणि अश्रू दोन्ही डोळ्यांमधे भरून भरून काही दिसेनासं झालं तेंव्हा त्यांनी एकदा शेवटची पान ताजं तवानं करायची टिचकी मारली आणि जाण्याच्या नोंदीवर टिचकी मारणार इतक्यात चिंटुला 'निरोप वाचावे' च्या पुढच्या कंसात १ आकडा दिसला. आपल्याला कोणी बरं काय निरोप पाठवला असा विचार करत करत चिंटुनी निरोपाचा कप्पा उघडला. निरोपाच्या कप्प्यात कोण्या पिंकी नावाच्या मनोगतीचा निरोप होता. मिनीचं आपल्याकडे लक्ष नाही ना हे बघत चिंटुनी तो निरोप उघडला. तो निरोप असा:

तू फक्त 'हो' म्हण !

प्र. : खालील कविता पूर्ण करा. '.....' च्या जागी कितीही ओळी लिहू शकता.
व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
....................
मला तू फक्त 'हो' म्हण !

असाही विमा !

मनोगतींच्या ठाणे येथे आनंदात, उत्साहात पार पडलेल्या कट्ट्यात काय झालं हे तर बरेच जणं सांगतीलच, पण कट्ट्यानंतर मला काय अनुभवायला मिळालं हे मला सांगावंसं वाटत आहे.

सर्वांचा निरोप घेऊन मी ठाण्याच्या स्टेशनला पोहोचले. तिकिट काढून मला हव्या त्या फलाटापर्यंत पोहोचेपर्यंत माझी लोकल मला वाकुल्या दाखवत माझ्या समोर निघून गेली.

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२१)

 

                     ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # २१.


काळवेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥

पाठभेदः हरिनाम=नाम हरि, ज्ञानदेवा=ज्ञानदेवीं

आणि कविता खपल्या... (३)

आणि एक दिवस जिलब्या गणपतीला प्रदक्षिणा घालताना अचानक त्यांना एक खल्लास आयडिया सुचली...


त्याचं झालं असं की जिलब्या गणपतीला येताना ती दारात बसलेल्या त्यांच्या नेहमीच्या हार - फुलं वाल्याकडे गेले होते. नेहमीसारखाच गणपतीला हार घेतला (हल्ली चिंट्या मिनीला गजरा घ्यायच्या ऐवजी देवाला हार घ्यायला लागला होता.. कालाय तस्मै नमः हेच खरं!) तर हार घेताना असं लक्षात आलं की आज सगळे बोगनवेलीच्या फुलांचे हात आहेत, नेहमीचे शेवंती, गुलछडी असे नाहीत. म्हणून त्यांनी हारवाल्याला विचारलं की का रे बाबा हे असे हार का? तर त्यानी उत्तर दिलं 'अवो सायेब आजकाल ह्याच फुलांना ज्यादा डिमांड हाये. आपल्याला काय, कष्टमर ज्ये मागतो त्ये आपन बनवतो. हे असंच चालतं बगा बाजारात. बोगनवेल तर बोगनवेल, उद्या कुनी सदाफ़ुलीचे हार मागितले तर आपन सदाफुलीचे बनवू की'

आणि कविता खपल्या... (२)

कथेचा या आधीचा भाग http://www.manogat.com/node/4380


कविता खपवण्याच्या आपल्या प्रयत्नामधे चिंटु आणि मिनी दिवस रात्र मनोगतावर येउन आपल्या प्रतिभेचे शिंपण करायला लागले. सुरुवातीला अर्थातच त्यांना फारसे कोणी ओळखत नव्हते. आणि म्हणून आपल्या कवितांना कोणीच दाद देत नाही किंवा काहीही प्रतिक्रियाही देत नाही असं त्यांना वाटलं. मग त्यांनी एक idea केली. चिंट्यानी कविता टाकली की मिनीनी वा वा म्हणायचं आणि मिनीनी कविता टाकली की चिंट्यानी वा वा करायचं. कवितेला एक दाद मिळाली की इतरही कोणीतरी दाद देइलच असं त्यांचं calculation होतं. पण तरीही चतुर मनोगती काही यांच्या कवितांवर बोलायला तयार नाहीत.