वाईवरून कोल्हापूर

आमच्या कोंकणात (म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात) 'वाईवरून कोल्हापूर' असा एक वाक्प्रचार वापरला जातो. 'उगाचच अति लांबच्या मार्गाने जाणे' असा त्याचा अर्थ. रत्नागिरी जिल्ह्याचा नकाशा नि रडतोंडीचा घाट एवढे लक्षात घेतले की त्याचा अर्थ अगदी स्पष्ट होतो.
पण नुसतेच हिंडायला जायचे असेल तर कमीत कमी वेळ आणि अंतर हे निकष लावण्याची गरज नसते. पावसाळ्यात निरुद्देश भटकणे असेल तर मग 'ते निकष न लावणे' हीच गरज बनते.

कामथे काका (भाग चोविसावा)

काका पेपर वाचता वाचता सोफ्यावर आडवे झाले. सोफ्यावर झोपलेलं नीताला आवडत नाही हे, ते केव्हाच विसरले. झोपेची पेंग एवढी होती की नियम आणि आवड निवड यांचा विचार करायला शरीर तयार नव्हतं. नीताच्या लक्षात आलं की ते सोफ्यावर झोपल्येत, पण ती काहीच बोलली नाही. हल्ली ती का नरमली होती कोण जाणे. कदाचित तिरस्कार आणि तक्रार करायला ती कंटाळली असावी किंवा तिने त्यांना खरंच स्वीकारलं असावं. असो. पंधरावीस मिनिटांनी काका उठून बसले. खडबडून जागे झाले ते एका स्वप्नाने. स्वप्नात त्यांना एक बोळ वजा अंधारी गल्ली दिसली. तिथेच कुणाला तरी बांधलेलं दिसलं.

प्रपोजल- एक नाटक

ह्या नाटकाला २८ पारितोषिके मिळाली आहेत आणि टीकाकारांनी उचलून धरले आहे, अशी बरीच ख्याती कानावर आली होती. त्यामुळे हे नाटक बघायचे असे मनाशी ठरवले होते. त्याप्रमाणे, एकदाचा, एका रविवारी मुहूर्त मिळाला. तिकीटे काढल्यावर लक्षांत आले की डॉ. अमोल कोल्हे, आता काम करत नसून त्यांच्या जागी कोणी 'आस्ताद काळे' काम करतात. पण अदिती सारंगधर आहे, हे पाहून बरे वाटले.