इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी -२

दिवेकर खाली उतरला. अत्यंत घाईघाईनं त्यानं चेहऱ्यावर गांभीर्य आणि नाटकी विनम्रपणा यांच्या समसमान मिश्रणाचा एक थर चढवला आणि आत पाऊल टाकलं. अर्थातच रिवाजाप्रमाणे शिक्षणचुडामणींकडे लोक आले होते, ते बिझी होते, त्यांनी पाच मिनिटं बसायला सांगितलं होतं, वगैरे.

मोठं होऊन बसलेल्या कुठल्याही माणसाला भेटण्यासाठी जितका वेळ ताटकळणं आवश्यक असतं तेवढं ताटकळून झाल्यावर तो एकदाचा आत गेला. आत शिक्षणचुडामणी आपल्या गुबगुबीत खुर्चीत जोधपुरीत बसले होते. दिवेकरचा हात हातात घेऊन त्यांनी दिवेकरचं तोंडभर स्वागत केलं.

इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी -१

आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर सुधन्वा दिवेकर ग्लासमध्ये कडक कॉफी ओतून, तो समोर ठेवून विचारमग्न अवस्थेत बसला होता. एखादी अत्यंत नवीन, महत्त्वाची कल्पना कुणासमोर मांडायची असली की तो आधी अर्धा एक तास असाच तंद्रीत बसायचा. आज त्याची अकरा वाजताची वेळ ठरली होती. तीही शिक्षणचुडामणी बाळासाहेब कलंत्रे यांच्याबरोबर.

१. अध्यात्म : पूर्वभूमिका

१) अध्यात्माचा साधा अर्थ आपण मुळात काय आहोत हे समजणे असा आहे. जे तुम्हाला समजेल ते तुम्ही आत्ता, या क्षणी आहातच त्यामुळे अध्यात्म म्हणजे तुमचा तुम्हाला पत्ता सांगण्या सारखे आहे. जीवनातली सगळी निराशा, टेन्शन्स, असहायता आणि जे जे काही म्हणून उणे आहे ते आपण मुळात कोण आहोत हे न समजल्यामुळे आहे. आपल्या मूळ स्वरूपाला सत्य, शाश्वत, अमृत, शून्य, आत्मा, निराकार, अनंत, अपरिवर्तनीय अशी अनेक नांवे आहेत पण सगळ्याचा अर्थ एकच आहे. त्यामुळे  अध्यात्मात शब्दाला महत्त्व नसून कळण्याला आहे.

टूथपेस्ट ते दंतमंजन

"सुमे, गधडे, मला दंतमंजन देतेस होय गं दात घासायला... ते काही नाही, मला टूथपेस्टच हवी आहे, आणि तीदेखील ताबडतोब! " दहा वर्षांच्या मनीषाचा आरडाओरडा ऐकून घरातली सगळी मंडळी जांभया देत, डोळे चोळत आवाजाचा मागमूस घेत परसात आली. पायऱ्यांच्या जवळच्या गुलबक्षीच्या ताटव्यापाशी मनीषा एका खांद्यावर नॅपकीन, हातात टूथब्रश आणि चेहऱ्यावर चिडके भाव अशा थाटात तिच्याच वयाच्या सुमावर गरजत होती. "मनू बेटा, घरातली टूथपेस्ट खरंच संपली आहे गं, वाण्याचं दुकान उघडलं की लगेच देते हं आणून तुला टूथपेस्ट! " मावशीबाई मऊ आवाजात मनीषाची समजूत काढीत म्हणाल्या.

एका मावशीची आठवण.

जुलै २००६ ला मी पुण्याच्या अभिनव कला मंदिरात प्रवेश घेतला...   पहिल्यांदाच खेड्या-पाड्यातून उच्चभ्रू जगात आल्यावर आपला गावंढळ साधेपणा सतत आपल्या दरिद्री मनाला टोचत असतो,   हिणवत असतो. माझ्याही अवस्था या नियमाच्या बाहेर नव्हती. पण त्याबद्दल मी कधीतरी लिहीलच...

खरं काय आणि खोटं काय... १

"दुनिया ही अशी तिरपागडी आहे बघ, बापू" गौतम म्हणाला. " ती आहे तशी रंगरंगीली, आणि म्हणून तुम्ही लेखक अगदी बाह्या सरसावून लिहायला बसता. पण या रंगीबेरंगी दुनियेतले फार थोडे रंग लेखकांना त्यांच्या लिखाणात आणता येतात. आता तुझंच उदाहरण घे. तू कथा लिहितोस. कधीकधी चांगल्याही लिहितोस" गौतमचा स्वर किंचित मिश्किल झाला. " म्हणून तुला वाटेल की लेखकाच्या कल्पनाशक्तीसमोर सत्य  हे काहीच नव्हे. तुझ्या लिखाणातली पात्रं, त्यांचे विचार जगावेगळे, अगदी झगझगीत असतात असं वाटेल तुला. पण वस्तुस्थिती बरोबर उलटी आहे. या..