सुजी, की आणि जागतिक बदलाचे वारे

या आधीचा भाग इथे वाचा : दुवा क्र. १

-----------------------------------------------------

मी सुजाता काटकर. इ. ९ वी.

सध्या आमच्या वर्गात वार्षिक परिक्षेनिमित्त निबंधलेखनाचा सराव चालू आहे. तसा प्रत्येक विषयाचा काही ना काही सराव चालूच आहे. तरी गणितं किंवा सायन्सचं जर्नल त्यातल्या त्यात बरं असतं - म्हणजे पुस्तकातून तश्या प्रकारची गणितं पहायची आणि ती पाहून ही सोडवायची. सायन्सच्या जर्नलमधल्या आकृत्या वगैरे तर सरळ सरळ पुस्तकातून कॉपी करायच्या असतात. पण भूगोलाचे नकाशे किंवा निबंध आला की वाट लागते. निबंधाला तर फुल्ल आपापलंच डोकं चालवावं लागतं.

एक शोधयात्रा !

लहानपणापासून मला अन माझ्या बहिणीला वाचनाचं अतोनात वेड! कदाचित आमची आई ग्रंथपाल असल्याने असेल. ती दर सुटटीच्या दिवशी नवनवीन पुस्तके शाळेतून घरी आणायची, शिवाय "मंजूरी" साठीचे गठठेही येऊन पडलेले असायचे. दर शनिवारी शाळेतून घरी जाताना ' आज आपल्याला कोणते पुस्तक मिळणार? ' हाच विचार मनात घोळत असायचा. या शिवाय प्रत्येक पुस्तक प्रदर्शनाला आम्ही जायचो ते वेगळंच! फास्टर फेणे, चंदू अशासारख्या खास बाल / कुमार साहित्यापासून ते थेट कोरलईच्या किल्लेदारापर्यंत ( हे अगदी खास विविध घटनांनी भरलेले, चक्क दोन मोठठे भाग असलेले पुस्तक होते..

खेकडा नि कबिला (भाग २)

पळत जाण्याचा बेत रद्द झाला. गार-गार वाऱ्यात नि सटंसटं मार देणाऱ्या पावसात घराची वाट चालत होते.  रेनकोटच्या टोपीवरचं पाणी निथळून त्याचा टपटप आवाज येत होता.  आडव्या-तिरप्या पावसाच्या मोठाल्या थेंबानं माझा जीव एवढासा झालेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं स्वच्छ खळाळणारे ओहोळ जोरात वाहात होते. पावसाचा नाद-वाऱ्याचा नाद-ओहोळाचा नाद-नि पाखरं चिडीचूप बसल्यावरचा शांततेचा नाद-मधनंच खोडसाळ पिलावर ताणून आवाज करणारा पाखराचा नाद-माझ्या चालण्याचा आवाज-रेनकोटवर पडणाऱ्या थेंबांचा नाद-माझ्या शांततेचा अगदी मनातला आवाज---या साऱ्या नादानं माझा जीव अगदी वेडावलेला.

पिठल्याच्या वड्या

वाढणी

पाककृतीला लागणारा वेळ
10

जिन्नस

  • डाळीचे पीठ १ वाटी
  • आले, लसूण पेस्ट १ चमचा
  • मीठ चवीप्रमाणे
  • फोडणीचे साहित्य
  • तेल
  • खिसलेले खोबरे
  • दाण्याचा कूट
  • मसाला
  • तिखट

मार्गदर्शन

खिसलेले खोबरे, दाण्याचे कूट, तिखट, मसाला, मीठ एकत्र करून घ्यावे. हे झाले सारण तयार.  

'आनंदाचे डोही'

स. न. वि. वि.

महाराष्ट्रातील वंचित जनतेच्या प्रश्नांबाबत गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या 'वंचित विकास' (दुवा क्र. १) या संस्थेचे नाव कदाचित आपणास परिचित असेल. १९८५ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या या संस्थेचे महाराष्ट्रात सध्या १३ ठिकाणी काम चालू आहे. १९९३ पासून महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशात छिंदवाडा इथेही संस्थेचा आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहे.