दारावर थाप पडली आणि विलासप्रसादांची झोप मोडली. आज पाडवा असूनही विलासप्रसाद अंमळ उशीराच उठले. उठल्याबरोबर ताबडतोब त्यांनी आरशात पाहून केस व्यवस्थित केले, ठेवणीतले हास्य तोंडावर चिकटवले आणि दार उघडले.
हातात ओवाळायचे ताट घेऊन बाईसाहेब उभ्या होत्या.
"हे काय तुम्ही अजून तयार नाही. आज पाडवा ना. रितेशबाबा पण अजून उठायलाय"
कावरेबावरे होऊन विलासप्रसादांनी आजूबाजूला पाहिले.
"अगं हळू बोल. कोणी ऐकलं तर.. खुर्ची जाईल माझी "
"का काय झालं.?"